Latest Post

शिरडी (राजेंद्र  गडकरी)-कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लॉक डाउनचा  तिसऱ्या टप्यात  परराज्यातील लोकांना शासनाने गावी जाण्यासाठी  परवानगी दिल्याने अनेक परप्रांतीय आपल्या राज्यात परत जात आहेत शासन त्याची रेल्वे, बसने व्यवस्था करत आहे शिरडीतुन दोन रेल्वे उ,प्रदेशात सोडल्या होत्या व आता शिर्डी येथून पहिली बस  परराज्यात जाण्यासाठी सोडली जात आहे  आज शिर्डीतून पहिली बस विनामुल्य २१ प्रवाश्यांना घेवुन छत्तीसगडच्या देवरीपाससाठी रवाना करण्यात आली,आपल्या गावी  जाणारे लोक मोठे आनंदित  दिसत होते,या नतंरही महाराष्ट्,कर्नाटक,तेलगणा,आध्रंप्रदेश ,गुजरात या राज्यात बसेस राहाता तहसिलमधुन आदेश आला तर सोडल्या जाणार आहेत,५०दिवसानी शिर्डी बस स्थानकात प्रवासी व बसेस बघायला मिळत होते,लॉकडाऊन चे नियम पाळले जात होते,जाणारे लोक  प्रशासनाचे आभार मानत होते,  अनेकाकडे मोठे संसाराचे गाठोडे दिसत होते,येथुन घरी परतत।असताना त्याच्यां चेह्रयावर कही खुशी कही गम ही दिसत होते,येथे कामधंदा।होता, घरी काय करणार। आपल्या।राज्यात गेल्यानंतर  परत महाराष्ट्रात लवकर येता येईल का।असे काही यावेळी बोलत होते, प्रशासनाने चांगली सोय केली ,निवास, भोजनही दिले,असे सांगत त्यानी सगळ्याचे आभारही मानले,काहीच्या डोळ्यात पाणी येत होते,कोरोनापासुन देशाला लवकर मुक्त कर असे काही सांगत होते,साईबाबांना साकडे।घालत होते,यावेळी शिर्डी बसस्थानकात महसुलचेअधिकारी,पोलीस ,
डॉक्टर,व मोजकेच लोक उपस्थित होते,टाळ्या वाजवत व साईच्या जयजयकाराने ही पहीली बस येथुन रवाना करण्यात आली,त्यावेळी तहसीलदार कुंदन हिरे यांनी ड्रायवर व  कंडेकटर यांचे सत्कार केले.

श्रीरामपूर (वार्ताहर) सध्या कोरोना आजाराने थैमान घातले आहे त्यापार्श्वभूमीवर सगळयाच यंत्रणा जागरुक होऊन दक्षता घेतांना दिसत आहे. मात्र श्रीरामपूर नगरपरिषद त्याला अपवाद असून पालिकेचे ढिसाळ नियोजन पुन्हा एकदा समोर आले आहे.
             याबाबत असे की, सध्या कोरोना आजारांमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामध्ये आरोग्य यंत्रणा अलर्ट झाले असतांना श्रीरामपूर नगरपरिषदेची रुग्णवाहिका गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याचे समोर आले आहे.
             श्रीरामपूर काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यांना याचा प्रत्यय आला आहे. रुग्णवाहिका म्हणजे अत्यावश्यक सेवा आणि आताच्या या संकटाच्या काळातच पालिकेची रुग्णवाहिका गेल्या काही दिवसांपासून ना दुरुस्त असल्याने  नगरपरिषद प्रशासन गंभीर नसल्याचे पून्हा एकदा दिसून आले आहे.
               दोन ते तीन दिवसांपासून शहरातील वेग वेगळे नागरिक नगरपरिषदेच्या रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधत आहे परंतु वाहन विभागातील कर्मचारी नागरिकांना रुग्णवाहिका ना दुरुस्त असल्याचे सांगत आहे आणि त्याचा प्रत्यय छल्लारे यांना आला आहे.
            याबाबत अधिक विचारपूस केली असता असे सांगण्यात आले की, वेळेवर सर्व्हिसिंग न झाल्याने सदरची रुग्णवाहिकेच्या दुरुस्तीचे काम गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाण्याच्या टाकीजवळ चालू आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासन किती जागरुक आहे हे दिसून येते आहे.
श्रीरामपूर नगरपरिषदेचे सुमारे १५० कोटींचे वार्षिक बजेट आहे. आणि अश्या अटीतटीच्या प्रसंगी अत्यावश्यक सेवेचा बोजवारा उडाला आहे. यापुर्वी देखील पालकीचे अत्यावश्यक सेवा देणारे वाहन कधी डिझेल अभावी तर कधी गाडीचे टायर खराब झालेने बंद असतात. त्यामुळे नगरपरिषद प्रशासन नेमकी करते काय असा प्रश्न उपस्थित होतो.

श्रीरामपूर . (प्रतिनिधी )-दीड-पावणे दोन महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशानुसार व श्रीरामपूर नगर पालिकेने केलेल्या नियोजनानुसार आज श्रीरामपूरातील बाजारपेठ उघडण्यात आली . दुकानदारांचा अर्धा दिवस दुकानातील झाडलोट आणि धूळ साफ करण्यातच गेला . शहरात आज खरेदी करणाऱ्यांपेक्षा रस्त्यावर फिरणाऱ्या बघ्यांचीच जास्त गर्दी दिसून आली . नगरपालिकेने निर्माण केलेल्या नियंत्रक पथकात सदस्य संख्या सुद्धा जास्त असल्याने रस्त्यावर त्यांचेच टोळके दिसून येत होते.व्यापारी
असोसिएशनने प्रांत अधिकार्‍याकडे केलेली मागणी, त्याला जिल्ह्याचे वजनदार मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी दिलेला पाठिंबा आणि नागरिकांची ताणलेली उत्सुकता या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने मंगळवारी संध्याकाळी उशीरा शहरातील बाजारपेठ उघडण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार आज सकाळी मुख्य बाजारपेठेतील सर्व रस्त्यांवर एका बाजूची दुकाने उघडण्यात आली. मेन रोड, शिवाजी रोड वर पश्चिम मुखी तर नेवासा संगमनेर रोडवर दक्षिणमुखी दुकाने सुरू करण्यात आली.सकाळपासूनच दुकानदारांनी आपली दुकाने उघडून थाटण्यास सुरुवात केली. बारा वाजेपर्यंत दुकानातील झाडलोट व स्वच्छता सुरू होती. कारण दीड महिन्यापेक्षा जास्त काळ दुकाने बंद असल्यामुळे दुकानात सर्वत्र धूळ साचलेली दिसून आली.रस्त्यावर दुकानात जाणाऱ्या ग्राहकांपेक्षा  रस्त्यावर फिरणाऱ्या बघ्यांचीच गर्दी अधिक प्रमाणात होती.बाजार पेठेतील दुकानावर नियंत्रण ठेवण्यासाठी नगरपालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांची सात पथके तयार केली. प्रत्येक पथकामध्ये दहा ते पंधरा लोकांचा समावेश होता. त्यांना नेमून दिलेल्या रस्त्यावर हे सर्व लोक दुकानदारांना व नागरिकांना सूचना देत होते. नगरपालिकेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी समीर शेख, उपमुख्याधिकारी प्रकाश जाधव. सोफिया बागल व त्यांचे सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते. मुख्याधिकारी शेख स्वतः रस्त्यांवर फिरुन दुकानदारांना काळजी घेण्याचे आवाहन करीत होते.  व्यापारी पेठेतील दुकानदारांनी ग्राहकांसाठी सैनीटायझरची व्यवस्था केली होती . इतर कुठेही रांगा नव्हत्या . मात्र दारूच्या दुकानांसमोर खरेदीसाठी मद्यपींच्या मोठया रांगा लागल्या होत्या . या रांगा येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचे लक्ष वेधून घेत होत्या .
  रस्ता मोकळा करा

शहरातील सर्वत्र रस्ते सुरू करण्यात आलेले असताना श्रीरामपूर शहराला दक्षिणोत्तर जोडणाऱ्या सय्यद बाबा चौकतील धान्य गोडाऊन जवळ बंद केलेला रस्ता मात्र सुरू करण्यात न आल्याने वार्ड नंबर 1,2, गोंधवणी रोड, पंजाबी कॉलनी, मिल्लत नगर या भागातील लोकांना रेल्वे पुलाच्या पलीकडे जाण्यासाठी मोठा वळसा घालून यावे लागत होते. सगळीकडे जर बाजारपेठ सुरू करण्यात आली आहे तर हा रस्ता देखील मोकळा करण्यात यावा.  संध्याकाळी पाच नंतर सकाळी नऊ पर्यंत तो बंद करण्यात यावा अशी मागणी दोन्ही बाजूकडील नागरिकांनी केली आहे.

शिरडी (राजेंद्र गडकरी)-अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्याकामी महत्वाचा निणर्य .घेण्यात आलाआहे,जिल्हात तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक, श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.त्यासाठी, महसुल, मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती गठीत करण्यात आली आहे. नायब तहसीलदार (महसुल), मोटार वाहन निरिक्षक, आगार व्यवस्थापक आणि वैदयकिय अधिकारी यांचा या समितीत समावेश असेल.ही समिती एक खिड़की कक्षांतर्गत खालील प्रमाणे कार्यवाही करणार आहे.
यामध्ये, परराज्यात जाणा-या मजुरांची नोंद घेऊन त्यांच्या राज्यनिहाय याद्या तयार करणे, त्यास मान्यता देणे आणि मान्यता प्राप्त यादीतील मजुरांची वैदयकिय अधिकारी यांच्यामार्फत स्क्रिनिंग करणे व त्यांना प्रमाणपत्र देणे आदी जबाबदारी असणार आहे.याशिवाय, मजुरांच्या संख्येनुसार सामाजिक अंतर (5ocial distancing) चे पालन करुन बसेसची संख्या निश्चित करणे, आगार व्यवस्थापकांनी तात्काळ मोफत बसेस उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणे, प्रवाश्यांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध असल्याची खात्री करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस मार्फत मजुरांना राज्याच्या सीमेवर सोडण्याची कार्यवाही करणे आदी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.कोणतीही व्यक्ती / संस्था / संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लघन केल्यास भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय / कायदेशीर कार्यवाहीस पात्र असतील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे, या मुळे अनेकाना आता आपल्या राज्यातजाणे सोयास्कर होणार।आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी)- 51 दिवसांच्या लॉकडाऊननंतर आजपासून श्रीरामपुरातील दुकाने शासकीय नियम पाळून सुरू होणार आहेत. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांनी तसा आदेशही जारी केला आहे. श्रीरामपूर शहारातील दुकाने सुरु करावी यासाठी व्यापार असोसिएशनने महसूल अधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यापूर्वी आ. लहू कानडे, खा. सदाशिव लोखंडे यांनी व्यापारी व प्रशासकीय-अधिकार्‍यांच्या तीन-चार बैठका घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.काल दुपारी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे बोलणे करून दिल्यानंतर ना. थोरात यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांना आदेश देऊन नियमाचे पालन करून व्यावसाय सुरु करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रांताधिकार्‍यांनी तहसीलदार व पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना आदेश केल्यानंतर मुख्याधिकार्‍यांनी काल रात्री उशिरा हा आदेश जारी केला आहे.शासनाकडून ठरवून दिलेल्या नियम व अटींचे काटेकोरपणे पालन करून आजपासून दुकाने सुरू होतील. त्यासाठी वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. सोमवार, बुधवार व शुक्रवार गांधी पुतळा ते बेलापूर वेस पर्यंत पश्चिम दिशेला तोंड असणारी दुकाने, शिवाजी रोड ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत पश्चिम दिशेला तोंड असणारी दुकाने, नेवासा रोड ओव्हरब्रीज पासून संगमनेर रोड नाकापर्यंत दक्षिण दिशेला तोंड असणारी दुकाने तसेच इतर आतील रोडवरील पश्चिम व दक्षिण दिशेला तोंड असणारी दुकाने सुरू राहतील.तसेच मंगळवार, गुरुवार आणि शनिवार गांधी पुतळा ते बेलापूर रोड वेस पर्यंत पूर्व दिशेला तोंड असणारी दुकाने, शिवाजी रोड ते गोंधवणी महादेव मंदिरापर्यंत पूर्व दिशेला तोंड असणारी दुकाने, नेवासा रोड ओव्हरब्रिज पासून संगमनेर रोड नाकापर्यंत उत्तर दिशेला तोंड असणारी दुकाने तसेच इतर आतील रोडवरील पूर्व व उत्तर दिशेला तोंड असणारे दुकाने सुरू राहतील. रविवारी सर्व भागातील दुकाने बंद राहतील.हॉटेल, रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने मात्र बंद राहतील. प्रत्येकाने या अटी व शर्तीचे पालन करणे गरजेचे आहे. ग्राहकांनी तोंडावरती मास्क बांधलेला असेल तरच त्यांना खरेदीसाठी प्रवेश द्यावा, दुकानांमध्ये एका वेळी फक्त पाच ग्राहक खरेदीसाठी सोडण्यात यावे.दुकानाच्या प्रवेश द्वारावर शक्यतो ग्राहकांच्या थर्मल स्कॅनिंगची सुविधा करण्यात यावी, दुकानात प्रवेशावेळी सर्व ग्राहकांना हॅण्डवॉश व सॅनिटायझरची सुविधा करण्यात यावी, होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांना दुकानात प्रवेश देण्यात येऊ नये, शक्यतो 5 वर्षापर्यंत व 60 वर्षावरील व्यक्तींना दुकानात प्रवेश देण्याचे टाळावे, कामगारांच्या एकूण क्षमतेच्या 33 टक्के कामगारांचा वापर करावा, दुकान मालक व कामगार यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील, सर्व आस्थापना यांनी त्यांच्या दुकानात एक रजिस्टर ठेवावे.त्यामध्ये येणार्‍या ग्राहकांची संपूर्ण माहिती नमूद करणे बंधनकारक आहे, दुकानात व दुकानाबाहेर सामाजिक अंतर सोशल डिस्टन्स ठेवण्यात यावे, अत्यावश्यक सेवा व शेतीविषयक बाबी दररोज सुरू राहतील, आस्थापना चालक, मालक, कर्मचारी, कामगार यांनी आरोग्य सेतू वापरणे बंधनकारक राहील, कोणत्याही दुकानदाराने तसेच ग्राहकाने आपले दुचाकी व चारचाकी वाहन दुकानापर्यंत न नेता बाहेर निश्चित केलेल्या पार्किंगमध्ये पार्क करावे, दुकान मालकांनी ग्राहकांना शक्यतो ई-पेमेंट करण्याचा आग्रह धरावा.सर्व दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू राहतील. वरील नमूद केलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे बंधनकारक आहे. इतर बाबींसाठी यापूर्वी लागू करण्यात आलेले निर्बंध जसेच्या तसे लागू आहे. त्याचे पालन करणे बंधनकारक राहिल. तसेच वरीलप्रमाणे अटी व शर्तींचे पालन न करणार्‍या आस्थापना तात्काळ बंद करण्यात येऊन त्यांच्या विरोधात दंडात्मक व फौजदारी स्वरुपाची कारवाई केली जाईल, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
     ही दुकाने राहणार बंद
हॉटेल,रेस्टॉरंट, केश कर्तनालय, ब्युटी पार्लर, पान स्टॉल, चहा कॉफीची दुकाने, रसवंती, शीतपेय, भेळ, वडापाव व इतर खाद्यपदार्थ विकणार्‍या गाड्या आदी दुकाने बंद राहणार आहेत.
    लक्ष ठेवण्यासाठी पथकांची नियुक्ती
दुकान चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून विविध प्रभागांमध्ये एक प्रमुख अधिकारी व त्यांना सहाय्य करण्यासाठी काही अधिकार्‍यांची पथके तयार करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्रत्येकावर लक्ष ठेवले जाणार आहे. वरील नियम व अटींचे जो पालन करणार नाही, त्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

शिर्डी,प्रतिनिधी जय शर्मा )दि.12 : जगासह देशात व महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. सध्या कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. ही  उपाययोजना नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असून शहर व तालुक्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे अवाहान राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
कोरोना बाबत संगमनेरातील जनतेला अवाहन करताना नामदार थोरात म्हणाले की, कोरोना हे मानव जातीवरील संकट आहे. कोरोना हा अदृश्य शत्रू असून त्याचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, मास्क वापरणे याचबरोबर गर्दी करणे टाळणे व विनाकारण घराबाहेर पडणे टाळणे हे अत्यावश्यक आहे. या नियमांचे पालन केले तर आपण निश्चितच कोरोनाची साखळी तोडू शकतो. कोरोना संसर्ग तिसऱ्या टप्प्यावर येऊ नये आणि तो रोखण्यासाठी देशात महाराष्ट्रात व तालुक्यात कोरोनाची साखळी तोडणे अत्यंत गरजेचे आहे. मागील दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन असून महाराष्ट्र शासनाने कोरोना प्रादूर्भाव थांबवण्यासाठी प्रभावी आणि अत्यंत चांगले काम केले आहे. प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य कर्मचारी, पोलिस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर सर्व शासकीय कर्मचारी अत्यंत सेवाभावीपणे आपले काम करत आहे. या सर्वांना संपूर्ण सहकार्य करणे प्रत्येक नागरिकांचे मुलभूत कर्तव्य आहे. आपण घरीच थांबलो तर या सर्वांवरील ताण कमी होईल. अशा संकटाच्या काळात आपण सरकारच्या सोबत राहणे गरजेचे आहे.
            संगमनेर तालुक्यात व शहरात कोरोनाचे काही रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रुग्ण आढळलेल्या भागांमध्ये हॉटस्पॉट जाहीर करून लॉकडाऊनची अत्यंत प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे  काही ठिकाणचे भाग सील केले गेले आहेत. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून काही अफवा पसरविल्या जात असून नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच अफवा पसरवणाऱ्यांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईल असे सूतोवाच त्यांनी केले. तसेच नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेबरोबर कुटुंबियांच्या सुरक्षिततेकरीता स्वतः घरी थांबा, विनाकारण घराबाहेर पडणे टाळा आणि मास्कचा वापर करा  असे आवाहनही केले. शासन व प्रशासन आपल्यासाठी काम करत आहे. संगमनेर शहर, कुरण,  धांदरफळ, घुलेवाडी या परिसरातील नागरिकांना नामदार थोरात यांनी दिलासा दिला आहे. या सर्व परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून असून प्रशासनाला वेळोवेळी सूचना देत आहोत. आपल्या सर्वांची काळजी घेण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहनही नामदार थोरात यांनी केली आहे.

शिर्डी,दि.12 : कोरोना व्हायरस संक्रमणाविरुध्द देश आणि राज्यपातळीवर विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. शालेय विद्यार्थी, त्यांचे पालक यांना प्रशासनातर्फे कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांनांची माहिती व्हावी तसेच त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी कोपरगांव पंचायत समितीमार्फत विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शालेय विद्यार्थी मोठया प्रमाणावर सहभागी झाले होते.
            कोपरगांव शहर आणि तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांचे सहभागातून कोविड-2019 संबंधी समाजातील सर्व स्तरातून जागृती व प्रबोधन करणारे संदेश व्हाटसृ ॲपच्या माध्यमातून पाठविण्यात आले, दूरध्वनी व मोबाईलद्वारे कोविड-2019 संबधी शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांशी  शिक्षक व  मुख्याध्यापक यांनी चर्चा केली.  दिनांक 16 एप्रिल ते 3 मे, 2020 या कालावधीत रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्ये स्पर्धा, कविता लेखन स्पर्धा  व हस्ताक्षर स्पर्धा उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. विद्यार्थ्यांसाठी आयोजीत करण्यात आलेले उपक्रम पूर्णपणे त्यांच्या घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यातून करण्यात आले होते. ‍विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी कोणतेही वेगळे साहित्य विकत आणावे लागले नाही हे या स्पर्धेचे वैशिष्टय होते. कोरोना व्हायरसबद्दल जनजागृती करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे व त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त करणे हा राबविण्यात आलेल्या उपक्रमाचा उददेश होता.
               स्पर्धांसाठी खालीलप्रमाणे इयत्ता 1 ते 5 साठी  प्राथमिक गट, इयत्ता 6 ते 8 साठी  उच्च प्राथमिक गट,  इयत्ता 9 ते 10 साठी माध्यमिक  गट आणि इयत्ता 11 ते 12  साठी  उच्च माध्यमिक गट तयार करण्यात आले होते. शाळास्तर स्पर्धांमध्ये मुख्याध्यापक व शिक्षकांनी गटनिहाय शाळेतील प्रथम क्रमांकाच्या रांगोळी, चित्रकला, निबंध, घोषवाक्ये, कविता लेखन व हस्ताक्षर यांचा फोटो केंद्रप्रमुख यांचेकडे पाठवला. केंद्रप्रमुख यांनी गटनिहाय केंद्रातून प्रथम क्रमांकाचा फोटो तालुकास्तरावरील स्पर्धा समितीकडे पाठवला. यामधून तालुकास्तर समितीकडून स्पर्धानिहाय व  गटनिहाय प्रथम तीन क्रमांक निश्चित करण्यात आले. विजयी स्पर्धकांना प्रशासनाच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. उपक्रमांच्या यशस्वितेसाठी विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक, केंद्रप्रमुख,  शिक्षण विस्तार अधिकारी व गटसाधन केंद्र कर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेतले. शिर्डीचे उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे शिर्डी, कोपरगांवचे तहसिलदार योगेश चंद्रे व पंचायत समिती गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget