११ मतांनी पराभव, पण राजकीय भूकंप; सामान्य माणसाची लढाई हिरो ठरली

सत्ता, पैसा आणि संपूर्ण यंत्रणा विरोधात असतानाही केवळ ११ मतांच्या फरकाने झालेला पराभव हा साधा निकाल राहिलेला नाही, तर तो संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. समोर दोन वेळा आमदार राहिलेले, साखर सम्राट म्हणून ओळखले जाणारे वजनदार नेते होते. त्यांनी सगळी ताकद पणाला लावली, तरीही विरोधकाला संपवू शकले नाहीत, हेच या निकालाचे मोठे वास्तव आहे.

“मी ११ मतांनी हरलो आहे, पण भीतीने नाही, झुकून नाही, विकून नाही,” अशा ठाम शब्दांत उमेदवाराने आपली भूमिका मांडली. हा निकाल एकच गोष्ट स्पष्ट करतो — जुन्या राजकारणाची मक्तेदारी आता हादरली आहे. लोकांचा आवाज दबवता येत नाही, उलट तो अधिक बुलंद होत चालला आहे.

पराभव जरी स्वीकारावा लागला असला, तरी गावागावात एकच चर्चा — ‘११ मतांची हळहळ’ सुरू आहे. सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या या उमेदवाराने थेट कारखानदारी आणि प्रस्थापित सत्तेला टक्कर दिली. पराभव असूनही जनतेच्या नजरेत ते ‘हिरो’ ठरले आहेत. “आज हरलो असेन, पण उद्याच्या लढाईसाठी अधिक ठाम, अधिक आक्रमक आणि अधिक सज्ज आहे,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

या निकालानंतर स्वीकृत नगरसेवक पदाच्या न्याय्य हक्काचा प्रश्नही चर्चेत आला आहे. “हा न्याय कोण देणार?” असा सवाल उपस्थित होत असून, विखे साहेब न्याय देतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकूणच, हा पराभव नसून तो सामान्य माणसाच्या संघर्षाचा विजय मानला जात आहे. ही लढाई इथे थांबत नाही, तर खऱ्या अर्थाने आता सुरू झाली आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget