Latest Post

बेलापूर  (प्रतिनिधी  )- लग्न समारंभासाठी बेकायदा मंडळी जमवुन मा जिल्हाधिकारी अहमदनगर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल बेलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन श्रीरामपूर तालुक्यातील हा पहीलाच गुन्हा आहे                                        या बाबत बेलापूर खूर्द येथील पोलीसा पाटील युवराज गोरक्षनाथ जोशी यांनी बेलापूर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली की मी सरपंच  अनुराधा गाढे ग्रामसेवक चंद्रकांत तुंभारे कामगार तलाठी विकास शिंदे अनिल गाढे सुनिल बारहाते उमेश बारहाते आदींची ग्रामस्तरावर कोरोना कमीटी असुन मी सचिव म्हणून काम पहात आहे आज साकाळी अकरा वाजता श्रीहरिहर केशव गोविंद बन ट्रस्टच्या हाँलमध्ये चालू आसलेल्या लग्न समारंभात कुठल्याही नियमांचे पालन न करता चार पाचशे लोक एकत्र आल्याचे समजताच कोरोना १९ कमीटीचे सर्व जण सदर ठिकाणी  जावुन समक्ष पहाणी केली असता सदर कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली त्या वेळी केशव गोविंद बन ट्रस्टचे पदाधीकारी यांनी लग्न समारंभास परवानगी देताना कोरोनाचा प्रादुर्भाव होवु नये म्हणून कुठलीही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही तसेच लग्न समारंभाच्या वेळी ट्रस्टचे कुणीही पदाधीकारी उपस्थित नव्हते गळनिंब येथील मुलगी व सडे तालुका राहुरी येथील नवरदेव यांचा विवाह पार पडत असताना मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली या बाबत कमीटीने विचारणा केली आसता काहींनी आम्ही रोख पैसे मोजले असल्याचे सांगितले या बाबत कमीटीने ट्रस्टच्या पदाधीकार्याशी संपर्क साधला असता दोन तास कुणीही आले नसल्याचे कोरोना कमीटीचे म्हणणे आहे ट्रस्टने कार्यक्रमाची सुपारी घेतल्या नंतर तेथे थांबणे आवश्यक होते परंतु तसे न करता ट्रस्टचे अध्यक्ष सचिव यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही प्रकारची उपाय योजना न करता हाँल भाडे घेवुन कार्यक्रमासाठी दिली तसेच नवरदेव नवरीचे  आई वडील यांनी लग्न समारंभासाठी १०० ते १५० पेक्षा जादा लोक एकत्र जमवुन मा जिल्हाधिकारी  व जिल्हा दंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अहमदनगर यांचेकडील कोरोना (१९) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचे अनुशंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना पत्रक / आदेश क्रDC/कार्या/९ब१/२०२०दिनांक३१मे२०२० अन्वये तसेच क्रआव्यमपू/कार्या१९अ/५९२/२०२०अहमदनगर दिनांक २जुन २०२० यांचे आदेशाचे उल्लंघन केले बाबतची फिर्याद देण्यात आली असुन या फिर्यादीमुळे वर्हाडी मंडळीची धांदल उडाली कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाने कठोर उपाय योजना केली असली तरी ग्रामस्थ मात्र कोरोना बाबत फारसे गंभीर दिसत नसल्याचे समोर आले आहे.

बुलडाणा - 30 जून
ग्रीन गोल्ड कंपनीने सोयाबीन चे बोगस बियाणे विकुण शेतकऱ्यांची फसवणूक केली त्यामुळे शेतकरी.मागणी करुण ही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत नव्होती म्हणून काही शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री रविकांत तुपकर यांची भेट घेतली होती.या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना घेवून रविकांत तुपकर व त्यांचे सहकारी 29 जून 2020 रोजी दु.1 वाजता बुलडाणा जिल्हा कृषि अधीक्षक नरेंद्र नाइक यांची कैबिन मध्ये जावून
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई व बोगस बियाणे देणारी कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी साठी कैबिन मध्ये बैठा आंदोलन सुरु केला,सायंकाळ पर्यंत काही निर्णय ना झाल्याने कार्रवाई होय पर्यंत कार्यालय सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेत तुपकर व आंदोलकांनी रात्रीचा जेवन कैबिन मध्ये केला व रात्री कैबिन मध्येच मुक्काम करत सर्वजन झोपले
       शेतकऱ्यांच्या आक्रमकतेपुढे कृषी विभागाने नारमाईची भूमिका घेत चिखली पो.स्टे.ला रात्री 1.17 वा ग्रीन गोल्ड कंपनीवर भा.द.वि.कलम 420, बीज अधिनियम 6(b) & 7(b) बियाणे नियम 1968 च्या 23 (d) नुसार गुन्हा दाखल केला व कंपनीचे चिखली MIDC मधील गोडावून रात्री 3 वाजता सील करण्यात आले.तसेच ग्रीन गोल्ड कंपनीला राज्यात बंदी घालावी अशी शिफारस बुलडाणा कृषी विभागाने राज्य सरकार कडे केली आहे.प्रशासना कडून शेतकऱ्यांना बोगस बियाणे देणारी कंपनीवर  सदरची कार्रवाई झाल्यानंतर रात्री 3:30 वाजता आंदोलन संपले तो पर्यंत जिल्हा कृषी अधीक्षक नरेंद्र नाईक व कर्मचारी कार्यालयातच होते.आता नुकसान भरपाईसाठी शेतकरी न्यायालयात जाणार असल्याची माहिती तुपकर यांनी दिली.या आंदोलनात राणा चंदन,नितीन राजपूत,पवन देशमुख,सैय्यद वसीम,प्रदीप शेळके,शेख रफिक शेख करीम,दत्तात्रय जेऊघाले, ऋषिकेश म्हस्के यांच्यासह अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोपरगावकडून एक रुग्णवाहिका गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णाला घेवून गोंधवणीपर्यंत आली. परंतु करोनाबाधित रुग्ण सापडल्याने गोंधवणीचा भाग सील करण्यात आला आहे. रुग्णाला तातडीने घेवून जाणे गरजेचे असल्यामुळे तेथील लोखंडी पाईप काढण्यासाठी गेले असता त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरल्यामुळे चारपाच लोकांना त्याचा झटका बसला. ही बाब काहींच्या लक्षात आली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती. एवढी मोठी घटना घडल्याची माहिती सांगितली असता अधिकारी व पदाधिकार्‍यांनी एकमेकांवर ढकला ढकली केल्याने संताप व्क्त होत आहे.गोंधवणी शिवारात चार दिवसापूर्वी करोना बाधीत रुग्ण सापडल्याने गोंधवणी परीसर सील केला आहे. काल सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कोपरगावकडून रुग्ण घेवून रुग्णवाहिका गोंधवणीपर्यंत पोहोचली. परंंतु परिसर सील असल्याने रस्ता बंद होता; परंतु रुग्णाला घेवून रुग्णवाहिका जाणे आवश्यक होते. तेथील नागरिकांनी पाईप काढून रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरलेला होता.या पाईपमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याची माहिती भैरवनाथनगरचे सरपंच भारत तुपे यांनी प्रांंताधिकार्‍यांंना सांगण्यासाठी फोन केला त्यांचा मोबाईल बंद होता. तहसीलदाशी संपर्क केला असता मी अधिकार्‍यांना सांगतो असे त्यांनी सांगितले. नगरपालिकेत फोन केला तर हे पोलिसांचे काम आहे असे उत्तर मिळाले. त्यानंतर उपनगराध्यक्ष करण ससाणे यांना सांगितले असता त्यांनी पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांना खडसावून घटनास्थळी पाठविले. या कर्मचार्‍यांनी तातडीने या पाईपमध्ये उतरलेला प्रवाह बंद करून रस्ता मोकळा केला. त्यांतर रुग्णवाहिका श्रीरामपूरकडे रवाना झाली, असे भारत तुपे यांनी सांगितले.

अहमदनगर - यातील तक्रारदार हे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांनी उत्पादन शुल्क विभागाकडे दारु विक्रीसाठी लागणारा परवाना मिळण्यासाठी रितसर अर्ज केला होता . सदर अर्जावरुन त्यांना दारु विक्रीचा परवाना मिळाला होता त्यावरुन त्यांनी हॉटेल चालु केले होते . यातील आरोपी नामे दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याने सदर परवाण्याबाबत माहीती अधिकार अन्वये उत्पादन शुल्क विभागाकडे कोणत्या कागदपत्राचे आधारे परवाना दिला याबाबतची माहीती मागवुन घेतली होती . व सदर माहीतीचे आधारे वर नमुद आरोपी यातील तक्रारदार यांना सदर हॉटेल परवाना हा नियमानुसार मिळाला नसुन त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत . सदर बाबत मी उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्टांकडे तक्रारी करुन तुझा हॉटेल परवाना रदद करतो . अशी धमकी देत होता . त्यासाठी तो तक्रारदास यास वारंवार फोन करुन , समक्ष भेटुन तिन लाख रुपये खंडणीची मागणी करत होता . सदर आरोपीविरुध्द नगर शहरात अनेक गुन्हे दाखल असल्याने यातील तक्रारदार हे घाबरुन गेले होते . परंतु त्यांची खंडणी देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालय येथे येवून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा यांची भेट घेवुन त्यांचेकडे तक्रारी अर्ज दिला . लागलीच सदरबाबतची माहीती पो नि दिलीप पवार यांनी वरीष्टांना दिली . सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन मा.श्री अखीलेश कुमार सिंह , पोलीस अधीक्षक , अहमदनगर यांनी सागर पाटील अप्पर पोलीस अधीक्षक , अ.नगर व संदीप मिटके , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग , पो नि दिलीप पवार , स्थानिक गुन्हे शाखा यांना सदर अर्जावर कारवाई करण्याचे आदेश दिले, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि शिशिरकुमार देशमुख , पोउनि सोळके , पोउनि मेढे , पोहेकॉ / रविंद्र पांडे , पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे पोना रविद्र कर्डीले , पोकॉ संदिप दरंदले , कमलेश पाथरुट , रोहीत मिसाळ असे तक्रारदार व सोबत सरकारी दोन पंच यांना बोलावून घेवून तक्रारदार यास एक लाख रुपये रक्कम सोबत घेण्यास सांगून ठरलेल्या ठिकाणी जावुन पंचासमक्ष तक्रारदार व पोलीस पथकाने सापळा रचुन खंडणी मागणारा इसम याची वेषांतर करुन वेगवेगळया ठिकाणी वाट पाहत थांबलो असता काही वेळात तेथे ठरलेल्या संभाषणाप्रमाणे खंडणी मागणारा इसम नामे दिगंबर लक्ष्मण गेंटयाल हा आल्यावर त्याने तक्रारदार यास खंडणीची मागणी करुन रक्कम एक लाख रुपये स्वीकारल्यानंतर सापळयातील पंचासमक्ष पोलीस पथकाने त्यास झडप घालुन त्यास जागीच ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातील एक लाख रुपये रक्कम हस्तगत केली असुन तक्रारदार यांचे फिर्यादीवरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असुन पुढिल कारवाई कोतवाली पोलीस स्टेशन करत आहेत.
आरोपी दिगंबर लक्ष्मण गेंटयाल याचेवर दाखल असलेले गंभीर गुन्हे
 १ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं १८२/२०१५ भा.द.वि.क .३०७,३ ९ ५ प्रमाणे
२ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं १८०/२०१५ भा.द.वि.क .४३८,३५३ प्रमाणे
३ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं 1८०/२०१६ मुंबई पो.अॅक्ट ३७ ( १ ) ३ , १३५ प्रमाणे
 ४ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं ११ ९ ७ / २०१५ डिफेसमेंट अॅक्ट क ३५ प्रमाणे ५ ) कोतवाली पोस्टे गु.रजि.नं 1 ३ ९ ० / २०१७ भा.द.वि.क. ३ ९ २,३२७ ३४१ प्रमाणे
६ ) तोफखाना पोस्टे गु.रजि नं 1३ ९ ० / २०१६ आर्म अॅक्ट ३,२५ प्रमाणे
७ ) कोतवाली पोस्टे गु.रजि नं 1 ११७/२०२० महा पो.का.क. ३७ ( १ ) ३ १३५ प्रमाणे अहमदनगर जिल्हा पोलीस दलातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की , अशा प्रकारचे गुन्हेगार प्रवृत्तीचे इसम कोणत्याही कारणासाठी खंडणी / वर्गणी मागत असतील किंवा इतर प्रकारचा त्रास देत असतील तर तात्काळ पोलीसांशी संपर्क साधावा त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल . सदरची कारवाई मा . श्री अखीलेश कुमार सिंह , पोलीस अधीक्षक , अहमदनगर , मा . श्री सागर पाटील साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक , अ.नगर व श्री . संदीप मिटके साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी , नगर शहर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी केलेली आहे. 

श्रीरामपूर | श्रीरामपूर शहरातील गोंधवनी परिसरात 18 जूनला कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे गोंधवनी रस्ता परिसर 200 मीटर पूर्णपणे सील केला असून, या परिसरातील मुख्य रस्ता हा पूर्णपणे बंद केलेला असल्याने होणारी गैरसोय थांबावी म्हणून लवकरात लवकर गोंधवनी रोड हा जुना राज्यमार्ग म्हणून त्वरित चालू करावा, अशी मागणी नगरसेविका प्रणिती दिपक चव्हाण व खादी ग्रामोद्योगचे दिपक चरणदादा चव्हाण यांनी केली आहे.   प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हंटले आहे की, रेड झोन असल्यामुळे परिसरातील सर्वच दुकाने 100 % बंद आहेत. अगोदरच गेल्या तीनचार महिन्यापासून लोकडाऊन परिस्थिती असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन त्रस्त झालेले असून उपासमारीची वेळ आली आहे. या भागात वास्तव्य करणारा बहुसंख्य वर्ग हा हातावर पोट भरणारा आहे. परिसरातील सर्वच दुकाने बंद असल्याने उधारीवरती नागरिकांचा जो उदरनिर्वाह चालत होता, तोही पूर्णपणे ठप्प झाला असल्याचे चव्हाण यांनी म्हंटले आहे.
गेल्या पाच सहा दिवसांपासून नागरिकांचे हाल होत असून स्थानिक प्रशासन, आमदार, नगराध्यक्षा, प्रांत, तहसीलदार यांनी लक्ष घालून किमान या रेड झोन परिसरात सकाळ व संध्याकाळी एक-एक तास जीवनावश्यक वस्तूंची दुकाने चालू ठेवावीत, जेणेकरून स्थानिक नागरिकांची उपासमार थांबेल.  रेड झोन असल्यामुळे प्रशासनाने फक्त रहिवासी क्षेत्रातील विविध रस्ते बंद करावयास हवे होते ; परंतु  राज्यमार्ग असलेला गोंधवनी रोड हा मुख्य रस्ताच बंद केल्या कारणाने शहरातील दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांची त्याचबरोबर नगरपरिषद कर्मचाऱ्यांचीदेखील जाणेयेणे कमी ससेहोलपट होत आहे. त्यामुळे, परिसरातील गोंधवनी रोड हा मुख्य रस्ता किमान एक बाजू तरी चालू ठेवावा, अशी मागणी गोंधवनी रस्ता परिसरातील नागरिकांनी केली आहे.

बुलडाणा - 29 जून
शेतकरी नेते रविकांत तुपकार आक्रमक होत त्यांनी आज 29 जून रोजी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालायात पोहोचन हल्लाबोल आंदोलन करत शेतकऱ्यांना आजच नुकसान भरपाई द्या अन्यथा शेतकऱ्यांची फसवणुक केल्यामुळे ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून व कृषी अधीक्षक कार्यालय व पेटवून देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
     संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात बियाणे कंपन्यांनी व महाबीज नी शेतकऱ्यांना बोगस बियाणांची विक्री केली आहे.याच बियांयांची शेतकऱ्यांनी आपले शेतात पेरणी केली परन्तु बियाणे उगावलेच नाही. बुलडाणा जिल्ह्यात ग्रीन गोल्ड कंपणीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी व बोगस बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी यासाठी रविकांत तुपकरांनी बुलडाणा जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात गेल्या 4 तासापासून हल्लाबोल आंदोलन चालू केले आहे.जर शेतकऱ्यांना आजच्या आज नुकसान भरपाई मिळाली नाही व कंपन्यांवर कारवाई झाली नाही तर कृषी अधीक्षक कार्यालय व ग्रीन गोल्ड कंपनीचे गोडावून पेटवून देण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी राज्यमंत्री  रविकांत तुपकरांनी दिला आहे.तुपकर आक्रमक होताच कार्यालायात पोलिस बल दाखल झालेला असून सायंकाळी 7:45 वाजे पर्यंत तुपकरचा आंदोलन सुरुच आहे.

दि.२५/०६/२०२० रोजी सोनई पोलीस पोलीसांनी घोडेगाव येथे आरोपी नामे निलेश उर्फ निलकंठ मधुकर केदार
रा.घोडेगांव ता.नेवासा याचे ताब्यातुन एक गावठी कटटा हस्तगत करुन गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हयात आरोपी निलेश मधुकर केदार यास अटक करुन त्याचेकडे गुन्हयासंदर्भात कौशल्यपुर्वक तपास करुन त्याने त्याचा मित्र विजय बाळु सोनवणे रा आदर्शनगर, उरुळी देवाची, ता हवेली जि पुणे यास
आणखी एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुस विकल्याची कबुली दिली. त्यावरुन सदर गुन्हयाचे तपास अधिकारी व सोनई पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि जनार्दन सोनवणे यांनी मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली व पुर्व परवानगीने सपोनि ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ दत्ता गावडे, पोकॉ बाबा वाघमोडे यांचे पथक तयार करुन पुणे येथे रवाना केले. सदर पथकाने पुणे येथे जावुन हडपसर पोलीस ठाण्याचे पथकाची मदत घेवुन गुन्हयात पाहीजे आरोपी विजय बाळु सोनवणे याचा शोध घेवुन व त्यास ताब्यात घेवुन त्याचेकडुन एक गावठी कटटा व दोन जिवंत काडतुसे पंचासमक्ष हस्तगत केले आहे. आरोपी विजय बाळु सोनवणे यास सोनई पोलीस स्टेशनला आणुन अटक करुन त्यास मा न्यायालयात हजर केले असुन सदर आरोपीस ३ जुलै पर्यत पोलीस कस्टडी रिमांड
मिळाली आहे. गुन्हयाचा पुढील तपास सपोनि जनार्दन सोनवणे हे करीत आहेत. आरोपी विजय बाळु सोनवणे याचेवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. १. श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजि.नं. १३०/२०१७ भा.द.वि.क. ३०२, ३९४(अ), ३४ प्रमाणे २. हडपसर पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १३५८/२०१८ भा.द.वि.क. ३०७,३९७,३४ प्रमाणे सदरची प्रशंसनीय कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री अखिलेश कुमार सिंह साो अहमदनगर, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती दिपाली काळे मॅडम श्रीरामपुर, मा पोलीस उपअधिक्षक मंदार जवळे सो उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली सोनई पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे, सपोनि/ज्ञानेश्वर थोरात, पोहेकॉ चव्हाण, पोहेकॉ दत्ता गावडे, पोना शिवाजी माने, पोकॉ विठठल थोरात, पोकॉ बाबा वाघमोडे व पोकॉ सचिन ठोंबरे यांनी केली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget