Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर दि.१३- अंभोरा चेक पोस्ट येथे सापळा लावून दोन अट्टल दरोडेखोरांना पकडण्यात कोतवाली पोलीस ठाण्याच्या डिबीला यश आले आहे. संतोष नंदू भोसले (वय १९), काळू निलगिर्या भोसले (वय ३०, दोघे रा.वाळूंज पारगाव ता.नगर) असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत समजलेली माहिती अशी की, चंदन इस्टेट मध्ये बंगाल्याच्या दराचे कुलूप तोडून चोरीप्रकरणी दाखल गुन्हातील आरोपी हे अंभोरा पोलीस ठाणे हद्दीत येणार असल्याची माहिती कोतवालीचे पो.नि. प्रविण लोंखडे यांना मिळाली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी अंभोरा चेक पोस्टवर सापळा लावून संतोष नंदू भोसले , काळू निलगिर्या भोसले या दोघांना मोठ्या शिताफीने पकडले. यावेळी पोलीस खाक्या दाखविताच, कोतवाली हद्दीतील गुन्ह्याची कबुली दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पो.नि.प्रविण लोंखडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार डिबीचे पोसई सतिश शिरसाठ, अंभोरा पोस्टचे प्रभारी अधिकारी सपोनि ज्ञानेश्वर कुकलारे, कोतवालीचे पोना गणेश धोत्रे, शाहीद शेख, नितीन शिंदे, पोकाँ सुजय हिवाळे, भारत इंगळे, बापू गोरे, गणेश चव्हाण, देवडे आदिच्या पथकाने ही कारवाई केली.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- आमच्या आडीच वर्षाच्या कार्य काळातील संपुर्ण कामकाजाची निपक्षपातीपणे चौकशी  करुन आम्ही दोषी आढळल्यास आमच्यावर फौजदारी कारवाई करा असे आव्हानच बेलापूरचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी देवुन सत्ताधार्यांना एक प्रकारे घरचा आहेरच दिला आहे         बेलापूर ग्रामपंचायतीत काँग्रेसच्या राधाताई बोंबले या सरपंच असुन सर्व कारभार त्यांच्या वतीने बाजार समितीचे संचालक सुधीर नवले हे पहात आहेत सत्ताधारी पार्टीचे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी मागील मासीक बैठकीत आपला विरोध नोंदवुन या पुढे आमच्या परवानगी शिवाय आर्थिक व्यवहार करु नये असे लेखी दिलेले असतानाही एक तास उलटत नाही तोच एक धनादेश देण्यात आला त्यामुळे उपसरपंच रविंद्र खटोड यांनी ग्रामविकास अधिकार्याकडे विविध माहीती मागीतली असुन पंधरा दिवस होवुनही ती माहीती दिली गेली नाही त्यामुळे खटोड यांचा पारा चांगलाच चढला या वेळी ग्रामपंचायतीतील सर्व कामे ही पारदर्शीच झाली पाहीजे चुकीचे काम करणारांना आम्ही पाठीशी घालणार नाही असे म्हणताच बाजार समितीचे संचालक सुधीर नवले म्हणाले की माजी सरपंच भरत साळुंके यांच्या काळातील सर्व कामे नियमाने झाली का ? टाळ खरेदी कोणत्या पध्दतीने झाली त्यावर रविंद्र खटोड यांनी आम्ही पारदर्शी कारभार केला असुन टाळ खरेदी करताना ई परचेसींग केलेले आहे आणी आमच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची चौकशी करण्याचा अर्ज मीच देतो अन दोषी सापडलो तर फौजदारी कारवाई करा पण कुणाचेही चुकीचे काम यापुढे खपवुन घेणार नाही  अंगणवाडीचे साहीत्य सदस्यांना न विचारता खरेदी केलेच कसे कोणत्या बैठकीत हा विषय घेतला हे दाखवुन द्या ग्रामपंचायतीने खरेदी केलेला संगणक दुसर्याच्या घरी गेलाच कसा? तो कुणाच्या घरी होता त्या अधिकार्याचे लेखी पाहीजे अशी तंबीच खटोड यांनी ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांना दिली सी सी टि व्ही खरेदीची सर्व कागदपत्रे मला हवी आहे असे बजावुन टाळ खरेदीच्या कागदपत्राचीच फाईल उपस्थित सर्वासमोर ठेवुन कुणीही चौकशी करा असेही खटोड यांनी बजावले  या वेळी माजी सदस्य अशोक गवते यांनी नळ कनेक्शनचे पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात आला त्या वेळी खटोड यांनी तातडीने गवते यांना बोलावुन खुलासा करण्यास सांगितले गवते यांनीही आडीच वर्षात मी एकाही व्यक्तीकडून पैसे घेतले नसुन ज्यांचे म्हणणे असेल ते पैसे ग्रामपंचायत कार्यालयात जमा झालेले असेल असे सांगितले या वेळी खटोड यांनी राजकारण हा आमचा धंदा नसुन आम्ही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतुन काम करत असल्याचे सांगितले ग्रामपंचायत कार्यालयात बर्याच नागरीका समोरच दोन नेत्यामध्ये चांगलीच तु..तु.,.मै..मै..झाली त्याची दिवसभर गावात चर्चा असुन गावात चाललेली सर्व विकास कामे ही पारदर्शिपणे व्हावीत अशीच नागरीकांचीही अपेक्षा आहे.

बुलडाणा - 13 जून
बुलडाणा तालुक्याती सैलानी येथे माहामार्ग ठेकेदाराच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका अनेक शेतकरी व नागरिकांना बसला आहे.जोरदार पावसामुळे शेतांचे नुकसान झाले व घरात व दुकानात पाणी शिरले आहे.
       बुलडाणा तालुक्यातील पिंपळगांव सराय जवळ हाजी हज़रत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांची दरगाह आहे.हिन्दू-मुस्लिम एकतेची प्रतीक या दर्ग्यावर देश भरातून भाविक येत असतात.हे स्थान मुख्य मार्गापासुन आत
असल्याने येथे येणाऱ्या भाविकांना फार अडचनीचा सामना करावा लागत होता म्हणून भाविकांच्या सुविधेसाठी दूधा ते हातनी या मार्गचा काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करीत आहे.ठेकेदार सदर काम संथा गति ने होत असल्याने मागील वर्षी पावसाळ्यात तर सैलानी कडे जाणारा मार्ग तब्बल 4 महीने बंदच होता या मुळे या मार्गावरील गावाच्या नागरिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. 12 जून रोजी सैलानी परिसरात जोरदार पाऊस पडला त्यामुळे सैलानीत अनेक घरात,दुकानात रात्रीच्या वेळी पानी घुसल्याने लोकांची तारांबळ उडाली होती.रसत्याला लागून योग्यरित्य नाल्या नसल्याने पानी शेतात शिरले व शेतात उभे मिर्ची व इतर पिकांचे फार नुकसान झाले आहे.सदर लोकांना ठेकेदाराने नुकसान भरपाई द्यावे अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्रात परत एकदा लॉकडाउन लावून सर्व दुकाने बंद करण्यात येणार आहेत अशा स्वरूपाच्या बातम्या काही समाज माध्यमांमध्ये आणि वाहिन्यांवर येत आहेत पण अशाप्रकारे कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले मात्र स्वयंशिस्त पाळावीच लागेल गर्दी करणे आरोग्याला अपायकारक होईल असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.राज्यात पुन्हा लॉकडाऊन अशा बातम्या जनमानसात संभ्रम निर्माण करतात त्यामुळे शहानिशा केल्याशिवाय अशा बातम्या प्रसारित करू नये अशा गैरसमज आणि अफवा पसरवणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट फॉरवर्ड करणे गुन्हा आहे याची जाणीवही मुख्यमंत्र्यांनी करून दिली
स्वयं शिस्त पाळावी
बाहेर पडल्यावर कायम चेहर्‍याचा मास्क लावणे, साबणाने जंतुनाशक आणि हात धुणे, शारीरिक अंतर ठेवणे हे नियम आता आपल्याला आपल्या जीवनाचा भाग बनवावे लागतील. याची सवय होईस्तोवर त्रास होईल पण ही जीवनपद्धती सर्वांनी स्वतःच्या आणि आपल्या जवळच्या व्यक्तींच्या आरोग्यासाठीच अंगीकारावी लागेल. स्वयंशिस्त ही पाळावीच लागणार असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

बेलापूर  (प्रतिनिधी  )- फेस बुक अकाऊंट हँक करुन मोबाईल धारकाच्या नातेवाईका कडून पैसे उकळण्याचा प्रयत्न  थोडक्यात फसला असुन संबधीत मोबाईल धाराकाने सायबर शाखेकडे तक्रार दाखल केली आहे          या बाबत सविस्तर हकीकत अशी की बेलापूर येथील अमोल विठ्ठल गाडे यांचे मोबाईल  अज्ञात व्यक्तीने हँक करुन त्या मोबाईल मधील सर्व व्यक्तीचे मोबाईल नंबर  मिळवुन त्यांना मेसेज केले की मला पैशाची अंत्यंत गरज असुन तातडीने फोन पे वर या खात्यावर पैसे पाठविण्याची विनंती केली मात्र हे संदेश पाठविताना पाठविणार्या व्यक्तीने हिंदीतुन संदेश पाठविला त्यामुळे अमोल गाडे यांच्या मेव्हण्याला संशय आला त्यांनी तातडीने अमोलला फोन करुन विचारणा करताच मी पैसे मागीतलेच नाही असे अमोलने सांगताच त्याच्या मेव्हण्याने   मोबाईलचा स्क्रीन शाँट काढून पाठविला त्याच दरम्यान अमोलला एका व्यापार्याचाही फोन आला अन मग अनेक मित्राचे फोन सुरु झाले की तुला अचानक पैशाची काय गरज पडली या प्रश्नामुळे अमोल गोंधळून गेला त्याने तातडीने गुन्हा अन्वेषन शाखेचे रविंद्र कर्डीले मनोज गोसावी यांना ही घटना सांगीतले त्यांनी ताताडीने व्हाँटसअप वर संदेश पाठविण्यास सांगीतला अशाच प्रकारे गावातील चार पाच जणाचे मोबाईल हँक करण्याच्या घटना घडल्या असुन अमोल गाडे याने अहमदनगर येथील सायबर शाखेकडे लेखी तक्रार दाखल केली असुन गाडे यांच्या बरोबर घडलेली घटना आणखी कुणाच्याही बाबतीत घडू शकते त्यामुळे कुणीही विनाकारण चौकशी केल्याशिवाय आर्थिक व्यवहार करु नये असे अवाहन बेलापूर पोलीस स्टेशनचे रामेश्वर ढोकणे यांनी केले आहे.

बुलडाणा - 12 जून
रात्री झालेल्या पहील्याच जोरदार पावसाने नदी-नाले वाहु लागले आहे.बुलढाणा-धाड मार्गाचे काम सुरु असल्याने कोलवड जवळ पैनगंगा नदीवर पर्यायी पुलाचे बांधकाम करण्यात आले होते परंतु पहील्याच पावासाने नदीला आलेल्या पूरामुळे सदर पर्यायी पुल वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
   विदर्भाला मराठवाड्याशी जोडणारा बुलडाणा-धाड हा प्रमुख मार्ग आहे.सद्या या मार्गाचे काम सार्वजिनक आंधकाम विभागा कडून "हेम" या योजने अंतर्गत जिजामाता रोड निर्मिति व पालसिद्ध कंस्ट्रक्शन करीत आहे.ग्राम कोलवड जवळून पैनगंगा नदी वाहते.या नदीवरचा जुना पुल तोडून नवीन पुलाचे निर्माण कार्य सुरु असून पर्यायी पुलावरुन वाहतूक वळविण्यात आली होती.11 जूनच्या रात्री बुलडाणा तालुक्यातील अनेक भागात जोरदार पाऊस पडल्याने पैनगंगा नदी दुथड़ी वाहु लागल्याने पर्यायी पुल सकाळी 6 वाजेच्या दरम्यान वाहून गेला. त्यामूळे अनेक वाहने अडकुन पडली होती. पाण्याच्या टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने वाहून गेलेल्या पूलावरन ट्रॅक्टर टाकण्याचा धाडसी प्रयत्न केला होता मात्र सुदैवाने ट्रॅक्टर नदीत कोसळता कोसळता वाचला. सद्या या मार्गावारील वाहतूक बंद असून वाहने इतर मार्गाने जात आहे.

बुलडाणा - 12 जून
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण च्या देखरेख खाली बुलडाणा ते देऊळघाट या 7 किलोमीटर मार्गाचे काम मागील काही दिवसापासुन जोरात सुरु आहे.बुलडाणा-अजिंठा या सीमेंट कॉन्क्रीट महामार्गाचे काम दोन वर्षापासून सुरु असून सदर मार्ग दोन भागात विभागलेला आहे.प्रथम बुलडाणा ते देऊळघाट या 7 किलोमीटर मार्गाचे काम डांबरीकरनचे आहे तर पुढे देऊळघाट ते अजिंठा हे जवळपास 40 किलोमीटर चा मार्ग सीमेंट कॉन्क्रीटचा आहे.अनेक अडचणी मुळे या कामात दिरनगाई झाली असून
आता मागील एक महिन्यापासुन बुलडाणा ते देऊळघाट मार्गाचे काम जोमात सुरु आहे.मार्गाचे दोन्ही साइड खोदुन मुरुमाने भरण्यात येत आहे तसेच आयुर्वेद महाविद्यालय जवळचे घाट माथा रुंदीकरणाचे काम युद्धस्तरावर सुरु आहे.या 7 किलोमीटरच्या मार्गावरील जुने पुल पाडून नवीन पुलांचे बांधकाम करण्यात येत आहे.खोदकामा मुळे धुळीने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.सदर माहामार्गाचा काम लवकर होने अपेक्षित आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget