Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोतवाली पोलीस ठाण्यातील हवालदारा ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात अडकल्यापाठोपाठ तोफखान्याचा हवालदारही अडकला. सलग दोन दिवस दोन पोलीस एसीबीच्या ट्रॅपमध्ये सापडल्याने पोलीस दलातील लाचखोरी समोर आली आहे.तोफखाना पोलीस ठाण्यातील हवालदार पोपट पंडित रोकडे असे लाचेच्या सापळ्यात अडकलेल्या पोलिसाचे नाव आहे. 10 हजार रुपयांची लाच स्वीकारण्यासाठी रोकडे याने थेट कलेक्टर ऑफिसचे आवार निवडले. तेथेच एसीबीने रोकडे यास लाच घेताना रंगेहात पकडले.वहिनीसोबतचा कौटुंबिक वादाचा गुन्हा दाखल न करता तो अदखलपात्र नोंदविण्यासाठी रोकडे याने 15 हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती 10 हजार रुपये लाच देण्याचे ठरले. ही लाच घेताना रोकडे यास एसीबीने पकडले.गुरूवारी कोतवाली पोलीस ठाण्याचा हवालदार अनिल गिरी गोसावी यास 5 हजार रुपयांचा लाच घेताना पकडल्यानंतर शुक्रवारी तोफखान्यातील हवालदार रोकडेदेखील एसीबीच्या ट्रॅपमध्ये अडकले. सलग दोन दिवसांच्या या कारवाईने पोलिसांतील लाचखोरी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे

पाथर्डी_तालुका प्रतिनिधी विकास दिनकर-
पाथर्डी_लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपरिषदेवर जेसीबी गायब झाल्याबाबत सात दिवसांपूर्वी निवेदन देऊनही नगरपरिषदेने कुठलीही दखल घेतली नसल्याने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपरिषद आंदोलन  करण्यात आले.
        जेसीबी गायब करणाऱ्या संबंधितावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा नगर परिषदेत पाथर्डी येथे सात दिवसाच्या आत तीव्र स्वरूपाचे आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देऊन देखील आज पर्यंत कुठल्या प्रकारची उचित कारवाई झाली नाही म्हणून आज  करण्यात आले. नगरपरिषद मध्ये जेसीबी च्या संदर्भात तोंडी व लेखी स्वरुपात  नगरपरिषद  सोबत संपर्क केला होता परंतु सात दिवस होऊन देखील जेसीबी संदर्भात कुठल्याही प्रकारची माहिती न दिल्याने आज लहुजी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. नगरपालिकेचा जेसीबी बऱ्याच वर्षापासून गायब आहे कार्यालय प्रक्रिया न करता नगरपालिके मधून गायब झालेला आहे पालिकेचा जेसीबी गायब असल्याने तिच्या कामाच्या निमित्ताने पाथर्डी शहरातील लाखो रुपये खर्च केला असून उर्वरित बिले आदा करण्यात येऊ नयेत. तरी अद्याप पर्यंत जेसीबी चा तपास लागलेला नाही. वरून आता नागरिकांची खात्री झाली आहे सदरचे जेसीबी परत मिळू शकत नाही म्हणून संपत संबंधितावर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सुहास घोरपडे यांनी दिला.
यावेळी सुभाष घोरपडे जिल्हाध्यक्ष,आनंद पवळे कार्याध्यक्ष,मुरली दिनकर संपर्कप्रमुख,लक्ष्मीताई काळोखे तालुकाध्यक्ष,रेखा काळोखे तालुका उपाध्यक्ष,मंदाबाई उकिरडे तालुका शहराध्यक्ष,संजय ससाणे शेवगाव तालुका प्रमुख,सीताबाई काकडे, जालिंदर काळोखे, पोपट शिरसाठ,आनंद उबाळे,शैलेश शिरसाठ,अर्जुन ससाने,दत्ता बिडवे,देविदास भारस्कर आदी उपस्थित होते.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शासनाने सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजनेत गोरगरिबांना प्रतिमाणसी दरमहा पाच किलो धान्य देणे म्हणजेच गरिबांची क्रूर चेष्टा असून गरिबांना जगण्या इतपत धान्य शासनाने द्यावे याकरिता येत्या अधिवेशनात आवाज उठविणार असल्याची माहिती आमदार लहु कानडे यांनी दिली आहे     श्रीरामपूर तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्यावतीने श्रीरामपूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार लहू कानडे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धान्य दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष तालुका अध्यक्ष बजरंग दरंदले हे
होते यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा सचिव रज्जाक पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे शहराध्यक्ष माणिक जाधव गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक कावेरी आदिक अव्वल कारकून चारुशीला मगरे आमदार कानडे यांचे सहाय्यक समिम बागवान उपस्थित होते केंद्र शासनाने एक व्यक्ती दोन व्यक्ती अशा निराधार अपंग विधवा व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ  दिल्यामुळे त्यांना 35 किलो धान्‍य दिले जात होते मागील शासन कर्त्याने त्या निराधारांचा घास हिरावून त्यांना प्राधान्य योजनेचा लाभ देण्याचा जुलमी निर्णय घेतला या बाबतही अधिवेशनात आवाज उठविणार आहे स्वस्त धान्य दुकानदार हा समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याचा करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे हे पुण्याचे काम करत असताना त्यांचा प्रपंच व्यवस्थित चालेल असे कमिशन मार्जिन त्यांना मिळाले पाहिजे या करिता आपण प्रयत्न करू मात्र त्यांच्याकडूनही जनतेला  चांगली सेवा मिळाली पाहिजे असे ते म्हणाले        यावेळी बोलताना स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई म्हणाले की आपल्या तालुक्याला आमदार लहू कानडे च्या रूपाने अभ्यासू आमदार लाभलेला आहे शासनाने धान्य दुकानदारांना पाँज मशीन दिल्यामुळे दुकानदारा बरोबरच पुरवठा विभागही पाँश झाला आहे धान्य वाटपात अतिशय पारदर्शकता आली असून तालुक्याचे वाटप 93 टक्के असून अहमदनगर जिल्हा ही धान्य वाटपात आघाडीवर आहे दुकानदाराकडे प्रत्येक कार्डधारकांची चे फोन नंबर असून धान्य घेण्यासाठी त्यांना वेळोवेळी फोन केले जातात  दुकानदारही काळानुरूप बदलला आहे परंतु त्यांचा उदरनिर्वाह चालावा इतके कमिशन मार्जिन त्यांना दिले पाहिजे असेही देसाई म्हणाले यावेळी पुरवठा यंत्रणेत आमूलाग्र बदल झाले असून शासनाने एक व्यक्ती व दोन व्यक्ती यांचे अंत्योदय योजनेतील नाव काढून ते प्राधान्य कुटुंब योजना टाकल्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला असून शासनाने केरोसीन बंद केल्यामुळे दोन पिढ्या पासून केरोसीन व्यवसाय करणार्या दुकानदारावर अन्याय झाला असून केरोसीन बंद झाल्यामुळे त्यांचे प्रपंच उघडले आहेत याचा देखील या निमित्ताने  विचार व्हावा अशी मागणी संघटनेचे जिल्हा सचिव रज्जाक  पठाण जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रकांत झुरंगे तालुकाध्यक्ष बजरंग दरंदले माणिकराव जाधव आदींनी केली यावेळी गोदामपाल शिवाजी वायदंडे पुरवठा निरीक्षक श्रीमती कावेरी अधिक पुरवठा अव्वल कारकून श्रीमती चारुशीला मगरे यांनी पुरवठा यंत्रणेतील कामकाजाची माहिती दिली यावेळी आमदार कांनडे यांनी मला मोघम माहिती नको मी अधिकारी म्हणून काम केले असून त्याच पद्धतीने माहिती द्यावी अशी सूचना केली यावेळी सुभाष चोरडिया सुभाष साळुंखे गोपीनाथ शिंदे दिलीप गायके चंद्रकांत गायकवाड प्रकाश गदिया अनिल मानधना मुरलीधर वधवानी शिवाजी सैद देवराम गाडे योगेश नागले भाऊसाहेब वाघमारे बनीचंद खरात जाकीर शेख राठोड मच्छिंद्र भालके राजेंद्र वधवानी अतुल जिरंगे रवींद्र काळे विजय मैराळ सोमनाथ देवकर मंगेश छतवानी प्रेमचंद छतवानी रमेश हरदास राजेंद्र शिंदे राजेंद्र वाघ सतीश बोर्डे दशरथ पिसे पुंडलिक खरे सुरेश पवार श्याम पवार आदी उपस्थित होते                     [  मला स्वतःचे डोके आहे त्यात मेंदूही माझाच आहे त्यामुळे निर्णय घेण्यास व विकास कामे करण्यास मी सक्षम आहे शिवाय मी  शासनात उपायुक्त पदावर काम केल्यामुळे कायद्याची अंन कागदाची मला चांगली माहिती आहे त्यामुळे तालुक्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगले काम केले जाईल जेणेकरून प्रत्येक नागरिकाला मी आमदार झाल्यासारखे वाटेल असेही आमदार कानडे म्हणाले.


अहमदनगर – कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गुरुवारी रात्री हॉटेल इम्पेरियलसमोर ही कारवाई करण्यात आली. रात्री उशीरा झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे कोतवाली पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत आले आहे.अनिल अजिनाथ गिरीगोसावी (वय 33, पोलिस हवालदार, कोतवाली पोलीस स्टेशन, अहमदनगर, रा. प्लॉट नं. 100, माधवनगर , भूषणनगर , केडगाव, अहमदनगर) हे पकडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.याबाबत माहिती अशी की, गिरीगोसावी यांच्याकडे तपास असलेल्या गुन्ह्यात तक्रारदार हे फिर्यादी आहेत. सदर गुन्ह्यात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी पोलीस हवलदार गिरीगोसावी यांनी पंचासमक्ष 5000/- रु लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केले. रात्री अकरा वाजेच्या सुमारास शहरातील जुने बसस्थानक येथील हाॅटेल इम्पिरिअलसमोर पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली.पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे, दीपक करांडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

शिर्डी प्रतिनिधि श्रीरामपूर येथून शिर्डीत प्लास्टिकचे ग्लास पत्तरवाळी ड्रोन  विकण्यासाठी आलेली महिंद्राची मालवाहतूक   mh17 bd  3085 ही रिंगरोड येथे खाली करतांना नगरपंचायतच्या पथकाने पकडली  महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी असतांना राजरोसपणे प्लास्टिकचा वापर होत आहे स्वता पर्यावरण मंत्री यांनी शिर्डीत  होत असलेल्या प्लास्टिकच्या वापरा विषयी नाराजगि व्यक्त केली असतांना ही शिर्डीत राजरोसपणे विक्री केली जाते याला नेमक कोणाचा  आशीर्वादा आहे की  शिर्डीत प्लास्टिकची विक्री होते आता नगरपंचायत नेमकी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

नाशिक । प्रतिनिधी मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर विल्होळी येथून 16 लाख रूपयांची औषधे असलेला ट्रक चोरटे पळवून नेत असताना नाशिक तालुक्यातील मुंगसरा शिवारात तो पलटी झाल्याची घटना घडली होती. हा ट्रक लुटणार्‍या चौघांच्या टोळक्यास ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.संदिप शिवाजी गायकवाड (32, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), आकाश शिवाजी गायकवाड (22, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर), गणेश पाराजी गांगुर्डे (28, रा. तळेगाव काचुर्ली ता. त्र्यंबकेश्वर/ तीघेही रा. सध्या महिरावणी) राहुल कारभारी जाधव (मुळेगाव, ता. नाशिक, सध्या रा. भंदुरे वस्ती, सातपूर)अशी संशयितांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिककडून मुंबईकडे औषधसाठा घेऊन जाणारा ट्रक (एमएच 04-सीए-7764) चोरट्यांनी चालकास मारहाण करून रविवारी (दि.22) रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास विल्होळी शिवारातून पळवला होता. याप्रकरणी ट्रकचालकाने वाडीवर्‍हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.चोरटे भरधाव ट्रक गिरणारेमार्गे मुंगसरा, दरी, मातोरी रस्त्याने पेठरोडकडे घेऊन जात असताना मुंगसरा शिवारात पलटी झाला. लाखो रूपयांचा औषधसाठा व ट्रक रात्रीपासून रस्त्याच्या कडेला पडून असल्याने सोमवारी (दि.23) ग्रामस्थांंनी नाशिक तालुका पोलिसांशी संपर्क साधला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तत्काळा तपास सुरू केला होता.जिल्ह्याच्या अधिक्षक आरती सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला होता. विल्होळीत घटना घडलेल्या भागातील सीसीटिव्ही फुटेज तपासले असता संशयित चौघे त्यात आढळून आले. त्यांची चौकशी करता हे जिंदाल कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून काम करत असल्याचे समोर आले.पोलीसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना घरून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता. कामावरून सुटल्यानंतर घरी येत असताना त्यांनी सबंधीत ट्रक हात करून थांबवला होता. त्यात बसून येत असताना चालकास हातातील डब्याने मारहाण करत त्यास जैन मंदिराजवळ उतरवून देण्यात आले होते.तर हा ट्रक घेऊन चौघे पळून जात असताना ट्रक मुंगसरा परिसरात पलटी झाला. यामध्ये चौघांनाही जखमा झाल्या आहेत. पोलीसांनी ट्रक हस्तगत केला असून चौघांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरिक्षक के.के. पाटील, सहायक निरिक्षक स्वप्नील राजपुत, सागर शिंपी व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

अहमदनगर (प्रतिनिधी)  जिल्ह्यातील पाच सराईत गुन्हेगारांवर नगर पोलिसांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई केली आहे. या पाचही अट्टल गुन्हेगारांना नाशिक जेलमध्ये रवाना करण्यात आल्याची माहिती एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी दिली.प्रशांत ऊर्फ पांड्या साईनाथ लेकूरवाळे (रा. निमगाव खैरी, श्रीरामपूर), गणेश ऊर्फ सोमनाथ बापूसाहेब हाळनोर (रा. फत्याबाद, श्रीरामपूर), कमलेश दिलीप डेरे (रा. धांदरफळ, संमगमनेर), संतोष राघू शिंदे (रा. राजापूर, श्रीगोंदा) आणि राजू ऊर्फ राजेंद्र भाऊ गागरे (मांडवे खुर्द, पारनेर) अशी स्थानबध्द केलेल्या पाच सराईतांची नावे आहेत. पारनेर, संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, बेलवंडी या स्थानिक पोलिस पोलीस अधिकार्‍यांनी एमपीडीएचा प्रस्ताव तयार करून एसपींकडे पाठविला. एलसीबीचे पीआय दिलीप पवार यांनी त्याची पडताळणी करत तो कलेक्टरांकडे पाठविला.कलेक्टर राहुल द्विवेदी यांनी या पाचही जणांना एक वर्षासाठी नाशिक जेलमध्ये स्थानबध्द ठेवण्याचा अंतिम आदेश पारीत केला. त्यानंतर एलसीबीच्या टिमने या पाचही सराईत गुन्हेगारांची रवानगी नाशिक जेलमध्ये काल (दि.24) केली. सराईतांची कुंडली प्रशांत लेकुरवाळे विरोधात दरोडा, अपहरण, गणेश हाळनोर विरोधात सरकारी कामात अडथळा, हत्यार प्रतिबंध कायदा, कमलेश डेरे विरोधात चोरी, हाणामारी, संतोष शिंदे विरोधात चोरी, खुनी हल्ला आणि राजू गागरे विरोधात सरकारी कामात अडथळा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत. आगामी काळात वाळू तस्कर, हातभट्टी दारू माफियांविरोधात एमपीडीएचे प्रस्ताव तयार करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पीआय दिलीप पवार यांनी दिली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget