श्रीरामपूर रमजान स्पेशल- (डॉ सलीम सिकंदर शेख)" तुम्हाला," आजन " देउन पुकारले (बोलावले ) जाईल , तर तुम्ही नमाज अदा करण्यासाठी घाई करून दुकान , व्यापार, हातातील काम लवकर आटोपून लगेच या "
( दिव्य कुरआन सुराहा नं.६२ , सुरह अल - जुमूआ .आ.न.९,१०).
प्रत्येक धर्मात श्रद्धांळुंना ,ईमानवानांना , मंदिर, मस्जिद, चर्चा , मध्ये बोलावण्यासाठी एका विशिष्ट पद्धती आहेत. प्रेषीत मुहम्मद स्व.यांनी मक्का हुन मदीना हिजरत केल्या नंतर , तेथील ईमानवानांना एकत्र करण्यासाठी कोणती पद्धतीची गरजेचे आहे ,यासाठी त्यांनी आपल्या सहकारी मित्र ( साहाबा रजि.) यांची मिटींग बोलावून सल्ला मागितला .( प्रेषित मुहम्मद स्व.यांच्या कामाची पध्दत आशी होती की , कोणत्याही काम करताना , आपल्या सहकारी मित्रांना ( साहाबा म्हणतात ) चर्चा साठी एकत्र करून , प्रत्येक सहभागी सहकारी मित्रांचे सल्ला , विचार घेऊन नंतर च कोणताही निर्णय घेत असत , .ही ईस्लामी लोकशाही पध्दती आहेत.) दिवसातून पाच विविध वेळेनुसार लोकांना एकत्र करण्यासाठी कोणती पध्दतीची गरज आहेत,
,काही सहाबांनी ज्यु ( यहुदी)सारखी कंक (बेल ) वाजवून ,तर काहींनी चर्च सारखं घंटा वाजवू ,तर कोणी शंख वाजवू तर कोणी आग लावून बोलावू ,हे सल्ले प्रेषीतांना आवडली नाही, दुसऱ्या दिवशी विचार करून सांगा , तर खास मित्र हजरत उमर बिन खत्ताब रजि.( ईस्लामी दुसरे खलिफा ) यांच्या स्वप्नात कोणीतरी मनुष्य वारंवार तेच तेच आजान सारखं शब्द , वाक्य रचना गूण गुणत आहे ,तसेच त्यांच्याच प्रमाणे दुसरे सहाबा (मित्र) हजरत अब्दुल्ला बिन जैद रजि.यांनी ही त्यांच्या ही स्वप्नात त्याच शब्दांचा आवाज वारंवार येत आहेत , त्यांनी झोपेतच तो आवाज पाठ ( कंठस्त) करून झोपेतूनच तात्काळ उठून , निम्म्या रात्रीच प्रेषीत मुहम्मद स्वं . यांच्या कडे जाऊन उठवून सर्व स्वपनातील हाकीगत सांगितली ...
ही अल्लाहा ( परमेश्वर, ईश्वराला) चीच ईच्छा , वरदान , देनं ,आहेत . अल्लाह चीच मान्यता आहे , अल्लाह चेच शब्द , ध्वनी समजून , लगेच त्यांचे खास सहकारी मित्र हजरत बिलाल रजि. भारदस्त व्यक्तिमत्व ,पहाडी परंतु मंजुळ आवाजाचे धनी ., यांना बोलावून पहाटेची नमाज ए फजर ला .
( हे ' आजान " चे पवीत्र शब्द व ध्वनी )
(१) " अल्लाहा -हु - अकबर .. अल्लाहा- हु - अकबर .."
( अर्थात :- अल्लाहा (ईश्वर ) सर्व श्रेष्ठ आहे . अल्लाहा (ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहेत.)
" अल्लाहा- हु - अकबर ... अल्लाहा- हु- अकबर "
(अर्थात:- अल्लाहा (ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहे .. अल्लाहा (ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहेत.)
(२) " अशहदु -अल - ला- ई-लाह-ईल्लल्लाह....."
(अर्थात:- मी ग्वाही देतो की, अल्लाहा (ईश्वरा)च्या शिवाय कोणीही पुज्य नाही .)
" अशहदु -अल- ला- ई- लाह - ईल्लल्लाहा ...."
( अर्थात:- मी ग्वाही देतो की, अल्लाहा (ईश्वरा) च्या शिवाय कोणीही पुज्य नाही.)
(३)" अशहदु- अनन - मुहम्मद - अर - रसुलुल्लाहा ...."
(अर्थात:- मी ग्वाही देतो की , मुहम्मद - स्वल्लल्लाहा - अल्लाहा (ईश्वरा)चे प्रेषीत आहेत.)
" अशहदु - अन न- मुहम्मद - अर - रसुल्लल्लाहा ....'
(अर्थात:- मी ग्वाही देतो की, मुहम्मद - स्वल्लल्लाहा अल्लाहा (ईश्वरा)चे प्रेषीत आहे.)
(४) " हयया - अल-स-सलाह...."
अर्थात:- नमाज ( सलाहा ) कडे ..या )
" हयया - अल - स-सलाह....."
(अर्थात:- नमाज ( सलाह ) कडे या )
(५) " हयया - अल - फलाहा...."
(अर्थात:- सफलते -(कल्याणा) कडे - या...)
" हयया -अल- फलाहा ....)
अर्थात :- सफलते -(कल्याणा) कडे ..या..)
(६) "अल्लाह हु - अकबर .... अल्लाहाहु - अकबर ..
"अल्लाहा हु - अकबर ..... अल्लाहा हु - अकबर ..
(अर्थात;- अल्लाहा ( ईश्वर) सर्व श्रेष्ठ आहे ... अल्लाहा (ईश्वर) सर्वश्रेष्ठ आहे....)
(७) " ला- ई- लाहा - ईल्लल्लाहा...)
(अर्थात:- अल्लाहा ( ईश्वरा) शिवाय कोणीही पुज्य नाही....)
मदीनेच्या मस्जिद उंचवट्यावर जाउन . भारदस्त आवाजात आहिस्ता-आहिस्ता अल्लाहा ने दाखविलेल्या मंजुळ आवाजात आजान दिली ...हाच आजानचा ध्वनी संपूर्ण सृष्टी मधे जगातल्या सर्व शहरं, गल्ली, गावं, खेड्यां नी पाच(५) वेळा धुमधमत आहे..
ज्या ज्या वेळेला आजान पुकारली जाते, त्या प्रत्येक वेळा जगात निगेटिव्ह एनर्जी पसलेली असते .आशा वेळेस च आजान ही पॉझिटिव्ह एनर्जी पसरविण्याचे महत्त्वाचे काम करीत असते .
जगात कुठेही काही आपादा आल्या उदाहरणार्थ :- नदीला पुर येवून पुर्ण गावं पाण्यात गेलं, भयानक दुष्काळी परिस्थिती , धरणीकंप वारंवार होत आहे , एखाद्या गावात काही विशिष्ट संकटं आली , महामारी , आशा वेळी गावातील मस्जिद मधे किंवा आप आपल्या घरावर जाउन " अजान पुकारले " जातात. ज्या गावात , खेड्यात , शहरात जेष्ठ नागरिकांना या गोष्टीचे ज्ञान, माहिती आहे , त्या त्या ठिकाणी जेष्ठ नागरिक तरुणांना " अजान पुकारण्यांस " सांगितले जाते ..करोना महामार्गामधे भारतात खुप विविध ठिकाणी खेड्यांत , शहरात " अजान पुकारले " गेली .हे सत्य परिस्थिती आहे..
प्रेषीत मुहम्मद स्व नी सांगितले की, " ज्या ज्या वेळी आजान चे ध्वनी उच्चारले जातील त्या त्या वेळी शंभर मिटर अंतरावरील शैतान हा भितीने घाबरून पळून जातो. "
याचाच अर्थ असा की , आपल्या मधे सकाळी सकाळी आलेली मरगळ ,आळस ,व नकारात्मक विचार , नकारात्मक स्वप्न . नकारात्मक एनर्जी .अजानच्या मंजुळ स्वरा(ध्वनी)ने सकारात्मक बदल घडवून आणुन मनाप्रमाणे प्रसन्ना येते ,
.एक आनंदी पहाट...उजेडत असते....
( मित्रांनो आपल्या मित्रांना आवश्य पाठवा कृपया खाडाखोड करु नका . प्रतिक्रिया अवश्य कळवा..)
डॉ सलीम सिकंदर शेख, बैतुशशिफा हॉस्पिटल श्रीरामपूर
