Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी- आज दि.21/09/2022 रोजी Dysp संदीप मिटके यांना नेवासा फाटा परिसरात सेक्स रॅकेट चालवून बळजबरीने  वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे बाबत गुप्त बातमी मिळाली.  त्यावरून नेवासा फाटा परिसरात हॉटेल पायल,हॉटेल नामगंगा,व हॉटेल तिरंगा या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन  पंचासमक्ष छापा टाकुन सात पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे.  त्यानुसार आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशन येथे प्रचलित कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. एकाच वेळी तीन ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला या कारवाईमुळे नेवासा फाटा परिसरात व शहरातील अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे. 

सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, मा.स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके , PI प्रताप दराडे, Pi हर्षवर्धन गवळी, PI विजय करे, PI विलास पुजारी, Api मानिक चौधरीं व इतर पोलीस अधिकारी व अमलदार यांनी केली.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-सण ,उत्सव ,जयंत्या मोठ्या उत्सहात साजऱ्या करा .त्याचा  आनंद लुटा. पण हे करत असताना बेलापुरकरासारखा समाजात आदर्श निर्माण होईल असा कार्यक्रम ,उपक्रम राबवा असे अवाहन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी केले .                    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, बेलापुर ग्रामपंचायतीचा शतक महोत्सव याचे औचित्य साधुन बेलापुरकरांनी गणेशोत्सव काळात गावात शांतता राखुन विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्ज पार पाडले गणोशोत्सव काळात जिवंत देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण तसेच गणेश मंडळांना सन्मानपत्र असा कार्यक्रम बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित करण्यात आला होता .त्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा.जि प ,सदस्य शरद नवले हे होते.सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे,  रणजित श्रीगोड, कनजी टाक, एकनाथ उर्फ लहानु नागले ,गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे,सुधाकर खंडागळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रामेश्वर सोमाणी, ,कनजीशेठ टाक,बाळासाहेब दाणी,विष्णुपंत डावरे,रवींद्र कोळपकर,पोलीस पाटील अशोक प्रधान,अन्वर सय्यद,प्रभात कुऱ्हे,शफीक बागवान,जाकीर हसन शेख आदि मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. पोलीस अधिक्षक मनोज पाटील पुढे म्हणाले की माझ्या २५ वर्षाच्या नोकरीत पोलीस बंदोबस्त नको असे म्हणणारे बेलापूर हे पहीले गाव पाहीले आहे .आनंद लुटतानाही मनात काहीतरी भिती असते .त्यामुळे पोलीस बंदोबस्ताची मागणी केली जाते .बेलापुरगावाने विना पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा दिलेला शब्द खरा करुन दाखविला. बेलापूर च्या नेतृत्वाचे हे यश आहे. बेलापुरकरांनी राबविलेला हा "बेलापुर पँटर्न" जिल्ह्यात नव्हे तर राज्यात लागु व्हावा.सण उत्सव ज्या उद्देशाने सुरु झाले तो उद्देश बाजुलाच राहीला. त्याचे कारण आपण विसरत चाललो आहोत त्यामुळे पोलीसावरील कामाचा ताण वाढत आहे .सर्वच जण पोलीस बंदोबस्त मागतात .सण उत्सव साजरा करणारे रात्री अकरा बारा नंतर झोपी जातात .पण पोलीस मात्र पहारा देत असतो सण उत्सवात काही विघ्न येवु नये म्हणून दारुबंदी करावी लागते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या गावाचे अभिनंदन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो असुन इतरांनी देखील या गावाचा आदर्श घ्यावा असे अवाहनही श्री.पाटील यांनी केले. अध्यक्षीय भाषणात शरद नवले म्हणाले की सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुस्लीम बांधव विविध संघटनांचे प्रतिनिधी पत्रकार बंधु ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले असुन गावाच्या विकासासाठी उज्वल भविष्यासाठी अशीच भूमिका ठेवावी असे अवाहनही नवले यांनी केले या वेळी अहमदनगर गुन्हा अन्वेषण विभागाचे अनिल कटके ,सरपंच महेंद्र साळवी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड  तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे ,हाजी ईस्माईल शेख मोहसीन सय्यद भाजपाचे प्रफुल्ल डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले .या वेळी देखावा स्पर्धेत प्रथम क्रमांक हिंदु संघटक विर सावरकर मित्र मंडळ रुपये पाच हजार द्वितीय क्रमांक छत्रपती तरुण मंडळ रुपये तिन हजार  तृतीय क्रमांक गौरी गणेश बाल मित्र मंडळ रुपये दोन हजार सिध्दी विनायक युवा मंच रुपये एक हजार रामराज्य मित्र मंडळ रुपये एक हजार तसेच सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला तसेच गणेश विसर्जन शांततेत पार पाडल्याबद्दल सर्व गणेश मंडळ पोलीस पाटील जामा मस्जिद ट्रस्ट महावितरणचे अधिकारी कर्मचारी  गणेश विसर्जन काळात मदत करणारे सफाई कर्मचारी पोहणारे बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी आदिंचा सन्मानपत्र देवुन गौरव करण्यात आला या वेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित  होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केले तर प्रफुल्ल डावरे यांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.यावेळी गावकरी पतसंस्थेचे संचालक विशाल आंबेकर, सचिन वाघ, महेश कुऱ्हे,अमोल गाडे,दादासाहेब कुताळ,नितीन शर्मा,भैय्या शेख, दिलीप दायमा, किशोर कदम,हैदरभाई सय्यद,गोपी दाणी,राम कुऱ्हे,राहुल माळवदे,जयेश अमोलिक, शहानवाज सय्यद,दस्तगीर शेख, सोमनाथ साळुंके, बाबुलाल पठाण,राकेश कुंभकर्ण गोपाल जोशी,रोहित शिंदे आदी उपस्थित होते.

विना पोलीस बंदोबस्त गणेश विसर्जन मिरवणूक पार पाडल्यास रु.११,००० बक्षीस देईल असे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत जाहीर केले होते तसेच श्री. गवळी साहेबांनी ११००० रुपये दिल्या नंतर मी ही ११००० रुपये बक्षीस देईल असे तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ नागले यांनी जाहीर केले होते. काल जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या समक्ष पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी रु.११००० बक्षीस रक्कम सरपंच महेंद्र साळवी व उपसरपंच अभिषेक खंडागळे यांच्या कडे सुपूर्द केली. त्या नंतर लगेच एकनाथ नागले यांनी देखील रु.११००० सरपंच, उपसरपंच यांच्या कडे जमा केली.


बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी  प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गेल्या पाच दिवसापासून  ग्रामपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते अखेर प्रशासन ग्रामस्थ व कामगार संघटना यांच्यात तडजोड होवुन कामगारांना रुपये नऊशे तसेच महागाई भत्ता दोनशे रुपये वेतनवाढ देण्याचा एकमताने निर्णय  झाला त्यामुळे कामगारांनी आपले आंदोलन मागे घेतले वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज पाचवा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शरद नवले सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे गांवकरीचे चेअरमन साहेबराव वाबळे मोहसीन सय्यद मुस्ताक शेख यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही  कामगारांच्या मागण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासन नागरिक कर्मचारी व कामगार नेते जिवन सुरुडे यांच्यात अनेक बैठका झाल्या .आज अखेर या बैठकीत तोडगा काढण्यात ग्रामस्थ प्रशासन व महाराष्ट्र राज्य श्रमीक संघ यांना यश आले .पाच दिवसापासून कामगार आपल्या मागण्यावर ठाम होते महागाई वाढली त्यामुळे पगार वाढ करण्यात यावी अशी मागणी कामगारांनी केली होती तर ग्रामपंचायतीचा वसुल कमी असल्यामुळे इतकी पगारवाढ देता येत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे होते विरोधी पक्षनेते माजी सरपंच भरत साळूंके जनता अघाडीचे अध्यक्ष रविंद्र खटोड बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले यांनीही कामगारांच्या मागण्यावर योग्य तो तोडगा काढावा  अशी सुचना केली होती आमदार लहु कानडे ,अशोक उद्योग समुहाचे सर्वेसर्वा भानुदास मुरकुटे गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांनी आंदोलन स्थळी भेट देवुन कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या.सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे गांवकरी मंडळाचे नेते सुनिल मुथा गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे पत्रकार देविदास देसाई,ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत नवले, मुस्ताक शेख,भाजपाचे प्रफुल्ल डावरे,तेली महासंघाचे जिल्हाध्यक्ष लहानु नागले,पुरुषोत्तम भराटे,हाजी इस्माईल शेख,मोहसीन सय्यद,बाळासाहेब दाणी,अमोल गाडे,भैय्या शेख, सचिन वाघ,दिलीप दायमा,किशोर कदम, शफिक बागवान,रत्नेश गुलदगड, जिना शेख,रामदास वाबळे,दादासाहेब कुताळ, महेश कुऱ्हे,विशाल आंबेकर तसेच श्रीकृष्ण बडाख मदीना शेख शरद संसारे राजेंद्र मुसमाडे प्रकाश भांड आदिंनी तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले अखेर ग्रामपंचायतीच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करुन ग्रामस्थासमोर गावाकरीता दोन पावले मागे घेत आंदोलन स्थगीत करत असल्याचे कामगारांनी सांगितले या वेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे  कामगार नेते जिवन सुरुडे देविदास देसाई सुनिल मुथा प्रफुल्ल डावरे सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले आदिंनी मनोगत व्याक्त केले प्रफुल्ल डावरे यांच्या भाषणाचा धागा पकडून सुधीर नवले यांनी राजकारणाचा उल्लेख करताच उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आक्षेप नोंदवला यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला भरत साळूंके यांनीही आक्रमक पावित्रा घेतला अखेर ग्रामस्थांच्या मध्यस्थीनंतर वादावर पडदा पडला.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - अहमदनगर जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकान आय एस ओ मानांकन करण्यासाठी जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर अनेक बैठका घेवुन सर्व सुचना व मार्गदर्शन करण्यात येवुनही अजुन पर्यत तयारी झालेली नसुन दुकानदारांनी महीना अखेरपर्यत सर्व तयारी करावी अशी सक्त सुचना पुरवठा निरीक्षण अधिकारी दत्तात्रय भावले यांनी दिली                           जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने आय एस ओ करावयाची असुन श्रीरामपुर तालुक्यातील दुकानाचा आढावा घेण्यासाठी पुरवठा निरीक्षण अधिकारी भावले यांनी बैठक बोलवीली होती त्या वेळी दुकानदारांना मार्गदर्शन करताना भावले म्हणाले की  रंग रंगोटी करणे, रजिष्टर अद्यावत करणे, सर्वत्र एकाच आकाराचे फलक लावावेत, राज्य सरकारने दिलेल्या पुर्तता करून महीना अखेरी पर्यंत सर्व धान्य दुकाने सज्ज करा .

राज्य सरकारने आय एस ओ मानांकना करीता ९१ प्रकारच्या सुचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार स्वस्त धान्य दुकानदारांच्या अहमदनगर येथे जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी किशोर कदम यांनी वेळोवेळी बैठका घेवून मार्गदर्शन केले आहे, त्याच बरोबर तहसिलदार प्रशांत पाटील यांनीही तालुकास्तरावर वेळोवेळी  बैठका घेऊन मार्गदर्शन केले, त्यानुसार अनेक दुकानदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात सर्वांना एकाच आकाराचे फलक व रजिष्टर देण्यात आले आहेत. उर्वरीत पुर्तता दुकानदारांनी करायची आहे. 

 त्यानुसार आता उर्वरीत दुकानदारांनी यात लक्ष घालून या महिना अखेरी पर्यंत आय एस ओ मानांकनासाठी सज्ज व्हायचे आहे.

ज्या दुकानदारांना आय एस ओ मानांकन प्राप्त होईल त्यांना लवकरच सरकार कडुन सी एस सी केंद्रा सारख्या पुढील व्यावसायिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार  असल्याचे ही यावेळी श्री भावले यांनी सांगितले.

या वेळी श्रीरामपूर तालुका गोदामाच्या धान्य पुरवठ्यात मार्च महीन्या पासुन मोठ्या प्रमाणात तुटवडा येत असल्याने तालुक्यांच्या वितरणावर मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. रेशनकार्ड धारक व दुकानदारांत विनाकारण वाद होत आहेत.सध्या सणासुदीचे व पावसाळ्याचे दिवस आहेत. अन्न धान्यांची नितांत गरज आहे.

आम्ही आय एस ओ करीता प्रयत्नशिल आहोत पण तुम्ही आम्हाला वेळेवर धान्य पुरवठा करा . अशी मागणी जिल्हाध्यक्ष देवीदास देसाई यांनी केली.या वेळी नायब तहसीलदार अभया राजवळ पुरवठा निरीक्षक सुहास पुजारी जिल्हाध्यक्ष देविदास देसाई जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रकांत झुरंगे  तालुकाध्यक्ष बजरांग दरंदलेआदिसह गोपीनाथ शिंदे, दिलीप गायके, माणीक जाधव, सुभाष चोरडीया, प्रकाश गदिया, मुरली वधवाणी, चंद्रकांत गायकवाड, देवराम गाढे, अनिल मानधना, योगेश नागले, अजीज शेख, एकनाथ थोरात, सुधिर गवारे,  नरेंद्र खरात, उमेश दरंदले, मच्छींद्र भालके,  श्याम पवार, सचीन मानधने, बाळकृष्ण कांगुणे, विजय मैराळ, राजन वधवाणी, धनु झिरंगे, वासुदेव वधवाणी आदिंसह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार उपस्थीत होते.

बेलापुर  (प्रतिनिधी  )- ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात यावी  प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी या मागणीसाठी बेलापुर ग्रामपंचायत कर्मचारी  धरणे आंदोलन सुरु केले असुन गटविकास अधिकारी अनंत परदेशी यांच्यासमोर कामगारांनी टोकाची भुमीका घेतल्यामुळे बोलणी फिसकटली वेतनवाढ करण्यात यावी पंधरा महीन्यापासुन थकीत असलेली प्राँव्हीडंट फंडाची रक्कम तातडीने जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य श्रमीक संघाचे काँ.जिवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केलेले आहे .आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता .कामगार व ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यात तोडगा काढण्यासाठी गटविकास अधिकारी अनंत परदेशी हे ग्रामपंचायत कार्यालयात आले होते ते येण्यापुर्वी जि प सदस्य शदर नवले, भाजपाचे जेष्ठ नेते,सुनिल मुथा देविदास देसाई प्रफुल्ल डावरे,गावकरी पतसंस्थे चे चेअरमन साहेबराव वाबळे,ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख, हाजी इस्माईल शेख, पुरुषोत्तम भराटे,मोहसीन सय्यद,प्रभात कु-हे, शफिक बागवान, विशाल आंबेकर,शफिक आतार,जब्बार आतार  यांनी सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे व कामगारांचे नेते जिवन सुरुडे यांच्याशी चर्चा करुन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी ८००रुपये व २००रुपये अशी एक हजार रुपये पगारवाढ देण्याचे कबुल केले मात्र कामगार हे १२००रुपये पगारवाढ करण्यावर ठाम राहीले त्यामुळे बैठकीत एकमत होवु शकले नाही त्यामुळे बोलणी फिसकटली अन कर्मचारी आंदोलन  सुरुच ठेवण्यावर ठाम राहीले ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी देखील या पुढे आपण पगारवाढ देवु शकत नसल्याचे स्पष्ट केले त्या वेळी बोलताना उपसरपंच अभिषेक खंडागळे म्हणाले की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या पगारावर ३५% खर्च करण्याची तरतुद असतानाही बेलापुर ग्रामपंचायत पगारावर ७०% खर्च करते ५०लाख उत्पन्न असुन ३६ लाख रुपये त्याकरीता आगोदरच पगारावर खर्च होत आहे आणखी खर्ख वाढला तर इतर कामे करणे अवघड होईल हे सर्व ग्रामस्थाच्या नजरेसा आणून दिले आहे .८००+ २०० पगारवाढ देतानाही फार कसरत करावी लागणार असल्याचे सरपंच साळवी यांचे म्हणणे आहे तर कामगार नेते जीवन सुरुडे यांच्या मते कोरोनामुळे वसुली झाली नाही याचे निमित्त पुढे करुन कामगारांना पगारवाढ केलेली नाही महागाई भरमसाठ वाढल्यामुळे किमान पंधराशे रुपये  पगारवाढ देण्यात यावी आशी मागणी केली

बेलापूर |प्रतिनिधी|-बेलापूर येथून महाविद्यालयात शिकणार्‍या 17 वर्षांच्या एका अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीस फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुरी तालुक्यातील चांदेगाव परिसरात मोलमजुरी करणार्‍या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, दि. 12 सप्टेंबर रोजी 7.45 ते सकाळी 11.30 च्या दरम्यान आपली 17 वर्षे 4 महिने वयाची बेलापूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ. लोटके करीत आहेत. नजीकच्या काळात बेलापुरातून अल्पवयीन मुलगी पळवून नेण्याची ही दुसरी घटना आहे. त्यामुळे पालकवर्गामध्ये चिंतेचे वातावरण आहे.

श्रीरामपुर (प्रतिनिधी) १४/९: सोमय्या विद्या विहार प्रणितश्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव येथे १४ सप्टेंबर राष्ट्र भाषा हिंदी दिनानिमित्त राज्यस्तरीय हिंदी वकृत्व स्पर्धेचे  आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्रीरामपूर येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजने उत्तेजनार्थ तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.मागील दीड वर्षापासून अधिक काळ शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल प्रत्येक वर्षी तिन्ही भाषाची वकृत्व स्पर्धेचे आयोजन करते. यावर्षी हिंदी वकृत्व स्पर्धेसाठी अहमदनगर,नासिक पुणे व औरंगाबाद जिल्ह्यातून २५ शाळांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी कुमारी हीरल नितीन जेठवा हिचा विषय होता "समय बडा बलवान " व कुमारी रश्मी मनोज गिडवाणी हिचा विषय होता "आझादी के ७५ साल " दोघींनीही उत्कृष्ट वकृत्व करून ५० स्पर्धकांमध्ये चतुर्थ क्रमांक पटकावला. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री राम टेकावडे,सचिव कुमार प्रतिक्षित टेकावडे , प्रा डॉ योगेश पुंड ,पर्यवेक्षक श्री सोलंकी,पर्यवेक्षक सौ जेठवा,पर्यवेक्षक श्री त्रिपाठी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.यशस्वी विद्यार्थिनींना ज्येष्ठ हिंदी शिक्षिका शेख यांचे मार्गदर्शन लाभले.

वकृत्व_स्पर्धेचा_अंतिम_निकाल

प्रथम क्रमांक : श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव

द्वितीय क्रमांक: आत्मा मलिक स्पेशल इंटिग्रेटेड मिलिटरी स्कूल, कोकमठण 

तृतीय क्रमांक: प्रवरा पब्लिक स्कूल, प्रवरानगर 

उत्तेजनार्थ पारितोषिक

 १) विवेकानंद इंग्लिश मिडीयम स्कूल,अहमदनगर

२) सेवा निकेतन कॉन्व्हेन्ट स्कूल, कोपरगाव

३) न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज श्रीरामपूर


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget