भारत पाकिस्तान दरम्यान शस्त्रसंधी झाल्याबद्दल बेलापुरात जल्लोष
बेलापूर(प्रतिनिधी) गेल्या चार दिवसापासून भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सुरू असलेले युद्ध पाकिस्तानने विनंती केल्याने अखेर शस्त्र संधी झाल्यामुळे बेलापूर येथील सत्यमेव जयते ग्रुप व बेलापूर ग्रामस्थांच्या वतीने घोषणा देऊन फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली भारत पाकिस्तान दरम्यान गेल्या सात तारखेपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती भारताने पहलगाम हल्याचा बदला घेण्याकरता नऊ अतिरेकी अड्डे उध्वस्त केले त्याचा परिणाम पाकिस्तानने भारताच्या नागरि वस्त्यावर हल्ले सुरू केले. त्याचबरोबर आपल्या देशातील अनेक ठिकाणाला ड्रोन च्या साह्याने लक्ष बनवण्याचा प्रयत्न केला .परंतु भारताच्या सैन्य दलाने हा हल्ला परतून लावला. पाकिस्तानने भारतावर हल्ला करून निष्पाप नागरिकांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तरी देखील भारताने संयम राखत केवळ अतिरेकी असलेल्या ठिकाणावरच हल्ले केले.आणि ही बाब जगासमोर आली त्यामुळे अखेर पाकिस्तानला नमते घेत शस्त्र संधी करणे भाग पडले. याच घटनेचा बेलापूर ग्रामस्थ सत्यमेव जयते ग्रुपचे वतीने फटाक्याची आतिषबाजी करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारत माता की जय वंदे मातरम ,जय जवान जय किसान, सैन्यदलाचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी तिरंगा हातात घेऊन सत्यमेव जयते ग्रुप व ग्रामस्थ यांच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यानंतर झेंडा चौकात घोषणाबाजी करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात फटाकेची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, देविदास देसाई, विष्णुपंत डावरे संजय भोंडगे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुवालाल लुक्कंड,पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, दिलीप दायमा,दिपकसा क्षत्रिय,विलास नागले,अँड. पांडुरंग कोकणे, बाबुलाल पठाण, भगीरथ मुंडलिक,जाकीर शेख,दिलीप दुधाळ,नंदकिशोर दायमा,विशाल आंबेकर, किरण गागरे,गोपी दाणी,गणेश मगर,महेश कुऱ्हे, संजय शिंदे, भाऊसाहेब तेलोरे, प्रविण बाठीया ,राधेशाम आंबिलवादे,दिलीप अमोलिक,अजीज सय्यद, महेश ओहोळ,औदुंबर राऊत, इरफान शेख,सुभाष मोहिते, राहुल माळवदे, बबन मेहेत्रे ,सचिन कणसे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Post a Comment