Latest Post

शिर्डी ( प्रतिनिधी) येथील श्री साईनाथ रुग्णालय येथे सेवेत असताना आपल्या आर्थिक फायद्यासाठी दुसऱ्या खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या येथील  डॉक्टर अमित नाईकवाडी यांचा भांडाफोड दैनिक साई दर्शन च्या टीमने स्टिंग ऑपरेशन करून केला आहे, श्री साईबाबा संस्थान व खुद्द साईबाबानाही आर्थिक फायद्यासाठी फसवणाऱ्या या डॉक्टरांवर श्री साई संस्थान प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात यावे , अशा मागणीचे सर्व पुराव्यानिशी निवेदन दैनिक साई दर्शन च्या वतीने श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे,
यासंदर्भात अधिक माहिती अशी की,शिर्डीत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे दोन अद्ययावत रुग्णालये, नागरिक आणि साई भक्तांच्या सेवेसाठी सुसज्ज आहेत. परंतु या रुग्णालयातील काही डॉक्टर मंडळींकडून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या जीवाशी अत्यंत बेजबाबदारपणे खेळ चालविला असून त्याबाबत असंख्य तक्रारी दैनिक साईदर्शन कडे प्राप्त होत असतानाही  श्री साईबाबा संस्थानची बदनामी होईल अथवा चुकीचा संदेश बाहेर भक्तांना अथवा नागरिकांना जाईल या एकाच कारणामुळे  आजवर त्या तक्रारींकडे दैनिक साई दर्शन कडून कानाडोळा करण्यात आला. मात्र हा प्रकार दिवसेंदिवस वाढू लागला आहे, एका डॉक्टरांनी तर मोठा कळसच केला आहे,
 अश्या या डॉक्टरच्या  एकाच दिवसात दोन तक्रारी साई दर्शन कडे येऊन संबंधित रुग्णाची नातेवाईक असलेली व्यक्ती न्यायाची अपेक्षा दैनिक साई दर्शन कडे करत होती, त्या अनुषंगाने सदर प्रकरणी खरे काय ते शोधण्याचा प्रयत्न दैनिक साईदर्शनने केला असता धक्कादायक प्रकार निदर्शनास आल्याने या संपूर्ण प्रकरणी दैनिक साईदर्शनच्या टीम सह स्टिंग ऑपरेशन करत सदर प्रकरणाचा भांडाफोड केला आहे.
संबंधित डॉक्टर अमित नाईकवाडी हे येथील साई संस्थानच्या साईनाथ रुग्णालयात अस्थिरोग तज्ञ म्हणून म्हणून सेवा बजावतात, त्याबद्दल मानधनही घेतात,आणि या रुग्णालयात कोणतेही वैद्यकीय उपकरणे व साधनांची कमी नसतांनाही या रुग्णालयात ऑपरेशन साठी आलेल्या रुग्णांना  मात्र कोपरगाव हद्दीत नवीन झालेल्या हॉस्पिटलला ऑपरेशन करा , मी स्वतः ऑपरेशन तेथे करतो,असे हे डॉक्टर सांगत असल्याचे निदर्शनास आले, म्हणजे हे महाशय डॉक्टर साईबाबा संस्थान मध्ये मानधन घेऊन  अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करतात, मात्र येथे काही रुग्णांची शस्त्रक्रिया संस्थांनच्या रुग्णालयात करण्याऐवजी कोपरगाव येथील एका नवीन हॉस्पिटल मध्ये ऑपरेशन करून देतो, असे सुचवतात, हे साईबाबांना किंवा साई संस्थानला फसवण्याचा प्रकार नाही का? असा सवाल करण्यात येत आहे, यासंदर्भात साईनाथ रुग्णालयात चौकशी केली असता येथील वैद्यकीय अधीक्षकाकडून  काल दिनांक१३ सप्टेंबर 20 21 सोमवार रोजी डॉक्टर नाईकवाडी हे वैद्यकीय कारणाने एक दिवसीय रजेवर असल्याचे कळाले , त्यांनी तसा मोबाईलवर सकाळी मेसेज केल्याचेही सांगण्यात आले,त्यानंतर आम्ही  डॉक्टर नाईकवाडे यांना कॉल केला असता त्यांनी मात्र मी 8 दिवस रजेवर असून संस्थान रुग्णालयात कोणतेही ऑपरेशन करू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले. मग आम्ही स्वतः आम्हाला माहिती मिळाल्या नुसार हे खरच आजारी आहेत की दुसऱ्या दवाखान्यात रुग्णांची शस्त्रक्रिया करत ,काम करत आहेत हे तपासण्या साठी कोपरगाव येथील त्या हॉस्पिटल मध्ये खात्री करण्यास गेलो असता हे डॉक्टर नाईक वाडी त्या हॉस्पिटल मधेच एका रुग्णाचे ऑपरेशन करत असल्याचे आम्हाला दिसून आले, येथे केसपेपर वर औषधे सुद्धा त्यांनी स्वहस्ताक्षरात ऑपरेशन थेटर मधून बाहेर येऊनत्यांच्या सही निशी लिहून दिली आणि आम्ही त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केली आहे, त्या व्हिडिओ मध्ये त्यांनी सांगितले की, मला सर्दी असल्याने साईनाथ रुग्णालयात ऑपरेशन करू दिले जात नाही म्हणून मी इथे शस्त्रक्रियेसाठीआलो आहे, याचा अर्थ साई संस्थानच्या रुग्णालय प्रशासनालाही फसवुन हे डॉक्टर महाशय येथे शस्त्रक्रिया करत होते, हे उघड झाले आहे,अश्या पद्धतीने रुग्णांच्या ऑपरेशनची तारीख  साईनाथ रुग्णालयात असताना हे महाशय दुसऱ्या खाजगी रुग्णालयात त्या रुग्णाला बोलावत असतील, आपल्या आर्थिक फायद्यासाठी जर संस्थान रुग्णालय सोडून इतर दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असतील, तेथे शस्त्रक्रिया करीत असतील तर या डॉक्टरांच्या वतीने श्री साईबाबा संस्थान रुग्णालयात सेवेवर येतांना जे प्रतिज्ञापत्र लिहून दिले आहे ,त्याचे उल्लंघन होत नाही का? कारण संस्थान रुग्णालय प्रशासनाच्या नियमाप्रमाणे जर डॉक्टर साई संस्थान रुग्णालयात काम करत असेल तर इतर दवाखान्यात त्यांना काम करण्यास मनाई आहे असे असताना या डॉक्टर महाशयांनी मात्र ते तर केलेच आहे ,पण संस्थान रुग्णालयातील रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात बोलावुन तेथे शस्त्रक्रिया करतो असे सांगणे म्हणजे साई संस्थान प्रशासनाला फसवण्याचा प्रकार हा नाही का? या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि अश्या डॉक्टर पेशाला काळीमा फासणाऱ्या पांढऱ्या कपड्यातील काळा हेतू ठेऊन काम करणाऱ्या लोकांना योग्य आणि कठोर शासन झाले पाहिजे अशी दैनिक साईदर्शन प्रमाणेच असंख्य साईभक्त, ग्रामस्थ, रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक यांची मागणी असून  सदर प्रकरणी संस्थान प्रशासनाने  लक्ष घालून डॉक्टर अमित नाईकवाडे यांना कठोर शासन करून सेवेतून बडतर्फ करावे, जेणेकरून अश्या प्रकारे श्री साईबाबा संस्थान प्रशासनाची आणि पर्यायाने साईबाबांची पैशांच्या लालसेपोटी फसवणूक करणाऱ्या लोकांना चाप बसविणे अत्यंत गरजेचे झाले आहे, ह्या डॉक्टरांना तातडीने कठोरात कठोर शासन करून सेवेतून बडतर्फ करावे, साईंच्या रुग्णालयात होणाऱ्या ह्या अशा डॉक्टरांच्या अनागोंदीला आळा बसवावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे दैनिक साई दर्शन च्या वतीने श्री साईबाबा संस्थान चे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश व श्री साईबाबा संस्थान च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री बानाईत यांना ही प्रत्यक्ष भेटून केली  आहे, त्यांनीही या निवेदनानंतर यासंदर्भात लवकरच लवकर चौकशी करून कारवाई करू, असे आश्वासन यावेळी दिले आहे, दरम्यान या प्रकरणामुळे या डॉक्टर महाशया बद्दल शिर्डी व परिसरातील ग्रामस्थ व संपूर्ण साई भक्तांमध्ये मोठी चर्चा होत आहे व या डॉक्टरांवर कारवाई करावी अशी मागणी ही साई भक्त व ग्रामस्थांनी केली  आहे,

श्रीरामपूर - तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत, पोलीस उपनिरीक्षक अधिकारी संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या नेतृत्वाखाली, गणेशोत्सवा निमित्त राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमे अंतर्गतील, त्याच बरोबर पोलीस निरीक्षक साळवे यांना ,मिळालेल्या गुप्ता माहितीच्या आधारे, आरोपी दत्तु सावळेराव पवार वय वर्षे २९ यास, राहता तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणाहून, सापळा रचून ताब्यात घेतले असता, आरोपी दत्तु पवार याच्या कडून बजाज कंपनीच्या ३, हिरो होंडा कंपनीच्या ८, टिव्हीएस स्टार कंपनीची १, अशा एकूण ८ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १२ दुचाकी वाहने ताब्यात घेण्यात आल्या असून. यापूर्वी आरोपी दत्तु पवार याच्या विरुद्ध राहता पोलीस ठाण्यात ६ गुन्हे दाखल असून, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ गाड्यांसह एकूण १८ गुन्हे उघडकीस येणार असल्याचा अंदाज पोलीस सूत्रांकडून व्यक्त केला जात आहे. दुचाकीतील सराईत गुन्हेगारा विरुद्ध, करण्यात आलेली कारवाई, पोलीस अधीक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे,सहायक फौजदार ए बी आढागळे, एस आर गोरे, पोलीस कॉन्स्टेबल आयुबब शेख, अली हबीब, पोलीस नाईक अनिल शेंगाळे,आबासाहेब गोरे, दादासाहेब लोढे, दादासाहेब गुंड, साजीद पठाण, चांदभाई पठाण, प्रशांत रणनवरे आदींच्या पथकाने केली असून. आरोपी दत्तू पवार याच्या विरुद्ध ,तालुका पोलीस ठाण्यात,भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अशोक आढागळे हे करीत आहेत.

श्रीरामपुर (प्रतिनिधी  )- येथील गुप्तधन खोदणारा सुनील गायकवाड याने साडीच्या सहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली असुन सुनिलच्या आत्महत्येमुळे बेलापुर गावात मोठी खळबळ उडाली आहे या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. बेलापूर गावामध्ये जुलै महिन्यामध्ये गुप्तधन सापडल्याची घटना घडली होती.खटोड यांच्या घरी सापडलेल्या या गुप्तधनामध्ये चांदी बरोबरच  सोने असल्याची तक्रार हे गुप्तधन खोदण्याचे काम करणारा मजूर सुनील गायकवाड यांनी मिडिया समोर केली होती.

त्याच सुनील गायकवाड यांनी बेलापुर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्यासमोर आपल्या राहत्या घरी काल संध्याकाळी आत्महत्या केली आहे.

          या घटनेमुळे बेलापूर गाव व  श्रीरामपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.सुनील गायकवाड यांनी असा आरोप केला होताा की या गुप्तधनाची विल्हेवाट स्वत:च्या फायद्यासाठी बेलापूरातील काही मुजोर प्रवृत्तीच्या लोकांनी लावली होती .तसेच या मुजोर प्रवृत्तीच्या लोकांना आपण या प्रकरणाचा निपटारा केला असे देखील वाटत होते.या आरोपानंतर सुनील गायकवाड यांनी आत्महत्या केली आहे.

   त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होण्याची आवश्यकता असून यामध्ये अनेक “व्हाईट कॅालर गुन्हेगारांचे” हात गुंतलेले असल्याची दबक्या आवाजात बेलापूर गावात चर्चा पूर्वी चालु होती आणि आता सुनील गायकवाड यांच्या मृत्यूनंतर ही चर्चा पुन्हा जोर पकडत आहे.

       तरी पोलिस प्रशासनाने या प्रकरणाच्या मूळाशी जावुन  तपास करून सुनील गायकवाड यांना न्याय द्यावा.त्यांच्यामागे चार मुली,आई ,पत्नी हे पोरके झाले आहेत.काही व्हाईट कॅालर गुन्हेगार प्रवृत्तीच्या अति स्वार्थी व अति लालची लोकांमुळे गोरगरीब मजूर सुनील गायकवाड यांचा जीव गेला बेलापूरात गुप्तधन सापडल्याची आगोदर दबक्या आवाजात चर्चा होती खटोड यांच्या बंगल्याच्या परिसरात खोदकाम करताना गुप्त धनाचा हंडा सापडला तो हंडा सर्व प्रथम सुनिल गायकवाड याच्या नजरेस पडला होता त्या नंतर त्यांच्या जोडीदारांच्या मदतीने तो बाहेर काढला त्या वेळी तिन जणांना तो उचलत नव्हता असे सुनिलचे म्हणणे होते संबधीतांनी त्यांना गप्प बसविण्यासाठी लालच दाखविले त्यामुळे ते मजुरही गप्प बसले त्या नतर दिलेल्या अश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे सुनिल व त्याच्या सोबत खोदकाम करणारांनी वाद घालण्यास सुरुवात केली अन त्या गुप्त धनाचा  गावभर बोभाटा झाल्यानंतर संबधीतांनी बऱ्याच दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास गुप्तधन असले बाबत कळविले त्या नंतर शासकीय नियमाप्रमाणे कार्यवाही झाली मात्र त्या डेगीत केवळ चांदीच ठेवण्यात आल्याचे सुनिलचे म्हणणे होते या खोदकाम करणार्या मजुरांना दबावतंत्राचा वापर करुन दहशतीखाली ठेवले सुनिल याने अनेक वृत्तवाहीनींना मुलाखती दिलेल्या होत्या त्यामुळे सुनिलवर फार मोठा दबाव होता त्याला रात्र रात्र झोप येत नसे तो अचानक झोपेतुन खडबडूळ जागे व्हायचा आसे काही नातेवाईकांचे म्हणणे आहे त्यामुळे पैसे कमी मिळाल्यामुळे आलेले नैराश्य तसेच वाढता दबाव यामुळै सुनिलने आत्महत्या केली असल्याचे गावात बोलले जात आहे पोलीसांच्याही एकंदर सर्व प्रकार आता लक्षात येत आहे मात्र तक्रार न आल्यामुळे पोलीसही शांत आहेत मयत सुनिलला मेल्यानंतर तरी न्याय मिळेल का?  गुप्तधनाची सखोल चौकशी होवून सोने गिळणारे वाटून घेणारे उक्ते घेणारे यांना शासन होईल का?हा खरा सवाल आहे

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील  खैरी निमगाव येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  खैरी निमगाव परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला आरोपी. क्र.)1)  रमेश धोंडीराम गायकवाड वय 35 रा. खैरी निमगाव 42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.) आरोपी. क्र.) 2. अर्जुन केशव गायकवाड  56,000/-  रु. कि.चे 800 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2500/- रू  किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)  एकूण 1,02,000/- रुपये 

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे खैरी निमगाव परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे  खैरी निमगाव येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी,  पो. कॉ. नितीन शिरसाठ चा. पो. कॉ.  रवींद्र लगड, आर सी पी पथक आदींनी केली.


बेलापुर  (प्रतिनिधी )-येथील सुनिल विनायक गायकवाड वय ४३ याने घरातच साडीच्या सहाय्याने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली. या बाबत मिळालेली माहीती अशी की सुनिल गायकवाड यांने काल सायंकाळी घरातील छताला असलेल्या पंख्याला साडी बांधुन गळफास घेतला सुनिलची पत्नी माहेरी गेलेली होती  घरात कुणीही नसल्यामुळे ही बाब उशीरा लक्षात आली तो पर्यत सुनिल मयत झालेला होता घटनेची माहीती मिळताच बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके आपल्या सहकाऱ्या समवेत घटनास्थळी पोहोचले सुनिल यास खाली उतरुन श्रीरामपुर येथील साखर कामगार हाँस्पीटलला दाखल केले असता डाँक्टरांनी त्यास मृत घोषित केले मृतदेहाचे शवविच्छेदन करुन ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले बेलापुर येथील स्मशानभुमीत शोकाकुल वातावरणात त्याचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे पोलीस पाटील अशोक प्रधान उपस्थित होते  काही दिवसापासून सुनिल हा प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याची गावात चर्चा सुरु असुन सुनिलच्या आत्महत्येचे खरे कारण काय ? या बाबत नागरीकात उलट सुलट चर्चा चालू आहे त्याच्या पश्चात आई पत्नी व चार लहान मुली भाऊ भावजयी असा परिवार आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) आज दि.  10/09/2021 रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारा मार्फत  श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव आऊटसाईड येथे गावठी हातभट्टी दारू  अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत  अशी  खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी  जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी  हरेगाव आऊट साईड परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू  अड्ड्यावर छापा टाकून  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू  यांचा नाश करण्यात आला 

आरोपी. क्र.)1) अशोक बाबुराव गायकवाड

42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

3500/- रू किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 2.  सुधीर काशिनाथ गायकवाड 

38,500/-  रु. कि.चे 550 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2000/- रू  किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

आरोपी. क्र.) 3. अशोक रामभाऊ गायकवाड

35,000/-  रु. कि.चे 500 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.)

3500/- रू  किमतीची 35 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.)

आरोपी. क्र.) 4. संतोष चंद्रभान गायकवाड

14,000/-  रु. कि.चे 200 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

1,500/- रू  किमतीची 15  लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.)

---------------------------------------------

 एकूण 1,40,000/-/-  रुपये

 वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड )  (ई)  प्रमाणे  गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अचानक झालेल्या व लागोपाठ सुरू असलेल्या कारवाईमुळे हरेगाव आऊटसाईड परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे हरेगाव येथील महिलांनी  Dy.s.p. संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले.

*सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. डॉ. दिपाली काळे,  यांचे मार्गदर्शनाखाली  Dy.s.p  संदीप मिटके, ASI.राजेंद्र आरोळे,H.c. सुरेश  औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ,  लक्ष्मण  राऊत, अमोल गायकवाड, प्रवीण भोजे, आर सी पी पथक आदींनी केली.*

बेलापूर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायतीने १४ वा वित्त आयोग व दलीत वस्ती योजनेच्या निधीतून केलेल्या कामात ४० लाख रुपयाचा भ्रष्टाचार झालेबाबत जि प सदस्य शरद नवले यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळल्याने जिल्हा परिषदेचे विद्युत विभागाचे शाखा अभियंता बी. बी. चौधर यांच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी निलंबनाची कारवाई केलीआहे.बेलापूर बुद्रुक येथील ग्रामपंचायतीने २०१५ ते २०२० या काळात १४ वा वित्त आयोग,दलित वस्ती सुधार योजना आदी योजनांच्या निधी मधून लाईटची कामे केली होती. याकामांवर अंदाजे ४० लाख रुपये एवढी मोठी रक्कम खर्च करण्यात आली होती. सदरील कामात भ्रष्टाचार झालेला असल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कडे तक्रार केली होती.तसेच जिल्हा परिषदेच्या जनरल बॉडी सभेत हा विषय मांडून याबाबत चौकशी करण्याचा ठराव करण्यात आला होता.या अनुषंगाने शासकीय तंत्रनिकेतन,अहमदनगर यांच्या वतीने तांत्रिक तपासणी व चौकशी करण्यात आली.चौकशी अधिकाऱ्यांनी बेलापूर गावास भेट देऊन समक्ष पाहणी करत चौकशी केली.या चौकशीत झालेले काम व नमूद केलेले काम यांत मोठी तफावत आढळून आली.तसेच मोजमाप पुस्तकात नोंदणी केलेली बल्ब,वापरलेले पोल यात मोठी तफावत आढळली.या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.तसेच श्री.चौधर यांनी कामाचे अंदाजपत्रके,मोजमाप पुस्तिका व इतर कागदपत्रे तपासणी कामी हजर केली नाहीत.यावरून या कामात गैरव्यवहार झालेला दिसत असल्याने श्री.चौधर यांच्यावर  जिल्हा परिषद सेवा(शिस्त व अपील)च्या तरतुदीनुसार निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली असून याबाबतचे आदेश जिल्हा परिषद संकेतस्थळावर टाकण्यात आले आहेत.यामुळे गावात खळबळ झाली असून सन २०१५ ते सन २०२१ याकाळात लाईटच्या कामात मोठा  गैरव्यवहार झाल्याचे उघड झाल्याची चर्चा आहे.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget