Latest Post


बेलापूर(देविदास देसाई )बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी जनता विकास आघाडीला सत्तेतून पायउतार करीत गावकरी मंडळाने ११ जागा जिंकुन सत्ता मिळविली. तर प्रदिर्घ काळ सत्तेत असलेल्या जनता विकास आघाडीला ६ जागांवर समाधान मानावे लागले.

जि. प. अध्यक्ष शरद नवले,अशोक कारखाना संचालक अभिषेक खंडागळे,भाजपचे शहराध्यक्ष प्रफुल्ल डावरे, व सुनील मुथा यांच्या नेतृत्वाखाली गावकरी मंडळाचे सौ. तबसुम आसिफ बागवान,सविता उत्तमराव अमोलिक, अभिषेक भास्करराव खंडागळे, सौ.प्रियंका प्रभात कु-हे,मुस्ताक उमर शेख,महेंद्र जगन्नाथ साळवी,सौ. मिना अरविंद साळवी, वैभव विलास कु-हे,चंद्रकांत मोहनराव नवले,सौ. उज्वला रविंद्र कुताळ,व रमेश कमलाकर अमोलिक हे विजयी झाले. प्रभाग पाच मधून गावकरी मंडळाचे महेंद्र साळवी व .सौ. मिना साळवी हे दिर भावजयी गावकरी मंडळाकडून विजयी झाले.

तर पं. स. सदस्य अरूण पा. नाईक, बाजार समिती संचालक सुधीर नवले, जनता आघाडी प्रमुख रविंद्र खटोड,माजी सरपंच भरत साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता विकास आघाडीचे रविंद्र मुरलीधर खटोड,भरत अशोकराव साळुंके, सौ. रंजना किशोर बोरुडे, सौ. शिला राम पोळ,सौ. सुनीता राजेंद्र बर्डे व सौ.छाया बाळासाहेब निंबाळकर हे सहा उमेदवार विजयी झाले.


प्रभाग निहाय उमेदवार व त्यांना मिळालेली मते याप्रमाणे-

*प्रभाग-१*    रविंद्र मुरलीधर खटोड   *विजयी* ज वि आ (७४१),संजय बापूराव गोरे-पराभूत गा मं (५६१)राजेंद्र राशीनकर-पराभूत-स्वतंत्र(३३),

सौ. रंजना किशोर बोरुडे-* *विजयी* ज वि आ (६७१),सौ. माधुरी प्रशांत ढवळे पराभूत- गा मं (६५०),सौ. तबसुम असिफ बागवान *विजयी* गा मं (६३०),सौ. शिरीन जावेद शेख-पराभुत ज वि आ (५८५),सौ.सय्यद बेगम आबुताहेर-पराभूत-स्वतंत्र(९०)

*प्रभाग-२* भरत अशोकराव साळुंके   *विजयी* ज वि आ (५८६),प्रफुल्ल हरिहर डावरे-पराभुत गा मं (५५४),कैलास मदनलाल चायल -पराभूत स्वतंत्र(५४१)

कु. सविता उत्तमराव अमोलिक *विजयी* गा मं (८१८),सौ. छाया विलास सोनवणे-पराभुत ज वि आ (७५७),सौ. नंदा अनिल पवार -पराभूत स्वतंत्र(८६)

सौ. शिला राम पोळ *विजयी* ज वि आ (९३६),सौ. सोनाली हेमंत बनभेरू पराभुत-गामं(७२८)

*प्रभाग-३* अभिषेक भास्करराव खंडागळे *विजयी* गा मं ( १०१८ ),चंद्रकांत गुलाबराव नाईक-पराभुत ज वि आ ( ५७८     ),नवाज इलियास शेख-पराभूत स्वतंत्र( ४५६ ),

सौ. प्रियंका प्रभात कु-हे- *विजयी* गा मं  ( ११४५),सौ.गौरी चेतन कु-हे पराभूत ज वि आ (८७० )


*प्रभाग-४* मुश्ताक उमर शेख- *विजयी* गा मं ( ९१०), हरुन महेमुद सय्यद पराभुत -ज वि आ (६९६),सौ. छाया बाळासाहेब निंबाळकर *विजयी* ज वि आ (  ८१६),सौ. कल्याणी रमेश लगे पराभूत गा मं (७९४  ),सौ. सुनीता राजेंद्र बर्डे *विजयी* ज वि आ ( ८५२),सौ. कमल भगवान मोरे पराभुत गा मं( ७४८)


*प्रभाग-५* महेंद्र जगन्नाथ साळवी *विजयी* गा मं ( ७२२    ),विशाल डॅनियल साळवे पराभुत ज वि आ (  ५०६ ), अच्छेलाल यादव पराभुत -स्वतंत्र (१०७),सुविध भोसले पराभुत स्वतंत्र(१७),वैभव विलास कु-हे *विजयी* गा मं ( ७०८),विजय लहू कु-हे  पराभूत ज वि आ (६७३) ,      ,सौ.मिना अरविंद साळवी *विजयी* गा मं  (  ६५९ ),सौ.राणी मिलिंद एडके -पराभुत ज वि आ (  ६०७),कविता झिने पराभुत स्वतंत्र (९३ )

*प्रभाग-६* चंद्रकांत मोहनराव नवले *विजयी* *गा मं (९९७),सुधीर वेणूनाथ नवले पराभूत ज वि आ (८५०),राजेंद्र मोहन राशीनकर पराभुत स्वतंत्र(५४),अच्छेलाल यादव पराभुत स्वतंत्र(६३),निलेश प्रकाश पाटणी पराभुत स्वतंत्र(६३),रमेश कमलाकर अमोलिक* *विजयी* *गा मं (१०५०),भाऊसाहेब वसंत तेलोरे पराभुत ज वि आ (९३२),सौ. उज्वला रविंद्र कुताळ *विजयी* गामं(१०९६),सौ.सिमा विवेक वाबळे पराभुत ज वि आ (८७७)याप्रमाणे मते मिळाली आहेत*.



*या निवडणुकीत अरुण पा. नाईक यांचे बंधु चंद्रकांत नाईक यांचा अभिषेक खंडागळे यांनी मोठया मताधिकक्याने  तर सुधीर नवले यांचा शरद नवले यांचे बंधु चंद्रकांत नवले यांनीही मोठया फरकाने धक्कादायक पराभव केला*.

*तर प्रभाग दोन मध्ये माजी सरपंच भरत साळुंके यांनी लक्षवेधी तिरंगी लढतीत तिसऱ्यांदा बाजी मारली.त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष* *प्रफुल्ल डावरे व स्वतंत्र उमेदवार कैलास चायल  यांचा पराभव केला .येथे मोठी मत विभागनी झाली.तसेच रविंद्र खटोड यांनी नवखे उमेदवार संजय बापूराव गोरे यांचा मोठया फरकाने पराभव करून तिसऱ्यांदा बाजी मारली .जनता आघाडीच्या सौ. छाया विलास सोनवणे या  सविता अमोलिक यांच्याकडून पराभूत झाल्या आहेत. येथे जनता आघाडीच्या वेळेत अर्ज माघारी घेऊ न शकलेल्या व नंतर जनता आघाडीला पाठिंबा दिलेल्या सौ. नंदा अनिल पवार यांना ८६ मते मिळाली. त्यांची तांत्रिक उमेदवारी राहिल्याचा फटका आघाडीच्या सौ. सोनवणे यांना बसला*.

*मात्र एवढ्या अटीतटीच्या निवडणुकीतही प्रभाग १ आणि २ मध्ये खटोड-साळुंके यांच्या नैतृत्वाखालील जनता आघाडीचे आजही वर्चस्व कायम असल्याचे दाखवुन दिले आहे*.

*माजी उपसरपंच रविंद्र खटोड व भरत साळुंके प्रतिक्रिया देताना म्हणाले की, कर्मयोगी मुरलीधर खटोड यांचा समर्थ वारसा पुढे चालविताना गावाच्या विकासाला बांधील राहुन काम करु.सक्षम सकारात्मक विरोधकांची भूमिका बजावताना सत्ताधाऱ्यांना चांगल्या कामात साथ देऊ.तर सुधीर नवले म्हणाले की, जनतेने दिलेला कौल मान्य आहे.हा जनतेची दिशाभूल, दहशत, दादागिरी व धनशक्तीचा विजय आहे.*


*जि. सदस्य शरद नवले यावेळी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, निवडणूक संपली मतभेद संपले. आता गावाच्या विकास कामांना प्राधान्य देणार आहोत. पिण्याच्या पाण्याची योजना,घनकचरा आदीकामे प्राधान्याने करणार आहोत. विजय सुज्ञ मतदारांना समर्पित करीत आहोत.*विजया नतंर बोलताना अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे म्हणाले की आमचा कारभार पारदर्शी अन  सर्वांना विश्वासात घेवुन होणार आहे ३६५ दिवसात आमच्याकडून योग्य कारभार झाला नाही तर आमचा राजीनामा श्रेष्ठींनी घ्यावा तो देण्यास आम्ही बांधील आहोत.


बेलापुर  (प्रतिनिधी )- श्रीराम मंदिर बांधकामात आपलाही सहभाग असावा या हेतुने बेलापूरातील मुस्लिम बांधवानी ४४ हजार एकशे अकरा रुपयाची देणगी श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष , गोविंद देवगीरीजी महाराज तथा राष्ट्र संतआचार्य किशोरजी व्यास यांच्याकडे सुपुर्त केला                                           श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष गोविंद देवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास हे बेलापुर  या जन्मगावी येणार असल्याची माहीती मुस्लीम बांधवांना मिळाली जामा मस्जिदचे चिफ ट्रस्टी जाफरभाई आतार बहोद्दीन सय्यद हैदरभाई अकबरभाई टिन मेकरवाले हाजी ईस्माईल रफीक भाई शेख  शफीक बागवान मुनीर बागवान मोहसीन सय्यद गँसुद्दीन शेख आजिज शेख यांनी मुस्लिम बांधवाची ताताडीची बैठक बोलविली वा त्या बैठकीत

राम मंदिराला देणगी देण्याचा विषय घेण्यात आला सर्व मुस्लिम बांधवांनी ताताडीने आपापल्या परीने राम मंदिरासाठी आर्थीक मदत केली आचार्य किशोरजी व्यास यांचे गावात आगमन होण्यापुर्वी मुस्लिम समाजाने ३३ हजार रुपये जमा केले होते आचार्य किशोरजी व्यास यांचे बेलापुर गावातील जामा मस्जिदमध्ये आगमन होताच चिफ ट्रस्टी जाफराभाई आतार व बहोद्दीन सय्यद हाजी ईस्माईल अकबर टिन मेकरवाले यांनी त्यांचे स्वागत केले त्या वेळी आणखी अकरा हजार रुपये जमा झाले अशा प्रकारे मुस्लिम बांधवांच्या वतीने श्रीराम मंदिर बांधाकामासाठी  ४४ हजार रुपयाची देणगी गोविंद देवागिरीजी महाराज यांच्याकडे सुपुर्त करण्यात आली या वेळी बोलताना हाजी ईस्माईल म्हणाले की श्रीराम मंदिराच्या उभारणीत बेलापूरातील मुस्लीम बांधवाचा सहभाग असावा म्हणून आम्ही हा खारीचा विटा उचलण्याचा प्रयत्न केला या वेळी बोलताना अकबर भाई टिन मेकरवाले म्हणाले की एका चांगल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे भाग्य आम्हा मुस्लिम बांधवांना लाभले गावाच्या वतीने आणखी मोठी मदत करण्याचा प्रयत्न करु असेही ते म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव निर्माण झाला तेव्हा पासून ते हे संकट पूर्णपणे नष्ट होई पर्यंतच्या काळात शेतकरी ,छोटे व्यावसायिक , व्यापारी, संघटित असंघटित मोल मजुरी करून हातावर पोट भरणारे कामगार, या सर्वांचे विज बिल माफ करावे या मागणी साठी वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला मात्र सत्ताधारी व बाकी सर्व विरोधी पक्ष  यांचे या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा एकदा आम आदमी पार्टीला चड्डी-बनियान आंदोलन हाती घ्यावे लागले 

संपूर्ण देशामध्ये कोरोना सारख्या भयानक विषाणूच्या प्रादुर्भाव निर्माण झाला होता त्यामुळे आजही आर्थिक गडी विस्कटलेली आहे  उद्योग-व्यवसायात  कामगारांची मोठ्या प्रमाणात कपात झाली कमी वेतनात काम करण्याचा फतवा काढला पूर्वीच्या कोरोनाची  लस बाजारात उपलब्ध होत असताना दुसरी कोरोना ची लाट येणार या धास्तीने पूर्वापार सुरू असलेल्या उद्योगांना खीळ बसली

 हजारो नागरिक या मुळे धास्तावले आहे  संपूर्ण महाराष्ट्रात लाँक डाऊन काटेकोरपणे पालन करण्यात आले होते   देशातील संपूर्ण आर्थिक चक्र थांबलेले आहे दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे त्यामुळे देवाण-घेवाण ठप्प झाली त्यामुळे शेतकरी व्यापारी संघटित व असंघटित कामगार यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे रोजगार नाही शेती मालाला बाजारपेठेत उठावा नाही त्यामुळे  सर्वसामान्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेऊन सर सगट कोरोना काळातील विज बिल माप करावे या मागणीसाठी  आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल यांच्या नेतृत्वाखाली वीज बिल माफ करा या मागणीसाठी  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी  चड्डी-बनियान आंदोलन करण्यात आले यावेळी आपचे जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुकाध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, शहराध्यक्ष किशोर वाडीले, युवा अध्यक्ष अक्षय कुमावत, यशवंत जेठे, वक्ते  प्रवीण जमदाडे, भैरव मोरे, भरत डेंगळे, अक्षय पवार, सागर देवकर,अभिजित राऊत, दीपक परदेशी आदी उपस्थित होते.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- श्रीरामपुर तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणार्या बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेकरीता मतदान शांततेत संपन्न झाले एकुण ७२.५० टक्के मतदान झाले.बेलापुर ग्रामपंचायतीच्या सतरा जागेकरीता मतदान संपन्न झाले बेलापुर गावात एकूण १४१०४ मतदारा पैकी १०२१८ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक १ मध्ये एकुण मतदार १८९५ होते पैकी १३४९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावाला प्रभाग क्रमांक दोन मध्ये ऐकुण मतदान २३५० होते पैकी १६९६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक  तीन मधुन ऐकुण मतदार होते २८५४ पैकी २०७६ जणांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक चार मध्ये ऐकुण २१२३ मतदार होते पैकी १६३७ लोकांनी मतदानाचा हक्क बजावला प्रभाग क्रमांक पाच मध्ये ऐकुण मतदार होते २०३९पैकी १४१४मतदारानी मतदानाचा हक्क बजावला प्रभात क्रमांक सहा मध्ये ऐकूण मतदार होते २८८१पैकी २०४६ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला जि प सदस्य
शरद नवले सुनिल मुथा अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांचा गावकरी मंडळ तर जनता अघाडीचे

रविंद्र खटोड काँग्रेसचे अरुण पा नाईक व बाजार समितीचे संचालक

सुधीर नवले यांचा जनता विकास अघाडी  यांच्यामध्ये सरळ सरळ लढत होती त्यात प्रभाग क्रमांक एक दोन तीन सहा मध्ये अपक्ष उमेदवार असल्यामुळै सर्वच प्रभागात कमालीची चुरस निर्माण झाली आहे प्रत्येक प्रभागात दोनही पँनल बरोबरच अपक्षांनीही आपला हात सैल सोडल्यामुळे सकाळपासुनच मतदारांनी मतदान केंद्राभोवती रांगा लावल्या होत्या काही अनुचित प्रकार होवु नये म्हणून भापोसे आयुष नोपाणी हे बेलापुरात तळ ठोकुन होते सर्व मतदारांचे भवितव्य आता मशिनमध्ये बंद झाले आहे अपक्षासह दोनही पँनलने विजयाचा दावा केला असला तरी मतदार कुणाला कौल देणार हे सोमवारच्या निकाला नंतरच जाहीर होईल

बेलापुर  (देविदास देसाई  )-बेलापुर खूर्द येथील केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकाने रस्त्यावर सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश बँकेला परत केला त्या शिक्षकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

या बाबत सविस्तर माहीती अशी की केशव गोविंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील शिक्षक जालींदर विटनोर हे शाळेच्या कामानिमित्त उच्च माध्यमिक मडंळ पुणे येथे गेले होते शाळेचे


कामकाज आटोपुन रस्त्याने पायी जात असताना त्यांच्या पायाने एक कागद उडाला तो कागद त्यांना चेक साराखा वाटला त्यामुळे त्यांनी तो उचलुन हातात घेतला तर तो खरोखरच चेक होता अन तो ही चक्क नऊ कोटी रुपयाचा १३ जानेवारी २०२१ रोजी दिलेला चेक हा बँक आँफ महाराष्ट्र शाखेतुन एल आय सी कार्यालयासाठी देण्यात आलेला होता त्यांनी ही घटना तातडीने विद्यालयाचे प्राचार्य सोपान मगर व आपले नाशिक येथील नातेवाईक डाँ नवनाथ तमनर यांना कळविली दोघांनीही तो चेक  महाराष्ट्र बँकेच्या शाखेत नेवुन देण्याचा सल्ला दिला तो चेक घेवुन विटनोर हे महाराष्ट्र बँकेच्या शिवाजी नगर येथील शाखेत गेले तेथे गेल्यावर बँकेचे शाखाधिकारी कुलकर्णी यांना या बाबत माहीती देताच त्यांना फार आंनद झाला त्यांनी तातडीने सर्व स्टाफची बैठक बोलविली बैठकीत जालींदर विटनोर यांनी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी व शाखाधिकारी पी एच पारख यांच्याकडे तो सापडलेला नऊ कोटी रुपयाचा धनादेश सुपूर्त केला सर्वांनी जालींदर विटनोर यांच्या प्रामाणिकपणा बद्दल टाळ्याच्या गजरात कौतुक करुन बँकेच्या वतीने विटनोर यांचा सत्कार करुन त्यांना गिफ्टही देण्यात आले या वेळी बँकेचे महाप्रबंधक सी एन कुलकर्णी म्हणाले की हा धनादेश बँक आँफ महाराष्ट्र एम्प्लाँइज पेंशन ट्रस्टच्या वतीने एल आय सी ला देण्यात आलेला होता पर रस्त्याने जाताना हा चेक गहाळ झाला होता विटनोर सरांनी प्रामाणिकपणे तो चेक आणुन दिला त्या बद्दल शाखेच्या वतीने त्यांचे कौतुक करतो असेही कुलकर्णी म्हणाले*

बेलापुर (प्रतिनिधी  )- सत्तेच्या धुंदीत मद मस्त झालेल्यांना आता घरचा रस्ता दाखवुन गावकरी मंडळाच्या सर्व सतरा सदस्यांना निवडून द्या त्यांच्याकडून दर्जेदार काम करुन घेण्याची जबाबदारी माझी आहे असे अवाहन गावकरी मंडळाचे नेते सुनील मुथा यांनी केले गावकरी मंडळाच्या वतीने आझाद मैदान येथे आयोजित प्रचार सांगता सभेत अध्यक्ष पदावरुन बोलाताना मुथा म्हणाले की एका विकास कामाला दहा वर्षातुन एकदाच निधी येतो त्यामुळे त्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहीजे सत्ताधार्यांनी गटारीची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची केली असुन गटारीतुन सांडपाणी वाहुनच जात नाही केवळ काम उरकायचे अन बिल काढायचे हाच एकमेव धंदा चालू असुन मतदानातुन या महाभागांना जाब विचारा चुकीच्या कामाचा जाब विचारण्याची जबाबदार आपलीच आहे मला त्याचे काय असा विचार जर सर्वांनी केला तर यांचे धंदे जोरात चालतील चुकीच्या कामांना अन चुकीच्या माणसांना पाठीशी घालु नका  हीच वेळ आहे नाही तर पाच वर्ष पश्चात्ताप करण्याची वेळ येईल गावात चाललेल्या चुकीच्या कामाबाबत मीच वेळोवेळी आवाज उठविला असेही मुथा म्हणाले तुमच्या बापाबरोबर मी काम केलेले आहे ते करताना अभिमान वाटायचा आज तुमचे काम पाहुन लाज वाटते पैसा वाटला की निवडून येता येते हा गैरसमज काढुन टाका सत्तेतुन पैसा कमवायचा पैशातुन गुंड गोळा करायचे ते ग्रामसभेत आणायचे अन बोलणाराला दमबाजी करायची ही यांची पध्दत आहे ग्रामपंचायतीकडे लाखो रुपयाचे भंगार पडलेले आहे ते एका व्यक्तीच्या घरात पडलेले आहे गावची ग्रामपंचायत म्हणजे आपली घरची मालमत्ता असल्यागत ही मंडळी वावारत आहे गावात वेगवेगळ्या टोळ्या तयार झालेल्या आहे आता त्यात  कर्मचाऱ्यांची टोळी देखील सामील झाली आहे आपल्या मर्जीने कर्मचारी भरले त्याचा बोजा आपल्यावर पडत आहे त्यामुळे आता जागे होवुन मतदान करा असे अवाहनही मुथा यांनी केले आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-गावकरी मंडळाने काढलेल्या प्रचार फेरीस नागरीकांनी मोठ्या उत्सहात प्रतिसाद दिला महीला पुरुष मोठ्या संख्येने या प्रचार मोहीमेत सहभागी झाले होते महीलासह सर्वांच्याच डोक्यात टोप्या घातलेल्या होत्या त्या टोप्यावर दोन्ही बाजुने गावाकरी मंडळाची निशाणी ट्रँक्टर रोडरोलर रिक्षाचे चिन्ह छापलेले होते बाजारा पेठेतील हनुमान मंदिरापासुन प्रचार फेरीस सुरुवात झाली प्रत्येक गल्ली गल्लीतुन जात उमेदवारांनी मतदारांना मत देण्याचे अवाहन केले  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन फेरीची सांगता झाली सायंकाळी आझाद मैदान येथे झालेल्या प्रचार साभेतही नागरीकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली प्रचार फेरीस मिळालेला प्रतिसाद पहाता व सभेची गर्दी पहाता या वेळेस गांवकरी मंडळ विजयी होईल असा दावा मंडळाच्या नेत्यांनी केला आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget