Latest Post

धुळे( प्रतिनिधी )शहरातील जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात असलेल्या देविदास नगरात बनावट दारूचा कारखाना  आझादनगर पोलिसांनी  उद्ध्वस्त केला. तब्बल दोन तास चाललेल्या  या कारवाईत पोलिसांनी दारू बनविण्यासह पॅकिंगचे साहित्य जप्त केले असून याप्रकरणी एकाला ताब्यातही घेण्यात आले आहे.अशी माहिती आझादनगर पोलीस ठाण्याचे निरिक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे.याबाबत माहिती  जुने धुळे भागातील ग.नं.14 च्या परिसरात एका मोकळ्या जागेत बनावट दारू बनविण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा पोलीस अधिक्षक विश्वास पांढरे, अपर पोलीस अधिक्षक डॉ.राजु भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली  हेकॉ.दीपक पाटील, संजय सुर्यवंशी, महिला हेकॉ.वाडिले, पोना.पाथरवट, रमेश माळी, पोकॉ. संजय भोई, शोएब बेग, अतिक शेख, डी.बी.मालचे, जे.बी.भागवत, सागर सोनवणे, संतोष घुगे यांच्या पथकाने रात्री सव्वा दहाच्या सुमारास देविदास नगरात छापा टाकला.यावेळी देविदास नगरातील सुर्यमंदिराजवळ एका घराच्या पाठीमागे असलेल्या मोकळा जागेत दारू बनविण्याचा कारखाना सुरू  असल्याचे आढळून आले. पोलिसांनी छापा टाकून त्या ठिकाणी असलेल्या देशी-विदेशी दारूच्या साठ्यासह बाटलीचे बुच, रिकाम्या बाटल्या, बुच सिलबंद करण्याचे मशिन, प्लास्टिकचे ड्रम आदी मिळून 32 हजार 549 रूपयांचा ऐवज जप्त केला.याप्रकरणी सागर गणेश परदेशी या 25 वर्षीय तरूणालाही ताब्यात घेतले आहे. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (अ) (फ) (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. 

अहमदनगर (प्रतिनिधी)  मनमाड महामार्गावरील पत्रकार चौकात झालेल्या भीषण अपघातात टँकरच्या धडकेने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजता घडली. कमलेश अनिल पटवा (वय- 27 रा. भुतकरवाडी) असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.आज दुपारी साडेबाराच्या सुमारास दुधाने भरलेला टँकर नगर कडुन मनमाडच्या दिशेने चाललेला असताना यावेळी तारकपूरकडून सावेडीकडे दुचाकीवर चाललेला तरुण टँकरला जाऊन धडकला.टँकर तरुणांच्या अंगावरून गेल्यामुळे तरूणाचा जागीच मृत्यू झाला. पत्रकार चौकातील वाहतूक शाखेच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यामध्ये ही घटना कैद झाल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश मोरे यांनी सांगितले. दरम्यान अपघात होताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. हाकेच्या अंतरावर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- तरुणांच्या बौध्दिक विकासा बरोबरच शारीरिक विकास होणे आवश्यक आहे त्या करीता बेलापूर गावात लवकरच व्यायाम शाळा बांधुन व्यायामाचे साहीत्य देखील  देणार असल्याची घोषणा आमदार लहु कानडे यांनी केली              
 नाताळ व नव वर्षानिमित्त  समता स्पोर्टस् क्लबच्या वतीने सायकल व रनिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्या विजेत्या स्पर्धकाना आमदार लहु कानडे यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते आमदार कानडे पुढे म्हणाले की बेलापूर ग्रामपंचायतीने व्यायाम शाळेस जागा उपलब्ध करुन द्यावी त्या ठिकाणी व्यायाम शाळा व व्यायामाचे साहीत्य देण्याची जबाबदारी माझी आहे संगणकामुळे आजचा तरुण हुशार झाला असला तरी त्यास शारिरीक व्यायाम करण्यास वेळच नसतो परंतु शरीर तंदुरुस्त असणे आवश्यक आहे समता स्पोर्टस् क्लबने सामाजिक कार्याची  गेल्या तीस वर्षाची परपंरा अखंडीतपणे चालु ठेवली आहे त्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन आपल्या चांगल्या कार्यात माझीही मदत लागल्यास ती मदत करण्यास मी तयार आहे असेही ते म्हणाले  सायकल स्पर्धेत प्रथम क्रमांक  मिळविणारे प्रविण जाधव यांना सायकल बक्षिस देण्यात आली दुसर्या क्रमांकाचे रुपये २२२२ चे बक्षिस उदय टिमकरे याने मिळविले तृतीय क्रमांकाचे रुपये ११११ चे बक्षिस प्रसाद कलंगडे याने मिळविले चौथ्या क्रमांकाचे रुपये ७७७ चे बक्षिस सुशांत राऊत याने मिळविले आकाश धाटे यास उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले धावण्याच्या स्पर्धेचे पहीले बक्षिस रुपये ३३३३ चे  किशोर मरकड याने मिळविले  दुसऱ्या क्रमांकाचे रुपये २२२२चे बक्षिस दिनेश पाटील याने मिळविले  तृतीय क्रमांकाचे रुपये ११११चे बक्षीस अजय साबळै याने मिळविले चौथ्या क्रमांकाचे बक्षीस रुपये ७७७ कमलेश गायकवाड याने मिळविले किसन बनकर व राहुल देशमुख यांना उत्तेजनार्थ बक्षिस  देण्यात आले या वेळी पंचायत समीती सदस्य अरुण पा नाईक उपसरपंच रविंद्र खटोड बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले भरत साळुंके मनोज श्रीगोड देविदास देसाई दिलीप दायमा जावेद शेख आदि उपस्थित  होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष संतोष शेलार उपाध्यक्ष रोहण शेलार गणेश शेलार सुयश शेलार अविनाश शेलार सुहास शेलार विपुल शेलार ऋतिक शेलार संजय शेलार अक्षय शेलार आदिनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विजय शेलार यांनी केले तर बंटी शेलार यांनी आभार मानले प्रास्ताविक संजय शेलार यांनी केले

🔹 वन्यजीव विभाग हुआ सतर्क
🔸 कब खत्म होगी बाघिन की तलाश

 बुलढाणा - 29 दिसंबर

2 सप्ताह पहेले ज्ञानगंगा अभयारण्य से बाहर निकलकर अजंता पर्वतीय श्रृंखला से होते हुए अजंता की गुफाओं तक का सैर-सपाटा कर आखिर सी-1 बाघ वापस ज्ञानगंगा अभयारण्य में लौट आने की जानकारी वन्यजीव विभाग से मिली है.अपने सुरक्षित अधिवास व बाघिन की तलाश में ये 3 वर्षीय नर बाघ अब तक 1700 किलोमीटर से अधिक का प्रवास कर चुका है.इस अभयारण्य में बाघ के वापस लौट आने से अकोला वन्यजीव विभाग के अधिकारियों में उत्साह का वातावरण देखा जा रहा है.
         यवतमाल जिले के "टीपेश्वर अभयारण्य" में करीब 3 साल पहेले  "टी-1" नामक एक बाघिन ने 3 शावकों को जन्म दिया था. इन शावकों को क्रमशः सी-1, सी-2 और सी-3 ये नाम दिए गए थे.ढाई साल की उम्र में यह बाघ अपनी माँ को छोडकर पडोसी राज्य तेलंगाना के आदिलाबाद के जंगल में चला गया था जो फिर महाराष्ट्र में लौट आया और नांदेड़, हिंगोली, परभणी और वाशिम से होते हुए 5 माह में 13 सौ किलोमीटर की लंबी यात्रा करते हुए 1 दिसेंबर की रात में बुलढाणा जिलों के "ज्ञानगंगा अभयारण्य" में प्रवेश किया.सी-1 इस बाघ को रेडियो कॉलर लगा होने से उसका पीछा वाइल्डलाइफ इंस्टिट्यूट ऑफ इंडिया की टीम निरंतर कर रही है.15 दिन "ज्ञानगंगा अभयारण्य" में इस बाघ ने गुज़ारे जिस से  ये अनुमान लागाया जा रहा था कि अब इसी अभयारण्य को याद बाघ अपना आधिवास क्षेत्र बना लेगा किंतु ये बाघ अभयारण्य बाहर निकल गया और बोरखेड होते हुए बुलढाणा के करीब से गुज़रकर राजुर घाट में जा पहुंचा और बुलढाणा-मलकापुर मार्ग को क्रॉस कर अजंता पर्वत श्रृंखला से होते देवलघाट,पाडली,गिरडा,सवलतबारा जंगल से निकलकर जालना जिले के धावडा और फिर औरंगाबाद जिले की सीमा में प्रवेश करते हुए अजंता की गुफाओं के पास फरदापुर और फिर आगे सोयगांव परिक्षेत्र तक चला गया.इधर-उधर भटकने के बाद इस बाघ ने अपने कदम वापस खींचते हुए जिस रास्ते से गुज़रा था उस से सटकर ही ये बाघ अजंता की पहाड़ियों की सफारी कर 27 दिसेंबर को वापस ज्ञानगंगा अभयारण्य में लौट आया है.बाघ ने अब तक 1700 किलोमीटर से अधिक का सफर तय करते हुए एक रिकॉर्ड बनाया है.खास बात तो ये है कि इतनी लंबी यात्रा करने के बाद भी कहीं पर बाघ ने किसी मनुष्य पर हमला नही किया है. इस बाघ पर अकोला वन्यजीव विभाग के अधिकारी पूरी तरह से नज़र बनाए हुए हैं.

*कब तक यूँ ही भटकेगा सी-1 बाघ*
जानकारों की माने तो सी-1 बाघ अब पूरी तरह से जवान हो गया है जो संरक्षित अधिवास की बजाय खास तौर पर बाघिन की तलाश में घूम रहा है.अब तक 17 सौ किलोमीटर से अधिक यात्रा इस बाघ की हो गई फिर भी बाघिन नही मिल पाई है. बाघ का वापस ज्ञानगंगा अभयारण्य में वापस लौट आना इस बात के संकेत दे रहे है कि अब वे यहाँ स्थायिक हो सकता है और यदि बाघ इस अभयारण्य में रुक गया तो उसे एक बाघिन की आवश्यकता रहेगी,ऐसे में वन्यजीव विभाग इस दिशा में विचार करते हुए मेलघाट,ताडोबा या फिर अन्य किसी व्यघ्र प्रकल्प से एक बाघिन की व्यवस्था करना चाहिए.

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदारा ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकल्यापाठोपाठ तोफखान्याचा हवालदारही अडकला. सलग दोन दिवस दोन पोलीस एसीबीच्या ट्रॅपमध्ये सापडल्याने पोलीस दलातील लाचखोरी समोर आली आहे.तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदार पोपट पंडित रोकडे असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी रोकडे याने थेट कलेक्टर ऑफिसचे आवार निवडले. तेथेच एसीबीने रोकडे यास लाच घेताना रंगेहात पकडले.वहिनीसोबतचा कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल न करता तो अदखलपात्र नोंदविण्यासाठी रोकडे याने 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच घेताना रोकडे यास एसीबीने पकडले.गुरूवारी कोतवाली पोलीस ठाण्याचा हवालदार अनिल गिरी गोसावी यास 5 हजार रुपयांचा लाच घेताना पकडल्यानंतर शुक्रवारी तोफखान्यातील हवालदार रोकडेदेखील एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकले. सलग दोन दिवसांच्या या कारवाईने पोलिसांतील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे

पाथर्डी_तालुका प्रतिनिधी विकास दिनकर-
पाथर्डी_लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपरिषदेवर जेसीबी गायब झाल्याबाबत सात दिवसांपूर्वी निवेदन देऊनही नगरपरिषदेने कुठलीही दखल घेतली नसल्याने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपरिषद आंदोलन  करण्यात आले.
        जेसीबी गायब करणाऱ्या संबंधितावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा नगर परिषदेत पाथर्डी येथे सात दिवसाच्या आत तीव्र स्वरूपाचे आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देऊन देखील आज पर्यंत कुठल्या प्रकारची उचित कारवाई झाली नाही म्हणून आज  करण्यात आले. नगरपरिषद मध्ये जेसीबी च्या संदर्भात तोंडी व लेखी स्वरुपात  नगरपरिषद  सोबत संपर्क केला होता परंतु सात दिवस होऊन देखील जेसीबी संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याने आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नगरपालिकेचा जेसीबी बऱ्याच वर्षापासून गायब आहे कार्यालय प्रक्रिया न करता नगरपालिके मधून गायब झालेला आहे पालिकेचा जेसीबी गायब असल्याने तिच्या कामाच्या निमित्ताने पाथर्डी शहरातील लाखो रुपये खर्च केला असून उर्वरित बिले आदा करण्यात येऊ नयेत. तरी अद्याप पर्यंत जेसीबी चा तपास लागलेला नाही. वरून आता नागरिकांची खात्री झाली आहे सदरचे जेसीबी परत मिळू शकत नाही म्हणून संपत संबंधितावर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सुहास घोरपडे यांनी दिला.
यावेळी सुभाष घोरपडे जिल्हाध्यक्ष,आनंद पवळे कार्याध्यक्ष,मुरली दिनकर संपर्कप्रमुख,लक्ष्मीताई काळोखे तालुकाध्यक्ष,रेखा काळोखे तालुका उपाध्यक्ष,मंदाबाई उकिरडे तालुका शहराध्यक्ष,संजय ससाणे शेवगाव तालुका प्रमुख,सीताबाई काकडे, जालिंदर काळोखे, पोपट शिरसाठ,आनंद उबाळे,शैलेश शिरसाठ,अर्जुन ससाने,दत्ता बिडवे,देविदास भारस्कर आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शासनाने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेत गोरगरिबांना प्रतिमाणसी दरमहा पाच किलो धान्य देणे म्हणजेच गरिबांची क्रूर चेष्टा असून गरिबांना जगण्या इतपत धान्य शासनाने द्यावे याकरिता येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार लहु कानडे यांनी दिली आहे     श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष बजरंग दरंदले हे
होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे शहराध्यक्ष माणिक जाधव गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक अव्वल कारकून चारुशीला मगरे आमदार कानडे यांचे सहाय्यक समिम बागवान उपस्थित होते केंद्र शासनाने एक व्यक्ती दोन व्यक्ती अशा निराधार अपंग विधवा व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ  दिल्यामुळे त्यांना 35 किलो धान्‍य दिले जात होते मागील शासन कर्त्याने त्या निराधारांचा घास हिरावून त्यांना प्राधान्य योजनेचा लाभ देण्याचा जुलमी निर्णय घेतला या बाबतही अधिवेशनात आवाज उठविणार आहे स्वस्त धान्य दुकानदार हा समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे हे पुण्याचे काम करत असताना त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालेल असे कमिशन मार्जिन त्यांना मिळाले पाहिजे या करिता आपण प्रयत्न करू मात्र त्यांच्याकडूनही जनतेला  चांगली सेवा मिळाली पाहिजे असे ते म्हणाले        यावेळी बोलताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की आपल्या तालुक्याला आमदार लहू कानडे च्या रूपाने अभ्यासू आमदार लाभलेला आहे शासनाने धान्य दुकानदारांना पाँज मशीन दिल्यामुळे दुकानदारा बरोबरच पुरवठा विभागही पाँश झाला आहे धान्य वाटपात अतिशय पारदर्शकता आली असून तालुक्याचे वाटप 93 टक्के असून अहमदनगर जिल्हा ही धान्य वाटपात आघाडीवर आहे दुकानदाराकडे प्रत्येक कार्डधारकांची चे फोन नंबर असून धान्य घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी फोन केले जातात  दुकानदारही काळानुरूप बदलला आहे परंतु त्यांचा उदरनिर्वाह चालावा इतके कमिशन मार्जिन त्यांना दिले पाहिजे असेही देसाई म्हणाले यावेळी पुरवठा यंत्रणेत आमूलाग्र बदल झाले असून शासनाने एक व्यक्ती व दोन व्यक्ती यांचे अंत्योदय योजनेतील नाव काढून ते प्राधान्य कुटुंब योजना टाकल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला असून शासनाने केरोसीन बंद केल्यामुळे दोन पिढ्या पासून केरोसीन व्यवसाय करणार्या दुकानदारावर अन्याय झाला असून केरोसीन बंद झाल्यामुळे त्यांचे प्रपंच उघडले आहेत याचा देखील या निमित्ताने  विचार व्हावा अशी मागणी संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक  पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले माणिकराव जाधव आदींनी केली यावेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक श्रीमती कावेरी अधिक पुरवठा अव्वल कारकून श्रीमती चारुशीला मगरे यांनी पुरवठा यंत्रणेतील कामकाजाची माहिती दिली यावेळी आमदार कांनडे यांनी मला मोघम माहिती नको मी अधिकारी म्हणून काम केले असून त्याच पद्धतीने माहिती द्यावी अशी सूचना केली यावेळी सुभाष चोरडिया सुभाष साळुंखे गोपीनाथ शिंदे दिलीप गायके चंद्रकांत गायकवाड प्रकाश गदिया अनिल मानधना मुरलीधर वधवानी शिवाजी सैद देवराम गाडे योगेश नागले भाऊसाहेब वाघमारे बनीचंद खरात जाकीर शेख राठोड मच्छिंद्र भालके राजेंद्र वधवानी अतुल जिरंगे रवींद्र काळे विजय मैराळ सोमनाथ देवकर मंगेश छतवानी प्रेमचंद छतवानी रमेश हरदास राजेंद्र शिंदे राजेंद्र वाघ सतीश बोर्डे दशरथ पिसे पुंडलिक खरे सुरेश पवार श्याम पवार आदी उपस्थित होते                     [  मला स्वतःचे डोके आहे त्यात मेंदूही माझाच आहे त्यामुळे निर्णय घेण्यास व विकास कामे करण्यास मी सक्षम आहे शिवाय मी  शासनात उपायुक्त पदावर काम केल्यामुळे कायद्याची अंन कागदाची मला चांगली माहिती आहे त्यामुळे तालुक्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगले काम केले जाईल जेणेकरून प्रत्येक नागरिकाला मी आमदार झाल्यासारखे वाटेल असेही आमदार कानडे म्हणाले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget