Latest Post

गौरव डेंगळे/नवी दिल्ली/१७/१/२०२५ भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला.यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात १०० गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला.पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही.त्यामुळे पहिल्या डावात भारताने ५०-० अशी आघाडी मिळवली होती.ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं.पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी ६ ड्रिम पॉईंट्स दिले.तर अटॅक करताना फक्त ८ गुण मिळवले.म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त २ गुण होते.तर भारताकडे ४८ गुणांची आघाडी होती.तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला.एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते.त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे १०६ गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता. कारण ९८ धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून ९८ धावांचा फरक कमी करणं कठीण होतं.त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला.भारताने हा सामना १०९-१६ गुणांनी जिंकला.


उपांत्यपूर्व फेरीचे निकाल:

पहिला उपांत्यपूर्व सामना: युगांडाचा न्यूझीलंडवर ७१-२६ ने विजय. 

दुसरा उपांत्यपूर्व सामना: दक्षिण आफ्रिकेचा केनियावर ५१-४६ ने विजय. 

तिसरा उपांत्यपूर्व सामना: नेपाळचा इराणवर १०३-०८ ने विजय. 

चौथा उपांत्यपूर्व सामना: भारताचा बांगलादेशवर १०९-१६ ने विजय.

बेलापूरःबेलापूर बु ग्रामंचायतीच्या उपसरपंच पदावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील तसेच जि.प.सदस्य शरद नवले व कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांच्या नेतृत्वाखालील गावकरी मंडळाच्या सौ.प्रियंका प्रभात(केशव) कु-हे यांची बिनविरोध निवड झाली.                                  उपसरपंच पदासाठी सरपंच स्वाती अमोलिक यांचे अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक संपन्न झाली.बैठकीस मावळत्या उपसरपंच तबसुम बागवान ,अभिषेक खंडागळे,मुश्ताक शेख,चंद्रकांत नवले,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार, मीना साळवी, शिलाताई पोळ,वैभव कु-हे,भरत साळुंके,रमेश अमोलिक आदी सदस्य उपस्थित होते.निर्धारित वेळेत सौ.प्रियका कु-हे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची उपसरपंच पदावर बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामविकास अधिकारी निलेश लहारे यांनी जाहीर केले.    निवडीनंतर आभाराच्या सभेत शरद नवले,अभिषेक खंडागळे,जालिंदर कुऱ्हे,भास्करराव खंडागळे,विष्णुपंत डावरे, भाऊसाहेब कुताळ आदिंची भाषणे झाली.याप्रसंगी जालिंदर कु-हे,भाऊसाहेब कुताळ,प्रफुल्ल डावरे,बाळासाहेब दाणी,सुरेश बाबुराव कुऱ्हे,रावसाहेब अमोलिक,सचिन वाघ, रमेश काळे,भाऊसाहेब तेलोरे,अजिज शेख, जब्बार पठाण,अशोक कुऱ्हे,विष्णूपंत कुऱ्हे,शफिक बागवान,बाबुलाल पठाण,प्रशांत मुंडलिक, मास्तर हुडे, हेमंत मुथा,योगेश राकेचा,बाबुराव पवार,महेश कु-हे,विशाल आंबेकर,दादासाहेब कुताळ,रफिक शेख,शशिकांत तेलोरे, सुभाष शेलार,अशोक आंबिलवादे,बाळासाहेब शेलार,पञकार देविदास देसाई,दिलिप दायमा,सोमनाथ शिरसाठ,अभिषेक निर्मळ, नितीन खोसे, प्रकाश साळुंके, राम कुऱ्हे,कान्हा लगे,ग्रामस्थ तसेच यांचेसह गावकरी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बेलापूरःगावाच्या विकासासाठी मतभेद विसरुन सर्वांनी एकञ यावे.विरोधासाठी विरोध न करता विधायक कामाला पाठींबा तर चुकीची कामे होत असतील तर त्याला विरोध केला गेला पाहिजे असे मत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले यांनी व्यक्त केले.                              ---बेलापूर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या वतीने बेलापूर प्रेस क्लबच्या सदस्यांसह अन्य पञकारांचा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी श्री.नवले बोलत होते.यावेळी राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार मिळाल्याबद्दल नवनाथ कुताळ तसेच भास्कर खंडागळे ,रणजीत श्रीगोड,मारुतराव राशिनकर,सुनिल मुथा,विष्णुपंत डावरे,ज्ञानेश गव्हले,देविदास देसाई,सुनिल नवले,दिलिप दायमा,सुहास शेलार,शरद पुजारी,रुपेश सिकची,आतिष देसर्डा यांचेसह अभिजीत राका,गणेश साळुंके आदिंचा सत्कार करण्यात आला.                            ---याप्रसंगी पं.समितीचे माजी सभापती दत्ता कु-हे,भास्कर खंडागळे,सुनील मुथा,नवनाथ कुताळ,मारुतराव राशिनकर,ज्ञानेश्वर गव्हले,लहानुभाऊ नागले यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास पंडीतराव बोंबले,प्रकाश पा.नाईक,विश्वनाथ गवते,चंद्रकांत नाईक,तुकाराम मेहेञे, बाळासाहेब दुधाळ,कलेश सातभाई,सुधाकर खंडागळे,प्रकाश कु-हे ,बाळासाहेब लगे,बंटी शेलार,सुरेश कु-हे,शफिक आतार,संजय शेलार,रमेश अमोलिक ,अशोक प्रधान,अन्तोन अमोलिक,रमेश शेलार, आयजुभाई शेख,  आदि उपस्थित होते.

गौरव डेंगळे (नवी दिल्ली) १३/१/२०२५ खो खो विश्वचषक २०२५ मध्ये उद्घाटन सामना भारत विरुद्ध नेपाळ सामना नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियमवर पार पडला.खो खो वर्ल्डकप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताने विजयी सलामी दिली.भारताचा पहिलाच सामना नेपाळशी रंगला होता.या सामन्यात भारताने पहिल्या डावातच मोठी आघाडी घेतली होती.भारताला अटॅक करण्याची संधी मिळाली होती.भारताने पहिल्या डावात २४ गुण मिळवले.त्यानंतर दुसऱ्या डावात जेव्हा नेपाळ संघ अटॅक करण्यासाठी आला. तेव्हा भारताने जबरदस्त पद्धतीने झुंजवलं. नेपाळने आपल्या डावात २० जणांना बाद करण्यात यश मिळवलं. पण भारताने ४ गुणांची आघाडी घेतली होती. मात्र तिसऱ्या डावात बचावत्मक पवित्र्यात असलेल्या नेपाळने कमबॅक केलं. टीम इंडियाला फक्त १८ जणांना बाद करता आलं.तर नेपाळला चांगल्या डिफेंससाठी एक गुण मिळाला. तिसऱ्या डावानंतर भारताकडे २१ गुण होते. नेपाळला हा सामना जिंकायचा तर २२ जणांना बाद करणं आवश्यक होतं. पण चौथ्या डावात टीम इंडियाचे खेळाडू भारी पडले. दुसऱ्या बॅचने नेपाळला चांगलंच झुंजवलं. त्यामुळे एकीकडे वेळ कापरासारखा उडत होता. दुसरीकडे नेपाळचे खेळाडू एक एक खेळाडू बाद करण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर नेपाळला फक्त १६ गुण मिळता आले. एकूण भारताचे ४२ आणि नेपाळचे ३७ गुण होते.भारताने हा सामना पाच गुणांनी जिंकला.भारताच्या शिव पोथीर रेड्डी याला बेस्ट अटॅकिंगसाठी पुरस्कार देण्यात आला. तर नेपाळच्या रोहितकुमार वर्माला सर्वोत्तम डिफेंसाठी सामन्यानंतर गौरविण्यात आलं आहे. या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला आदित्य गणपुले याने.. त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. भारताचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे पाकिस्तान संघ भारतात पोहोचू शकला नाही. त्यामुळे भारताचा सामना नेपाळसोबत आयोजित केला गेला. अ गटात नेपाळ, पेरू, ब्राझील आणि भूतान भारतासोबत असून प्रत्येकी एक सामना खेळतील. उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित करण्यासाठी अव्वल दोन स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

कोपरगाव(गौरव डेंगळे)१३/१:सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल येथे "पद्मभूषण श्री करमसीभाई सोमैया" राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धेचे सहाव्या पर्वाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.प्रखर देशभक्त स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोमैया विद्याविहार संचलित,श्री शारदा इंग्लिश मिडियम स्कूल,कोपरगाव येथे दि ११ जानेवारी २०२५ रोजी राज्यस्तरीय इंग्रजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये निपून वक्तृत्वाचे गुण वाढीस लागावे त्यांच्यातील श्रवण क्षमतेचा विकास व्हावा,त्यांना आपले विचार मुद्देसूदपणे मांडण्याची कला अवगत व्हावी,त्यांच्यातील भाषण कौशल्य विकसित व्हावे व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.राज्यातील अहिल्यानगर,मालेगाव, संभाजीनगर,कोपरगाव,वैजापूर, श्रीरामपूर,राहता,लोणी,शिर्डी येथून २२ शाळेतील ४४ उत्कृष्ट विद्यार्थ्यांनी आपले वकृत्व सादर करून स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला.या इंग्रजी वकृत्व स्पर्धेचा प्रथम क्रमांक श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलने पटकावला.दानिश शेख व कनिका सावंत यांनी वकृत्व स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण केले.स्पर्धेचे उद्घाटन व बक्षीस वितरण माननीय सुहास गोडगे(अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती व गोदावरी बायोरिफायनरीज, साखरवाडी),कल्याणी व्यास,शाळेचे प्राचार्य के एल वाकचौरे, उपप्राचार्या सौ शुभांगी अमृतकर,पर्यवेक्षिका सौ प्रज्ञा पहाडे,सौ पल्लवी ससाणे,सौ नाथलीन फर्नांडिस आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून गणेश डांगे,नानासाहेब वाघ व नेहा पहाडे यांनी काम पाहिले.सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच पारितोषिक प्राप्त शाळेंना मानचिन्ह व बक्षीस रक्कम प्रदान करण्यात आली.यशस्वी विद्यार्थ्यांना इंग्रजी विभागाचे शिक्षक यास्मिन पठाण,मोनिका भांडगे,शिल्पा खांडेकर,तरणुम शेख,स्मिता परिमल,हेमा कडू,स्मिता लोखंडे, वैजंती कुटे,स्वप्निल पाटील,साईनाथ चाबुकस्वार,गणेश मलिक, विशाल आल्हाट व महेश मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.




👉 स्पर्धेचा अंतिम निकाल!

👉 *प्रथम क्रमांक* 

श्री.शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगाव ₹ १०,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *द्वितीय क्रमांक*

ऑक्झोलिअम कॉन्व्हेंट स्कूल अहिल्यानगर ₹ ७०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *तृतीय क्रमांक* 

प्रवरा गर्ल्स इंग्लिश मिडीयम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज लोणी ₹ ५,०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक*

संत विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल ₹ ३०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक*

संजीवनी सैनिकी स्कूल, कोपरगाव ₹ २,०००/-  सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ तृतीय पारितोषिक*

 न्यू एरा इंग्लिश मीडियम स्कूल, मालेगाव.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ चतुर्थ पारितोषिक*

अशोक आयडियल स्कूल श्रीरामपूर.

₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ पाचवे पारितोषिक*

श्री गणेश इंटरनॅशनल स्कूल, कोराळे ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

👉 *उत्तेजनार्थ सहावे पारितोषिक*

न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज,श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. 

👉 *उत्तेजनार्थ सातवे पारितोषिक*

न्याती समता इंटरनॅशनल स्कूल, श्रीरामपूर ₹ १०००/- सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र.

खंडाळा (गौरव डेंगळे): अहिल्यानगर येथील रेसिडेन्शिअल हायस्कूल येथे जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्यावतीने जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा आयोजन करण्यात आले होते.१४ तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविलेल्या १४ शाळांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. खंडाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने समूह गीत गायन स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला व श्रीरामपूर तालुक्यातून एकमेव शाळेने बक्षीस पटकावण्याचा मान मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांना रवींद्र पाटोळे,सुनील सिनारे,सुनील खरात,सुनील बिराडे तसेच शिक्षक वृंदांचे मार्गदर्शन लाभले.स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे

प्रवासाचे सहकार्य राधाकिसन बोरकर यांनी केले.तृतीय क्रमांक पटकावल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रमेश शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती,ग्रामपंचायत खंडाळा,तंटामुक्ती समिती तसेच सर्व पालक वृंदांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - नगरपालिका ही स्थानिक स्वराज्य संस्था असून ती एका कुटुंबासारखी आहे. कुटुंबप्रमुखाचे काम सतत सुरू असते. माझ्याकडे काही जादूची कांडी नाही,तरी पण जेवढे मला चांगलं करता येईल तेवढे चांगले करण्याचा मी प्रयत्न करीन.समस्या या न संपणाऱ्या असतात. त्या निर्माण होणारच आहेत,त्यात जेवढया मला सोडवता येतील तेवढे करण्याचा माझा प्रयत्न राहील.सर्व पत्रकारांनी या कामी आम्हाला सहकार्य करावे.पत्रकारांसाठी पत्रकार दिन हा फक्त कार्यक्रमाचे स्वरूप न राहता या निमित्ताने सर्व पत्रकारांचे संपूर्ण बॉडी चेकअप करून शुगर, बीपी, किडनी, कोलेस्ट्रॉल व इतर लिपींग प्रोफाइलची प्रत्येकाची तपासणी नगरपालिकेमार्फत आज आणि उद्या केली जाणार आहे. हा एक वेगळा प्रयत्न आहे. सर्वांशी सल्लामसलत करून भविष्यात आपल्या सहकार्याने नगरपालिकेचा कारभार करू. कामाच्या गडबडीत स्वतःच्या प्रकृतीकडे आपण दुर्लक्ष करतो पण आपण आपलाही विचार करावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.

येथील आगाशे सभागृहात काल नगर परिषदेतर्फे पत्रकार दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. त्यावेळी प्रास्ताविकपर भाषण करताना मुख्याधिकारी घोलप बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा हे होते.व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर,मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,संपादक करण नवले,ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपी यांची उपस्थिती होती.


प्रारंभ स्वीप कार्यक्रमांतर्गत नगरपालिकेने घेतलेल्या विविध स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभ उपस्थित पत्रकारांच्या हस्ते पार पडला.यामध्ये रांगोळी, चित्रकला व इतर स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

याप्रसंगी बोलताना ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी नगरपालिकेचे वसुली विभागाचे काम तत्पर असावे,त्यांचे खाते प्रमुख मागे कोपऱ्यात बसतात त्यामुळे पुढे काय चाललंय हे त्यांना कळत नाही.त्यांना पुढे बसवावे. पैसे स्विकारण्यासाठी खिडक्या वाढवाव्यात अशी सूचना केली.

संपादक करण नवले यांनी सण उत्सव काळात रस्त्यांचे सुयोग्य नियोजन करावे. अतिक्रमण विभागाला सूचना द्याव्यात. पालिकेच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांना आम्ही प्रसार माध्यमे म्हणून योग्य ती प्रसिद्धी देऊ असे सांगितले. 

पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सलीमखान पठाण यांनी नगरपालिकेच्या बांधकाम आणि आरोग्य विभागाला वारंवार सूचना कराव्या लागतात हे बरोबर नाही.या खात्याच्या कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आपली कर्तव्य पार पाडावी असे सांगून शहराचा विस्तार वाढत असल्याने शहराच्या वेगवेगळ्या भागात तीन ते चार अभ्यासिका असाव्यात. त्यामधून गोरगरिबांची मुले अभ्यास करून यशस्वी होतील.या बाबीकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे असे आवाहन केले.

जयेश सावंत यांनी पत्रकार भवनाचे काम पूर्ण करून ते ताब्यात मिळावे तसेच वसंतरावजी देशमुख यांच्या नावाची व्याख्यानमाला व पुरस्कार पुन्हा सुरू करावेअसे सांगितले. याप्रसंगी पत्रकार अनिल पांडे,रवी भागवत,महेश माळवे,नवनाथ कुताळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

उपस्थित सर्व पत्रकारांचा पालिकेतर्फे मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमानंतर सर्व पत्रकारांची बीपी,शुगर टेस्ट करण्यात आली. इतर तपासण्या आज पालिकेच्या सरकारी दवाखान्यात करण्यात येणार आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लोकमान्य टिळक वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे तसेच डॉ.सांगळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

मुख्याधिकारी घोलप यांनी पुढाकार घेऊन पत्रकार दिन साजरा करण्याची खंडित झालेली परंपरा पूर्ववत सुरू केल्याबद्दल दोन्ही पत्रकार संघाचे वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget