Latest Post

बेलापूरात दुषित पाणीपुरवठ्या विरोधात शोले स्टाईल आंदोलनाचा इशारा 

    बेलापूर : - ( प्रतिनिधी ) गेल्या अनेक दिवसांपासून बेलापूरकरांना दुषित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असून त्यात सुधारणा न झाल्यास पाणीपुरवठ्याच्या मुख्य टाकीवर चढून शोले स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा अशोक कारखाण्याचे संचालक अभिषेक खंडागळे यांनी 

ग्रामविकास अधिकारी राजेंद्र तगरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

       निवेदनात पुढे म्हटले आहे की, सध्या साथीचे रोग चालू आहे. त्यातच एक ते दिड महिन्यापासून गावात पिण्यासाठी दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाणीसाठा मुबलक असताना , ऐन दिवाळीतही नागरिकांना अशाच दुषित पाण्याचा पुरवठा केला गेला. पाणी मुबलक असताना जारचे पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तळ्याचे व इतर श्रोतांच्या  पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवावे व त्वरित पाणीपुरवठा सुधरावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

     वेळोवेळी सांगूनही यात सुधारणा होत नसल्याने पुढील आठ दिवसात पाणी पुरवठ्यात सुधारणा न झाल्यास ग्रामस्थांसह मुख्य पाण्याच्या टाकीवर चढून सामुदायिक शोले स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा अभिषेक खंडागळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. सदर निवेनावर भास्कर बंगाळ , प्रसाद खरात , शांतवन अमोलिक , महेश कुऱ्हे , दादासाहेब कुताळ आदिंच्या सह्या आहेत.

अहमदनगर - शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी रविवारी राज्याच्या राजकारणात भूकंप आणला. त्यांनी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिली आहे. यावर, आमची कसल्याही प्रकारची राजकीय चर्चा झाली नाही, असे स्पष्टीकरण विखे पाटील यांनी दिले आहे. मात्र, असे असले तरी, सत्तारांच्या या ऑफरमुळे विखेपाटील शिवसेनेच्या वाटेवर आहेत का? अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आले आहे. अब्दुल सत्तार हे एका कार्यक्रमासाठी श्रीरामपूरमध्ये आले असता त्यांनी विखे पाटलांना ही ऑफर दिली.विखे पाटील हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी शिवसेनेत यावे आणि राज्याचे नेतृत्व करावे. मात्र, मी तर शिवसेनेत फक्त ऑफर देणारा आहे. परंतू आमचे पक्ष प्रमुख अंतिम निर्णय घेतात आणि पक्षप्रमुख जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील. या अगोदरही विखे पाटील शिवसेनेत होते. त्यांनाही शिवसेनेचा अनुभव आहे. राज्य सरकारमध्ये अशा नेत्यांची गरज आहे आणि निश्चितपणे त्याचा परिणाम भविष्यात दिसेल,असे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.सत्तार यांच्या ऑफर नंतर, काही वेळातच राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया आली. अब्दुल सत्तार हे माझे चांगले मित्र असून पक्षविरहित आमची मैत्री आहे. आज ग्रामीण विकास विभागाचा कार्यक्रम होता पंचायत समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन करायचे होते. यासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही,असे विखे पाटील यांनी म्हटले आहे.खरे तर विखे पाटील भाजपमध्ये जात असताना त्यांच्या सोबत कोण-कोण जाणार? अशी जोरदार चर्चा होत होती. यात अब्दुल सत्तार यांचे नाव आघाडीवर होते. मात्र, अब्दुल सत्तार शिवसेनेत गेले आणि विखे पाटील भाजपमध्ये गेले. अब्दुल सत्तार यांच्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टिकरण दिले असले, तरी राजकारणात काहीही होवू शकते. त्यामुळे ते उद्या शिवसेनेत दिसले तर नवल नाही, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

अहमदनगर : गेल्या २० दिवसांपासून रिक्त असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी अनिल कटके यांना नियुक्ती मिळाली आहे. ते कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यातून बदलून आले आहेत. याशिवाय इतर सहायक निरीक्षक व उपनिरीक्षकांच्याही जिल्हांतर्गत बदल्या पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केल्या आहेत. काही अधिकारी नव्याने बदलून आले आहेत.स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक दिलीप पवार यांची ३१ आॅक्टोबर रोजी पुणे ग्रामीणला बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. या महत्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष होते. दरम्यान पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी २० नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश दिले. त्यात कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल कटके यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती मिळाली. कटके यांच्याकडे कोपरगाव शहर व तालुका अशा दोन्ही पोलीस ठाण्यांचा पदभार होता. आता हे दोन्ही पदभार शिर्डीचे निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याकडे सोपवण्यात आले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्षातील निरीक्षक संजय सानप यांची तात्पुरत्या स्वरूपात टू प्लस पथकात नेमणूक करण्यात आली आहे. जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे यांना नगर येथील दहशतवादी विरोधी पथकात तात्पुरते संलग्न करण्यात आले आहे. घारगाव ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांची श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात, कर्जतचे सपोनि मनोहर इडेकर यांची नगरला तोफखाना ठाण्यात बदली झाली. तोफखान्याचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा धायवट यांची श्रीरामपूर शहर ठाण्यात, भिंगारचे उपनिरीक्षक पंकज शिंदे यांची संगमनेर शहर ठाण्यात बदली झाली. हे अधिकारी नव्याने हजर सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे हे पाथर्डी ठाण्यात, सपोनि सुनील बडे हे जामखेड ठाण्यात, सपोनि शाहिदखान पठाण हे बीडीडीएस येथे, सपोनि दिलीप तेजनकर हे श्रीगोंदा ठाण्यात, सपोनि दिलीप शिरसाठ हे जिल्हा विशेष शाखेत नव्याने हजर झाले. याशिवाय उपनिरीक्षक रणजित गट हे श्रीगोंदा ठाण्यात, मधुकर शिंदे राहुरी ठाण्यात, अनिल गाडेकर हे ट्रायल मॉनेटरिंग सेलमध्ये, नवनाथ दहातोंडे हे मानवसंसाधन विभागात, अशोक लाड हे शिर्डीत साई मंदिरात, तर उपनिरीक्षक दीपक पाठक हे एमआयडीसी ठाण्यात नव्याने हजर झाले आहेत. 

शिर्डी : आंतरराष्ट्रीय तिर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डीत गुन्हेगारी राज हळूहळू डोके वर काढू लागली आहे. गुरूवारी रात्री काही गुंडांनी निमगाव हद्दीतील देशमुख चारी जवळील राहणाऱ्या रवींद्र साहेबराव माळी (वय-३७ ) या किराणा दुकानदाराचा मानेवर चाकूने वार करून खून केला आहे.या प्रकरणी अकरा जणांवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.शिर्डीच्या शासकीय गेस्ट हाऊस समोरील देशमुख चारी येथे निमगाव हद्दीमध्ये रवींद्र साहेबराव माळी यांचे व आरोपी यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. याची तक्रार शिर्डी पोलीस स्टेशनला रवींद्र साहेबराव माळी यांनी केली होती. याचा राग धरून अजय वैजनाथ भांगे, विशाल रमेश पाटील, रविंद्र बनसोडे, समीर शेख, अज्जु पठाण, रंजना वैजनाथ भांगे, ललिता रमेश पाटील, सुनील लोखंडे, अक्षय शिंदे, महेश गायकवाड, कुणाल जगताप आदी अकरा जणांनी १९ नोव्हेंबरच्या रात्री अकरा वाजेदरम्यान देशमुख चारीजवळ माळी यास तीन जणांनी पकडून त्याच्यावर चाकूने वार केले.  घटना कळताच पोलिस उपविभागीय अधिकारी संजय सातव, पोलिस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने निर्णय घेत परिसरात आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. पाच आरोपींना पकडण्यात पोलीसांना यश आले असुन उर्वरितांचा शोध सुरू आहे. मयत रविंद्र माळी यांचा मुलगा रोहित माळी याने दिलेल्या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- फ्रेंड्स फाँर एव्हर ग्रुप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने एक पणती जवानो के नाम हा उपक्रम राबविण्यात आला असुन आचार्य गोविंददेवगिरीजी महाराज ऊर्फ आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई व बेलापुर पोलीसांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शहीद जवान व कोरोना काळात शहीद झालेल्या कोरोना योद्ध्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली         फ्रेंड्स फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने गेल्या पाच वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी एक पणती शहीद जवानो के नाम हा उपक्रम गेल्या पाच वर्षापासून राबविला जात आहे  या वर्षी महंत गोविंददेवगिरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास पत्रकार देविदास देसाई बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके साईनाथ राशिनकर हरिष पानसंबळ रामेश्वर ढोकणे यांच्या हस्ते दिप पेटविण्यात आले या वेळी जि प सदस्य शरद नवले बाजार समितीचे संचालक सुधीर नवले अशोक कारखान्याचे संचालक अभिषेक खंडागळे अजय डाकले पंडीत महेशजी व्यास खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड भरत साळुंके  दिलीप दायमा उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिषेक खंडागळे प्रफुल्ल काळे गोपाल जोशी मयुर साळुंके राजेश सुर्यवंशी योगेश जाधव सुभाष शेलार साईनाथ शिरसाठ शशिकांत तेलोरे महेश कुर्हे विष्णूकांत लखोटीया संदीप जाधव निशिकांत लखोटीया विजय कोठारी प्रभात कुर्हे प्रशांत मुंडलीक विकास खोसे सुरेश जाधव विशाल श्रीगोड विशाल वर्मा श्रीनिवास हिरवे गोरख कुमावत राम कुर्हे जयेंद्र खटोड रविंद्र कुर्हे वेणूगोपाल सोमाणी सुमीत सोमाणी महेश उंडे श्रीकांत भागवत रामेश्वर कोतकर आदिंनी विशेष परिश्रम घेतले.

शिर्डी - राज्य सरकारने येत्या पाडव्याला, १६ नोव्हेंबर रोजी साईमंदीर उघडण्याचा निर्णय घेवुन जगभरातील भाविकांना दिवाळीची अनोखी भेट दिली आहे. मंदीरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदीर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे.पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले. यावेळी डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे व मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, मंदीर प्रमुख रमेश चौधरी उपस्थीत होते.कोरोनामुळे १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साईमंदीर बंद करण्यात आले होते. तब्बल २४२ दिवसांनी पाडव्याला साईमंदीर उघडणार आहे. सूरवातीला  सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळुहळु ही संख्या वाढवण्यात येईल.६५ वर्षावरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रूग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोना बाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणाऱ्या भाविकांमधुन किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येती विषयी फिडबॅक घेतला जाणार आहे.भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदीरात जावुन दर्शन घेता येईल मात्र चावडी आणि मारूती मंदीरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिगेटींग मधुन पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदीरात हार, प्रसाद आदी पुजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पुजा, ध्यानमंदीर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीन मध्ये चहा-बिस्कीटे मिळणार नाही. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळुहळु भाविकांना पुर्वी प्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे. भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे.  राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.

पुणे : वानवडीतील खुनाच्या प्रयत्नातील फरार असलेल्या आरोपीकडून आणि त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरुन  स्वारगेट पोलिसांनी ११ पिस्तुले आणि ३१ काडतुसे असा एकूण ४ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या आरोपींनी विकलेल्या दोन पिस्तुलांचा वापर वानवडी आणि वेल्हे येथील गोळीबाराच्या गुन्ह्यात करण्यात आला आहे.बारक्या ऊर्फ प्रमोद श्रीकांत पारसे (वय १९, रा. आंबेगाव पठार), राजू अशोक जाधव (वय २०, रा. माणगाव, ता़ हवेली), बल्लुसिंग करतारसिंग शिकलीगर (वय ४९, रा.निमखेडी, जि़ बुलढाणा), लादेन ऊर्फ सोहेल मोदीन आसंगी (वय २४, रा. टेल्को कॉलनी, कात्रज) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर, उपायुक्त सागर पाटील यांनी माहिती दिली. वानवडी परिसरात काही दिवसांपूर्वी वाळु सप्लायरवर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्या गुन्ह्यातील आरोपीला पिस्तुल पुरविणारा व सध्या फरार असलेल्या आरोपी बारक्या हा स्वारगेट येथील पीएमपी बसस्थानकावर मित्राची वाट पहात थांबला असल्याची माहिती स्वारगेट पोलिसांना मिळाली.त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बारक्या याला पकडले. त्याच्याकडून २ गावठी पिस्तुले आणि ४ काडतुसे जप्त करण्यात आली. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने राजू जाधव याला एकूण १३ गावठी पिस्तुल व काडतुसे विकण्यास दिल्याचे सांगितले. त्यानुसार राजू जाधव याला पकडून त्याच्याकडून १ गावठी पिस्तुल व ४ काडतुसे जप्त करण्यात आली. प्रमोद व राजू यांनी त्याच्या ओळखीच्या लादेन याला ४ पिस्तुले विकल्याचे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी लादेन याला पकडून त्याच्याकडून ३ पिस्तुल व ८ काडतुसे जप्त केली. त्याने राजू जाधव याच्याबरोबर बुलढाणा येथे जाऊन बल्लुसिंग शिकलीगर याच्याकडून आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी शिकलीगर याला अटक केली़.लादेन याने त्यातील पिस्तुल संदीप धुमाळ याला विकल्याचे सांगितले़ धुमाळ याने वेल्ह्यामध्ये त्यामधून गोळीबार केला होता़ त्याला ग्रामीण पोलिसांनी पकडले असून पिस्तुल जप्त केले आहे़ राजू आणि बारक्या हे दोघेही महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत़ राजू याचे नातेवाईक बुलढाणा जिल्ह्यातील निमखेडा येथे राहणारे आहेत़ तेथे त्यांची शिकलीगर याच्याशी ओळख झाली होती़ त्यातून त्यांनी त्याच्याकडून पिस्तुले आणून येथे दुप्पट किमंतीला विकली होती़ ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी, उपनिरीक्षक सुरेश जायभाय, हवालदार महेंद्र जगताप, पंढरीनाथ शिंदे, अरुण पाटील, रामचंद्र गुरव, विजय कुंभार, विजय खोमणे, महेश बारवकर, ज्ञाना बडे, मनोज भोकरे, सचिन दळवी, अमित शिंदे, वैभव शितकाल, महेश काटे, भूषण उंडे, बाबासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांनी केली़.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget