Latest Post

लखनौ (गौरव डेंगळे):SGFI ने ही पद्धत लागू केली कारण अनेक वेळा खेळाडूंना शाळा संपल्यानंतर किंवा इतर कारणांमुळे खेळात सातत्य ठेवता येत नाही,पण त्यांनी पूर्वी दिलेला परफॉर्मन्स महत्त्वाचा असतो.त्यामुळे मागील दोन वर्षांतील अधिकृत सहभागाचे सर्टिफिकेट खेळाडूच्या पात्रतेसाठी ग्राह्य धरले जाते.

स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाने डिजीलॉकर इंटिग्रेशनसह डिजिटल परिवर्तन स्वीकारले आहे.लखनौ क्रीडा प्रशासनातील डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा उपक्रम म्हणून,भारत सरकारच्या युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या निर्देशानुसार, भारतीय स्कूल गेम्स फेडरेशन (SGFI) ने त्यांची सर्व क्रीडा प्रमाणपत्रे डीजीलॉकर सह यशस्वीरित्या एकत्रित केली आहेत.यासह,संपूर्ण भारतातील तरुण खेळाडूंसाठी अखंड आणि सुरक्षित प्रवेश सुनिश्चित करून, डीजी लॉकर द्वारे प्रमाणपत्रांचे पूर्ण-प्रमाणात डिजिटल वितरण कार्यान्वित करणारी SGFI ही पहिली राष्ट्रीय महासंघ बनली आहे.

यावेळी डॉ. मनसुख मांडविया केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, यांनी SGFI च्या उपक्रमाचे कौतुक केले,ते म्हणाल की डिजिलॉकरद्वारे क्रीडा प्रमाणपत्रांचे डिजिटायझेशन हे क्रीडा प्रशासनातील एक क्रांतिकारी पाऊल आहे.यामुळे आमच्या युवा खेळाडूंना सक्षम बनवेल आणि प्रणाली अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक होईल."

रक्षा खडसे,युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री, म्हणाल्या की या डिजिटल परिवर्तनाचा भारतातील लाखो तरुण खेळाडूंना फायदा होईल. आमच्या भावी चॅम्पियन्सना समर्थन देणारी आणि त्यांचे पालनपोषण करणारी एक मजबूत डिजिटल स्पोर्ट्स इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

तंत्रज्ञान हे आता केवळ सक्षम करणारे नाही, तर ते विकासाचा आधार आहे. आम्ही एक तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली तयार करत आहोत जी प्रामाणिक आणि पारदर्शक आहे.मंत्रालयाद्वारे मान्यताप्राप्त सर्वात मोठ्या राष्ट्रीय क्रीडा महासंघांपैकी एक असलेल्या SGFL ने या डिजिटल परिवर्तनाची अंमलबजावणी करण्यासाठी एक अग्रगण्य पाऊल उचलले आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने,आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की भारतीय शालेय खेळ महासंघाने डिजीलॉकर प्रणालीवर आधीच अपलोड केले आहे.

68 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2024-25): 59,637 प्रमाणपत्रे 67 व्या राष्ट्रीय शालेय खेळ (2023-24): 60,385 प्रमाणपत्रे


हे डिजीलॉकर प्लॅटफॉर्मवर प्रकाशित 1,20,000 हून अधिक प्रमाणपत्रे (सहभाग आणि गुणवत्ता) एकत्रित उपलब्ध आहे.आम्हाला विश्वास आहे की दोन पूर्ण वर्षांचा डेटा कव्हर करणारी एवढ्या मोठ्या प्रमाणातील प्रमाणपत्रांचे योगदान देणारे आम्ही पहिले राष्ट्रीय क्रीडा महासंघ असणार आहे असे माहिती माननीय श्री दीपक कुमार (SGFI चे JAS अध्यक्ष) तसेच SGFI च्या सन्माननीय कार्यकारी समिती सदस्यांसह,हा उपक्रम प्रत्यक्षात अमलात आणण्याचा मोलाचा वाटा आहे.

68 व्या राष्ट्रीय चॅम्पियनशिप (2024-2025) आणि 67 व्या राष्ट्रीय स्पर्धेतील (2023-24) सर्व प्रमाणपत्रे आता उपलब्ध आहेत.

गौरव डेंगळे/श्रीरामपूर:खेलो इंडिया युथ गेम्सच्या ७ व्या आवृत्तीत कबड्डीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पढेगावकर वीरेंद्र मुंडलिकची निवड झाली आहे. ४ मे ते १५ मे २०२५ दरम्यान बिहारमध्ये या प्रतिष्ठित क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले जाईल.

पुण्यातील बालेवाडी स्टेडियमवर झालेल्या राज्य चाचण्यांमध्ये वीरेंद्रने अपवादात्मक कौशल्ये दाखवली,ज्यामुळे त्याला राज्य संघात स्थान मिळाले.त्याला राष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक, NSNIS कोच महेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले आहे,ज्यांच्या मार्गदर्शनाने वीरेंद्रच्या निवडीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

वीरेंद्र हा यशवंत विद्यालय पढेगावचा विद्यार्थी आहे.

या तरुण खेळाडूचा संघात समावेश केल्याने त्याचे समर्पण आणि प्रतिभा अधोरेखित होते आणि तो आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जोरदार प्रभाव पाडेल अशी अपेक्षा आहे.राज्य संघात निवड झाल्याबद्दल श्रीरामपूर तालुका क्रीडा समितीचे अध्यक्ष शिरोळे सर, काका चौधरी,नितीन बलराज, संभाजी ढेरे,अजित कदम तसेच तालुक्यातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर प्रतिनिधी श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील बाबासाहेब बाळाजी आठरे राहणार फत्याबाद  यांच्या घरी दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री दरोड्याचा प्रयत्न झाला यावेळी त्यांची सून हर्षदा हीने आरडाओरडा केल्यामुळे चोरटे पळून गेले परंतु आपल्याला ओळखले असावे असा समज झाल्याने आज सायंकाळी हर्षदा तिच्यावर ऍसिड फेकण्याची घटना घडली असून  या प्रकारामुळे परिसरात घबराट पसरली आहे.                  याबाबत सविस्तर वृत्त असे की फत्याबाद येथील  बाबासाहेब आठरे हे दिनांक रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री जेवण करून झोपले असता पहाटेच्या वेळेस तिन ईसम त्यांच्या घरात घुसले व त्यांनी सर्वांच्या तोंडावर स्प्रे मारला त्यावेळी त्यांची सुनबाई हर्षदा ही बाथरूमला गेलेली होती त्यादरम्यान चोरट्याने सर्व उचका पाचक केली काही दागिन्याचे गाठोडे बांधले व रोख रक्कम सोबत घेतली नेमकी त्याच वेळेस हर्षदा आठरे ही बाथरूम मधून बाहेर आली व घरात उचकापाचक करत असलेले पाहून जोरात आरडाओरड केली त्यावेळी शेजारीच असलेले आठरे यांचे पुतणे गणेश आठरे सुभाष आठरे चेतन आठरे हे धावत आले हे पाहून चोरट्याने सोन्याचे दागिने असलेले गाठोडे वरून खाली फेकले व दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारल्या व नागरिक येत असल्यामुळे ते आपला जीव वाचून पळाले परंतु त्यांना वाटले की या महिलेने आपल्याला ओळखलेले आहे त्यामुळे दोन दिवसापासून या महिलेच्या मार्गावर ते चोरटे होते कालही त्या महिलेला वीट फेकून मारली होती परंतु ती थोडक्यात बचावली आज बाबासाहेब आठरे यांची सून हर्षदा आठरे ही मुलीला घेऊन फत्याबाद येथे दवाखान्यात आली होती सोबत बाबासाहेब आठरे यांची पुतणी ही देखील होती दवाखान्यातून परत जात असताना दोन इसम मोटरसायकलवर आले व त्यांनी स्कुटीवर चाललेल्या या दोन महिलेच्या अंगावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला त्यात हर्षदा तिची पाठ भाजली व बाबासाहेबांचे पुतणीच्या छातीला भाजलेले आहे त्यांना तातडीने प्रवरणागर येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले हा हल्ला केवळ आपल्याला ओळखले आहे या गैरसमजुतीतुन झालेला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे

बेलापूर/(प्रतिनिधी)--तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाच्या बेलापूर बुll ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पा. व माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.यांचे नेतृत्वाखालील  तसेच जि.परिषद सदस्य शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांचे मार्गदर्शनाखालील गावकरी मंडळाच्या मिनाताई अरविंद साळवी यांची बिनविरोध निवड झाली.                                                                           माजी सरपंच स्वाती अमोलिक यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी निवडणुक अधिकारी व्हि.एस.गवारी (मंडलाधिकारी)यांचे अध्यक्षतेखाली,तलाठी व्हि.एच.खेमनर व ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांचे उपस्थितीत ग्रामपंचायत सदस्यांची बैठक संपन्न झाली.सरपंच पदासाठी गावकरी मंडळाच्या मिनाताई साळवी यांचा एकमेव अर्ज आला.विरोधी सुधीर नवले,रविन्द्र खटोड व भरत साळुंके यांचे नेतृत्वाखालील  जनता विकास आघाडीने निवडणुकीतून माघार घेतली.बैठकीस गावकरी मंडळाच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंंच प्रियंका  कु-हे, सदस्य अभिषेक खंडागळे, मुश्ताक शेख,तबसुम बागवान,चंद्रकांत नवले,वैभव कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार उपस्थित होते.तर  जनता विकास आघाडीचे सदस्य या बैठकीस अनुपस्थित राहिले.त्यामुळे मिनाताई साळवी यांच्या बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले.                                                                                  निवडीनंतर झालेल्या आभार सभेत जि.परिषद सदस्य शरद नवले म्हणाले की,गावकरी मंडळाने सरपंच पदाबाबत जो शब्द दिला आहे तो पाळला आहे.यापुढील काळात प्रवरा घाट विकास पर्यटन केन्द्र,गाव अंतर्गत रस्ते,सेंन्द्रिय खत प्रकल्प,बाराशे घरकुलांचे संकुल,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केन्द्र आदी प्रश्न मार्गी लावायचे आहेत.आजच्या बिनविरोध निवडीने विरोधकांचे मनसुबे उधळले गेले आहेत.गावकरी मंडळात फूट पडावी यासाठी देव पाण्यात बुडवून बसलेल्या विरोधकांना गावकरी मंडळाने ऐक्यातून चपराक दिल्याचे श्री.नवले म्हणाले.                                                           बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की विरोधकांनी बेताल आरोप केले त्याला आम्ही कामातून उत्तर दिले.विरोधकांच्या वीस वर्षात झाली नाहित इतकी विकास कामे गावकरी मंडळाने चार वर्षात करुन दाखविली.१२६ कोटीची ऐतिहासिक पाणीपुरवठा योजना,भुयारी गटारे,साठवण तलाव,घरकुल,क्रिडा संकुल,सर्वधर्मिय स्मशानभुमी,सेंद्रिय खत प्रकल्पासाठी ४३ एकर मोफत जमिन आदि  ठळक कामे झालित. या वाटचालीत पालकमंञी नाम.राधाकृष्ण विखे पा.माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे बहुमुल्य सहकार्य लाभल्याबद्दल खंडागळे यांनी धन्यवाद व्यक्त केले.या प्रसंगी गावकरी मंडळाचे मार्गदर्शक, पदाधिकारी,नागरिक बंधू- भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्रीरामपूर - येथील ह्जरत सैलानी बाबा दरबार यांचा ६६ व्या उर्स शरीफ निमित्त संदल मिरवणूक काढण्यात आली. 15 एप्रिल रोजी संपन्न झालेल्या या संदल निमित्त चादरीची मिरवणूक सैलानी बाबा दर्गाह पासून सायंकाळी निघाली. गिरमे चौक, शहीद भगतसिंग चौक, मेन रोड, महात्मा गांधी पुतळा, शिवाजी चौक, शिवाजी रोड मार्गे पुन्हा सैलानी बाबा दर्गा येथे येऊन फातेहा ख्वानी नंतर सुंदरची चादर बाबांच्या मजारीवर अर्पण करण्यात आली.
 १६ तारखेला सकाळी 11 ते पाच वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
याचवेळी यावर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले होते.

हजरत सैलानी बाबा बहुद्देशीय संस्था व नित्यसेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर पार पडले. या शिबीराचे उद्घाटन आमदार हेमंत तात्या ओगले तसेच माजी उपनगराध्यक्ष करण दादा ससाणे यांच्या हस्ते करण्यात आले.या रक्तदान शिबिरात हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी कलीम बिनसाद व अबूबकर बिनसाद यांच्यापासून सुरुवात करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अस्लम दिनसाद यांचेसह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी रक्तदान करून जनतेत सामाजिक कार्याचा एक अनोखा उपक्रम आपल्यापासूनच सुरू करायला हवा असा संदेश दिला. राज्यात अनेक ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद पाहायला मिळत असतांना या ठिकाणी मात्र हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक हजरत सैलानी बाबा दरबार बहुउद्देशीय संस्था पदाधिकारी सदस्य यांच्या माध्यमातून सर्व धर्मीय लोकांनी रक्तदान करून 
हजरत सैलानी बाबा बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून एकतेचा  संदेश दिला.यावेळी सर्व पदाधिकारी,सदस्य व येणाऱ्या भाविक भक्तांनी रक्तदान करून कार्यक्रम यशस्वी करण्यास सहकार्य केले.

श्रीरामपूर (गौरव डेंगळे): येथील श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श  होलिस्टिक स्पाइन केयर  व  पंचगव्य सेंटर यांच्यावतीने श्री कोरेश्वर गोसंवर्धनचे प्रख्यात नाडी परीक्षण तज्ञ ओमकारदेव अशोकदेव मुळे गुरुजी हे आपल्या श्रीरामपूरच्या शाखेत बुधवार दिनांक १६ एप्रिल रोजी नाडी परीक्षण घेणार आहे.

नाडी परिक्षण करून रक्तदाब कैन्सर, स्त्रियांचे विकार, संधिवात, जुनाट आजार, सनायुचे आजार,लहान बालकांचे आजार,हृदय विकार,युरिन इफेक्शन,पित्त विकार, किडनी विकार,कफ विकार,दमा इत्यादी आजारांवर वर मार्गदर्शन व उपचार करणार आहे. आता पर्यंत हजारो रुग्णना नाडी परीक्षण करून पंच्यागव्य औषधेनि गुरूजीनि हजारो रुग्णना बरे केले आहे.

तरी जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री कोरेश्वर गोसंवर्धनस स्पर्श स्पाइन होलिस्टिक  स्पाइन केयर व पंचगव्य सेंटर यांच्यावतीने करण्यात येत आहे.

शिबिराच्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी या नंबर वर संपर्क साधा - 7003497003

बेलापूर (प्रतिनिधी)- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बेलापूर बु ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय फर्निचर कामाचा लोकार्पण सोहळा बेलापूर पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नंदकिशोर लोखंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. बेलापूर ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगातून अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करून या वाचनालयाच्या फर्निचरचे काम करण्यात आले असून बेलापूर ग्रामपंचायतच्या या वाचनालयात जवळपास १९००० इतके ग्रंथ विविध पुस्तके उपलब्ध आहेत.ही पुस्तकांची मांडणी करण्या करता या आधीच्या काळात व्यवस्था नव्हती.ग्रामस्थांना विशेष करून तरुण पिढीला या वाचनालयाचा फार उपयोग होत आहे हे लक्षात घेऊन गावकरी मंडळाचे नेते शरद नवले व बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कुऱ्हे व सर्व सदस्य तसेच ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जुन्या व दुर्मिळ पुस्तकाचे जतन व्हावे हा दृष्टिकोन लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या फर्निचर चे नूतनीकरण केले. ग्रंथालयाचे कामकाज ग्रंथापाल सौ.उज्वला साळुंके हे पाहत आहेत.ग्रंथालय कामाचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच स्वाती अमोलिक, उपसरपंच प्रियंका कुऱ्हे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,तबसूम बागवान,ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे, प्रफुल्ल डावरे, पुरुषोत्तम भराटे, भाऊसाहेब कुताळ,हाजी इस्माईल शेख,संजय भोंडगे,अँड. अरविंद साळवी,सुभाष अमोलिक,भास्कर बंगाळ,प्रभात कुऱ्हे,बाबुराव पवार,भास्कर खंडागळे,देविदास देसाई, विष्णुपंत डावरे, दिलीप दायमा, सुहास शेलार,बाबुलाल पठाण,भाऊसाहेब तेलोरे,जाकीर हसन शेख,सागर खरात,गणेश बंगाळ,सुधीर तेलोरे,प्रविण बाठीया,दादासाहेब कुताळ,नवनाथ धनवटे, विशाल आंबेकर,महेश कुऱ्हे,जीना शेख, शशिकांत तेलोरे,विशाल शेलार,बंटी शेलार, पोपट पवार, विनायक जगताप,अमित तेलोरे,दत्तू निकम आदी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget