बेलापुर (प्रतिनिधी )-आपापसात होणारे मतभेद हे वादाचे मुख्य कारण असुन या कारणामुळेच न्यायालयात खटले जास्त तर न्यायाधिशांची संख्या कमी त्यामुळे न्यायालयावर कामाचा ताण येत असल्याचे मत तदर्थ जिल्हा न्यायाधिश १ व सहाय्यक सत्र न्यायाधिश बी बी तोष्णीवाल यांनी व्यक्त केले. मा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांचेकडील कार्यक्रमानुसार तालुका विधी सेवा समीती श्रीरामपुर वकील संघ व बेलापुर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते त्या वेळी शिबीराच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना न्यायाधीश
बी बी तोष्णीवाल म्हणाले की मतभेदातून होणारे वाद हे जागेवरच मिटले पाहीजे त्या करीता मध्यस्थाची नियुक्ती करण्यात आली आहे दिवाणी फौजदारी महीला विषयक कौटुंबिक वाद मध्यस्थामार्फत सोडविले जातील त्यामुळे वेळेची बचत होईल कायद्याने आता मुलाप्रमाणेच मुलींनाही समान अधिकार दिलेले आहेत अनेकांना आर्थिक अडचणीमुळे न्यायालयात जाता येत नाही त्यांना कायदेविषयक ज्ञान देण्याकरीता या शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन असे उपक्रम वर्षभर सुरु राहणार असल्याचे न्यायाधीश तोष्णीवाल यांनी सांगितले २ रे सह दिवाणी न्यायाधीश सौ एस व्ही मोरे शिबीरार्थींना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की समाजात महीलावरील अत्याचारात दररोज वाढ होताना दिसत आहे केवळ अशिक्षित लोक हे गुन्हे करतात असे नाही सुशिक्षित कायद्याचे ज्ञान असणारे लोकही गुन्हे करत आहेत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. बालविवाहचा कायदा झालेला असतानाही बालविवाह होतात ही शोकांतीका आहे महीलांना पोटगीचा अधिकार दिलेला आहे अनेक कायदे हे नागरीकांच्या भल्यासाठी केले जातात परंतु काही ठिकाणी त्याचा गैरवापर केला जातो या सर्वावर नियंत्रण आणावयाचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मुलावर कुटुंबावर चांगले संस्कार करण्याची गरज असल्याचे मत न्यायाधीश सौ एस व्ही मोरे यांनी व्यक्त केले या वेळी जि प सदस्य शरद नवले यांनीही मनोगत व्यक्त केले कार्यक्रमास सहाय्यक सरकारी अभियोक्ता अँड.पी पी गटणे पोलीस निरीक्षक संजय सानप अँड एस आर बिहाणी अँड .जगन्नाथ राठी ,अँड.सुहास चुडीवाल ,अँड. मनिषा वर्मा ,अँड. पंकज म्हस्के,अँड.ईजाज शेख अँड अविनाश भोकरे ,अँड वैभव खंडागळे ,अँड.अमोल भोकरे ,अँड सुनिल कपुर ,अँड .सुनिल शेळके मुस्ताक शेख रमेश अमोलीक शफीक बागवान विधी व न्याय समितीचे दिलीप थोरात संदीप शेरमाळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे हवालदार अतुल लोटके रामेश्वर ढोकणे निखील तमनर हरीष पानसंबळ गणेश भिंगारदे कामगार तलाठी हडोळे मिलींद दुधाळ अरुण आमोलीक दादा कुताळ मोहसीन सय्यद नितीन नवले पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा विष्णूपंत डावरे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर अँड जिवन पांडे यांनी सूत्रसंचलन केले शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.
Post a Comment