Latest Post

राहाता (प्रतिनिधी) नगर-कोपरगाव महामार्गाच्या दुरुस्तीसाठी संतप्त शिवसैनिकांनी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावरील पिंपरी निर्मळ येथील टोल नाका बंद पाडला. जोपर्यंत रस्ता पूर्ण दुरुस्त होत नाही तोपर्यंत टोल चालू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.नगर-शिर्डी-कोपरगाव या महामार्गाची प्रचंड दैना झाली असून सर्व मार्ग खड्ड्यात हरवला आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडून अनेकांचे बळी जात असताना या मार्गाची दुरुस्ती न करता केवळ टोल वसुली केली जाते. वारंवार मागणी करूनही दुरुस्तीकडे कानाडोळा करणार्‍या सुप्रिम कंपनी विरोधात नागरिक, साईभक्त व प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली होती.नागरिकांच्या तक्रारीची शिवसैनिकांनी दखल घेत खा. सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम राहाता तहसील कार्यालयात जाऊन धरणे आंदोलन केले. यावेळी शिवसेना नेते प्रमोद लबडे, नितीन औताडे, कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते, राजेंद्र पठारे, अक्षय तळेकर, धनंजय गाडेकर, ज्ञानदेव पवार, अमोल गायके, अनिल बांगरे, पुंडलीक बावके, दिनेश आसने, राजेंद्र देवकर, गणेश सोमवंशी, अशोक गोंदकर, राहुल गोंदकर, अनिल पवार, गंगाराम कांदळकर, बाळासाहेब पवार, संभाजी पेरणे, सनी वाघ, सागर कोते, शुभम ताम्हाणे, किरण जपे, दिनेश पवार यानी धरणे आंदोलन करत प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, जागतीक बँक प्रकल्प अधिकारी ए. जी. मेहेत्रे यांना निवेदन देत जोपर्यंत महामार्ग दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी तसा आदेश द्यावा, अशी मागणी सर्व शिवसैनिकांनी केली. त्यानंतर खा. लोखंडे यांनी शिवसैनिकांसह पिंपरी निर्मळ येथे जात स्वतः टोलनाक्याला टाळे ठोकले व काही वेळ तेथे बैठा सत्याग्रह केला.यावेळी खा लोखंडे म्हणाले, नागरिकांना चांगला रस्ता मिळावा म्हणून टोल आकारला जातो. मात्र या मार्गावर केवळ टोल आकारला जात असून रस्ता दुरूस्तीकडे दुर्लक्ष केले जाते. दोन महिन्यात या मार्गावर खड्ड्यामुळे पाच जणांचे बळी गेले. याला जबाबदार कोण? नगर ते कोपरगाव रस्ता व शिर्डी बाह्यवळण रस्ता तातडीने दुरूस्त करा मगच टोल सुरू करा. जोपर्यंत रस्ता खड्डेमुक्त होत नाही तोपर्यंत टोल सुरू करू देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला.तसेच तहसिलदार, कृषी अधिकारी व विमा कंपनी अधिकारी यांनी सर्व शेतकर्‍यांचे पंचनामे करावे. शेतात व खळ्यात पडलेल्या सोयाबीनचे वेगळे पंचनामे न करता सरसगट पंचनामे करून हतबल शेतकर्‍याला मदत करण्याचे अहवान केले. तसेच राहाता तालुक्यातील पेरू व फळबागांचेही पंचनामे करावे तसेच चारा पिकांचेही पंचनामे करा, अशा सुचना लोखंडे यांनी केल्या. विमा कंपनीचा एक अधिकारी शेतकर्‍यांची अडवणूक करतो, अशा तक्रारी शेतकर्‍यांनी करताच त्या अधिकार्‍याला खा. लोखंडे यांनी शिवसेना स्टाईलने फटकारले. यावेळी शिवसेना उप जिल्हा प्रमूख प्रमोद लबडे कमलाकर कोते राजेंद्र पठारे व नितीन औताडे यांची भाषणे झाली. सुप्रिमचा टोलनाका बंद पाडला खासदार लोखंडे व संतप्त शिवसैनिकांनी थेट पिंपरी निर्मळ येथील टोलनाक्यावर जात तेथील व्यवस्थापकाला बोलावून रस्ता जोपर्यंत दुरूस्त होत नाही तोपर्यंत टोल बंद करा टोल वसूल करू नका, अशा सूचना करत स्वतः खा. लोखंडे यांनी टोल वसूल करणार्‍या बूथला कुलूप लावले. यावेळी जागतिक बँक प्रकल्प अधिकारीही येथे उपस्थित होते.

सिल्लोड, प्रतिनिधी : मान्सनोत्तर पावसात पिके व चारा कुजल्याच्या विरहाने कृष्णा एकनाथ काकडे (38 रा. पूर्णावाडी, धानोरा) या दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा सोमवारी सकाळी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. बुधवारी त्यांच्या कुटुंबाची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन सांत्वन करीत शासकीय मदत मिळवून देऊ असे सांगत धीर दिला.

    मयत शेतकऱ्याला धानोरा शिवारात गट नं. 293 मध्ये अवघी एक एकर शेती आहे. यामुळे ते दुग्ध व्यवसाय करुण कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. परंतु परतीच्या पावसाने सोंगनी केलेल्या मकाच्या कणसाला कोंब फुटली, तर चारा वाहून गेला. यामुळे दुभत्या गायीला काय खाऊ घालणार अशा तणावात ते होते.

     कुटुंबातील कर्ताच माणूस गेल्याने हे कुटुंब उघड्यावर आले आहे. या कुटुंबाची माजी आ. सांडू पाटील लोखंडे, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, माजी सरपंच माधवराव काकडे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.

बुलढाणा- 6 नवंबर
राष्ट्रीय पक्षी मोर का शिकार कर उसके मांस की भाजी बना कर खानेवाले 3 आरोपियों को वन विभाग ने गिरफ्तार किया है.आरोपियों को कोर्ट ने आगामी 8 नवंबर तक वन कस्टडी में भेज दिया गया है.इस कार्रवाई के बाद इलाके में खलबली मची हुई है.
     बुलढाणा आरएफओ गणेश टेकाले को गुप्त जानकारी मिली के ग्राम मोज के पास कुछ लोग मोर का शिकार कर उसके मांस को पका कर खाने वाले हैं पश्चात बुलढाणा डीएफओ संजय माली,एसीएफ आर.आर.गायकवाड के मार्गदर्शन में कल 6 नवंबर की रात में आरएफओ गणेश टेकाले के नेतृत्व में वनकर्मी एच. पवार,के.बी.शेख,अंकुश बाभुलकर, रेस्क्यु टीम के प्रमुख राहुल चौहान,समाधान मांटे,संदीप मडावी,सुरेश भालेराव,विष्णु काकड व स्वप्निल वानखेडे आदि का एक दल तैयार मोहज की दिशा में भेजा गया तब गुट क्र.20 के एक खेत में एक सीमेंट के कमरे में 3 लोग मिले जिनके पास से राष्ट्रीय पक्षी मोर का पका हुआ और कच्चा मांस,बारा बोर की बंदूक,मांस काटनेवाले तेज़ हथियार आदि साहित्य जब्त किया गया.इन तीनो को पकड़कर बुलढाणा वन विभाग के कार्यालय में लाया गया.आरोपी संतोष शेनफड नरोटे,सचिन विजय नरोटे दोनों देवपुर निवासी तथा समाधान तेजराव वाघ निवासी सावली के खिलाफ भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 की धारा 9,39,51 के तहत तथा भारतीय वन अधिनियम 1927 की धारा 26(1) आई के तहत अपराध दर्ज कर तीनो आरोपियों को आज कोर्ट में भेजा गया जिन्हें आगामी 8 नवंबर तक वन कस्टडी में भेज दिया गया है.मामले की अधिक जांच एसीएफ गायकवाड व आरएफओ टेकाले कर रहे है.
    बता दे कि,मोहज, मालशेंबा,रोईखेड़ मायंबा,सावली,आदि इलाका जालना जिले की सीमा से सटा हुआ है तथा यहां वन्यजीव भी अधिक संख्या में होने के कारण अक्सर शिकारी यहां पर वन्यजीवों का शिकार करते हुए शराब के साथ पार्टी मनाते है.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे दिसत नाही. भाजपाने चर्चेची दारं खुली असल्याचं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, कोणताही प्रस्ताव आला नाही अन् पाठवणार नाही अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा -शिवसेनेत तणाव वाढल्याचं दिसून येत आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, काहीही झालं तरी मुख्यमंत्री शिवसेनेचा बनवा ही जनतेची मागणी आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जिथे जातील तिथे लोकं शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवा हेच मागणी करत आहे. शेतकरी आशेने बघत आहे. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदावर सहमती झाली होती त्यामुळे मुख्यमंत्री शिवसेनेचा या मागणीवर ठाम असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच कोणताही प्रस्ताव आला नाही किंवा जाणार नाही. जे ठरलं आहे ते करा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचं षडयंत्र कोणी रचत असेल तर जनादेशाचा अनादर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यावर अन्याय असेल असंही शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले आहे. दरम्यान, भाजपाने मंगळवारी कोअर कमिटीची बैठक घेतली या बैठकीनंतर भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी सांगितले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे.

बुलडाणा- 5 नोव्हेंबर
बुलडाणा तालुक्यातील सावळा,भादोला,डोंगरखंडाळा व वरवंड गावांचा आज 5 नोव्हेंबर ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार व रविकांत तुपकर यांच्या समवेत दौरा करून शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करुण शेतकऱ्यांशी संवाद ही साधला.यावेळी उपस्थित असलेल्या कृषी विभाग व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना कण्यात आले.बुलडाणा तालुक्यात ओल्या दुष्काळामुळे सोयाबीन,कापूस,उडीद,मुग या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांच्या डोळ्यातुन अक्षरशः पाणी येते आहे.प्रशासनाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आक्रमक आंदोलनाला प्रशासनाला समोर जावे लागेल असा इशाल यावेळी रविकांत तुपकरांनी दिला आहे.

बेलापूर ( प्रतिनिधी  )--नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या नियमाप्रमाणे १००% नुकसान भरपाई मिळावी तसेच बिगर विमा धारक शेतकऱ्यांना हेक्ट२५ हजार नुकसान भरपाई  मिळावी अशी मागणी शेतकरी संघटनेचे सुधाकर खंडागळे यांनी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे  केली              बेलापूर येथे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्याकरिता नामदार राधाकृष्ण विखे पाटील आले होते नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापूर येथील प्रकाश पाटील नाईक यांच्या नुकसानग्रस्त सोयाबीन पिकाची पहाणी केली त्यावेळी बोलताना सुधाकर खंडागळे यांनी अशी मागणी केली की सर्वच शेतकऱ्यांनी शेतीचा पिकाचा विमा उतरवलेला नाही परंतु या बेमोसमी पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांच्या पिकांचे 100 टक्के नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना सरसगट पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी या पंच नाम्यांमध्ये सर्वच पिकांचा समावेश करण्यात यावा त्यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वच पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले असून दोनच दिवसात सर्व नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात येतील असे सांगितले यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील पंचायत समिती सभापती दीपक पठारे जिल्हा  परीषद सदस्य  शरद नवले भाजपाचे प्रकाश चित्ते  अशोकचे संचालक अभिषेक खंडागळे बाळासाहेब नाईक युवराज नाईक प्रताप राव नाईक कामगार तलाठी कैलास खाडे मंडलाधिकारी गोसावी कैलास चायल आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राहुरी (प्रतिनिधी)- तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम भागातील म्हैसगाव, शेरी चिखलठाण परिसरात काल ढगफुटीसारखा प्रकार घडला. सुमारे साडेचार तास चाललेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील ओढ्या नाल्यांना पूर आल्याने तुडूंब भरलेले बंधारेही फुटले तर अनेक शेतजमिनीही वाहून गेल्या आहेत. अगोदरच परतीच्या पावसामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना त्यात आता ढगफुटीसारखे प्रकार घडत असल्याने शेतकरी पुरता धास्तावला आहे.म्हैसगाव परिसरात ढगफुटी होऊन झालेल्या पावसामुळे केदारेश्वर मंदिराजवळील म्हैस ओढ्याने रौद्ररुप धारण केले होते. ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्ता बंद झाल्याने पाच गावांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला. शेरी येथील तलाव फुटण्याची शक्यता असल्याने तलावाच्या सांडव्याचा भाग मोठा करुन तलावातील पाणी कमी करण्यास स्थानिक तरुणांना सांगितले. एकूणच पावसामुळे या भागात सर्वत्र पाणी भरलेले आहे. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने परिसरातील 5 ते 6 जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधलेले बंधारेही फुटले तर रस्त्यावरुन सुमारे 30 फुट पाणी वाहत होते.सोमवारी पहाटे 4 पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसाने म्हैसगाव परिसराला अक्षरक्ष झोडपून काढले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सकाळी 11.30 वाजता केदारेश्वर मंदिराजवळील (म्हैसगाव) ओढ्याच्या पुलावरुन प्रचंड वेगाने पाणी वाहू लागल्याने म्हैसगाव ते राहुरी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली. त्यामुळे शेरी, चिखलठाण, म्हैसगाव, कोळेवाडी, बुळे पठार भागातील ग्रामस्थांचा राहुरी तालुक्याशी संपर्क तुटला आहे.पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामा करण्यासाठी या भागात गेलेले तहसीलदार फसियोद्दीन शेख, तालुका कृषि अधिकारी महेंद्र ठोकळे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, मंडलाधिकारी, तलाठी, कृषि सहाय्यक, ग्रामसेवक असे सर्वच अधिकारी सकाळपासून पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget