पत्रकारांवर टीका खपवून घेतली जाणार नाही! बेलापूर प्रेस क्लबचा जाहीर निषेध
आम्ही पत्रकार कुणाचे 'पगारी' नोकर नाही किंवा कोणाचे बाःधिल नाही. पञकाराने काय करावे हे शहाणपण कोणी शिकवायची गरज नाही.बेलापूर प्रेस क्लबचे पत्रकार सदस्य समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून काम करत असतात.
बातमीची निवड हा पत्रकाराचा विशेष अधिकार आहे. कोणती बातमी प्रसिद्ध करावी आणि कोणती करू नये, हा सर्वस्वी त्या पत्रकारांचा आणि त्यांच्या संपादकांचा निर्णय असतो. बातमीचे महत्त्व, तिची सत्यता आणि समाजावर होणारा परिणाम तपासूनच बातमी लावली जाते. पत्रकारावर कोणत्याही बाह्य व्यक्तीने किंवा शक्तीने बातमीसाठी दबाव आणणे हे बेकायदेशीर आणि नैतिकतेच्या विरोधात आहे.
पत्रकार संरक्षण कायद्या सारखे पत्रकारांचे कायदेशीर कवच तरी काही अतिउत्साही व्यक्ती पत्रकारांना उद्देशून अपशब्द वापरतात किंवा टिकाटिपणी करतात. महाराष्ट्र सरकारने 'पत्रकार संरक्षण कायदा' (२०१७) लागू केला असून त्यातील प्रमुख तरतुदीनुसार कलम ३ व ४: पत्रकारावर हिंसाचार करणे किंवा त्याच्या कामात अडथळा आणणे हा गंभीर गुन्हा आहे. कलम ५ नुसार सदर गुन्हे हे 'दखलपात्र आहेत. तुमच्या राजकारणात पञकारांना आणू नका.पञकारांना राजकारणाशी काहिही घेणेदेणे नाही.दुसरे व्यक्ती वा नागरिक म्हणून पञकार स्वतंञ आहे.त्याची व्यक्ती म्हणून राजकीय विचारधारा असणे हा त्याचा नागरी अधिकार आहे.तेव्हा नागरीक म्हणून पञकाराने कोणी कोणाची बाजू घ्यवी वा कोणाचे समर्थन करावे हा व्यक्तीगत प्रश्न आहे.त्याबाबत आक्षेप घेण्याचा कोणालाही अधिकार नाही.यापुढे अशाप्रकारची टिका प्रेस क्लबचे पञकार सहन करणार नाहित,याची दखल घ्यावी. याविषयी अनेक पत्रकार संघटनांनी जाहीर निषेध करत वरिष्ठ अधिकारी यांना भेट घेणार असल्याची माहिती देखील दिली आहे कोणीही पत्रकारावर राजकीय ताबा आणू नये पत्रकारांना त्यांचे काम करून द्यावे या पद्धतीचे लवकरच निवेदन संबंधित प्रशासनाकडे माहिती मिळत आहे यावेळी भास्कर खंडागळे(अध्यक्ष), सुहास शेलार(उपाध्यक्ष),रणजित श्रीरामपूर (सचिव),सुनिल मुथा(कोषाध्यक्ष ),विष्णुपंत डावरे(सहसचिव),सदस्यःअशोक गाडेकर,ज्ञानेश्वर गव्हले,देवीदास देसाई,नवनाथ कुताळ,सुनिल नवले,दिपक क्षञिय,दिलिप दायमा,गणेश साळुंके,शरद पुजारी,आतिष देसर्डा








