Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) बेकायदेशीररित्या घरगुती वापराच्या गॅस टाक्यांचा साठा करून बाजारात चढ्या भावाने विक्री करणार्‍यावर शहर पोलीसांनी छापा टाकून एक लाख 71 हजार 850 रूपये किंमतीच्या 18 गॅस टाक्या जप्त केल्या आहे.  शहर पोलीसांनी ही कारवाई गुरूवारी (दि. 9) दुपारी अडीचच्या सुमारास मुकुंदनगर परिसरात केली. सय्यद जिशान आरीफ (वय- 32 रा. फकीरवाडा), जावेद आमीश सय्यद (वय- 41 रा. ख्रिस्त गल्ली) यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.मुकुंदनगर परिसरातील लक्ष्मी आटा ट्रेडिंग कंपनीचे आवारात बेकायदेशीररित्या गॅस टाक्यांचा साठा केला असून काही इसम त्याची विक्री बाजारात चढ्यादरांनी करत असल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपाधीक्षक मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी लक्ष्मी आटा कंपनीच्या आवारात छापा टाकला.या छाप्यात पोलीसांनी 18 गॅस टाक्या जप्त केल्या. सय्यद आरीफ, जावेद सय्यद यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात जिवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पुरवठा अधिकारी, सहायक फौजदार गायकवाड, पोलीस नाईक सुद्रिक, कुलांगे, द्वारके यांच्या पथकाने केली.

कोल्हार (साईप्रसाद कुंभकर्ण ) :-
 काही दिवसांपासून कोल्हार भगवतीपुर परिसरातील रान शेंडा येथे धुमाकूळ घालीत असलेला बिबट्या मंगळवारी पहाटेच्या सुमारास अखेर पिंजऱ्यात अडकला याबाबत सविस्तर असे की रानशेंडा येथील रामराव चांगदेव खर्डे पाटील व उल्हास खर्डे पाटील यांच्या वस्तीवर व परिसरात गेले दोन ते तीन महिन्यापासून बिबट्याचे वास्तव्य होते या बिबट्याने या परिसरातील कुत्रे व बकऱ्यांवर  हल्ला चढवित फस्त करीत त्यामुळे या परिसरातील रहिवासी चांगलेच भयभीत झाले होते शेतात काम करणाऱ्या मजुरांना दहशतीमुळे शेतीत काम करणे अवघड झाले होते परिसरातील नागरिकांच्या मागणीनंतर वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावला पण बिबट्या या पिंजऱ्यात अडकत नसल्याने दोन ते तीन ठिकाणी जागा बदलून हा पिंजरा लावण्यात आला शेवटी उल्हास खर्डे व प्रशांत खर्डे यांच्या शेताजवळील रोडलगत पिंजरा ठेवण्यात आला या पिंजऱ्यात अखेर मंगळवारी पहाटे च्या सुमारास हा बिबट्या जेरबंद झाला.
जेरबंद झालेला बिबट्या एक ते दीड वर्षाचा असून अजूनही एक -दोन बिबट्याचा संचार  परिसरात असल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे व पुन्हा या भागात पिंजरा लावण्याची मागणी.

दिल्ली :अखेर निर्भयाला न्याय मिळाला असून सात वर्षानंतर आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. येत्या २२ जानेवारीला चारही आरोपीना तिहार तुरुंगात फाशी देण्यात येणार आहे.दरम्यान दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज शिक्षेची सुनावणी केली. सुनावणीनंतर १४ दिवसांचा अवधी दिला असून २२ तारखेला सकाळी सात वाजता तिहार तुरूंगात चारही दोषींना फाशी देण्यात येईल.गेल्या सुनावणीत कोर्टाने तिहार जेल प्रशासनाला दोषींना नोटीस बजावण्यास सांगितले होते. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

मा.श्री.संजय राठोड, मंत्री, वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्‍य यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

संविधान बचाव समिती,श्रीरामपूर यांचे वतीने आज मोर्चा दि.६/1/2020 रोजी सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात येणाऱ्या सर्व धर्मीय,सर्व पक्षीय  प्रचंड मोर्चा मध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आ.कानडे यांनी केले आहे,भारत देशात संविधानाची पायमल्ली करण्याचे प्रकार सुरू असून
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेऊन केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग सध्याचे केंद्रातले सरकार करत आहे,त्याचाच एक भाग म्हणजे एन आर सी,सी ए ए व एन पी आर सारख्या संविधान विरोधी तरतुदी.
या सारख्या समाजविरोधी कायद्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने शांतता मय मार्गाने विरोध दर्शविणे काळाची गरज बनली आहे.
तेव्हा आजच्या होणाऱ्या मोर्चा मध्ये सर्व नागरीकांनी सामील होऊन शांततामय मार्गाने सदर मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन आ.कानडे यांनी केले आहे.

शिर्डी प्रतिणिधी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन तसेच वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी शिर्डीत श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या साईभक्‍तांना आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे मोफत वाटप करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्‍हणाले, पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी तसेच शिर्डीत आलेल्‍या साईभक्‍तांना सावली मिळावी व वातावरणात प्रसन्‍नता राहावी याकरिता संस्‍थान परिसरामध्‍ये १००० वृक्षांची लागवड करणेत आलेली आहे. या वृक्षलागवडीमुळे प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. दिनांक २६ जुलै २०१९ रोजी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १००० निंबवृक्षाची रोपे वाटप करणेत आलेली आहेत. त्‍याचप्रमाणे मंगळवार दिनांक १७ सप्‍टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १५०० निंबवृक्षांची रोपे वाटप करण्‍यात आलेली आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्‍हणूनच श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०१९ पासून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी येणा-या साईभक्‍तांना समाधी मंदीर परिसरात (लेंडीबाग गेट क्रं. ५ जवळ) प्रसाद रुपाने नियमित मोफत रोपे वाटप करणेत येत आहेत जेणेकरुन साईभक्‍त आपल्‍या घरी या रोपांची लागवड करतील. याची माहिती साईभक्‍तांना होणेकरीता मंदीर परिसरात वेगवेगळया भाषेत फलक ही लावण्‍यात आलेले आहेत. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार होण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध राज्‍यांतुन येणा-या साईसेवकांना वृक्ष वाटपाच्‍या सेवेचा लाभ दिला जात आहे. सदर मोफत वृक्ष वाटप उपक्रमामध्‍ये अशोका, शिसम, वड, आवळा, चिंच, जांभूळ, निंब अशा विविध प्रकारच्‍या रोपांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.
          या मोफत वृक्ष वाटप उपक्रमामधुन आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे साईभक्‍तांना मोफत वाटप करण्‍यात आलेले असून यापुढेही मोफत वृक्ष वाटप उपक्रम सातत्‍याने राबविला जाणार असल्‍याचेही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

मुंबई : देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची नाही. आम्ही सर्व देशभक्त आहोत, आमची देशभक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जमात ए इस्लामीच्या वतीने चर्चासत्र मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पीयूसीएलचे अध्यक्ष मिहीर देसाई, एपीसीआरचे अध्यक्ष युसूफ मुछला आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी राऊत म्हणाले की, देशात भीती पसरवली जात आहे, परंतु कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. घाबरविणारे येतात आणि जातात. हा देशाचा इतिहास आहे. महाराष्ट्राने भीती संपविण्याचे काम केले आहे, देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. ते पुढे म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांवर बंदूक रोखली जात आहे, हल्ले होत आहेत, असे असताना पंतप्रधान विद्यार्थ्यांनी केवळ शिकण्याचे काम करावे, असे सांगत आहेत. परंतु विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान होते, त्याच्यामुळे परिवर्तन घडले, असेही ते म्हणाले. आपल्याला सर्वांना मिळून देश वाचवायचा आहे, सर्वांनी याविरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.या वेळी कोळसे पाटील म्हणाले की, कोणताही कायदा आणताना सहजतेने त्याची अंमलबजावणी होईल असा कायदा असायला हवा. ज्या कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही ते आपल्यावर लादले जात आहेत. हे २०२४ निवडणुकीसाठी सरकारचे षड्यंत्र आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोघांचेही रक्त एकच असून सर्वांनी याविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन त्यांनी केले. तर सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे गरिबांच्या विरोधात आहेत. धर्मावर आधारित नागरिकत्व देऊन सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे, असे मिहीर देसाई म्हणाले.>तीस टक्के हिंदूंना फटकासीएए, एनआरसी, एनपीआरमुळे केवळ मुस्लिमांना नाही, तर सर्वांना फटका बसणार आहे. कित्येक लोकांकडे जुने पुरावे नाहीत. देशातील ३० टक्के हिंदूंचे यामुळे नुकसान होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget