Latest Post


बेलापुर  (प्रतिनिधी  )-राजकीय दृष्ट्या महत्वाची समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी महेंद्र जगन्नाथ साळवी यांची बिनविरोध तर अभिषेक खंडागळे हे अकरा विरुध्द सहा मतानी विजयी घोषीत  करण्यात आली साळवी यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बाबासाहेब गोसावी यांनी सरपंच पदी साळवी व उपसरपंच पदी खंडागळे   यांच्या नावाची घोषणा केली           

राजकीय महत्वाची समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायत १७ जागेकरीता झालेल्या निवडणूकीत गावकरी मंडळाला ११ तर जनता विकासा अघाडीला सहाच जागा मिळाल्या होत्या सरपंच निवडीत काही गडबड होणार नाही याची गावकरी मंडळाने पुरेपुर खबरदारी घेवुन सर्व सदस्यांना सहलीला पाठविले होते त्या नंतर भास्करराव खंडागळे यांच्या निवासस्थानी  पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक झाली गावकरी मंडळाचे श्रेष्ठी जि प सदस्य शरद नवले भाजपाचे  सुनिल मुथा भास्करराव खंडागळे भाजपा ओबीसी प्रांत उपाध्यक्ष प्रकाश चित्ते आर पी आय उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात उपसभापती बाळासाहेब तोरणे रणजीत श्रीगोड लोकसेवा विकास अघाडीचे तालुकाध्यक्ष गणेश भाकरे  प्रकाश पा नाईक जालींदर कुर्हे रावसाहेब अमोलीक हाजी ईस्माईल शेख साहेबराव वाबळे आदिंनी चर्चा करुन राखीव जागेकरीता निवडून आलेल्या महेंद्र साळवी रमेश अमोलीक स्वाती अमोलीक मीना साळवी या चारही जणांना पंधरा महीने सरपंच पद देण्याचे सर्वानुमते ठरले त्या नुसार महेंद्र साळवी यांनी सरपंच पदाकरीता अर्ज दाखल केला सरपंच पदाकरीता एकच अर्ज आल्याने त्याना  सरपंच      म्हणून बिनविरोध घोषीत करण्यात आले उपसरपंच पदाकरीता अभिषेक खंडागळे व खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड याचे अर्ज दाखल झाल्याने निवडूक घेण्यात आली त्यात अभिषेक खंडागळे यांना अकरा मते मिळाली खटोड यांना सहा मते मिळाली   गावकरी मंडळाने बोलविलेल्या बैठकीस प्रफुल्ल डावरे पुरुषोत्तम भराटे अकबर टिन मेकरवाले विशाल आंबेकर भास्कर बंगाळ मोहसीन सय्यद सुधाकर खंडागळे संजय गोरे सुभाष अमोलीक बाळासाहेब दाणी अनवर सय्यद अजीज शेख नवाब सय्यद बबलु कुर्हे जिना शेख जाकीर शेख उमर शेख सुभाष अमोलीक सुरेश अमोलीक सचिन वाघ शशीकांत तेलोरे  सागर ढवळे रत्नेश गुलदागड रमेश काळे यादव  काळे हेमत मुथा  आदी  उपस्थित होते निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून बाबासाहेब गोसावी यांनी काम पाहीले त्यांना ग्रामसेवक राजेश तगरे व कामगार तलाठी कैलास खाडे यांनी सहाकार्य केले  या वेळी पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट हवालदार अतुल लोटके पोपट भोईटे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला.

राहुरी |प्रतिनिधी-राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दि.1 फेब्रुवारी रोजी घडली असून.

याबाबत राहुरी पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोनच दिवसांपूर्वी एका महाविद्यालयीन तरुणीचे राहुरी फॅक्टरीहून रिक्षातून अपहरण झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा ही घटना घडल्याने पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. अपहरण झालेल्या मुलीचे वय 17 वर्षे 5 महिने असून ती गुंजाळे येथे आपल्या कुटुंबाबरोबर राहते. दि. 1 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 ते पहाटे 4.30 वाजे दरम्यान अज्ञात इसमाने त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फूस लावून पळवून नेले.

मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुध्द भादंवि. कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सुशांत दिवटे करीत आहेत.

१ फेब्रुवारी २०२१ - श्रीरामपूर | शिर्डीत पत्रकारांवर दाखल केलेला गुन्हा हा लोकशाहीला काळिमा फासणारा असून, पत्रकारांच्या न्याय्य हक्कावर गदा आणणारा आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या पत्रकारांवर दाखल झालेला गुन्हा तात्काळ मागे घ्यावा अन्यथा; राज्यभर तीव्र अंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने देण्यात आला आहे. यासंदर्भात श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना निवेदन देण्यात आले. 

            ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे हे मनमानी भूमिका घेत आहेत.  दोन महिन्यापूर्वी साईबाबा मंदिर परिसरात एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या दोन प्रतिनिधींसह कॅमेरामन वर शासकीय कामात अडथळा आणणे, साथरोग नियमांचे उल्लंघनकेल्याचा ठपका ठेऊन  शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. या प्रकारामुळे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील पत्रकारांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संस्थानाच्या अधिकाऱ्यांनी २ महिन्यानंतर गुन्हा दाखल केल्याने यामागे सुडाची भावना असल्याचा आरोप पत्रकार संघटनेने केला आहे. यावेळी  जयेश सावंत, दत्तात्रय खेमनर, अस्लम बिनसाद, स्वप्नील सोनार, अभिषेक सोनवणे, विठ्ठल गोराणे, 

राजेश बोरुडे, निलेश भालेराव, सुहास शेलार, सचिन उघडे, प्रभात शिंदे, वृषीकेश पोळ, अजहर शेख, अल्फाज जुनानी, कैफ मेमन, अफान कुरेशी, आकिब शेख, मोईज पठाण, सोहेल पठाण आदी उपस्थित होते.

Dy.s.p.संदिप मिटके यांच्या पथकाची कारवाई,दोन  पिडीत परप्रांतीय( बंगाली) महिलेची सुटका व एक आरोपी ताब्यात

आज दि.  २९/०१/२०२१ रोजी Dy.s.p. संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे   हा  पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली.  त्याप्रमाणे  हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा  येथे बनावट ग्राहक पाठवुन शासकीय पंचासमक्ष छापा टाकुन दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली असून आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द  राहुरी पोलीस स्टेशन जि.अहमदनगर येथे स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956  चे कलम  3,4,5,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

*सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा. डॉ. दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली Dy.s.p संदीप मिटके , PI गाडे, स.फौ. राजेंद्र आरोळे ,पो.हे.का सुरेश औटी, अण्णासाहेब चव्हाण, राधिका कोहकडे, पो का रवींद मेढे ,सुनील शिंदे ,सचिन ताजणे, सचिन लोंढे यांच्या पथकाने केली.


राहुरी (प्रतिनिधी  )- संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतकरी देविदास देसाई यांची विज मोटार चोरीस गेली असुन त्यांच्या  तक्रारी वरुन राहुरी पोलीस स्टेशनला भांद वि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे         या परिसरात  शेतकर्यांच्या विज मोटारी चोरुन चार - दोन हजारात भंगारात विकणारी मोठी टोळी कार्यरत असुन पोलीसांनी या चोरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे राहुरी तालुक्यातील प्रवरा काठावरील विहीरीतील पाणबुडी तसेच नदी काठावरील पाणबुडी चोरण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असुन चोरलेली विज मोटार चार - दोन हजारात भंगारात विकली जात असुन विज मोटार चोरीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत चोरीचा तपास लागत नसल्यामुळे शेतकरी आता तक्रर देण्याचेच टाळत आहे नदीवर टाकलेली विज मोटार  व केबल चोरणारी टोळीच या परिसरात वावरत असुन पोलीसांनी विज मोटार चोरणारे व त्या विकत घेणारे या दोघावरही कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे भंगार व्यवसाय करणाराकडे साठा रजिस्टर असणे गरजेचे असताना एकाही भंगार व्यवसायीकाकडे तशी नोंद वही आढळत नसुन अनेक ठिकाणी चोरीचे सामान खरेदी केले जात आहे संक्रापुर येथील अनेकांच्या विज मोटारी अद्याप पर्यत चोरीस गेलेल्या आहेत काहींनी तक्रारी दिल्या परंतु त्याचा पुढे काहीच  तपास न झाल्यामुळे आता शेतकरीही चोरी होवुनही गप्प बसत आहे संक्रापुर येथील शेतकरी देविदास देसाई यांनी राहुरी पोलीसाकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की माझे संक्रापुर येथील शेतातील विहीरीतुन २७जानेवारी ते २८ जानेवारी रात्री १ ते सहा वाजण्याच्या सुमारास कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी विहीरीतील पाच हाँर्स पाँवरची पानबुडी तसेच १२५ फुट केबलची चोरी करुन अंदाजे आठ हजार रुपयाचे नुकसान केले आहे या बाबत राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीस निरीक्षक हनुमंत गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगाव पोलीस पुढील तपास करत आहे विज मोटार चोरांचा व चोरीच्या मोटारी विकत घेणार्यांचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली असुन या बाबत लवकरच एक शिष्टमंडळ जिल्हा पोलीस प्रमुखांना भेटून निवेदन देणार आहे.

राहुरी( प्रतिनिधी मिनाष पटेकर )राहुरी तालुक्यातील नुकत्याच झालेल्या  ४४ ग्रामपंचायतीच्या व संभावी ३८ ग्रामपंचायतीच्या अशा ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उपविभागिय अधिकारी अनिल पवार यांच्या अध्यक्षेतेखाली काढण्यात आली.राहुरी तालुक्यात नुकत्याच ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुक संपन्न झाल्या यामधे निवडणुक आयोगाना  सरपंच पदाचे आरक्षण गोपनिय ठेवत त्याचे आरक्षण आज दि.२७ जानेवारी रोजी काढण्यात आले.यावेळी तहसिलदार फसियोदिन शेख,नायब तहसिलदार गणेश तळेकर यांनी आरक्षण सोडतीसाठी परिश्रम घेतले.यावेळी गटविकास अधिकारी गोंविद खामकर,कृषी अधिकारी महेश ठोकळे,दत्ता गोसावी,सुनिल हुडे,सयाजी,शंडगे,अभिजित क्षिरसागर,अश्विनी नन्नवरे, सुलोचना वाघमारे,महेश देशमुख,जावेद शेख,अंकुश सोनार अदि अधिकारी व कर्मचारी यांनी काम पाहिले.राहुरी येथे आज बुधवार दिनांक २७ जानेवारी रोजी सकाळी११ वाजता केशरंग मंगल कार्यालय येथे सन २०२१ ते २०२५ या कालावधीसाठी राहुरी तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची आरक्षण सोडती पार पडल्या.

आरक्षण पुढील प्रमाणे- 

अनुसुचित जाती - ११ जागा पैकी

ताहाराबाद,कुकडवेढे,वांबोरी,चेडगाव,केंदळ खुर्द, चिंचाळे(गडधे आखाडा)या गावात

पुरुष सरपंच राहणार आहे.तर मांजरी,मल्हारवाडी,मुसळवाडी,वळण,खुडसरगाव,

चिंचाळे (गडदे आखाडा)महिल सरपंच असणार आहे.

अनुसुचित जमाती-१० जागा

मालुंजे खुर्द, शिलेगाव, धानोरे,ब्राम्हणगाव भांड,उंबरे,महिला सरपंच राहणार आहे,

तर वरशिंदे(वाबळेवाडी),रामपुर,कात्रड,केंदळ बु,खडांबे खुर्द,येथे पुरुष महिला सरपंच असणार आहे.

नागराकांचा मागस प्रवर्ग-२२जागा पैकी 

सोनगाव,सडे,धामोरी खुर्द, वडनेर, मोमीन आखाडा, चिखलठाण दरडगाव थडी,टाकळीमिया,बाभुळगाव,कानडगाव ,डिग्रस,याजागेवर महिला सरपंच होणार आहेत.तर 

तुळापुर,पिंपळगाव फुनगी,आंबी, चादेगाव,चिंचविहिरे,कनगर बु,वावरथ जांभळी,जांभुळबन,पिप्री वळण,करजगाव,मोरवाडी,गणेगाव, या २० गावात पुरष सरपंच होणार आहे.

तर सात्रळ, निंभेर, तांदुळवाडी ,तांभेंरे, घोरपवाडी, बा.नांदुर ,कोंढवड, वरवंडी, खडांबे बुद्रुक गुंजाळे संक्रापूर दवणगाव केसापूर बोधेगाव लाख पाथरे खुर्द कोपरे तिळापुर हे पुरुष सरपंच होणार आहे.

तर गुहा कुरणवाडी  म्हैसगाव राहुरी खुर्द मानोरी देसवंडी तमनर आखाडा पिंपरी अवघड ब्राह्मणी मोकळ धामोरी, बुद्रुक आरडगाव चिंचोली गंगापूर अमळनेर ,जातप, माहेगाव ,वांजुळपोई ,कोल्हार खुर्द, येथे महिला सरपंच होणार आहे.



बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुरचे कर्तव्यदक्ष तहसीलदारांच्या कार्य तत्परतेमुळे दिव्यांग व्यक्तीला झटपट रेशन कार्ड मिळाले असुन आधार दिव्यांग संघटनेच्या वतीने तहसीलदार प्रशांत पाटील यांना धन्यवाद दिले आहे.   रामकृष्ण नगर शिरसगाव येथील रहीवासी संदिप गोपीनाथ गंभीरे हे रेशनकार्ड मिळविण्यासाठी  तहसील कार्यालयात आले होते पुरवठा विभागात गेल्यानंतर त्यांना आठ दहा दिवसांनी या असे सांगितले त्यामुळे निराश झालेले पायाने अधु असलेले दिव्यांग गंभीरे जड अंतकरणाने तहसील कार्यालयाचा जिना उतरत होता त्याच वेळेस तहसीलदार प्रशांत पाटील कार्यालयात जाण्यासाठी जिना चढत होते एक दिव्यांग व्यक्ती जिना उतरताना त्यांनी पाहीले या दिव्यांग व्यक्तीचे नक्कीच काही तरी महत्वाचे काम असणार आहे अशी शंका त्यांना आली त्यांनी दोन पावले मागे घेत त्या दिव्यांग व्यक्तीची अस्थावाईकपणे चौकशी केली त्या वेळी त्या दिव्यांगाला हे माहीत नव्हते की हेच तहसीलदार आहेत व यांच्या सहीनेच आपल्याला रेशनकार्ड मिळणार आहे तहासीलदार प्रशांत पाटील यांनी चौकशी केल्यानंतर दिव्यांग व्यक्ती संदीप गंभींरे यांनी सांगितले की रेशनकार्ड मिळावे या करीता हेलापाटे मारत आहे त्या वेळी तहसीलदार पाटील यांनी गंभीरे यासं हाताला धरुन मागे फिरविले अन माझ्या बरोबर चल मी तुला रेशनकार्ड देतो असे म्हणाले या वाक्यामुळे गंभीरे यांना नवल वाटले की पुरवठा अधिकार्यांनी नाही म्हटले मग हे कोठुन देणार तहासीलदार पाटील यांनी गंभीरे यांना हाताला धरुन पुरवठा विभागात नेले व तातडीने रेशनकार्ड तयार करण्याचा आदेश दिला अन काही वेळातच गंभीरे यांचे रेशनकार्ड तयार झाले तहसीलदार पाटील यांनी सही करुन ते त्यांच्या हातात दिले त्या वेळी संदिपं  गंभीरे याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता ही आनंदाची बातमी गंभीरे यांनी आधार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण खडके यांना सांगितली त्यांनीही संघटनेच्या वतीने तहसीलदार पाटील यांचे आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget