Latest Post

प्रतिनिधी-देशाच्या  अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच  औचित्य साधून  समाजातील प्रत्येक घटकाला सारखं महत्व आणि सारखा सन्मान मिळावा यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न - डॉ.वंदनाताई मुरकुटे भारतीय राज्यघटनेत देशातील सर्व नागरिकांना समान अधिकार देताना कुठेही स्त्री किंवा पुरुष असा उल्लेख केलेला नाही. आम्ही या देशाचे नागरिक असतानाही आम्हाला समाजात मानाचं स्थान दिलं जात नसताना आमच्या हस्ते ध्वजारोहण करून दिलेला सन्मान अविस्मरणीय असल्याचं  तृतीयपंधी  कार्यकर्ती ,कवियत्री व लेखिका दिशा पिंकी शेख यांनी प्राईड अँकेडमी येथे बोलताना व्यक्त केले.

यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार बरकतअली शेख, तृतीयपंथी आशु शेख, शाळेचे शिक्षक, पालक उपस्थित होते.

अध्यक्षपदावरून बोलताना बरकत अली म्हणाले की,माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक  माऊली मुरकुटे यांनी भगीरथ प्रयत्नाने ज्ञान गंगा ग्रामीण भागात स्थापित केली.

डॉ.मुरकुटे ह्या हाडाची शिक्षिका असून पंचक्रोशी दर्जेदार शिक्षण देण्याचा वसा घेतला आहे.


आपल्या समाजाचाच भाग असलेल्या तृतीयपंथीयांना, आज २१ व्या शतकातही उपेक्षेचे, अवहेलनेचेच जगणे जगावे लागत आहे. जमेची बाब म्हणजे कायद्याने तरी त्यांची बाजू उचलून धरायला सुरुवात केली आहे.


कुणाच्या घरी बाळ जन्माला आलं, कोणी नवीन व्यवसाय सुरू केला किंवा कोणाच्या घरी लग्न वा अन्य मोठा सामाजिक समारंभ असेल, तरच आपल्या समाजाला तृतीयपंथीयांची आठवण येते. पण तृतीयपंथी हे समाजाचाच भाग आहेत, याचा कधीच सखोलपणे विचार केला जात नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. तृतीयपंथीयांना आजही वेगवेगळ्या अनुभवांना सामोरं जावं लागतं. तृतीयपंथीयांच्या क्षमतेवर विश्वास ठेवला जात नाही, त्यांचा कुठल्याच स्तरावर स्वीकार केला जात नाही, माणूस म्हणून मनाप्रमाणे जगू दिलं जात नाही. शिक्षणाच्या हक्कापासूनदेखील ते वंचित आहेत, आपली ओळख सांगताना त्यांना केवळ नाव पुरेसं ठरत नाही तर सोबत जात, धर्म, कुटुंब यांचे दाखले जोडावे लागतात. परंतु कुटुंबानेच बेदखल केल्यानंतर पुरावे आणणार कुठून हा प्रश्न समोर उभा राहतो. ज्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील होऊ शकत नाहीत. या सर्व परिस्थितीमुळे आजही त्यांच्यासाठी रोजचं जिणं संघर्षमयच आहे.

शहरी आणि ग्रामीण भागातील तृतीयपंथीयांच्या समस्या आणि संघर्ष वेगळा आहे. त्याचा सखोल अभ्यास होण्याची आणि धोरण बनवताना स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. असे मत प्राईडच्या संस्थापिका ,सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे यांनी व्यक्त केले. 

याप्रसंगी चिमकुल्या विध्यार्थ्यांनी विविध कलागुण व मनोगते व्यक्त केले.प्राईड स्कुल व कॉलेज प्राचार्या सौ.गोटे यांनी प्रास्ताविक केले.

टाकळीभान प्राईड शाळेचे मुख्याध्यापक प्रा.घोगरे यांनी आभार मानले

🙏

श्रीरामपूर- दि.१४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य लघु वृत्तपत्र पत्रकार संघाची मासीक बैठक संपन्न झाली.

या बैठकीच्या अध्यस्थानी  पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री.बरकत अली शेख हे होते. बैठकीचे सूत्रसंचालन पत्रकार कासम शेख यांनी केले तर प्रास्ताविक पत्रकार सुभाष राव गायकवाड यांनी केले या कार्यक्रमात महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाच्या सदस्यपदी काही नवीन पत्रकारांना सदस्यपदी घेण्यात आले असून त्यांना शेख बरकत अली यांच्या हस्ते नियुक्ती पत्र व ओळखपत्र प्रदान करण्यात आले

या बैठकीत  देवळाली प्रवरा येथील महाराष्ट्र  लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे राहुरी तालुका प्रमुख जेष्ट पत्रकार इब्राहीम शेख यांची इंडियन कॉग्रेस ब्रिग्रेड कमेटी (महाराष्ट्र) च्या राहुरी तालुका अध्यक्ष पदावर निवड करण्यात आली. तसेच श्रीरामपुर येथील युवा पत्रकार इम्रान शेख यांची इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमिटीच्या श्रीरामपुर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. या दोघांचे निवडीचे पत्र इंडियन कांग्रेस बिग्रेड कमिटीचे महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत अली शेख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


या  प्रसंगी पत्रकार कासम शेख, इब्राहीम शेख,  असलम बीनसाद, सुभाष गायकवाड, गुलाब भाई शेख, एजाज सय्यद, इम्रान शेख ,यांनी उपस्थित पत्रकारां समोर मार्गदर्शनस्पद मनोगत व्यक्त केले व याकार्यक्रमाचे अध्यक्ष बरकत अली शेख यांनी पत्रकारीता कशी करावी या बाबत उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर मोहम्मद पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष बी. के. सौदागर, उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राज मोहम्मद शेख, पत्रकार असलम बीनसाद,इब्राहीम शेख, सुभाष गायकवाड, कासम शेख, शफी शेख, शब्बीर कुरेशी मोईन शाह गुलाब भाई शेख, जमीर शेख, भैय्या शेख,  यांनी शेवटी उपस्थितांचेआभार मानले

श्रीरामपूर येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे श्रीरामपूर शहर सचिव इम्रान सरदार शेख यांची महाराष्ट्र राष्ट्रीय अध्यक्ष  नुरेषा तिर्की संस्थापक ठाकूर बिपिन सिंह राजवत राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष राजेश भोसले महाराष्ट्र राज्य प्रभारी बरकत आलि शेख यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या इंडियन काँग्रेस ब्रिगेड कमेटी च्या श्रीरामपूर शहर अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल त्यांचे राजेश जी भोसले, बरकत अली शेख यांच्यासमवेत बि. के. सौदागर, शेख फकीर महंमद, संदीप पवार, हाजी राज मोहम्मद शेख, आमजद भाई शेख, सुभाष राव गायकवाड, रियाज खान पठाण, राज मोहम्मद आर. शेख, शेख सलाउद्दीन, सार्थक साळुंके, रमेश शिरसाट, लक्ष्मण साठे, साईनाथ बनकर, गुलाब भाई वायरमन, जावेद भाई शेख, शफिक शेख, ऐजाज सय्यद, मुसा सय्यद, कासम भाई शेख, मोहम्मद अली सय्यद, सलीम भाई शेख, रसूल सय्यद, मोहम्मद गौरी, अनिस भाई शेख, अकबर भाई शेख, मोहसीन शेख शब्बिर भाई कुरेशी मोईन शाह आदींनी त्यांचे अभिनंदन केले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-कत्तल करण्याच्या इराद्याने एकाच पिकअप मध्ये अकरा गोवंशीय जनावरे खचाखच भरुन जात असताना बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पिकअप फसला अन टेम्पोतील जनावरे पाहुन नागरीकांनी पोलीसांना पाचारण केले अन अकरा जनावरांना जिवदान मिळाले पोलीसांनी  पिकअपसह  सव्वा तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे  .                                   दोन दिवसापूर्वी बेलापूरच्या मुख्य झेंडा चौकात पाईपलाईन फुटल्यामुळे ती दुरुस्त करुन खड्डा बुजविण्यात आला आज सकाळी अकरा वाजता अकरा गो वंश जातीची जनावरे भरुन महेंद्रा पिकअप एमएच ११  टी ५४९९ ही पिकअप गाडी वळण घेत असताना दोन दिवसापूर्वी घेतलेल्या खड्ड्यात फसली त्यावेळी टेम्पो काढण्यासाठी ग्रामस्थ पुढे सरसावले परंतु पिकअप मधील दृश्य पाहुन नागरीकांचा संताप अनावर झाला पिकअप मध्ये अकरा गायी दाटीवाटीने घुसविलेल्या होत्या त्यात एक गाय मूर्छितावस्थेत होती तेथे उपस्थित असलेले तंटामूक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे शिवप्रतिष्ठाणचे किसन ताक्टे रोहीत शिंदे राहुल माळवदे प्रफुल्ल डावरे स्वप्निल खर्डे सागर लाहोर स्वप्निल खैरे भुषण चेंगेडीया  यांनी काही अघटीत होण्या आगोदरच पोलीसांना ही माहीती कळवीली बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके यांनी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या बाबत कळविले त्यांनी तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्यांच्या सूचनेवरुन बेलापूर पोलीस झेंडा चौकात आले व जनावरांनी खचाखच भरलेला टेम्पो ताब्यात घेतला प्रकाश पोळ रा मांजरी हा अमोल विटनोर याच्या सांगण्यावरुन या जनावरांची चारा पाण्याची सोय न करता कत्तल करण्याच्या इराद्याने घेवु जात असल्याची माहीती समजल्यावरुन पोलीसांनी  कारवाई करुन त्याचे ताब्यातील  तीन लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ताब्यात घेतलेली अकरा गायी व वासरे संगमनेर येथील जिवदया गो शाळेत पाठविण्यात आली आहे  बेलापुर पोलीस स्टेशनचे पोलीस काँन्स्टेबल निखील तमनर यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम१९९५ चे सुधारीत कायदा कलम २०१५ चे कलम ५, ५(ब)(क)९ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास पो नि संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अतुल लोटके हे करत आहे

बेलापुर  (प्रतिनिधी  )-स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव बेलापूरात विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला बेलापुर गावातील मुख्य ध्वजारोहण हे सर्व धर्मीय संत महंत व पोलीस तसेच जेष्ठ सेवानिवृत्त  शिक्षक यांच्या शुभहस्ते करुन ग्रामपंचायतीने एक वेगळाच आदर्श घालून दिला.  बेलापुर गावाला आदर्शवत घडविणारे सेवानिवृत्त जेष्ठ शिक्षक लक्ष्मण डोखे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर समाजाला सतत चांगला उपदेश करणारे सतं महंत महेश व्यास महानुभाव मठाचे कृष्णराज लाड बाबा सेंट पिटर चर्चचे पालक चंद्रकांत ओहोळ बेलापुरातील मुख्य जामा मस्जिदचे मौलाना शकील अहमद शेख आदि धर्मगुरुंच्या हस्ते ध्वजपुजन करण्यात आले .सरपंच महेंद्र साळवी यांच्या हस्ते बेलापुर पोलीस स्टेशनचे तर बेलापुर सहकारी सेवा संस्थेचे प्रकाश पा नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले बेलापुर ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण ग्रामपंचायत सदस्या तबसुम बागवान,स्वाती अमोलिक,सौ.शिला पोळ  यांच्या हस्ते तर मराठी मुले व मुलींच्या शाळेचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाणी व शाळा व्यवस्थापन समितीचे  अध्यक्ष तोफेल सय्यद यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्दू शाळेचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी डाँक्टर आजिम शेख,अँड.अयाज सय्यद, आसायी समीर शेख,इंजिनिअर स्वालिया कदिर सय्यद, रूजदा इकबाल शेख,नईम फकीर आतार यांच्या हस्ते करण्यात आले बेलापुर जे टी एस हायस्कूलचे ध्वजारोहण राजेश खटोड यांच्या हस्ते करण्यात आले.रामगड येथील जिल्हा परिषद उर्दू व मराठी शाळेत दिपक निंबाळकर यांच्या हस्ते 

 ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपट गावडे व देविदास देसाई यांनी केले.नवनाथ धनवटे यांच्या संदीप ढोल पार्टी ने डोलीबाजा वाद्याचे वादन करून वातावरण निर्मिती केली.साई इंग्लिश मीडियम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी झांज पथकाचे सादरीकरण केले.ध्वज स्तंभा भोवती केलेली सजावट उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होती.यावेळी फटक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली.ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व शाळांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी विविध मान्यवर,पत्रकार,सर्व संस्थांचे पदाधिकारी,ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी,मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महसुल विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या तिरंगा रँलीचे बेलापूरात जोरदार स्वागत करण्यात आले उपविभागीय अधिकारी अनिल पवार व पोलीस निरीक्षक संजय सानप,गटविकास अधिकारी मच्छिंद्र धस,मुख्याधिकारी गणेश शिंदे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-बेलापुर पोस्ट कार्यालय व ग्रामपंचायत बेलापुर बु!!यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालय येथे अपघात विमा शिबीर संपन्न झाले                                    डाक विभागाच्या वतीने रुपये३९९मध्ये नागरीकांचा दहा लाख रुपयांचा अपघाती विमा उतरविला जाणार आहे यात अपघाती मृत्यू आल्यास दहा लाख रुपये कायमचे अपंगत्व आल्यास दहा लाख रुपये दवाखाना खर्च रुपये ६० हजार दोन मुलांना शिक्षणाचा खर्च अपघाताने पँरालिसीस झाल्यास१० लाख रुपये भरपाई दिली जाणार आहे वय वर्ष १८ते ६५असणाऱ्या नागरीकासाठी एकच हप्ता आसणार आहे यात सर्व प्रकारचे अपघात सर्पदंश विजेचा शाँक फरशीवरुन घसरुन पडणे आदिंचा समावेश असल्याची माहीती डाक विभागाच्या वतीने देण्यात आली बेलापुर  विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संस्थेच्या सर्व सभासदांचा विमा विनामूल्य उतरविला जाणार असुन सभासदांनी आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा तसेच सर्व सभासदांनी या योजनेचा लाभ घ्यावाअसे अवाहन संस्थेचे चेअरमन सुधीर नवले व्हा चेअरमन पंडीतराव बोंबले व सर्व संचालकानी केले आहे.  या वेळी डाक विभागाचे जालींदर चव्हाण श्रीमती पुनम ओहोळ राहुल पारधे विलास गायकवाड संदीप वाकडे राजन पवार शिवाजी पोटभरे तसेच मा जि प सदस्य शरद नवले सरपंच महेंद्र साळवी सदस्य चंद्रकांत नवले विलास मेहेत्रे सुधाकर खंडागळे प्रफुल्ल डावरे पत्रकार देविदास देसाई दिलीप दायमा सुहास शेलार किशोर कदम मुसा शेख महेश कुऱ्हे  सचिन वाघ राहुल माळवदे मोहसीन सय्यद भाऊसाहेब कुटे मनोज कुटे प्रसाद साळूंके मुस्ताक शेख आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी )-स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त व बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त बेलापूरात प्रथमच सर्व धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरील भोंग्यातून राष्टगीत लावण्यात आले होते                                 हर घर तिरंगा मोहीमेंतर्गत सकाळी साडेआठ वाजता गावातील सर्व नागरीकांनी एकाच वेळेस ध्वज उभारले त्यानंतर सकाळी नऊ वाजता बेलापूरातील मुख्य पेठेतील जामा मस्जिद साईबाबा मंदिर, बिरोबा मंदिर श्री चक्रधर स्वामी मठ गावातील शालोम चर्च,ईनामदार मशिद,शिलोह चर्च आदि प्रार्थनास्थळ तसेच सर्व शाळामधील 

स्पिकरवरुन राष्ट्रगीत लावण्यात आले नागरीकांना अवाहन केल्याप्रमाणे सर्व नागरीक घरातून रस्त्यावर येवुन राष्ट्रगीताकरीता उभे राहीले बेलापूरातील आझाद मैदान येथे सर्व नागरीक जमा झाले त्या ठिकाणी सूचना दिल्याप्रमाणे बरोबर नऊ वाजता सर्वत्र राष्ट्रगीत सुरु झाले प्रत्येक  नागरीक राष्ट्रगीताचा मान ठेवुन जागेवरच उभे राहीले राष्ट्र गीतानंतर वंदे मातरम़् भारत माता की जय च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला बेलापुर जिल्हा परिषद मराठी मुलींच्या शाळेतील मुलींच्या लेझीम पथकाने अनेकांना आचंबित केले त्यानंतर मुलींनी देशभक्तीपर गीत सादर केले. बचत गटाच्या महिलांनी गावातून तिरंगा फेरी काढली. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य,सोसायटी पदाधिकारी व संचालक,विविध राजकीय पक्षांचे नेते व सदस्य,विविध संस्था व पतसंस्था यांचे पदाधिकारी, तरुण मंडळांचे प्रतिनिधी,विविध मान्यवर, नागरिक आदि उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पत्रकार देविदास देसाई यांनी केले.प्रास्ताविक सरपंच महेंद्र साळवी यांनी केले तर उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget