Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- प्रवरा नदी पात्रात अनोळखी ईसमाचे प्रेत आढळून आले असुन प्रवरा नदीच्या पुलावर एक हीरो होंडा मोटारसायकल  सापडली आहे  मोटार सायकलला असलेल्या कागदपत्रावरुन संबधीत ईसमाची ओळख पटली आहे.बेलापुर येथील प्रवरा नदी पात्रात अनोळखी इसमाचे प्रेत पाण्यावर तरंगत असताना काही व्यक्तींनी पाहीले त्यांनी तातडीने बेलापुर पोलीसांना तसेच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांना कळवीले बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके पोलीस काँन्स्टेबल पोपट भोईटे उपसरपंच अभिषेक खंडागळे रमेश अमोलीक देविदास देसाई किशोर कदम तातडीने घटनास्थळी पोहोचले याच दरम्यान प्रवरा नदीवरील पुलावर एक मोटारसायकल उभी असल्याची माहीती मिळताच हवालदार अतुल लोटके माजी सरपंच भरत साळुंके देविदास देसाई किशोर कदम यांनी प्रवरा नदीवरील पुलावर जावुन गाडीची पहाणी केली असता एम एच 17 ऐ एल 5198  ही हीरो होंडा कंपनीची गाडी  हँण्डल लाँक केलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला लावलेली आढळली  गाडीला खराब झालेला भाजीपाला तसेच वजनकाटा एक पिशवी तसेच एक डायरी आढळून आली या डायरीत शंकर उत्तम गलांडे नावाच्या व्यक्तीचे ओळखपत्र तसेच काही फोन नंबर असलेली चिठ्ठी सापडली त्यावरुन संपर्क साधला असता शंकर  हा तीन दिवसापासुन घरी आलेला नसल्याचे नातेवाईकांनी सांगितले  पोलीसांनी खटकाळी येथील गणेश अल्हाट नितीन जगताप दिनेश शेलार विश्वास बागुल सुरेश छल्लारे यां पोहणार्या तरुणांना बोलावुन ते प्रेत पाण्याबाहेर काढले पढेगाव येथील नातेवाईकांनी ते प्रेत शंकर उत्तम गलांडे वय वर्ष 31 याचेच असल्याचे सांगितले बेलापुर पोलीसांनी पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी श्रीरामपुर येथे पाठवीले आहे  पोलीसांनी अकस्मात मृत्यू गुन्हा रजिस्टर नंबर 55/2021 प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास हवालदार अतुल लोटके हे करत आहे.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकारांच्या संघटनेच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी जेष्ठ पत्रकार मनोजकुमार शंकरराव आगे यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र ही संघटना राज्यातील नियमित प्रसिद्ध होणाऱ्या दैनिक व साप्ताहिक वृत्तपत्रांच्या प्रशासकीय पातळीवर अडचणी सोडविण्यासाठी राज्यात काम करते. संघटनेचे राज्यभर, जिल्ह्यात प्रतिनिधी असून, वृत्तपत्र तसेच संपादक व पत्रकार यांना येणाऱ्या अडीअडचणी व त्यांना शासनाकडून कशी मदत मिळून देण्यात येईल याचे काम संघटना करते.मनोजकुमार आगे हे गेल्या ३४ वर्षापासून पत्रकारितेत काम करत असून, त्यांचा अनुभव पाहता, संघटनेचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार किसनभाऊ हासे यांनी मनोजकुमार आगे यांना नुकतेच पत्र दिले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संपादक पत्रकार यांची संघटनेच्या माध्यमातून नवीन कार्यकारिणी करण्यात येणार असून, जिल्ह्यातील पत्रकारांच्या प्रशासकीय पातळीवर समस्या व त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून काम केले जाईल असे नूतन जिल्हाध्यक्ष मनोजकुमार आगे यांनी सांगितले. या निवडीचे जेष्ठ पत्रकार प्रकाश भंडारे, जवाहर मुथा, अरविंद गाडेकर, नरेंद्र लचके, यांच्यासह अनेकांनी स्वागत केले आहे

प्रतिनिधी राहुरी-आज दिनांक ७ मे रोजी खरीप हंगाम पार्श्वभूमीवर येवले आखाडा राहुरी बुद्रुक येथे आकाश शेटे यांच्या प्रक्षेत्रावर हुमणी नियंत्रणासाठी प्रकाश सापळा प्रात्यक्षिक व कापुस शेतीशाळेच्या वर्गाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रशांत डहाळे म्हणाले की एकात्मिक कीड व्यवस्थापन, प्रकाश सापळे,बीबीएफ तंत्रज्ञान द्वारे पेरणी याबाबींचा वापर शेतीला फायदेशीर ठरेल. यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी शरदराव लांबे, शेतकरी संदीप कदम,दादा येवले, अमोल जाधव,दादा भवर,महेश येवले, शशिकांत येवले, सुनिल जाधव शेतकरी उपस्थित होते तसेच वळण येथील किसान कृषी सेवा केंद्र  येथे सोयाबीन बिजप्रक्रिया प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी भिमराज गढधे व संचालक युनुस शेख यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अरुण फुलारी, दिलिप डमाळे,विजय रूपनवर,कैलास रूपनवर आदी शेतकरी उपस्थित होते.



नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लसीकरणावर महत्त्वाची घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Naredra Modi) यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी देशात सर्वांना मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र शासनाने घेतल्याचे सांगितले. तसेच दिवाळीपर्यंत ८० कोटी जनतेला मोफत धान्य रेशन दुकानांमधून देण्यात येणार आहे.

जाणून घ्या महत्वाचे मुद्दे-1) देशात लसीकरण कार्यक्रम सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारने केवळ कोविड योद्धे आणि ४५ वर्षांपुढील नागरिकांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. तर राज्यांनी १८ ते ४४ वर्ष वयोगटातील लोकांच्या लसीकरणाची जबाबदारी घेतली होती. मात्र, आता १८ वर्षांपुढील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार आहे. २१ जूनपासून १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना केंद्र शासनाकडून मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. ज्या नागरिकांना मोफत लस घ्यायची नसेल तर ते पैसे देऊन लस विकत घेऊ शकतात, असेही मोदींनी स्पष्ट केले. लसनिर्मिती कंपन्यांकडून एकूण उत्पन्नाच्या ७५ टक्के लसी भारत सरकार खरेदी करुन, राज्य सरकारांना मोफत देणार आहेत.

2) मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार ८ महिने मोफत राशन पुरवले. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. ही योजना आता दीपावलीपर्यंत लागू असेल. महामारीच्याकाळात सरकार गरिबांसाठी त्यांचा साथी बनून उभं आहे. नोव्हेंबरपर्यंत ८० कोटी लोकांना मोफत धान्य मिळेल. 

3) भारताने जगात जिथे कुठे उपलब्ध होईल, ते सर्व भारतात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. या लढाईत लस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. लशीची संपूर्ण देशातून मागणी आहे. लस बनवणारे देश मोजकेच आहे. भारतात जर लस बनवण्याची कंपनी जर नसती तर आपल्या या विशाल देशात काय अवस्था झाली असती. आधी भारताला विदेशातून लस मिळवण्यासाठी खूप कठीण काम होतं. बाहेरच्या देशात लस तयार झाल्यानंतर आपल्याला लस मिळत होती. पोलिओच्या लशीचे तसेच झाले' असेही मोदी म्हणाले.

4)काही लोक या महामारीच्या काळातही भ्रम पसरवत होते, भारताची लस आली त्यावर अनेकांनी शंका उपलब्ध केली. जे लोक लसीबाबत शंक उपस्थित करत होते, ते भोळ्या बाबड्या लोकांच्या भावनांशी खेळत आहेत. अशा अफवांपासून सावध राहावं.

5) १ मे पासून राज्यांना २५ टक्के काम सोपवण्यात आले, काहींनी प्रयत्न केलं, काहींना अडचणी समजून आल्या. जगात लसींची उपलब्धता किती आहे हे राज्यांना समजलं. मे मध्ये कोरोनाची दुसरी लाट, लसींचा तुटवडा, राज्य सरकारच्या अडचणी असे प्रश्न होते. त्यानंतर सर्व राज्यांना समजलं, केंद्राचीच यंत्रणा नीट होते. राज्यांना अधिकार द्या असं जे म्हणत होते, त्यांनाही कळून चुकलं.

मुंबई.कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी घ्या, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.ब्रेक दि चेनमध्ये निर्बंधांबाबत निकष आणि पातळ्या निश्चित करणाऱ्या ४ जूनच्या आदेशानंतर राज्यभरात निर्बंध शिथिल झाले असल्याचा समज निर्माण झाला होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व पोलीस अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन राज्यात कुठेही सरसकट निर्बंध शिथिल करण्यात आले नसून आपापल्या भागातील परिस्थितीनुसार प्रसंगी निर्बंध कडक करण्याचा निर्णयही घ्यावा असेही स्पष्ट केले. गेल्या वर्षी संसर्ग हा विविध सण उत्सवानंतर वाढला होता, यावेळेस ही दुसरी लाट सणवारांच्या अगोदर आली आहे. दुसरं म्हणजे म्युटेशन झालेल्या या विषाणूमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असून यापासून अधिक सावध राहण्याची गरज आहे नाहीतर तिसऱ्या लाटेत मोठे आव्हान उभे राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला करताना रुग्ण संख्या कमी करण्यात आपल्याला यश येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक पावसाळ्यात आपापल्या भागातील नदी व धरणातील पाणी साठ्यावर लक्ष ठेवून असतो व विशिष्ट रेषेच्या वर पाणी पातळी वाढली तर लगेचच नागरिकांचे स्थलांतर किंवा इतर पाउले उचलतो अगदी त्याचप्रमाणे कोरोनासाठी निर्बंध लावायचे किंवा नाही याकरिता या पातळ्या ठरविण्यात आल्या आहेत.

बेलापुर  (प्रतिनिधी )- महाराष्ट्र शासनाने सहा जून हा दिवस दरवर्षी शिव स्वराज्य  दिन म्हणून साजरा करावा असे अवाहन महाराष्ट्रातील जनतेला केले, ह्या आवाहनास बेलापूर ग्राम पंचायतने प्रतिसाद देऊन सकाळी ९-३० वाजता बेलापूर ग्रामपंचायतीत शिव स्वराज्य दिन उत्सहात संपन्न करण्यात आला      सरपंच महेंद्र साळवी उप सरपंच आभिषेक खंडागळे  ,सदस्य व  नागरिक यांनी एकत्र येऊन छत्रपतीं शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार व श्रीफळ अर्पण करून अभिवादन केले छत्रपती शिवाजी महाराजांनी   ६ जुन १९७४ रोजी शिवराज्याभिषेक केला. होता रयतेचे राज्य शाश्वत् ,निरंतर,चीरकाल रहावे या साठी शिवराज्याभिषेक केला. होता याच दिवशी शकाची निर्मिती करून महाराज शककर्ते झाले .तो हाच शुभदिन होय .स्वातंत्र्याचे, सार्वभौमत्वाचे हे प्रतीक होय, म्हणून दरवर्षी हा सोहळा बेलापूर ग्राम पंचायतीच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे  सरपंच  महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी संगीतले. या वेळी सरपंच महेंद्र साळवी ,मा.सरपंच भरत साळुंके,जि.प्.विस्तार अधिकारी रवींद्र माळी , सदस्य  रवींद्र खटोड,राम पोळ,मुश्ताक शेख,प्रभात कुऱ्हे,प्रा.ज्ञानेश गवले, दिपक क्षत्रिय, दिलीप दायमा, श्रीमती कांबळे मॅडम, लोंढे मॅडम,  भालेराव सर, गागरे मॅडम, कांबळे सर, अनिता कांबळे, सोपान हिरवे, मधुकर गायकवाड, किरण खरोटे, विजय खरोटे, सचिन नगरकर, सचिन साळुंके, रवी बागडे आदी हजर होते.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-सोमवार दिनांक  ७ जुन पासुन पुणे नाशिक औरंगाबाद अहमदनगर कोपरगाव शिर्डी बस सेवा सुरु करण्यात येणार असुन प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे अवाहन श्रीरामपुर आगार प्रमुख राकेश शिवदे व प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड  यांनी केले आहे                               श्रीरामपुर आगारातुन पुणे बस सेवा सुरु करण्यात आली असुन त्यास मिळालेला प्रतिसाद पहाता आता उद्यापासुन श्रीरामपुर आगारातुन श्रीरामपुर कोपरगाव श्रीरामपुर पुणे श्रीरामपुर नाशिक श्रीरामपुर शिर्डी श्रीरामपुर औरंगाबाद श्रीरामपुर अकलुज या बस सेवा सुरु करण्यात येणार आहे या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे अवाहन प्रवासी संघटनेचे रणजीत श्रीगोड व आगार प्रमुख राकेश शिवदे यांनी केले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget