पत्रकारांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक गरजा पूर्ण करणे करिता शासनास भाग पाडणार शेख बरकत आली.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) शासनाने अधिस्वीकृती पत्र धारक व सामान्य पत्रकार यांच्यात दुजाभाव केला आहे केंद्र शासनाकडून समाचार पत्रास मान्यता मिळवून आर एन आय नोंदणी क्रमांक मिळविणाऱ्या संपादक व पत्रकार यात शासनाने दुजाभाव करून छोट्या पत्रकारांवर मोठा अन्याय केला आहे अशा सर्व पत्रकारांसाठी महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या वतीने लढा देऊन शासनाचे लक्ष केंद्रित करणार असल्याचे महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली यांनी सांगितले रविवार दिनांक 31/ 10 /2021 रोजी दुपारी दोन वाजता पत्रकार संघाच्या श्रीरामपूर येथील मुख्य कार्यालयात श्रीरामपूर तालुक्यातील पत्रकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत आली बोलत होते पत्रकारांच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक अडीअडचणी संदर्भात चर्चा करणे का मी तसेच वार्षिक स्नेह मेळावा घेणे का मी व पत्रकार संघात नवीन पत्रकारांचा समावेश करण्याकरिता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष व रुग्ण मित्र सुभाष राव गायकवाड हे होते अध्यक्षपदाची सुचना पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राज मोहम्मद शेख यांनी मांडली त्यास अनुमोदन पत्रकार संघाचे युवा कार्याध्यक्ष संदीप पवार यांनी दिले सूत्रसंचालन व प्रास्ताविक राज मोहम्मद शेख यांनी केले यावेळी रामगड येथील पत्रकार राज मोहम्मद शेख ,रसूल शेख यांना उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष पदावर पदोन्नती करण्यात आली याच बरोबर रामगड येथील महिला चळवळीतील कार्यकर्त्या सौ समीना रफिक शेख यां ची अहमदनगर जिल्हा महिला उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली श्रीरामपूर येथील युवा कार्यकर्ते व पत्रकार इम्रान सरदार पठाण यांची श्रीरामपूर शहर सचिव पदावर तर ममदापूर येथील पत्रकार व दलित मित्र शब्बीर फत्तु भाई कुरेशी

यांची राहता तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र व ओळख पत्र देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले या बैठकीत राज मोहम्मद ,शेख असलम बिन साद, कासम शेख ,एजाज शेख ,कुमारी अश्विनी अहिरे ,शब्बीर कुरेशी आदींनी मनोगत व्यक्त केले आपल्या प्रमुख भाषणात शेख बरकत आली पुढे म्हणाले की पत्रकारांनी बातमीची शहानिशा करूनच बातम्या वृत्तपत्र पोर्टल न्यूज अगर न्यूज चैनल मध्ये प्रसिद्ध केल्यास पत्रकार अडचणीत येणार नाही समाजातील चांगल्या किंवा वाईट बातम्या पत्रकारांना प्रसिद्ध कराव्या लागतात सांगली बातमी छापल्यावर पत्रकाराची बाह वाह होते मात्र एखाद्याच्या भ्रष्टाचाराबाबत बातमी प्रसिद्ध केल्यास ती व्यक्ती पत्रकारावर लांछन लावून त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते अशा वेळेस पत्रकाराने घाबरून जायचे काहीच कारण नाही पत्रकार संघ खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभा आहे त्याला अडचणीतून बाहेर आणण्याची दानद पत्रकार संघ मध्ये आहे काळजी करायचे कारण नाही असे त्यांनी सांगितले आपल्या अध्यक्षीय भाषणात सुभाष राव गायकवाड यांनी सांगितले की मी गेल्या चार पाच वर्षापासून या पत्रकार संघात काम करीत असून माझ्या काही जवळच्या मित्रांनी मला जातीचे आंतर दाखविले त्यांना मी सांगितले की मी रुग्णमित्र आहे रुग्णांना जात पाहून हॉस्पिटल मध्ये नेत नाही सगळे रुग्ण मला समान आहेत आणि डॉक्टरही मुस्लिमांना वेगळं आणि हिंदूंना वेगळा औषध उपचार करीत नाही त्यामुळे या पत्रकार संघात मला कधीही भेदभाव दिसला नसल्या ने मी या पत्रकार संघाचा घटक आहे असे त्यांनी सांगितले या बैठकीस पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद प्रदेश युवा अध्यक्ष संदीप पवार श्रीरामपूर शहर अध्यक्ष रियाज खान पठाण बेलापूर शहर उपाध्यक्ष अस्लम भाई सय्यद श्रीरामपूर शहर संघट कुमारी अश्विनी अहिरे सामाजिक कार्यकर्ते अमीर बेग मिर्झा पत्रकार रमेश शिरसाट पत्रकार संघाचे सदस्य मोहम्मद गौरी व रसूल भाई शेख आदींसह इतर पत्रकार उपस्थित होते उपस्थितांचे आभार श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष कासम भाई शेख यांनी मानले.


Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget