Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )--हात उसने घेतलेल्या रकमेची परतफेड न केल्यामुळे वसुली करीता न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात आरोपीला तीन लाख रुपये दंड तसेच एक वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे  या बाबत मिळालेली माहीती अशी की शेख ईरफान रशिद रा अहमदनगर याने त्याचा मित्र विष्णू हीरा सारस यास दोन लाख रुपये सारस यांच्या व्हँन दुरुस्तीसाठी दिले होते या पैशापोटी सारस यांनी शेख ईरफान यांना धनादेश दिला होता   तो धनादेश वटला नाही म्हणुन दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी श्री . यु . पी . देववर्षी  यांनी दिला असुन आरोपी विष्णु हिरा सारस रा. भिंगार यांस १ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व नुकसान भरपाई म्हणुन फिर्यादीला ३ लाख रुपये देण्यांचा आदेश दिला आहे आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास ६ महिण्याचा सश्रम कारावाची शिक्षा सुनावण्यात आली आहे  . सदर खटल्यात फिर्यादीचे वतीने अँड . शेख हाफिज एन . जहागीरदार , नोटरी पब्लीक व अँड . दावर एफ शेख , अहमदनगर यांनी काम पाहिले . भिंगार येथील फिर्यादी शेख इरफान रशिद याने सन २०१२ मध्ये त्याचा मित्र आरोपी विष्णु हिरा सारस रा - भिंगार यांस २ लाख रुपये आरोपीची व्हॅन दुरुस्ती करीता हात उसनवार दिले होते फिर्यादीने आरोपी कडे सदर रक्कमेची मागणी केली असता सदर रक्कमेचे परत फेडी पोटी आरोपीने फिर्यादीला दिलेला धनादेश वटला नाही म्हणुन फिर्यादीने आरोपीला वकिला मार्फत नोटीस पाठवुन धनादेशाचे रक्कमेची मागणी केली होती परंतु आरोपीने मुदतीत धनादेशाची रक्कम दिली नाही म्हणुन फिर्यादी याने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात आरोपी विरुध्द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अँक्टचे कलम १३८ प्रमाणे खटला दाखल केला होता आरोपीने दिलेला धनादेश हा भिशीचे व्यवहाराचे सिक्युरीटी पोटी दिलेला होता सदर धनादेशाचा फिर्यादी गैर वापर करीत आहे आरोपी फिर्यादीची कोणतीही रक्कम देणे लागत नाही असा बचाव आरोपीने घेतला होता परंतु न्यायालयाने आरोपी बचाव अमान्य करुन सदर खटल्याचा निकाल दिनांक १०/१२/२०२१ रोजी देवून व आरोपीला दोषी धरुन १ वर्षाचा सश्रम कारावासची शिक्षा व ३ लाख रुपये नुक्सान भरपाई आरोपीने फिर्यादीला दयावी आरोपीने नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादीला न दिल्यास आरोपीला ६ महिण्याची सश्रम कारवासाची शिक्षा सुनावली आहे . सदर खटल्यात फिर्यादीचे वतीने अँड . शेख हाफिज एन . जहागीरदार , नोटरी पब्लीक व अँड . दावर एफ . शेख यांनी काम पाहिले .


अहमदनगर (प्रतिनिधी)-नेवासा तालुक्यातील कांगोणी येथील अलिकडेच पडलेल्या दरोड्याचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला मागील 15 दिवसांत नेवाशासह राहुरी व पाथर्डी तालुक्यातील वस्त्यांवर दरोडे टाकणारी तिघा सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद केली आहे.याबाबत माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील शिंगणापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कांगोणी येथे 5 डिसेंबर रोजी रात्री बबन जगन्नाथ बेल्हेकर यांच्या वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी घराचा मागील दरवाजा तोडून आत प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आईला चॉपर व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा 3 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला.सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी समांतर तपास करत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबर्‍याकडून हा गुन्हा आरोपी रवींद्र भोसले याने व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. त्यामुळे स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने गंगापूर येथे जाऊन आरोपींचा शोध घेतला.आरोपी रवींद्र मुबारक भोसले रा. गंगापूर जि. औरंगाबाद यास ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचे साथीदार लखन चव्हाण, कुलथ्या भोसले व इतर साथीदारांनी मिळून केला असल्याची माहिती दिल्याने सदर माहितीच्या आधारे त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन आरोपी नंबर उर्फ लखन प्रल्हाद चव्हाण रा. अंतापूर ता. गंगापूर जि. औरंगाबाद व कुलथ्या बंडू भोसले रा. बाबरगाव ता. गंगापूर यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून ताब्यात घेतले.ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे वरील गुन्ह्या व्यतिरिक्त आणखी कुठे गुन्हे केले याबाबत चौकशी केली असता त्यांनी मागील 15 दिवसांच्या कालावधीत नेवासा व राहुरी तालुक्यात प्रत्येकी दोन तर पाथर्डी तालुक्यात एक असे 5 ठिकाणी गुन्हे केल्याचे सांगितले.दुसरा आरोपी कुलथ्या बंडू भोसले याचेविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथे गेल्यावर्षी एक दरोडा तर औरंगाबाद जिल्ह्यातील वाळुंज येथे 2020 मध्ये तीन व 2019 मध्ये दरोड्याचे दोन गुन्हे दाखल आहेत.अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे व शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सुनील चव्हाण, दत्ता हिनगडे, मनोहर गोसावी, संदीप पवार, दत्ता गव्हाणे, पोलीस नाईक शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, आकाश काळे, सागर ससाणे, रोहित येमूल व चालक हवालदार बबन बेरड यांनी ही कारवाई केली.दरम्यान काल तीनही आरोपींना नेवासा न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.


श्रीरामपूर प्रतिनिधी-शहरामध्ये गेल्या महिनाभरापासून वेगवेगळ्या भागांमध्ये दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वेगवेगळ्या भागातील कॉलन्यांमध्ये बाहेर उभ्या असलेल्या दुचाकींचे पेट्रोल चोरून नेण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पोलीस यंत्रणा मात्र या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला सक्षम पोलीस अधिकारी नियुक्त करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.गेल्या महिनाभरात शहरातून मोठ्या प्रमाणात दुचाकी वाहने चोरीला गेली आहेत. अगदी घरासमोरून गाड्या चोरून नेल्या जात आहेत. याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास तुम्ही सध्या तपास करा, शोधा, मग आमच्याकडे या, अशी उत्तरे दिली जातात. वॉर्ड नंबर 2 मध्ये तर एका महिलेने आपल्या घरासमोरून चोरीला गेलेली गाडी स्वतः शोधून काढली आणि श्रेय मात्र पोलिसांनी घेतले अशीही चर्चा आहे.माजी आ. स्व. जयंत ससाणे यांचे तत्कालिन स्वीय सहाय्यक सुभाष तोरणे यांची दुचाकी अशीच चोरीला गेली. तिचा अद्याप तपास लागलेला नाही. पत्रकार अनिल पांडे यांच्या दुचाकी चोरीचाही तपास लागला नाही. वॉर्ड नंबर 7 मध्ये एका घरासमोरून गेलेली दुचाकी सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत असताना चोरटे अद्याप सापडलेले नाहीत.

दुसरीकडे मिल्लतनगरमध्ये असलम बिनसाद तसेच गुलाबभाई शेख यांच्या घरासमोरील गाड्यांमधून पेट्रोल चोरीला गेले आहे. फातेमा कॉलनी, मिल्लतनगर, संजयनगर परिसरातील अनेक घरांसमोरून गाड्यांतून पेट्रोल चोरून नेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. पेट्रोल चोरी करणारी मोठी टोळी श्रीरामपूरमध्ये कार्यरत असून त्याच्या जोडीला वॉर्ड नंबर दोन मधील धनगर वस्ती परिसरातील अनेक लोक पेट्रोल चोर्‍या करतात. पोलिसांनाही ते माहिती आहे. परंतु तडजोडीतून याकडे दुर्लक्ष केले जाते. यापूर्वी मोबाईल चोरीच्या घटना घडत होत्या. आता पेट्रोल चोरीच्या घटना वाढत आहेत.सर्वसामान्य माणसे आपली वाहने घराबाहेर लावतात. परंतु चोरटे त्यावर डल्ला मारतात. वरून पोलीस तपास होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहराच्या सर्वच भागात पोलिसांनी रात्रीची गस्त सुरू करावी. चोरट्यांशी संबंध असलेल्या पोलिसांच्या तातडीने बदल्या कराव्यात. जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी श्रीरामपुरात येऊन शांतता कमिटी तसेच प्रत्येक भागातील प्रमुख नागरिकांची बैठक घेऊन हे प्रश्न समजून घ्यावेत, अशी मागणी शहरातील त्रस्त नागरिकांनी केली आहे.


बेलापुर  (प्रतिनिधी  )-भारताचे पहिले सी डी एस जनरल बिपिन रावत, त्यांची धर्मपत्नी मधुलिका रावत व इतर अकरा लष्करी जवानांच्या अपघाती मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून, देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. बेलापुरातही ग्रामस्थ व पत्रकारांच्या वतीने हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.


येथील विजयस्तंभाजवळ सीडीएस जनरल बिपिन रावत यांचेसह सर्व हुतात्म्यांचे स्मरण करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी " अमर रहे! अमर रहे! बिपिन रावत अमर रहे! " अशा घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी जि प सदस्य शरद नवले, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ज्येष्ठ पत्रकार देविदास देसाई आदिंनी श्रद्धांजलीपर शब्दसुमन वाहिले. 


यावेळी माजी पोलीस पाटील शिवाजी वाबळे, पोलिस नाईक गणेश भिंगारदे, पत्रकार सुहास शेलार, दिलीप दायमा, किशोर कदम, शकील शेख, गणेश आढाव, बेलापूर सोसायटीचे चेअरमन अनिल नाईक, श्रीरामपूर पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष कुऱ्हे, भास्कर बंगाळ, गणेश बंगाळ,शफीक आतार बाबा शेख बापू कुऱ्हे बाळासाहेब लगे नामदेव दुधाळ डाँक्टर रविंद्र गंगवाल अन्वर सय्यद, शफिक शेख, रावसाहेब अमोलिक, मच्छिंद्र खोसे, बाळासाहेब निकम, मोहन सोमाणी, संजय गोरे, महेश ओहोळ आदी उपस्थित होते.


भारतीय लष्कराचे चीफ डिफेन्स ऑफ स्टाफ बिपिन रावत यांचे त्यांच्या पत्नी सह 13 जणांचे तामिळनाडू येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत निधन झाले असून भारतीय सेनेचा रत्न हरपला असल्याच्या प्रतिक्रिया महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी व्यक्त केल्या दिनांक दहा-बारा 2021 रोजी पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात बिपिन रावत यांची श्रद्धांजलीपर शोकसभा घेण्यात आली यावेळी श्रद्धांजलीपर भावना व्यक्त करताना बरकत त अली शेख पुढे म्हणाले की गोरखा ब्रिगेडचे सी ओ ए एस बनणारे बिपिन रावत हे चौथे  अधिकारी बनवण्यापूर्वी लष्कर प्रमुख झाले ईशान्येतील दहशतवाद कमी करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता म्यानमार मधील 2015 सालातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यास प्रत्युत्तर देण्यात आले त्यात त्यांची प्रमुख भूमिका होती 2016 मधील सर्जिकल स्ट्राइक मध्ये त्यांनी प्रमुख भूमिका निभावली त्यांच्या विविध उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल, युद्ध सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, सेना पदक, अशी पदके देऊन गौरविण्यात आले होते त्यांच्या निधनाने भारतीय सेनेत व देशभरात दुखवटा पसरला आहे परमेश्वर त्यांच्या थोर आत्म्यास शांती देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली शेख यांनी अर्पण केली सामूहिक राष्ट्रगीताच्या स्वरात बिपिन रावत यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी अहमदनगर जिल्हा इलेक्ट्रॉनिक मीडिया चे जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, सामाजिक कार्यकर्ते सरंवर अली सय्यद, यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या शोक सभेच्या कार्यक्रमास पत्रकार संघाचे प्रदेश कार्याध्यक्ष अमीर भाई जहागीरदार, पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार, अहमदनगर इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद, सामाजिक कार्यकर्ते सरवर अली सय्यद, शहर काँग्रेस सरचिटणीस नजीर भाई शेख, सामाजिक कार्यकर्ते बुऱ्हाण भाई जमादार, सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा,  पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बीके सौदागर, अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इमरान शेख, पत्रकार संघ सदस्य सार्थक साळुंके, अहमदनगर महिला जिल्हाध्यक्ष सौ समीना रफिक शेख, कुमारी माहीम शेख, आदि पत्रकार व कार्यकर्ते उपस्थित होते.


बेलापूर (प्रतिनिधी)- येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून 'एड्स समज व गैरसमज' या विषयावर श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयातील वैज्ञानिक अधिकारी लक्ष्मीकांत करपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी एड्स या आजाराबाबत असलेली सद्यस्थिती, व मार्गदर्शन करतांना, एड्सबाबतची भीती बचाव याचे सविस्तर विवेचन आपल्या मार्गदर्शनातून उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे या होत्या. यावेळी महाराष्ट्र पोलिस सेवेत प्रविष्ट झालेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी आरती खर्डे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. रुपाली उंडे, श्रीरामपूर तालुका जिल्हा रुग्णालयातील तंत्रज्ञ पुरुषोत्तम शिंदे ,

प्रा. डॉ. संजय नवाळे, प्रा. अशोक थोरात, आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. अशोक माने यांनी केले. तर  प्रा.रुपाली उंडे यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमातील अनाथ मुलांची जबाबदारी बेलापुर ग्रामस्थांची असुन या आश्रमातील समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जि प सदस्य शरद नवले यांनी दिली              महावितरणचे कर्मचारी चेतन जाधव यांनी दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी मिळालेला बोनस गरीबांना मदत म्हणून  देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार त्यांना मिळालेल्या बोनसचे चार हजार रुपये तसेच तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी दिलेला मदतीनिधी श्री साई विठ्ठल अनाथ आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला त्या वेळी बोलताना जि प सदस्य शरद  नवले म्हणाले की या ठिकाणी आश्रमास पत्र्याचे शेड बांधुन देण्याची मागणी असुन त्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत तसेच येथील मुलांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करु या आश्रमाचे कृष्णानंद महाराज यांचे वय अवघे १९ वर्ष असतानाही ते १४ अनाथ मुलाचा सांभाळ करत आहे ते स्वतः अनाथ असुनही अनाथाचा ते नाथ बनले आहे असेही ते म्हणाले या वेळी कृष्णानंद महाराज व सचिव ज्ञानेश्वर महाराज म्हणाले की या आश्रमात चौदा अनाथ मुले राहत असुन त्याचा दैनंदिन व शिक्षणाचा खर्च मोठा आहे या ठिकाणी मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी दोन हजार लिटर क्षमतेच्या टाकीची गरज आहे  त्या करीता दानशुरांनी या आश्रमास मदत करावी असे अवाहन कृष्णानंद महाराजांनी केले आहे या वेळी पत्रकार देविदास देसाई तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास चेतन जाधव  पत्रकार दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम प्रकाश मेहेत्रे  उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget