"निवडणुका स्वबळावर अन् कोणाचा प्रस्ताव आला तर आघाडी "राष्ट्रवादीला यापुढे अधिक चांगले दिवस.... पालिकेचे ही काम उत्कृष्टच -अविनाश आदिक

श्रीरामपूर प्रतिनिधी - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस त्या स्वबळावर लढेल. मात्र कुणाचा प्रस्ताव आलाच तर आघाडी करूनही निवडणुका लढविल्या जातील, असे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्याचे सरचिटणीस आणि प्रवक्ता अविनाश आदिक यांनी दिले.जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल  श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने काँग्रेस भवन मधील बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात श्री. आदिक यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते कारभारी बडाख हे होते.आदिक  म्हणाले, आगामी काळात सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच जिल्ह्यात  विधान परिषदेची ही निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने जळगाव जिल्हा निरीक्षक म्हणून आपली नेमणूक केली आहे. तेथे ११ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. मात्र श्रीरामपूर कडे माझे अजिबात दुर्लक्ष होणार नाही. लोकनियुक्त नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी कोरोना च्या मोठ्या संकटाच्या काळातही पालिकेच्या माध्यमातून शहरात खूप मोठी विकास कामे केली आहेत. तुम्ही पहा,जनता त्याची रोज चर्चा करीत आहेत.राष्ट्रवादीला यापुढे नक्कीच खूप चांगले दिवस येणार आहेत,असे सूतोवाच करीत श्रीरामपूर साठी आपण आगामी काळात खूप मोठे काम करणार आहोत. आता मी ते सांगणार नाही. कारण  त्याचे सर्व श्रेय घेतील. काम झाल्यानंतर आपण ते जाहीर करू, भले त्याचे श्रेय नंतर कोणीही घेवो, असे आदिक यांनी सांगितले.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारशीनुसार आपली जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे असे आदिक यांनी सांगून खा. सदाशिव लोखंडे, आ. लहू कानडे बाबासाहेब दिघे, आणि आपण  असे चौघेजण या तालुक्यातून जिल्हा नियोजन समितीवर गेले आहेत.  हे श्रीरामपूरचे भाग्य आहे. शहरातील जनता सुज्ञ आहे. गेली पाच वर्षे त्यांनी राष्ट्र वादी ला  खूप मोठे पाठबळ दिले.  आगामी निवडणुकीसंदर्भात नियोजन करण्यासाठी सर्वांचे मत विचारात घेतले जाईल. त्यासाठी ज्येष्ठांनी एकत्र येवून त्याची कच्ची यादी तयार करून ठेवावी.चौकट: गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील जनतेच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करताना आदिक यांनी अनेक आठवणी विशद केल्या. स्व. गोविंद राव आदिक साहेबांना लता जी  राखी बांधण्यासाठी येत असत.चौकट -यावेळी साईबाबा संस्थानच्या विश्वस्तपदी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांची निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक म्हणाल्या, अवि दादा यांनी मला निधी आणून दिला आणि मी तो आयता वापरला.  अविदादा यांनी  दिलेल्या निधीबद्दल ऋण व्यक्त केले. अवि दादा होते म्हणूनच मला खूप मोठा निधी मिळाला. शहरातील नागरिकांनीही मला खूप मोठी साथ दिली. ती यापुढेही मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.नगरसेवक राजेंद्र पवार म्हणाले राज्यामध्ये भाजपाची लाट असताना श्रीरामपूर आतील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून अनुराधाताई आदिक यांना निवडून दिले त्या निवडीस त्या सार्थ ठरल्या, शहरांत घर तेथे रस्ता ही संकल्पना राबवत त्यांनी शहरातील गल्ली बोळातील रस्ते केले अजूनही जवळपास 100 रस्ते मंजूर करण्यात आले आहेत तसेच शहराची भविष्याची पाण्याची गरज लक्षात घेता सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना ही त्यांनी सरकारकडे पाठवली असून लवकरच तीही मार्गी लागेल असेही पवार म्हणाले.यावेळी तालुक्यातील अनेक विविध सोसायट्या, विविध ग्रामपंचायती मध्ये निवडून आलेल्या शेकडो मान्यवरांचा आदिक बंधू आणि भगिनी यांच्या हस्ते प्रत्येकास  बुके  देत सत्कार करण्यात आला. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर आणि तालुक्यातील विविध पदांवर नियुक्ती दिलेल्या मान्यवरांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

दादा, तुमचा हा गौरव पाहून ,तुमच्याकडे संस्काराची लोकशाही आहे. हे तुमच्याकडे पाहून सर्वांनाच जाणवते आमच्याकडील नेत्यांना मात्र सगळीकडचे पाणी मानवले.सुसंस्कृत जनतेची आदिक साहेबांपासूनच तुमच्या परिवाराला साथ आहे.म्हणूनच आम्हाला अरुण पाटील नाईक यांच्या सह तुमच्या सहवासाचा नाद आहे, गोंडेगाव येथील बाबासाहेब कोळसे यांच्या या कवितेस उपस्थितांनी भरभरून दाद देतानाच सर्वत्र हशा पिकला होता.

यावेळी मर्चंट असोसिएशनच्या संचालकपदी पुरुषोत्तम झंवर ,प्रवीण गुलाटी, राहुल कोठारी,स्वरूपचंद खाबिया,निलेश बोरावके हे बहुमताने निवडून आल्याबद्दल  तसेच तुर्कस्तान येथे झालेल्या आशियाई पावर लिफ्टिंग स्पर्धेत प्रा सुभाष देशमुख यांनी कांस्यपदक पटकवल्याबद्दल त्यांचाही आदिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच अशोक कारखाना निवडणुकीत चांगले मताधिक्य मिळविल्याबद्दल सर्व उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. मातुलठाण सोसायटी निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष आणि श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक कैलास बोर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवडून आलेल्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक,ऍड. सर्जेराव कापसे, विष्णुपंत खंडागळे, बाबासाहेब कोळसे, ऍड. समीन बागवान आधी काँग्रेसजनांनी केक काँग्रेस भवन वर हजेरी लावत अविनाश आदिक यांचा सत्कार केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारभारी बडाख,यावेळी नगराध्यक्षा तथा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त अनुराधाताई आदिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलास बोर्डे,,जयाताई जगताप ,अर्चनाताई पानसरे,सोनल मुथा,रेवती चौधरी, ऐश्वर्या चौधरी, निशा थोरात, नगरसेवक राजेंद्र पवार , मुक्तार शहा, प्रकाश ढोकणे,  ताराचंद रणदिवे,भाऊसाहेब डोळस,रईस जहागीरदार,सुरेश निमसे, सोमनाथ गांगड,विजय शिंदे, चंद्रकांत सगम,नजीर मुलाणी, मल्लू शिंदे, बापूसाहेब सदाफळ,बापूसाहेब पटारे, उत्तम पवार,हर्षल दांगट,शहराम शेटे, रामभाऊ औताडे, भागचंद औताडे, वसंतराव पवार,डॉ. बापूसाहेब आदिक, आदित्य आदिक,अर्जुन आदिक, सुनील थोरात, हंसराज आदिक, निलेश आदिक,कार्लस साठे, राजेंद्र गवारे, किशोर बकाल, जालिंदर लवांडे, भगवानआदिक, विलास बडाख,डॉ. विलास आढाव, भाऊ डाकले, स्वप्निल जाधव, संदीप चोरगे,अमजद पठाण, लक्ष्मण धोत्रे, गोपाल वायं देशकर, राजेंद्र पानसरे, रवी गरेला, तौफिक शेख, शफी शहा,सैफ शेख, शोहेब शेख, भैय्या भिसे,निखिल सानप,योगेश जाधव, समित मुथा,राहुल बोरावके,शाकिर सय्यद, निरंजन भोसले, विलास ठोंबरे, सागर कुऱ्हाडे, शुभम पवार, अथर्व पाटील,  सोहेल सय्यद,  किशोर बडाख, डॉ. अरविंद बडाख, बाळासाहेब बडाख,श्रीकांत दळे, गणेश ठाणगे, सचिन पवार,लक्ष्मण धोत्रे बाळासाहेब बोरुडे,विशाल गोल्हार अक्रम शेख, मुयर खेमनर, आदि मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट जयत चौधरी आणि बाबासाहेब लबडे यांनी केले.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget