Latest Post

श्रीरामपूर(प्रतिनिधी)- लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर श्रीरामपूर शहरातील दुकाने सुरू करणे अथवा बंद ठेवण्याबाबत फक्त बैठकांचा सिलसिला सुरू आहे. मात्र कोणताही ठोस निर्णय घेण्यात प्रशासनाला यश मिळाले नाही. आधीच अनेक कारणांमुळे अडचणीत आलेले श्रीरामपूरकर बाजारपेठेच्या संदिग्धतेमुळे हवालदिल झाल्याने माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यापारी हितासाठी या विषयात लक्ष घालावे अशी मागणी मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, भाजयुमो सरचिटणीस अक्षय वर्पे, मनसेचे सचिव स्वप्नील सोनार यांनी विखे पाटलांची भेट घेऊन केली.
लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून श्रीरामपूर शहरातील व्यापाऱ्यांमध्ये दुकाने बंद अथवा सुरू करण्याबाबत  अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. प्रशासकीय पातळीवर सध्या बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तरीही प्रशासकीय भवनात या विषयाच्या चर्चेचे गुऱ्हाळ सुरू ठेवत दररोज बैठकांचा सिलसिला सुरू आहे. वेगवेगळे राजकीय पुढाऱ्यांच्या बैठकांना उपस्थित राहून एकही ठोस निर्णय न झाल्याने व्यापारी वर्गही हवालदिल झाला आहे. एकीकडे सर्वसामन्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. तर दुसरीकडे बाजारपेठेबाबत ठोस निर्णय लांबणीवर पडला आहे. हवालदिल झालेली व्यापाऱ्यांना मदतीसाठी कोणाकडे याचना करावी असा प्रश्न पडलेला असताना त्यांना विखे पाटलांनी आधार देऊन प्रशासनास योग्य त्या सूचना द्याव्या अशी मागणी केतन खोरे यांनी केली.
तर स्वप्नील सोनार व अक्षय वर्पे यांनी सांगितले की, गेल्या आठवड्याभरात वेगवेगळ्या नेत्यांच्या उपस्थितीत पाच बैठका श्रीरामपूरात झाल्या मात्र एकही बैठकीत व्यापाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला नाही. फक्त राजकीय कलगीतुरा बघायला मिळल्याने सक्षम लोकप्रतिनिधी नसलेल्या श्रीरामपूरची वाटचाल अंधारकडे चालली आहे. व्यापाऱ्यांच्या हितासाठी राजकारण वेगळे ठेऊन भूमिका घेणे गरजेचे आहे अन्यथा बाजारपेठ बकाल होईल अशी भीती अक्षय वर्पे व स्वप्नील सोनार यांनी व्यक्त केली.

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात असलेल्या कंटेनमेंट झोन वगळून महापालिका, नगरपालिका हद्दीतील एकल, वसाहती लगत असणारी, निवासी संकुलातील सर्व दुकाने सुरू राहतील. तसेच नागरी क्षेत्रातील बाजारपेठ आणि व्यापारी संकुल बंद ठेवण्यात येणार असली तरी या ठिकाणच्या जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदी-विक्रीची दुकाने सुरू करण्यास जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे.दरम्यान जिल्ह्यात नागरी क्षेत्राच्या हद्दीतील सर्व कापड बाजार, आठवडे बाजार, मॉल्स, व्यापारी संकुल, क्रीडा संकुलमध्ये सर्व दुकाने बंद राहणार ठेवण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणी दुकाने सुरू राहणार आहेत, त्या ठिकाणी प्रत्येक दुकानदाराने सॅनिटायझरचा वापर करावा. सामाजिक अंतराचे नियम पाळावे. दुकानातील कर्मचारी आणि ग्राहकांना मास्क आवश्यक असून खरेदी-विक्री करताना त्याचा वापर अनिवार्य. दुकानांमध्ये अनावश्यक गर्दी टाळावी. थुंकणार्‍यांवर स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी. दुकानांमध्ये गर्दी आढळल्यास ते सील करून संबंधित दुकानदारांवर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले आहेत.

पाथर्डी_कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिका प्रशासन कर्मचारी तसेच  मामा एंटरप्राईजेसचे कर्मचारी रात्र दिवस काम करीत आहे.
   पाथर्डी तालुक्यातील मोहज देवढे येथे काही दिवसांपूर्वी कोरोनो पॉझिटिव्ह रूग्ण सापडल्याने तालुक्यासह शहरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.एकीकडे कोरोनाची भीती व दुसरीकडे जीवनाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पालिका प्रशासन व  ठेकेदार कर्मचारी कुठलिही पर्वा न करता तालुक्याला कोरोना मुक्त करण्यासाठी झटत आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरात हायप्रोक्लोराईड ची फवारणी सुरू आहे.आज शहरामध्ये ब्लॉर मशिनच्या साह्याने फावरणीचे काम जोमाने सुरू आहे.
यावेळी आरोग्यविभाचे चेरमान प्रवीण राजगुरु म्हणाले की , पालिका प्रशासन हे कोरोना पार्शवभूमीवर चांगले काम करत आहे,तरी जनतेला माझे आव्हान आहे की गरज असेल तरच घरा बाहेर पडा, घरात राहा सुरक्षित राहा व पालिका प्रशासनासला सहकार्य करा.
    फवारणीची सुरवात ही खोलेश्वर मंदिर,ब्राम्हण गल्ली, ते नवी पेठ, अजंठा चौक, तिनहात चौक, पोळा मारुती पर्याय फवारणी करण्यात आली.
    यावेळी आरोग्यविभागाचे  चेरमान  प्रवीण राजगुरु,नगरसेवक रमेश गोरे,नगरसेवक महेश बोरुडे,पालिका प्रशासकीय अधिकारी आयुब सय्यद,शिवा पवार,मामा एंटरप्राइजेस चे मुकादम अक्षय साठे व सोन्याबापू जाधव,अमोल वाघमारे,आदी यावेळी उपस्थित होते.

नाशिक : शहरातील पंचवटी विभागातील कोणार्कनगर भागात राहणाऱ्या एका करोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात कोरोना कक्षात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.9) पहाटे घडली. त्यांचा कोरोना चाचणी नमुना अहवाल पॉसिटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. आतापर्यंत नाशिक शहरात करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा आता २०वर पोहोचला आहे.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्कनगर येथील एका ५१ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यास मालेगाव येथे ड्युटी केल्यानंतर विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. २ मे रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना सौम्य लक्षणे आढळून आल्यामुळे करोना संशयित म्हणून त्यांना जिल्हा रुग्णालयातील कक्षात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉ.चेवले यांनी ताबडतोब उपचार सुरु केले. ते उपचाराला प्रतिसाददेखील देत होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांना अचानक श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर त्यांना व्हेन्टीलेटरवर ठेवण्यात आले. अखेर उपचारास त्यांनी प्रतिसाद दिला नाही. हे ग्रामीण पोलीस दलाचे कर्मचारी होत. यानंतर दुपारी त्यांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी जाहीर केले. आले. ---९० पेक्षा अधिक पोलीस कोरोनाग्रस्तनाशिक जिल्ह्यातील मालेगाव कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. जिल्ह्यातील सर्वात जास्त पोलिसांची कुमक याठिकाणी कर्तव्य बजावत आहे. जवळपास आतापर्यंत मालेगाव शहरात कर्तव्य बजावणाऱ्या ९० पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शिर्डी –प्रतिनिधी जय शर्मा )श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कूल, शिर्डी मध्‍ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ज्‍युनिअर के.जी. या वर्गाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत असून याबाबतची लिंक सोमवार दिनांक ११ मे २०२० पासुन संस्‍थानचे www.sai.org.in या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली.
श्री.डोंगरे म्‍हणाले, देश व राज्‍यावर आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपायांकरीता व विषाणुची बाधा एकमेकांना होवु नये म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्‍कूल, शिर्डी मध्‍ये सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी ज्‍युनिअर के.जी. या वर्गाकरीता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु होत असून याबाबतची लिंक संस्‍थानचे www.sai.org.in या संकेत स्‍थळावर देण्‍यात येत आहे. सदर प्रवेश प्रक्रिया ही सोमवार दिनांक ११ मे २०२० ते बुधवार दि. २० मे २०२० सायंकाळी ०५.०० वाजेपर्यंत ऑनलाईन चालू राहणार आहे.
ज्‍युनियर के.जी वर्गात प्रवेशासाठी दिनांक ३० सप्‍टेंबर हा मानिव दिनांक गृहीत धरुन पाल्‍यांचे वय ०४.०० वर्ष ते ०४.११ या वयोगटापर्यत ठरविण्‍यात आलेले आहे. म्‍हणजे ज्‍या पाल्‍यांची जन्‍मतारीख (०१ ऑक्‍टोबर २०१५ ते ३० सप्‍टेंबर २०१६) या कालावधीतील असावी, अशाच पालकांचे पाल्‍यांना ज्‍यु.के.जी करीता प्रवेश देण्‍यात येईल. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ज्‍यु.के.जी. साठी मर्यादीत एकूण २५० प्रवेश देण्‍यात येणार असून प्रवेशांच्‍या जागा प्रथम प्राधान्‍यक्रम संस्‍थान कायम कर्मचारी पाल्‍य व कंत्राटी/आऊटसोर्स कर्मचा-यांचे पाल्‍य असा ठेवण्‍यात आलेला आहे. या कायम व कंत्राटी कर्मचारी पाल्‍यांचे प्रवेश अर्ज २५० पेक्षा जास्‍त असल्‍यास त्‍यांचे प्रवेशासाठी लॉटरी पद्धतीचा अवलंब करणेत येणार आहे. तसेच एकूण २५० पैकी प्रवेश जागा शिल्‍लक राहिल्‍यास उर्वरीत प्रवेशासाठी शिर्डी नगरपंचायत हद्दीतील पाल्‍यांच्‍या अर्जाची लॉटरी पद्धतीचा अवलंब करुन उर्वरीत प्रवेश भरण्‍यात येतील. त्‍यानंतरही प्रवेशाच्‍या जागा शिल्‍लक राहिल्‍यास नगरपंचायत हद्दीचे बाहेरील अर्जदारांना लॉटरी पद्धतीने प्रवेश देण्‍यात येतील. के.जी प्रवेश अर्ज घेतांना विदयार्थ्‍यांचा मूळ जन्‍म दाखला (ग्रामपंचायत/नगरपालिका/ महानगरपालिका) यांनी प्रमाणित केलेला असावा व जन्‍म दाखला लॅमीनेशन केलेला असावा. प्रवेश निश्चित करतांना शालेय व्‍यवस्‍थापनेचे नियम व अटी लागू राहतील.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी संस्‍थानचे www.sai.org.in या संकेत स्‍थळावर दिनांक ११/०५/२०२० ते २०/०५/२०२० रोजी सायं. ५.०० वाजेपर्यंत उपलब्‍ध राहील. ज्‍युनियर के.जी प्रवेशासाठी पालकांनी शाळेत येऊ नये. शाळेत पालकांना किंवा इतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. काही अडचण भासल्‍यास दुरध्‍वनी क्रमांक 02423-258916 व मो.नं.9284546498 आणि मो.नं.7720077280 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री अरुण डोंगरे यांनी केले.

बुलडाणा - 9 मे-उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच जंगलात मोठ्या प्रमाणात आगी लागण्याचे घटना घडत आहे.ही आग मानवी कारणामूळे जर चुकिने लागली असेल तर ती लवकर अटोक्यात येऊ शकते परंतु असे प्रयत्न फार कमी होतांना दिसून येतात. या वर्षी जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटनेला वनविभाग गांभिर्याने घेत धडक मोहिम सुरु करून जंगलात आग लागण्यास कारणीभुत 7 लोकांवर वन अधिनयमा प्रमाणे गुन्हे नोंदविले आहे.
      बुलडाणा जिल्ह्यात 80 हजार 816 हेक्टरवर वन क्षेत्र आहे. अनेक वेळी जंगलात आग लागल्याची माहिती वनविभागाला मिळते, वन अधिकारी,कर्मचारी घटनास्थळी जाऊन आग विझवून परत येऊन जातात. आता पर्यंत असेच होत आले आहे परंतु या वर्षी जंगलात आग लागल्याचे कारण,व त्याला कारणीभूत कोण? हे समोर आणून त्या व्यक्तिवर वन अधिनयमा प्रमाणे धडक मोहिम राबवून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश डीएफओ संजय माळी यांनी फायर फाइटर सेलचे प्रमुख व सहायक वनसंरक्षक रणजीत गायकवाड यांच्या मार्फत जिल्ह्यातील सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने एप्रिल व मे या दोन महिन्यात 7 ठिकाणी जंगलात आग
लागण्यास जबाबदार 7 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या मध्ये जळगांव जा. वनपरिक्षेत्र अंतर्गत आरोपी सरदार तडवला रा.चारठान,अरुण शंकर सईरिशे रा.भेंडवळ, विठ्ठल विश्वनाथ पाखरे रा.भेंडवळ,मोताळा वनपरिक्षेत्र अंतर्गत अंकुश मोहन चौहान रा.मोहेगांव, खामगांव वनपरिक्षेत्र अंतर्गत कनिराम रेखमल चौहान रा.दस्तापुर तसेच बुलडाणा वनपरिक्षेत्र अंतर्गतच्या ग्राम डोंगरखंडाळा येथील दामोदर भागाजी वाकोडे या 7 आरोपींचा समावेश आहे.या वेगवेगळ्या 7 आगिच्या घटनेत जवळपास 21 हेक्टर वनक्षेत्र जळालेला आहे. यातील 4 घटनेत शेतातील बांध जाळतांना आग जंगलात पसरल्याचे समोर आले.शेतकऱ्यांनी शेतात आग लावतांना जंगलात आग पोहचु नये याची काळजी घेणे गरजेचे आहे.
जंगलात आग लावणे किंवा आगी साठी कारणीभूत ठरणे हे वन अपराध आहे.आपल्या मुळे जंगलात आग लागू नये याची शेतकऱ्यांनीही दक्षता घ्यावी.भविष्यात जर कोणी जंगलात आग लावली तर त्याच्या विरोधात वनविभाग गंभीर कारवाई करणार,तसेच जंगलात आग,वन्यप्राणी,अतिक्रमण व इतर काही माहिती द्यायची असेल तर हैलो फॉरेस्टच्या 1926 या टोलफ्री नंबरवर आपण संपर्क करू शकता.             रणजीत गायकवाड सहायक वनसंरक्षक  बुलडाणा.

संगमनेर-(राजेशजेधे)संगमनेरतालुक्यातील धांदरफळ येथील सहा तर संगमनेरात एक अशा सात व्यक्ती करोना बाधीत आढळल्याने संगमनेर पुन्हा हादरले आहे. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल दिवेद्वी व जिल्हा पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट देवून पाहणी केली. संगमनेरचा जाहीर झालेला हॉटस्पॉट व धांदरफळ बुद्रूक प्रतिबंधात्मक क्षेत्र येथे आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याची तंबी जिल्हाधिकार्‍यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली आहे. तालुक्यातील धादंरफळ येथील 67 वर्षीय व्यक्ती करोना बाधीत होवून मयत झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. त्यापाठोपाठ संगमनेरातील कुरण रोड येथील एक महिला व धांदरफळ बुद्रूक येथील सहा व्यक्ती करोना बाधीत आढळले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी संगमनेरसह धांदरफळ बुद्रूक येथे भेट दिली.संगमनेरातील जाहीर केलेल्या हॉटस्पॉट एरियाची मॅपनुसार जिल्हाधिकार्‍यांनी पाहणी केली. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या आदेशाप्रमाणे कडक अंमलबजावणी करण्याची तंबी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिली. यावेळी प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, डीवायएसपी रोशन पंडीत, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार, मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप आदि उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget