श्रीरामपूर ( प्रतिनिधी )- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासन विविध पातळीवर प्रयत्न करत असुन त्याचाच एक भाग म्हणून कार्डधारकांना तीन महीन्याचे धान्य एकाच वेळी देण्यात यावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी पुरवठा मंत्र्याकडे केली आहे पुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांना पाठविलेल्या निवेदनात देसाई यांनी पुढे म्हटले आहे की कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी शासनाने अनेक उपाय योजना सुरु केल्या आहेत गर्दीच्या ठिकाणी एकत्र न येण्याचे अवाहन करण्यात आलेले आहे शासनाने कार्डधारकाना वितरीत करावयाचा धान्याचा कोठा एकाच वेळेस तिन महीन्याचा दिल्यास कार्डधारकाची दुकानात गर्दी होणार नाही तसेच दुकानदार टप्प्याटप्प्याने दुकानावर गर्दी होवु न देता वितरण करतील कारण धान्य दुकानात धान्य आल्यास कार्डधारक एकाच वेळेस गर्दी करतात एकाच वेळेस तीन महीन्याचे धान्य दिल्यावर दुकानावर जास्त गर्दी होणार नाही शासनाने या मागणीचा विचार करावा असेही निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर देविदास देसाई रज्जाक पठाण मिनाताई कळकुंबे विश्वासराव जाधव बाळासाहेब दिघे कैलास बोरावके ज्ञानेश्वर वहाडणे सुरेश उभेदळ बाळासाहेब देवखीळे सुरेश कोकाटे रावसाहेब भगत बाबा कराड भाऊसाहेब वाघमारे बजरंग दरंदले माणिक जाधव बाबासाहेब ढाकणे मुकुंद सोनटक्के आदिच्या सह्या आहेत
Post a Comment