Latest Post

बेलापूर (प्रतिनिधी )-बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन स्त्रावक संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय यांच्या सहकार्याने बेलापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले या शिबिराचा जवळपास 90 शिबीरार्थींनी लाभ घेतला बेलापूर येथील जैन स्थानकात बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशन व जैन श्रावक  संघ बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर यांच्या सौजन्याने मोफत नेत्र रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराचा जवळपास 90 लाभार्थ्यांनी लाभ घेतला यात डोळे तपासणी मोतीबिंदू तपासणी तसेच डोळ्यांच्या सर्व आजाराची  तपासणी करण्यात आली. तसेच ज्यांना नंबरच्या चष्म्याची आवश्यकता होती अशा व्यक्तींना अल्पदरात चष्म्याचे वाटपही करण्यात आले. यावेळी आनंद ऋषीजी नेत्रालय अहिल्यानगर येथील प्रशासकीय अधिकारी आनंद छाजेड, नेत्र चिकित्सक परमेश्वर मोटे, तसेच आनंद ऋषीजी नेत्रलयाचे जनसंपर्क अधिकारी सागर देवकर उपस्थित होते या शिबिरास जि प सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई यांनी शिबीरास भेट दिली. शिबिर यशस्वी करण्यासाठी बेलापूर किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष व जैन श्रावक संघाचे कार्याध्यक्ष शांतीलाल हिरण, जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष विजय कटारिया, अमित लुंक्कड,  संदीप देसर्डा, योगेश कोठारी, सचिन कोठारी, विकी मुथा, दिलीप बाठीया, स्वप्निल बोरा आदींनी शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

बेलापूर ( प्रतिनिधी)-एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर येथील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी चिरंजीव साईश रामेश्वर ढोकणे याने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय स्पर्धा परीक्षेत उज्ज्वल यश संपन्न केले असून त्यांनी केलेल्या यशाबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे.                             चिरंजीव साईश ढोकणे एस के सोमय्या प्राथमिक विद्यामंदिर श्रीरामपूर या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत आहे.त्याने आय एम विनर या परीक्षेत दोनशे पैकी 180 गुण मिळवून राज्यात पाचवा जिल्ह्यात दुसरा व तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळवला. त्याचबरोबर बीटीएस परीक्षेत राज्यामध्ये सहावा जिल्ह्यातील तिसरा तर तालुक्यात पहिला येण्याचा बहुमान मिळविला तसेच एन एस सी परीक्षेत राज्यात सातवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच मंथन या परीक्षेत राज्यांमध्ये नववा जिल्ह्यात चौथा व तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला तसेच ऑलिंपियाड या परीक्षेत राज्यात नववा जिल्ह्यात सहावा क्रमांक व तालुक्यात प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळविला तसेच लक्षवेध परीक्षेत राज्यांमध्ये तेरावा जिल्ह्यात आठवा येण्याचा बहुमान मिळवला तसेच महात्मा फुले जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये जिल्ह्यात तिसरा क्रमांक मिळविला. या सर्व स्पर्धेमध्ये चिरंजीव साईश यांने कमी वयात हा बहुमान मिळवला आहे. त्याला रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनाली पैठणी मॅडम व त्याला मार्गदर्शन करणाऱ्या वर्ग शिक्षिका श्रीमती मेघा पवार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले साईश ढोकणे हा श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल रामेश्वर ढोकणे यांचे चिरंजीव आहेत



निधन वार्ता.. नरसाळी बेलापूर खुर्द येथील शेतकरी मुरलीधर लक्ष्मण शेलार यांचे दीर्घ आजाराने नुकतेच निधन झाले ते 78 वर्षाचे होते . सर्व समाजातून नातेवाईकात ते नाना म्हणून प्रसिद्ध होते सर्वांच्या सुखदुःखामध्ये अडचणीमध्ये ते सहभागी होत. मोठा कष्टाने त्यांनी परिवार सांभाळून मुलांना स्वतःच्या पायावर उभे केले.अशोक शेलार व रवींद्र शेलार यांचे ते वडील . अशोक शेलार विद्यापीठात कर्मचारी तर रवींद्र शेलार कार्पोरेट मध्ये अधिकारी आहेत तर  बाबासाहेब शेलार यांचे चुलत बंधू होते. त्यांची पाठीमागे पत्नी कौशाबाई दोन मुले दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे..

येवला,एसएनडी मैदान – येथील एसएनडी मैदानावर पार पडलेल्या रोमहर्षक सामन्यात नंदुरबारने श्री शारदा संघावर ३ गड्यांनी विजय मिळवला.


कमी धावसंख्येच्या या सामन्यात श्री शारदा संघाला केवळ ७५ धावांत गुंडाळण्यात नंदुरबारच्या शिस्तबद्ध गोलंदाजीने यश मिळवले. जय शिंदे आणि सैराम शेलके हे दोनच फलंदाज दहाच्या पुढे धावा करू शकले, त्यांनी प्रत्येकी १८ धावा केल्या.


नंदुरबारकडून दुर्व तपस्वीने भेदक गोलंदाजी करत ३ महत्त्वाचे बळी घेतले. त्याला हंसराज आणि तनयने प्रत्येकी २ बळी घेऊन उत्तम साथ दिली आणि शारदा संघाचा डाव लवकर संपवला.


७६ धावांचे सोपे लक्ष्य गाठताना नंदुरबारच्या संघाची सुरुवात खराब झाली आणि त्यांनी लवकरच गडी गमावले, मात्र संयम राखत त्यांनी फक्त ८ षटकांत ७ गडी गमावून विजय मिळवला.


इशी गावितने नाबाद २५ धावा करत विजयात मोलाची भूमिका बजावली, तर जॉननेही २१ धावांची उपयुक्त खेळी केली. श्री शारदाकडून विहान कसलीवालने जबरदस्त गोलंदाजी करत ४ बळी घेतले, तर विराट घेगडमलनेही ३ बळी घेतले आणि पुनरागमनाची आशा निर्माण केली होती.

बेलापूर( प्रतिनिधी)- बेलापूर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनाच्या काचांना गडद काळा रंगाच्या फिल्म लावून बेकायदेशीर रित्या फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करुन त्यांच्याकडून जवळपास सात हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की  बेलापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये किरकोळ  चोऱ्यांचे प्रमाण  वाढले  होते. तसेच अपघाताचेही प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर  श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी  परिसरात विना नंबर प्लेट तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावून फिरणाऱ्या दुचाकी व चार चाकी वाहन तसेच चार चाकी वाहनांच्या काचांना गडद काळा रंगाचे फिल्म लावून बेकायदेशीर  फिरणाऱ्या वाहनावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बेलापूर पोलिसांनी दिवसभर ही मोहीम राबवली. त्यामध्ये अनेक दुचाकी या विना नंबरच्या तसेच फॅन्सी नंबर असलेल्या आढळून आल्या त्या गाड्यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली.  त्यात 19  दुचाकी विना नंबर तसेच फॅन्सी नंबरच्या दुचाकी आढळून आल्या एका मोटरसायकलवर तर चक्क नंबर प्लेटच्या जागी नंबर न टाकता सरपंच लिहिलेले होते  या पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख याच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव  त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सुधीर हापसे ,  पोहेकॉ सचिन गायकवाड,पोकॉ संपत बडे, भारत तमनर, नंदकिशोर लोखंडे, रविंद्र अभंग, पंकज सानप ,महेश थोरात आदिंची ही कारवाई केली. पकडलेली गाडी सोडविण्याकरता अनेकांनी आपल्या मित्रांना पुढार्यांना फोन लावले परंतु कारवाई का केली हे सांगताच त्यांनीही फोनवर  तुमच्या पद्धतीने काय असेल ते करा असा सल्ला पोलिसांना दिला.

बेलापूर (प्रतिनिधी)-सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर गावातील शासकीय कार्यालय तसेच मंदिर, मज्जिद, चर्च या ठिकाणी नागरिकांना व भाविकांना बसण्यासाठी म्हणून 20 बाकडे भेट देण्यात आले आहे.बाकडे लोकार्पणाची सुरुवात स्वामी समर्थ केंद्रा पासून करण्यात आली.सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपच्या वतीने बेलापूर बुद्रुक बेलापूर खुर्द तलाठी कार्यालय येथे येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता बाकडे भेट देण्यात आले. त्याचबरोबर बेलापूर गावातील मंदिर ,मज्जिद व चर्च याही ठिकाणी बाकडे भेट देण्यात आले. या वीस बाकड्यांची अंदाजीत किंमत 50 हजाराच्या आसपास असून या बाकड्यांचा लोकार्पण सोहळा काल श्री स्वामी समर्थ मंदिर कुर्हे वस्ती बेलापूर येथे संपन्न झाला. यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राचे सेवेकरी विठ्ठल गाडे मामा व अन्य सेवकर्यांच्या  तसेच सत्यमेव जयते ग्रुपच्या सर्व सदस्यांचे उपस्थितीत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांना चार बाकडे भेट देण्यात आले. यावेळी बोलताना सेवेकरी विठ्ठल गाडे मामा म्हणाले की सत्यमेव जयते ग्रुपने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात येणाऱ्या वयोवृद्ध भाविकांसाठी बाकड्यांची व्यवस्था केली त्यांनी सर्व धर्म समभाव लक्षात घेऊन मज्जिद असेल चर्च असेल त्याचबरोबर तलाठी कार्यालय याही ठिकाणी बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यावे तितके थोडे आहे. यावेळी सत्यमेव जयते ग्रुपच्या वतीने विष्णुपंत डावरे अभिषेक खंडागळे देविदास देसाई आदींनी मनोगत व्यक्त केले.या वेळी सत्यमेव जयते सुप्रभात ग्रुपचे राधेश्याम अंबिलवादे,सचिन वाघ, बाबासाहेब काळे,दिलीप अमोलीक,दिपकसा क्षत्रिय सचिन कणसे,विलास नागले, विशाल आंबेकर,भगीरथ मुंडलिक, नंदकिशोर दायमा,बाबुलाल पठाण, जाकीर शेख,औदुंबर राऊत,गोपी दाणी, महेश कुऱ्हे, संजय भोंडगे,महेश ओहोळ आदिंसह नागरिक उपस्थित होते.

बेलापूर (प्रतिनिधी )-महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्या वतीने आळंदी येथे पाच दिवसीय वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सव परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत गुरुकुलातील व बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव बटुक महेश दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका पटकाविली.                       दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान पुणे यांच्यावतीने आळंदी येथे वेदोत्सव 2025 संपन्न झाला या वेदोत्सवात महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानच्या सर्व 40 विद्यालयांमधून तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पाच दिवस चालल्येल्या या स्पर्धेमध्ये सूर्यनमस्कार स्पर्धा, निबंध स्पर्धा, विविध गुणदर्शन स्पर्धा, वकृत्व स्पर्धा ,संपूर्ण शुक्ल यजुर्वेद मध्यादिन संहिता या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या सर्व परीक्षेत दधीमती वैदिक गुरुकुल गोठमांगलोत या गुरुकुलातील बटुक महेश दिलीप दायमा यांनी प्रथम क्रमांक मिळविला त्याला त्याबद्दल सुवर्णमुद्रिका तसेच चांदीचे पंचपात्र सेट देऊन त्याचा सन्मान  प्रभू श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आला.  तसेच दधिमती गुरुकुलचे गुरुजी आचार्य वेदमूर्ती श्री कमलकिशोर जोशी याचाही सन्मान या वेळी करण्यात आला. महेश दायमा हे बेलापूर येथील पत्रकार दिलीप दायमा यांचे चिरंजीव आहेत. यावेळी प्रधानाचार्य कमल किशोर जोशी यांचाही मंहत गोविंद देवगीरीजी महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावर्षीच्या प्रथम क्रमांकाच्या सन्मानाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या महेश दिलीप दायमा यांने  प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णमुद्रिका मिळवली ते महेश दायमा हे बेलापूरचे आहेत तसेच त्यांचा सत्कार करणारे श्रीराम मंदिराचे कोषाध्यक्ष महंत गोविंद देवगिरी जी महाराज यांची जन्मभूमी देखील बेलापूर आहे.महेश दायमा याने राजस्थान येथील दधिमती वैदिक गुरुकुलात वैदिक शिक्षण घेण्याकरता प्रवेश घेतला होता .आज पाच वर्षे झाली त्या संस्थेत वैदिक ,धार्मिक, वेदशास्त्राचे शिक्षण घेत असताना प्रत्येक वर्षी प्रथम येण्याचा मान महेश ने मिळवला आहे . त्याला असलेली आवड व रुची लक्षात घेऊन गुरुकुलाच्या प्रमुखांनी त्याची पुढील शिक्षणासाठी वाराणसी येथे निवड केली होती . महंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी महेश दायमा यांचा सन्मान करतांना त्याची आस्थेने चौकशी करून पुढील वाटचालीस भरभरून शुभाशीर्वाद दिलेत .महेश दायमा यास दधिमती वैदिक गुरुकुल संस्थेचे अध्यक्ष सोहनलाल दायमा ,सचिव हरिनारायण व्यास ,कोषाध्यक्ष जय किशन संचालक समिती अध्यक्ष भालचंद्र व्यास, सहसचिव रूपनारायण असोपा, अध्यापक कमल किशोर जोशी तसेच सुभाष मिश्रा आदींचे मार्गदर्शन लाभले

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget