Latest Post

बेलापूर -- काही दिवसांपूर्वी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी विविध धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकर चा कर्ण  कर्कश्य  आवाज आणि  त्यांचा कायदेशीर वेळे व्यतिरिक्त होणारा वापर याविषयी पो. नि. हर्षवर्धन गवळी यांना निवेदन दिले होते. या संदर्भात पोलिसांनी संबंधितांना नोटीसाही दिल्या होत्या..

त्याच पार्श्वभूमीवर बेलापूर येथे एका लाऊड स्पीकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे नेमणूक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरून लाऊड स्पीकर चालक सोमनाथ साळुंके यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये आरोपीने कर्ण कर्कश्य  आवाजात लाऊड स्पीकर वाजवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, लाऊड स्पीकर चा आवाज आणि तो वाजवण्याची वेळ, याबाबतच्या आदेशाचे उल्लंघन केले आणि जनतेस पीडा उत्पन्न होईल असे वर्तन केले असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान रात्री दहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत लाऊड स्पीकर वाजविण्यास सर्वोच्च न्यायालयाची बंदी आहे. तसेच लाऊड स्पीकर चा आवाज किती डेसिबल पर्यंत असावा याचीही मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आहे. यासंदर्भात विविध धार्मिक स्थळांना नोटिसा देण्यात येऊन समज दिलेली आहे सदर कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील अशी माहिती बेलापूर औट पोस्टचे हवालदार अतुल लोटके यांनी दिली असुन अशा प्रकारे रात्रीच्या वेळेस मोठा आवाज लावुन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध करण्यात येणाऱ्या कारवाईत सातत्य ठेवावे अशी नागरीकाची मागणी आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्याला दिशा देण्यासाठी आता पत्रकारांनी पुढे येण्याची गरज आहे.माजी आमदार कै.जयंत ससाणे हे नेहमी पत्रकारांना आपले मित्र मानत होते. त्यांनी पत्रकार दिनी या शहरांमध्ये पत्रकारांच्या सत्काराची परंपरा सुरू केली. ही परंपरा करण ससाणे यांनी चालू ठेवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत श्रीरामपूरचा विकास आणि श्रीरामपूर जिल्हा कधी होणार या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली.

निमित्त होते अपूर्वा हाल येथे करण ससाणे मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभाचे.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्रीताई ससाणे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील बोलके, दत्तात्रय सानप, रमण मुथा,

ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, संपादक करण नवले,दिलीप नागरे, सुधीर नवले आदिंसह शहर व तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी आज श्रीरामपूरला कोणी वारस राहिलेला नाही. श्रीरामपूरच्या विकासासाठी कोणी पुढे येत नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. तोच धागा पकडून ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी पुढे कोणी यायचं असा प्रश्न उपस्थित करीत आता तुम्हीच नेतृत्व करा आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत असे त्यांना सांगितले.

श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून जी चळवळ ज्या वेगाने चालवायला पाहिजे ती सध्या मंदावल्यासारखी वाटते. शहरांमध्ये येणारे शासकीय अधिकारी सध्या आपल्या मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. चार दोन लोक जाऊन अधिकाऱ्याचा सत्कार करतात. त्यामुळे ते डोक्यावर बसतात. नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असल्याने तिथे काय चालले कुणालाच कळत नाही. शहरांमध्ये अतिक्रमणे वाढत आहेत. दिवसाढवळ्या मूळ जागा मालकांच्या जागेमध्ये अतिक्रमणे होत आहेत. गुन्हेगारी मध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर व तालुक्याचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी राजकीय पक्षाचे लोक कमी पडत आहेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, करण नवले, ज्ञानेश गवले, भाऊसाहेब काळे, नागेशभाई सावंत आदिंनी वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

 प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड यांनी शहरातील पत्रकार भवनाचा प्रश्न नजीकच्या काळात मार्गी लागणार आहे. खासदार राजीव शुक्ला यांच्या दहा लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवनाचे बरेचसे काम झाले आहे. उर्वरित काम आमदार लहूजी कानडे यांच्या निधीतून मार्च एंड पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी कै. जयंत ससाणे साहेब व पत्रकार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत पत्रकारांनी विरोधात बातमी छापली म्हणून ससाणे साहेब कधीही नाराज झाले नाहीत. उलट त्यांनी ती बातमी सकारात्मक दृष्टीने घेऊन मूळ प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शिर्डी संस्थानच्या माध्यमातून देखील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला. पत्रकारांनी केलेल्या बहुमोल सूचनांची ते दखल घेत असत तसेच शहर व तालुक्याच्या विकासासाठी नेहमी पत्रकारांशी चर्चा करीत होते. आज शहरांमध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार अनिल पांडे, महेश माळवे,गौरव साळुंके,शिवाजी पवार, सुनील नवले, प्रकाश कुलथे,सलीमखान पठाण,रणजीत श्रीगोड, बरकतअली शेख, भारतीताई परदेशी, रियाज पठाण, विठ्ठल गोराणे आदिंसह तालुक्यातील पत्रकार व ससाणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.



बेलापुर  (प्रतिनिधी  )-कोरोना काळातील अधिकचे मोफत धान्य शासनाने एक जानेवारी पासुन बंद केले असुन आता कार्डधारकांना वर्षभर माणशी पाचच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे मोफत धान्य वाटपामुळे आपला दैनंदिन खर्च कसा भागवावा अशा विवंचनेत स्वस्त धान्य दुकानदार सापडले आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना काळात केद्र सरकारने पंतप्रधान  गरीब कल्याण योजनेंतर्गत माणशी पाच किलो धान्य मोफत देण्याचा धाडसी निर्णय घेतला होता त्यामुळे विकतचे पाच किलो धान्य तर मोफतचे पाच किलो धान्य असे दर माह  माणशी दहा किलो धान्य दिले जात असे आता एक जानेवारी पासुन शासनाने माणशी पाचच किलो धान्य देण्याचे जाहीर केले असुन ते धान्य वर्षभर मोफत दिले जाणार आहे जिल्ह्यात १८०० धान्य दुकानदार असुन राज्यात ५५००० रेशन दुकानदार आहेत .धान्य मोफत वितरण करण्याचे शासनाचे आदेश असल्यामुळे आता दुकानदारांना धान्याकरीता पैसेच भरावे लागणार नाही तसेच कार्डधारकाकडून पैसेच घेता येणार नाही त्यामुळे आता दुकान भाडे विज बिल दैनंदिन खर्च घर खर्च  कसा भागवायचा असा प्रश्न दुकानदारांना पडला आहे .दुकानदारांना धान्य वितरणामागे क्विंटलला दिडशे रुपये कमिशन दिले जात असुन त्यात वाढ करण्यात यावी तसेच धान्य वितरणाचे कमिशन दर महा दुकानदारांच्या खात्यावर जमा करण्यात यावे अशी मागणी अहमदनगर जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष देविदास देसाई यांनी केली आहे .

बेलापुर ( प्रतिनिधी  )-कृषि प्रदर्शन अँग्रो वर्ल्ड २०२३ चा कृषि उद्योजक पुरस्कार सेंद्रिय व वैदिक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना प्रदान करण्यात आला                                   दिनाक ६ जानेवारी ते ९ जानेवारी दरम्यान नाशिक येथील डोंगरे वसतीगृह मैदानात कृषि प्रदर्शन भरविण्यात आले होते या वेळी कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सेंद्रिय  व वैदीक शेतीचे पुरस्कर्ते साँईल चार्जर टेक्नाँलाँजीचे जनक राम मुखेकर यांना खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते अँग्रो वर्ल्ड कृषि उद्योजक २०२३ हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे रासायनिक खते वापरुन मृत झालेल्या जमिनीला , शेतीला संजिवनी देण्याचे कार्य राम मुखेकर यांनी साँईल चार्जर टेक्नाँलाँजीच्या माध्यमातून सुरु केले अथक परिश्रमातून व संशोधनातून त्यांनी नैसर्गिक शेतीचे धडे शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात केली पूर्व परंपरागत शेती सोडुन जास्त उत्पादन घेण्याच्या नादात रासायनिक खते वापरुन शेती निर्जीव झाली त्या शेतीला कशाची गरज आहे यावर संशोधन करुन शेतकऱ्यांना वैदीक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करुन दिले  रासायनिक शेती बंद करुन सेंद्रिय वैदीक शेती पिकवा आपले अन पुढील पिढीचे रोगापासून, आजारापसून संरक्षण करा रोगावर खर्च करण्याआगोदर पिकाच्या पोषणावर भर द्या पिकाला असलेल्या कमजोरीमुळे रोग येतो पिकाला पोषण भरपुर ताकद दिली तर रोगच येणार नाही  अशी त्यांची शेतकऱ्यांना शिकवण आहे शेतकऱ्यांच्या बांधावार जावुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची राम मुखेकर यांची पद्धत आहे आज महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरील ईतर राज्यातील शेतकरीही आता वैदीक सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत राम मुखेकर यांच्या या कार्याची दखल घेवुन अँग्रो वर्ल्ड संस्थेच्या वतीने त्यांना या वर्षीचा कृषि उद्योजक पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे .

कोपरगाव(गौरव डेंगळे)विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच त्यांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, यासाठी श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल कोपरगाव विविध स्पर्धा परीक्षांची दालन नेहमीच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देत असते.या विद्यालयाचा विद्यार्थी कुमार अथर्व देवराम खेमनार याने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता आठवी दिनांक ३१जुलै २०२२) ९१.६१% गुण मिळवून राज्यात सहावा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर जनसेवा प्रतिष्ठान अहमदनगर आयोजित सी व्ही रमण या परीक्षेत अथर्वने राज्यात चौथा क्रमांक मिळविला. तसेच ग्रेटर बॉम्बे सायन्स टीचर असोसिएशन आयोजित डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक लेखी परीक्षेत अथर्व खेमनर याने यशस्वी होऊन चमकदार कामगिरी केली असून पुणे येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे.

त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत शारदा विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या  कुमारी स्वरा दत्तू शिंदे ७४.८९%, कुमारी सृष्टी नितीन वावधने ७१.१४ % आणि कुमारी ग्रीष्मा शरद कांबळे ६८.५५% या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे शारदा विद्यालयाच्या या विद्यार्थिनींनी गुणवत्ता यादीत येण्याचा मान मिळविला. त्यांच्या या उत्तुंग भरारी बद्दल शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीचे चेअरमन श्री सुहास गोडगे, माननीय प्राचार्य श्री के एल वाकचौरे आणि सर्व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

बेलापुर  (प्रतिनिधी )-नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दिला जाणारा श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज  समाज भूषण पुरस्कार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बेलापुर येथील धडाडीचे कार्यकर्ते अरुण पा नाईक यांना तर डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहीती फाउंडेशनचे

अध्यक्ष रणजीत बनकर यांनी दिली आहे.सामाजिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाच्या वतीने दर वर्षी श्री  श्री १०८स्वामी रामदासजी महाराज समाज भूषण व जिवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते  संस्थेचे पुरस्कार वितरणाचे हे सलग दहावे वर्ष आहे श्री श्री स्वामी रामदासजी महाराज हे गेली ३८ वर्षापासून बारा महीन्यातुन एक महीना पढेगाव येथे वास्तव्यास राहतातया एक महीन्याच्या काळात ते धार्मिक व समाज प्रबोधनाचे काम करतात हीच प्रेरणा घेवुन नेताजी सोशल फाउंडेशनच्या सदस्यांनी स्वामीजींच्या नावाने समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार देण्याची संकल्पना सुरु केली पढेगाव व स्वामीजींचा संपर्क असलेल्या गावातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना समाज भूषण व जिवन गौरव पुरस्कार सुरु करण्यात आलेले आहे या वर्षीचा समाज भूषण पुरस्कार सामाजिक  व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक यांना जाहीर झाला असुन पशु वैद्यकिय क्षेत्रात अविरतपणे कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे उक्कलगाव येथील ह भ प उल्हास महाराज तांबे कृषि क्षेत्रात कार्य करणारे लक्ष्मण बंगाळ तसेच धार्मिक व अध्यात्मीक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे ह भ प अमोल महाराज बडाख व युवा उद्योजक चंद्रशेखर गोरे यांना समाज भूषण पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे तर पशु वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे डाँक्टर सोपानराव वाघचौरे व आदर्श माता म्हणुन ग भा   ताराबाई काळे यांना जिवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे शनिवार दिनांक १४ जानेवारी रोजी मंगल कार्यालय हनुमान मंदीर पढेगाव येथे सकाळी दहा वाजता श्री श्री १०८ स्वामी रामदासजी महाराज यांचे शुभहस्ते पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार असल्याची माहीती नेताजी सोशल फाउंडेशन यशवंत शिक्षण सेवा मंडळाचे अध्यक्ष रणजीत बनकर वतीने देण्यात आली असुन या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी- विदेशात वैद्यकीय शिक्षणघेतल्यानंतरही भारतात मेडिकल प्रॅक्टीस अर्थात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी एफएमजीई(विदेशी चिकित्सा स्नातक परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. मात्र, ही परीक्षा पास न होताच औरंगाबाद येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या तालुक्यातील देऊळगाव माळी येथील एका डॉक्टरवर केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयने छापे घालून त्यांच्याकडून दस्तावेज जप्त केलेत.तसेच, कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली आहे. देशभरातील ७३ डॉक्टर्सवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यात मेहकर येथील डॉ. विनायक अभिमन्यू मगर यांच्या औरंगाबाद येथील दवाखान्यावर देखील छापा घालण्यात येऊन, दस्तावेज व सामग्री जप्त करण्यात आली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तसेच मोठमोठे शहरांमध्ये मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे नुकताच अहमदनगर जिल्ह्यात नेवासा या ठिकाणी नेवासा फाट्यावर श्वास हॉस्पिटल याला देखील आपल्याकडील योग्य ते दस्तावेज आठ दिवसात दाखल करावे या करीता पंचायत समिती आरोग्य अधिकारी यांनी नोटीस बजावली होती मात्र त्यानंतर देखील दवाखाना सुरू असल्याचं वृत्तवाहिन्यांनी वर बातमी प्रसिद्ध करण्यात आली आणि पंचायत समिती अधिकारी आरोग्य अधिकारी यांचे दाबे दणाणले त्यांना त्या क्षणी जाग आली आणि पुन्हा नोटीस बजावण्यात आली व श्वास हॉस्पिटल यास सील करण्यात आले अशाच अनेक मुन्नाभाई डॉक्टरांवर आता सीबीआयची कारवाई होणार याकरिता आता बोगस डॉक्टरांचे धावपळ झाली आहे या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडालेली आहे. याप्रकरणी सीबीआयने महाराष्ट्रासह अनेक राज्यांच्या १४ मेडिकल काउन्सिल्सलादेखील चौकशीच्या घेऱ्यात घेतले आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget