मासिक मिटींग व ग्रामसभेचा गळनिंब ग्रामसभेला विसर.गळनिंब.

गळनिंब (प्रतिनिधी)श्रीरामपूर तालूक्यातील गळनिंब ग्रामपंचायत सदस्यांची मासिकमिटींगचा अजेंठा देवूनही एकही सदस्य,ग्रामसेवक मासिक मिटींगकडे फिरकला नाही.तसेच प्रजाकसत्ताक दिनानिमित्त ग्रामसभेचा विसर देखील पदाधिकारी,ग्रामसेवक यांना पडला.
  गावाच्या विकासाचा केंद्रबिंदु म्हणजे ग्रामसभा असल्याने या सभेला अनन्यसाधारण महत्व असते.विविध कामांच्या आराखड्याची व शासनाच्या अनेक योजनांचा या ग्रामसभेत ठरावाच्या रूपाने कागदपत्रांची आवश्यकता असते गावातील विविध समस्यांचा प्रश्न समस्या मांडण्याचे व्यासपीठ असते. परंतु याच ग्रामसभेबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी अधिकारी अभियज्ञ असल्याचे समोर आले आहे.याबाबत गावातील सुज्ञ नागरीकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विषेश म्हणजे येथील ग्रामसेवकांना दोन गावांचा पदभार असल्याने दोन्ही गावांच्या ग्रामसभेची वेळ एकच असल्याने ग्रामसभेस सचिव म्हणून जि.प. शाळेच्या मुख्यध्यापिका यांनी चार्ज घेण्यास नकार दिला असल्याने प्रजाकसत्ताकदिनी ग्रामसभा होवू शकली नाही.
 गावाच्या प्रश्नावर जर पदाधिकारीच गंभीर नसतील तर विकास कसा होणार आणि कोण करणार यावेळी अनेकांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या बाबतीत अनेक समस्यांबाबत नाराजी व्यक्त केली.  प्रजाकसत्ताक दिनी न झालेली ग्रामसभा लवकरात लवकर घ्यावी असे मतही यावेळी व्यक्त केले.
Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget