श्रीरामपूर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक दिवसांपासून श्रीरामपूर नगर परिषद पाणी पुरवठा विभागाकडून शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा केला जात असल्याच्या नगर पालिकेकडे वेळोवेळी अनेक तक्रारी करुनही कोणीच दखल घेत नसल्याने येथील सामाजिक कार्यकर्ते तथा जे.जे.फाऊंडेशनचे अध्यक्ष जोयफ जमादार यांच्या जे.जे. गृपतर्फे शेवटी उपोषणाचा मार्ग स्विकारणे भाग पडले आहे,
कोरोना महामारीच्या संकटाने भेडसावत असलेल्या परिस्थितीला पोषक वातावरण देऊन विविध साथी आजाराला जणू निमंत्रणच देऊ पाहणार्या संबधीत नगर पालिका प्रशासन नेमके काय साध्य करु पहात आहे हे न समजनण्या पलिकडचे होऊन बसले आहे.
सदरील नळांद्वारे येणारे घाण पाणी पिण्यात येत असल्याने विविध साथीचे आजार बळावण्यास जरासाही विलंब लागणार नाही,त्यात आधीच कोरोनाचे महाभयंकर संकट असल्याने नगर पालिका प्रशासन का बरे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे ?, हे देखील एक न उलगडणारे कोडेच होऊन बसले आहे,
नगर पालिकेच्या अशा गलथान कारभारामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले असून यावर नगर पालिका प्रशासनाने त्वरीत लक्ष घालून नळांद्वारे होणारा दुषित पाण्याचा पुरवठा त्वरीत शोधून बंद करण्यात यावा अशी या उपोषणाच्या माध्यमातून जे.जे.गृपतर्फे मागणी करण्यात येत आहे,
तमाम शहरवासीयांच्या आरोग्याचा ज्वलंत प्रश्न असल्यानेच शहरातील इतरही अनेक सामाजिक संघटनांचा या उपोषण/आंदोलनास पाठिंबा मिळत आहे यामुळे शहरातील तमाम सामाजिक कार्यकर्त्यांनी यामध्ये अधिकाधिक आपला सहभाग नोंदवावा तथा समस्त शहरवासीयांची या त्रासापासून मुक्ती होणे कामी पुढाकार घ्यावा असे अवाहनही जे.जे.गृपतर्फे करण्यात येत आहे.
Post a Comment