Latest Post

अहमदनगर प्रतिनिधी - प्रस्तुत बातमीची हकीकत अशि की दि.०१/०७/२०२२ रोजी स्थानीक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे चैन स्नैकिंग गुन्हयातील आरोपीकडे तपास करत असताना पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे दोन इसम हस्तीदंत विक्री करणेसाठी येणार आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके यांनी सदर माहिती श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक आमदनगर यांना कळवली.मा.श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक यांनी पोलीस निरीक्षक श्री. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले. नमूद आदेशान्वये पोनि/अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/गणेश इंगळे,पोसई/सोपान गोरे,सफौ/राजेंद्र वाघ,पोहेकाॅ/बापूसाहेब फोलाणे,देवेंद्र शेलार,पोना/ भीमराज खर्से,सुरेश माळी,पोना/शंकर चौधरी,रवि सोनटक्के,पोकॉ/सागर ससाणे व मच्छिंद्र बर्डे लागलीच असे पथक तयार करून कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन करून रवाना केले.सदर सूचनाप्रमाणे पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे खाजगी वाहनाने नगर औरंगाबाद रोडवरील जेऊर टोल नाका येथे वेशांतर करून सापळा लावून थांबले असताना थोड्याच वेळात दोन इसम टोल नाका परिसरात संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यापैकी एकाच्या पाठीवर मिल्ट्री रंगाची सॅक होती.सॅक मधून काहीतरी भाग वर आलेला व त्यास रुमाल बांधलेला होता थोडा वेळ थांबल्यानंतर संशयित इसमा जवळ एक ग्रे रंगाची आय-२० कार येऊन थांबली व कार मधून चार इसम खाली उतरले संशयित दोन्ही इसम कार मधून आलेल्या इसमांना सॅक मधून एक मोठा हस्तिदंत सारखी वस्तू दाखवून बोलत असताना हस्तिदंत विक्री करण्यासाठी आलेले इसम हेच आहेत अशी पोलीस पथकाची खात्री झाल्याने त्यांनी संशयित इसमांवर झडप घालून शिताफीने ताब्यात घेतले.त्यांची अंग झडती घेतली असता त्यांचे ताब्यात हस्थिदंत सारखी वस्तू मिळून आली.संशयित इसमांना त्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी हस्तिदंत खरे असून ते विक्री करण्यासाठी आलो अशी कबुली दिल्याने त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव १) व्यंकटेश दुराईस्वामी वय ४० वर्ष रा.हल्ली, वाकडी फाटा दरेवाडी तालुका जिल्हा अहमदनगर २) महेश बाळासाहेब काटे वय ३० रा. आखेगाव तालुका शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे हस्तिदंत बाबत विचारपूस करता त्यांनी शेवगाव येथील महेश मरकड व त्याचे इतर साथीदारांना काळया बाजारात हस्थिदंत विक्री करण्यासाठी आलो असे सांगितले.हस्थिदंत कुठून आणले आहेत याबाबत तपास चालू आहे.सदर आय-२० कार मधून आलेल्या व ताब्यात घेतलेले इसमांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) महेश भगवान मरकड वय २६ वर्ष रा. गहिलेवस्ती शेवगाव २) सचिन रमेश पन्हाळे वय ३३ वर्ष राहणार आखेगाव तालुका शेवगाव ३) निशांत उमेश पन्हाळे वय २५ वर्ष रा. भगतसिंग चौक शेवगाव ४) संकेत परशुराम नजन वय २३ वर्ष रा.पवार वस्ती शेवगाव असे असल्याचे सांगितले त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी व्यंकटेश दुराईस्वामी व महेश काटे यांच्याकडून हस्तिदंत खरेदी करण्यासाठी आलो असल्याचे सांगितले, उपवन संरक्षण अधिकारी अहमदनगर यांनी हस्तीदंत हे प्राथमिक तपासणीमध्ये अस्सल खरे असल्याचे स्पष्ट झाले आहे.बहुमूल्य शोभेच्या वस्तू व औषधी आदि करिता हस्तिदंतांचा वापर होत असल्याने हत्तीचे दातांना आंतरराष्ट्रीय बाजारात विशेष महत्त्व आहे मात्र दातांची किंमत जाहीर केल्यास हस्तीचे दातांच्या तस्करीसाठी हत्तीची हत्या करण्याचे प्रमाण वाढू शकते त्यामुळे वनविभागाने या दातांची किंमत जाहीर करण्यात बंदी घातलेली आहे.सदरील घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे सदर इसमाविरुद्ध भादविक ४२९ सह वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २(१६),९,३९,४४,(ब),५० व ५१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची कारवाई श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर

श्री.सौरभ कुमार अग्रवाल अप्पर पोलीस अधीक्षक,श्री. अजित पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण विभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.

कोपरगाव प्रतिनिधी-दारू विक्री चालू ठेवण्यासाठी 55 हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोड अंती 35 हजारांची लाच स्विकारताना, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक नंदू चिंधू परते व सहा दुय्यम निरिक्षक राजेंद्र भास्कर कदम या दोन अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडले आहे.मंगळवारी रात्री कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे ही कारवाई करण्यात आली आहे. याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईने लाचखोर अधिकार्‍यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.तक्रारदार यांचा दारू विक्री व्यवसाय असून दारू वाहतूक व विक्री चालू ठेवण्यासाठी दिनाक 27 जून रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम यानी मागील 11 महिन्यांचे बाकी हप्त्याचे 55 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 30 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले तसेच आरोपी नंदू चिंधु परते यांनी त्यांच्यासाठी दरमहा 5 हजार रुपये लाचेची मागणी करून दिनांक 29 जुन रोजी आरोपी राजेंद्र भास्कर कदम याने 35 हजार रुपये लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांच्यासमक्ष स्विकारतांना पकडण्यात आले.ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक, नारायण न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक सतीश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार, पोलिस निरिक्षक संदीप साळुंखे, पो.ना. डोंगरे, पो.ना. इंगळे, पो. ना नितीन कराड, चालक विनोद पवार यांच्या पथकाने केली.

श्रीरामपूर प्रतिनिधी-येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळच्या दरम्यान एका एजंटने काही लोकांना जमवून अधिकारी व कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नव्हती.येथील आरटीओ कार्यालयात काल सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास एक एजंट व कर्मचारी त्यांच्यामध्ये काही कागदपत्र घेण्यावरून बाचाबाची होऊन शिवीगाळ झाली. त्या एजंटने बाहेरून काही लोकांना जमवून आणले. त्या ठिकाणी दोघांमध्ये वाद होत असल्याचे पाहून काही अधिकारी, कर्मचारी व एजंटसह गर्दी जमली. त्या एजंट्स व त्याने जमवलेल्या लोकांनी कर्मचारी अधिकार्‍यांना शिवीगाळ करत त्यांच्या बरोबर झटापट केली. हा प्रकार पाहण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती.या घटनेची माहिती कळताच पोलीस त्या ठिकाणी आले. या प्रकरणाची पोलिसांनी सर्व माहिती घेतली. त्या एजंटला शोधण्यासाठी पोलिसांनी त्याचे घर गाठले मात्र तो मिळून आला नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नव्हती .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देताना ज्या शाळा महाविद्यालय अडवणूक करेल अशा  शाळा/ महाविद्यालयीन विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विद्यार्थी सेना च्या वतीने करण्यात आली आहे ,

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या , वतीने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रिया चालू आहे. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना विविध स्वरुपांचे कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालय, तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय या ठिकाणी काही वेळा अडवणूक होण्याची शक्यता  आहे. वेळेत कागदपत्र मिळत नाही उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रिमिलेअर दाखला, जात पडताळणीचा दाखला, बोनाफाईड अशा विविध कागदपत्रांसाठी या कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची पिळवणूक होत असल्याच्या अनेक  तक्रारी येत  आहे. तसेच शाळा व कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतेवेळेस डोनेशनची मागणी केली जात आहे. अनेकांची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे जास्त फी भरु शकत नाही. नियम बाह्य फी मिळत असल्याने शाळा व कॉलेजमध्ये , गर्भश्रीमंत मुलांना ऍडमिशनला, प्रथम प्राधान्य देत आहेत. यामुळे अनेक गरीब विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहे. अशा शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्या शाळा व कॉलेज व्यवस्थापकांवर कारवाई करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. आत्ताच कुठे कारोनाची तिव्रता कमी असून शाळा व कॉलेजेस सुरु होताच मनमानी फी व डोनेशची आकारणी  सुरु केल्याच्या तक्रारी येत आहे. त्यामुळे पालक वर्ग हवालदिल झालेला आहे. काही सेतु चालकही दाखले देण्यिकरीता  अव्वाच्या सव्वा पैसे उकळत आहेत .तरी अशा सर्वावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे काहींना नोकरी नाही, व्यवसाय नाही त्यातच फी व डोनेशनची मागणी वाढत आहे. तसेच जे सेतु कार्यालय, शासकीय फी पेक्षा जास्त अतिरिक्त पैसे घेणार्या सेतू कार्यालयावर देखील कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर मनसे जिल्हाध्क्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली  तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल.आसा ईशारा मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने देण्यात आलेला आहे या निवेदनावर मनसे विद्यार्थी सेना उपजिल्हाध्यक्ष  गणेश दिवसे,तालुकाध्यक्ष  गणेश रोकडे, शहराध्यक्ष विशाल लोंढे, जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर जिल्हा सरचिटणीस सुरेश जगताप, उपजिल्हाध्यक्ष संतोष डहाळे, तालुकाध्यक्ष प्रविण(आबा) रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, कामगार सेना तालुका अध्यक्ष सचिन पाळंदे, निलेश सोनवणे, संदीप विश्वंबर, अमोल साबणे, अक्षय सूर्यवंशी, विकी परदेशी, मंगेश जाधव, संकेत शेलार, रोहन गायकवाड, श्रीराम थोरात, जगन सुपेकर, अमोल ढाकणे, सागर भोंडगे, अक्षय अभंग, राहुल शिंदे, श्याम लांडे, प्रमोद शिंदे, किशोर बनसोडे, आधी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत

अहमदनगर प्रतिनिधी -जिल्ह्यात १० जूलै २०२२ रोजी 'बकरी ईद' व‌ 'देवयानी आषाढी एकादशी' हे सण साजरा करण्यात येणार आहेत.त्यादृष्टीने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने २८ जूनच्या रात्री १२ वाजल्यापासून ते ११ जूलैच्या रात्री १२ वाजेपर्यंतच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३६ लागू करण्यात आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.सध्या राज्याच्या राजकीय परिस्थितीमुळे निषेध मोर्चा, प्रती निषेधाच्या घटना चालू असून प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, जोडे मारो आंदोलन तसेच

राजकीय पक्षांच्या नेत्यांचे कार्यालय तोडफोडीच्या घटना घडत आहेत. तसेच केंद्र सरकारच्या अग्निपथ सैन्य भरती योजना अनुषंगाने संपूर्ण देशभरात विविध संघटनांचा विरोध चालू आहे.त्यामुळे विविध राजकीय पक्ष मोर्च, निषेध आंदोलने, धरणे आंदोलने, रास्ता‌रोको, प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, कार्यालय तोडफोडीच्या घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे सध्या जिल्ह्यात विविध दिंड्या, पालख्या आगमन व प्रस्थान तसेच इतर धार्मिक कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी करण्याची शक्यता नाकारता येत नाही.महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३६ व त्यात समाविष्ट असलेल्या कलमांचा नियमन आदेश वरील कालावधीसाठी जारी करण्याचे अधिकार अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी यांना प्रदान करण्यात येत आहेत.असे ही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आदेशात नमूद केले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-दि. 27.06.2022 रोजी 15.35 वा पोलीस निरक्षक श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशन याना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे. प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपुर हा गावटी कटटा बाळगतो, तसेच तो खेरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई समर्थ मंगल कार्यालयाजवळ आहे अशी माहिती मिळालीतेव्हा श्री. मच्छिद्र खाडे, पोलीस निरीक्षक, श्री., अतुल बोरसे, पोसई पोना/1251। शेंगाळे, पोकां/ 173 सुनिल दिघे व चापोको.चैंदभाई पठाण अशानी दि. 27.06, 2022 रोजी 15.50 वा निमगाव खेरी ता श्रीरामपुर येथील शिवारातील खेरी निमगाव ते चितळी जाणारे रोडवर साई

समर्थ मंगल कार्यालया जवळ एक इसम आम्हाला उभा दिसला व तो आम्हा पोलीमांना पाहन 'पना लागला त्यावेळी त्याचेवर झडप घालुन पकडले. त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव प्रशांत ऊर्फ पांड साइनाथ लेकुरवाळे रा खैरी निमगाव ता. श्रीरामपुर असे सांगितले आहे. त्याची अंगझडती घेतली असता तव्हा त्याचकड एक गावठी कटटा सुमारे 20,000/- रु किंमतीचा व 2 जिवंत काडतुस 1000/- रु किंमतीचे असा मुह्वमाल मिढुन आला आहे.सदरचा मुद्येमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला आहे. सदर घटनेवरुन प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खरी निमगाव ता. श्रीरामपुर यांचे विरुध्द श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर 2102022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25,7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच सदर गुन्हयाचा पुढील तपास पोसई. अतुल बोरसे हे करत आहेत.सदर आरोपी प्रशांत ऊर्फ पांडु साईनाथ लेकुरवाळे रा. खैरी निमगाव ता. श्रीरामपुर यांचेवर खालील प्रमाणे गुन्हें दाखल आहेत,1) श्रीरामपुर ता पो स्टे I 83/ 2014 IPC 380,457 प्रमाणे 2) श्रीरामपुर ता पो स्टे 1 92/ 2014 1PC 399,402 प्रमाणे) नारायणगाव पो स्टे पुणे जिल्हा 1 52/ 2016 1PC 395,392 प्रमाणे महाराष्ट्र सघटीत गुन्हेगारी कायदा कलम 3(1),3(4) प्रमाणे 4) श्रीरामपुर ता पो स्टे I39/2018 IPC 399,402 प्रमाणे 5) श्रीरामपुर ता पो स्टे I113/2018 IPC 353,399,402 प्रमाणे 6) श्रीरामपुर ता पो स्टे 1 145/ 2018 IPC '399,402 प्रमाणे 7) श्रीरामपूर शहर पो स्टे 1922/ 2019 1PC 399,402 ऑर्म अँक्ट 4/25 प्रमाणे नमुद दाखल गुन्हयामध्ये मा. श्री. मनोज पपाटील साहेव, पोलीस अधीक्षक अहमदनगर, मा. स्वाती भोर मेंडम,अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर आणि मा. श्री. संदिप मिटके साहेव, उपविभागिय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर विभागयांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर तालुका पोलीस स्टेशनचे श्री. मच्छिद्र खाडे, पोलीस निरीक्षक, पोसई अतुल बोरसे, पोना 1251 अनिल शेंगाळे, पोकों। 73 सुनिल दिये चापोकों चाँदभाई पठाण यांनी सदरची कारवाई केलेली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-कोरोनाचे संकट टळू दे भरपूर पाऊस पडून बळीराजा सुखी होवो असे मनोभावे साकडे पाडूरंगाला घालणार असल्याचे  अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती अरुणगिरीजी महाराज यांनी सांगितले अडबंगनाथ देवस्थानचे मठाधिपती महंत अरुणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या पालखी व दिंडीचे यश ट्रेलर व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले होते त्या वेळी बोलताना अरुणगिरीजी महाराज म्हणाले की या दिंडीचे हे बारावे वर्ष असुन अतिशय शिस्तप्रिय दिंडी म्हणून या दिंडीची ओळख आहे .सर्व वारकऱ्यांना पांढरा पोषाख डोक्यावर टोपी असा गणवेश असुन पुरुष व महीला वारकरी स्वतंत्र वारीत चालत असतात कोरोनामुळे दोन वर्ष पायी दिंडी काढता आली नाही त्यामुळे आता वारकरी विठ्ठल पांडूरंगाच्या भेटीला आसुसलेला आहे .पांडूरंग सर्व भक्तांच्या ईच्छा पूर्ण करतील असा विश्वासही त्यांनी बोलुन दाखविला या वेळी मा ,जि प सदस्य शरद नवले यांनी देवस्थानला दिलेल्या निधीचा आवर्जुन उल्लेख करुन संस्थानला आणखी निधीची गरज असल्याचेही

अरुणगिरीजी महाराज म्हणाले या वेळी मा.जि प सदस्य शरद नवले उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले माजी सरपंच भरत साळूंके खटोड पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड प्रकाश कुऱ्हे  पत्रकार' देविदास देसाई नवनाथ कुताळ यश ट्रेलरचे मालक उल्हास कुताळ कुंदन कुताळ वसंतराव कुताळ रविंद्र कुताळ दादासाहेब कुताळ विलास मेहेत्रे कन्हैय्या कुताळ यश कुताळ प्रकाश कुऱ्हे भाऊसाहेब वाबळे शशिकांत नवले चंद्रकांत नवले रफीक बागवान  आदिंनी पालखीचे स्वागत केले. बेलापुर ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करून ह.भ.प.अरूणगिरीजी महाराजांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रामपंचायत सदस्य मुस्ताक शेख,रमेश अमोलिक,दिलीप दायमा,शिवदास दायमा, प्रकाश कु-हे,सचिन वाघ,समीर जहागिरदार,राजेंद्र कुताळ,नितीन नवले, सुभाष राशिनकर,कुंदन कुताळ, आदी उपस्थित होते

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget