Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )- तालुक्यात सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या  बेलापुर विविध कार्यकारी सेवा संस्थेत सुधीर नवले अरुण पा नाईक रविंद्र खटोड यांच्या  शेतकरी जनता विकास अघाडीने बारा जागेवर विजय संपादन केला असुन शरद नवले व अभिषेक खंडागळे यांच्या गांवकरी मंडळाला केवळ एकाच जागेवर विजय मिळवीता आला तिसऱ्या शेतकरी परिवर्तन पँनलला तीन अंकी संख्याही पार करता आली नाही                         बेलापुर सेवा सोसायटीची १३ जागेकरीता निवडणूक घेण्यात आली होती तेरा जागेकरीता एकुण ३४ उमेदवार निवडणूक रिंगणात होते बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक व जनता अघाडीचे रविद्र खटोड यांचा शेतकरी जनता विकास अघाडी तर प्रकाश मेहेत्रे यांचा परिवर्त पँनल

निवडणूक लढवत होता सर्वसाधारण जागेकरीता शेतकरी जनता विकास अघाडीचे आठही उमेदवार निवडून आले निवडून आलेले उमेदवार व त्यांना मिळालेली मते  १)कुऱ्हे  अशोक रामभाऊ (३५४ ) २)नवले किशोर शंकर ( ३७२ ) ३)नवले सुधीर वेणूनाथ (३६८ ) ४) नाईक अरुण गुलाबराव (३७९ ) ५)पवार शेषराव भानुदास (३४५ ) ६)बोबले पंडीत(३३०) ७) मेहेत्रे विलास गंगाधर (३०३) ८)सातभाई राजेंद्र कचरु (३३५ ) अनुसुचित जाती जमाती राखीव ९)अमोलीक अंतोन विठ्ठल महीला राखीव १०)मेहेत्रे सविता तुकाराम (२९८ ) ११)ईतर मागास प्र वर्ग शिवाजी रामनाथ वाबळे (३७३ )१२) भटक्या विमूक्त जाती जमाती गवते विश्वनाथ पाराजी तर गांवकरी मंडळाच्या एकमेव  सौ भाग्यश्री भास्करराव खंडागळे  या विजयी झाल्या आहेत .निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक संदीप रुद्राक्षे यांनी काम पाहीले या वेळी पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा धायवट हवालदार अतुल लोटके पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे पोलीस नाईक गणेश भिंगारदे पोलीस नाईक भारत पंडीत पोलीस नाईक किरण गीरमे निखील तमनर होमगार्ड मधुकर काळे सोमनाथ भगत किरण गिरमे आदिंनी चोख बंदोबस्त ठेवला .विजयानंतर शेतकरी जनता विकास अघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली .

बेलापुर  (प्रतिनिधी  )-एकीकडे विज्ञानाने मानवाची प्रगती होत आसतानाच बेलापूरात निवडणूक निमित्ताने गंडेदोरे केल्याचा प्रकार समोर आला असुन ग्रामपंचायत निवडणूकी नंतर सोसायटी निवडणूकीतही असाच प्रकार झाल्याचे उघड झाले आहे.  वर्षभरापूर्वी बेलापुर ग्रामपंचायतीची निवडणूक झाली होती त्या निवडणूकीत वाग्यांची पुजा करुन त्यास टाचण्या टोचून ते ठराविक ठिकाणीच टाकण्यात आले होते त्याचा परिणाम बेलापुर ग्रामपंचायत निवडणूकीत किती झाला? हे ते तंत्र मंत्र करणारांनाच ठाऊक! परंतु आता बेलापुर सोसायटी निवडणूकीतही अशाच प्रकारे तंत्र मंत्र टोटके करण्याचा प्रकार उघड झाला आहे असे टोटके करुन काहीच होत नसते है माहीत असुनही आठ दिवसापूर्वी आमावस्येच्या दिवशी नारळाची पुजा करुन ते ठराविक ठिकाणी ठेवण्यात आले होते आज बेलापुर सेवा संस्थेचे मतदान होत आहे त्या मतदान केंद्रासमोरच असे टोटके केल्याचे आढळून आले असून हा केवळ अंधश्रध्देचा प्रकार आहे विकृत मनोवृत्तीचा प्रकार असावा अशा मनोविकृताचा शोध घेण्याची नागरीकांची मागणी आहे . बेलापुर वा परिसरात

दिवसेंदिवस बुवाबाजी छाछूगीरी करणारांची संख्या वाढत आहे लोकांना खोटेनाटे अश्वासने देवुन आर्थिक लुबाडणूक करणाराचे मोठमोठे अड्डे तयार झालेले आहेत बेलापुर परिसरात चालणारी बुवाबाजी बंद करण्यासाठी अंधश्रध्दा निर्मूलन समीतीने या परिसरात व्यापक जनजागृती मोहीम राबवुन लोकांच्या श्रध्देचा फायदा घेवुन फसवणूक करणाराविरुध्द कारवाई करावी अशी मागणी सूज्ञ नागरीकाकडून केली जात आहे .

बेलापूरः(प्रतिनिधी  )-बेलापूर सोसायटीचे विद्यमान सत्ताधारी खोटं बोलं पण रेटून बोल ह्या गोबेल्स नितीत पारंगत आहेत.संस्थेच्या विकासाच्या गोंडस नावाखाली स्वंः हित साधण्याचे काम केले असुन त्यांचे पितळ उघडे पडले आहे.त्यामुळेच या निवडणुकीत सत्तापरिवर्तन आणि गावकरी मंडळाचा विजय निश्चित असल्याचा विश्वास जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी व्यक्त केला आहे.                                              जि प सदस्य शरद.नवले पुढे म्हणाले की,सत्ताधा-यांचे कारनामे सभासदांच्या लक्षात आले आहे.त्याच त्याच नेत्यांना आणि त्याच त्या चेहऱ्यांचा सभासदांना वीट आला आहे.जेथे तेथे ठराविक नेत्यांचीच टोळीच दिसत आहे . पदे फक्त यांनाच हवी असतात.सामान्य कार्यकर्त्यांना फक्त स्वार्थापुरते वापरायचे आणि स्वार्थ साधून झाला की वा-यावर सोडायचे हि यांची रित आहे.आता माञ सभासदांना बदल हवा आहे आणि तो होणारच यात शंका नसल्याचे .नवले म्हणाले.                             यांच्या ताब्यात पंधरा वर्षे ग्रामपंचायत होती.तेथे यांनी काय प्रताप केले हे जनतेला ठाऊक आहे.एका माजी सरपंचावर अपाञ होण्याची नामुष्की आली.अनेक प्रकरणी चौकशीला सामोरे जावे लागले.जे ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते ते कारभार हाकीत होते.कोणाची बिले काढायची,कोणत्या  चेकवर सह्या करायच्या याबाबत सूचना देत होते.ग्रामपंचायत ही रिमोट नेत्याच्या मर्जीने चालत असल्यामुळे अनेक गैरप्राकार झाले ..तोच प्रकार सोसायटीतही चालत होता.चेअरमन नामाधारी सयाजीराव तर रिमोट नेता बाजीराव अशी अवस्था होती.पेट्रोल पंपावरुन कोणाला पेट्रोल व डीझेल उधारीवर दिले गेले आणि कोणाकोणाकडून वसूली केली गेली हे सभासदांना माहित आहे.जुना पेट्रोल पंप व आता नुतनीकरण केलेल्या पेट्रोल पंपाचे फोटो टाकून टिमकी वाजविली जात आहे पण यात सत्ताधा-यांची कर्तबगारी काय?हि नुतनीकरण कामे विक्रीच्या प्रमाणात आॕईल कंपनी करते.पेट्रोल आणि डीझेलची घट हि प्रमाणीत घटीपेक्षा अधिक आहे.तसेच टेस्टिंगच्या नावाखाली आठवेळा ७६८ लिटर पेट्रोल काढले गेले.याची परस्पर विक्री झाली की कसे. तसे शेरेही कंपनी सेल्स  अधिका-यांनी वार्षिक समरी अहवाल व मासिक विक्री  पुस्तकात मारले आहेत.यावरुन यातही काळेबेरे असल्याचेच स्पष्ट होत आहे.तसेच पेट्रोलची अपेक्षित  विक्री एक लाख लिटरने तर डीझेलची अपेक्षित  विक्री दोन लाख लिटरने कमी झाली आहे  हे चांगल्या कारभाराचे लक्षण आहे का? पेट्रोल पंपात नफा झाल्याच बडेजाव केला जातो. पण पूर्वी पेट्रोलला प्रतिलिटर ७५पैसे कमिशन होते.ते आता  प्रतिलिटर ३रुपये २५पैसे तर डिझेलला पूर्वी प्रतीलिटर ४०पैसे कमिशन होते.तर आता प्रतिलिटर २रुपये २५पैसे मिळत आहे.कंपनीने कमिशनमध्ये घसघशीत वाढ केल्याने नफा दिसतोय.यात संचालक मंडळाची कर्तबगारी काय?तेव्हा खोटीनाटी माहिती देवून दिशाभूल करु नये असे श्री.नवले म्हणाले.             सोसायटी हि सभासदांच्या अर्थकारणाशी निगडीत आहे याचे भान सत्ताधा-यांना नाही.त्यांनी स्वतःचेच हित साधले आहे.संस्थेत गफले करुन सत्ताधारी मालामाल झाले आहे.हाच माल आता निवडणुकीत बाहेर पडणार आहे.सत्ताधा-यांना सत्तेची व पैशाची धुंदी आहे.पण सभासद उद्याच्या निडणुकीत  हि धुंदी उतरविल्याशिवाय राहाणार नाहित.गावकरी मंडळाने गेल्या वर्षभरात ग्रामपंचायतीत पारदर्शक कारभार केला आहे.विकासाची अनेक कामे अल्पावधीत केली आहे.लोकाभिमुख कारभार करुन जनतेचा विश्वास सार्थ ठरविला आहे.तसाच सभासदाभिमुख कारभार सोसायटीतही केला जाईल.यासाठी गावकरी मंडळाला विजयी करावे  असे आवाहनही नवले यांनी केले आहे.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या सर्व निवडणुका पूर्ण ताकतीने लढविण्यात येणार असुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे अवाहन मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी केले आहे .मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर तालुक्यामध्ये शासकीय विश्रामगृह येथे मनसेच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली होती या प्रसंगी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे म्हणाले की राज  ठाकरे यांच्या आदेशाने व पक्षाचे नेते बाळा नांदगावकर  यांच्या सूचनेने नगर जिल्हा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन आढावा बैठक घेण्याचे काम आम्ही चालू केली आहे प्रत्येक तालुक्यात जाऊन सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेण्याचे काम केले जाईल  येत्या स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये मोठ्या ताकतीने पदाधिकाऱ्यांनी निवडणूक लढवावी यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम जिल्ह्यातील आम्ही तिन्ही जिल्हाध्यक्ष करत आहोत तसेच श्रीरामपूर तालुक्यामध्ये पक्ष स्थापनेपासून आम्ही काम करत असताना अनेक अडचणींना सामोरे गेलो व पक्षाचे काम जोमाने करत आहोत प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्याच्या सुखात दुखात आम्ही सहभाग घेत असतो  श्रीरामपूर मध्ये मोठे संघटन तयार झाले आहे तसेच प्रत्येक निवडणुकीत आपले उमेदवार उभे करून निवडणूक लढलो परंतु पराभवाला सामोरे जावे लागले तरीही नाराज न  होता आम्ही काम करत राहिलो नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुका मध्ये काही ग्रामपंचायत मध्ये उमेदवार निवडून आले ग्रामपंचायतीमध्ये आपली सत्ता आली राज ठाकरे साहेब यांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचे संघटनेच्या वतीने केले जात आहे , विविध विषय घेऊन  रास्ता रोको मोर्चे अशा विविध प्रकारचे आंदोलने केलेली आहे व हिंदूंच्या रक्षणासाठी आम्ही रात्रंदिवस काम करत असतो व लव जीहाद च्या विरोधात सातत्याने आवाज उठवण्याचे काम आम्ही केलेले आहे  असे मनसे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे याप्रसंगी म्हणाले या आढावा बैठकी च्या अध्यक्षस्थानी नगर जिल्हा अध्यक्ष सचिन डफळ हे होते तर दक्षिण जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होते त्यांनी उपस्थित असलेल्या  सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना योग्य मार्गदर्शन करून पक्ष संघटन कसे वाढवावे येत्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने तयारी करून सर्व निवडणुकीमध्ये पदाधिकाऱ्यांनी काम करावे याचे मार्गदर्शन केले व कुठल्याही परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये आपले उमेदवार निवडूनच आले पाहिजे असे आदेश दिला व येत्या 13 तारखेला नगर येथे पक्षाचे नेते बाळा नांदगावकर साहेबांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये होणाऱ्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान करण्यात आले

आढावा बैठकीचे नियोजन  जिल्हा सचिव डॉक्टर संजय नवथर,  उपाध्यक्ष सुरेश जगताप, विधानसभा अध्यक्ष संतोष डहाळे,तालुकाध्यक्ष गणेश दिवसे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष विशाल शिरसाठ, तालुकाध्यक्ष मनविसे अक्षय सूर्यवंशी कामगार सेना तालुका अध्यक्ष प्रवीण रोकडे यांनी केले होते 

याप्रसंगी बबन महागडी भास्कर सरोदे दीपक सोनवणे मनोज जाधव राजू शिंदे संतोष भालेराव लखन कडवे गणेश राऊत लक्ष्मण लोखंडे अनिल शिंदे दादासाहेब बनकर रोहित जवंजाळ आकाश कापसे सचिन धोत्रे प्रवीण कारले महादेव वहाळ समर्थ सोनार संदीप विषांबर अमोल साबणे निलेश सोनवणे ईश्वर जगताप किरण रणवरे महेश कोलते लक्ष्मण लोखंडे सोमनाथ कासार रतन वर्मा निकेतन रोकडे ज्ञानेश्वर काळे अभंग चेतन दिवटे अक्षय अहिरे संतोष आवटी नितीन खरे अनिल बोरुडे दीपक लांडे अनिल शिंदे लक्ष्मण शिंदे रामदास फिलगर सुदाम गायकवाड

 लखन शिंदे प्रथमेश गायकवाड सुमित गोसावी ओमकार अनाप संदीप देठे सुधीर मोठे कृष्ण पठारे गणेश पठारे नंदू भुजबळ किशोर थोरात रोहित वेताळ कुंदन वेताळ अक्षय गुजर राहुल शिंदे विकी शिंदे अतुल खरात आदिसह कार्यकर्ते उपस्थित होते

नवी दिल्ली वृत्तसंस्था-ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न याचे वयाच्या ५२ व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झाले. फॉक्स क्रिकेटने ही माहिती दिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग याने ट्विट करून शोक व्यक्त केला. तसेच काही परदेशी प्रसारमाध्यमांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. वॉर्नच्या मॅनेजमेंट टीमकडूनही एक स्टेटमेंट जारी करून याबाबत माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे. वॉर्न थायलंड येथे होता आणि तेथे त्याला हार्ट अटॅक आल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.शेन वॉर्नच्या बाबतीत एक विचित्र बाब म्हणजे त्याने जे शेवटचं ट्वीट केलं, ते एका माजी क्रिकेटरच्या मृत्यूचं होतं.रॉड मार्श गेल्याची बातमी ऐकून दुःख झाले. तो एक महान खेळाडू होता आणि अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणास्रोत होता. रॉड याला क्रिकेटची खूप काळजी होती आणि त्याने क्रिकेटमध्ये खूप योगदान दिलं. त्याच्या आत्म्यास शांती लाभो असं ट्वीट शेन वॉर्नने निधनाच्या १२ तास आधी केलं होतं. पण दुर्दैव म्हणजे, त्याच सायंकाळी शेन वॉर्नचे दु:खद निधन झाले.शेन वॉर्न हा त्याच्या व्हिलामध्ये तो उपचारादरम्यान प्रतिसाद देत नव्हता. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांनंतरही त्याला पुनरुज्जीवित करता आले नाही, असे त्याच्या मीडिया टीमने जारी केलेल्या निवेदनात नमूद केलं आहे. तसेच, शेन वॉर्नबद्दल सेहवाग शोक व्यक्त करताना म्हणाला, विश्वास बसत नाही. जगातील दिग्गज फिरकीपटू, सुपर स्टार शेन वॉर्नने जगाचा निरोप घेतला. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.

बेलापूरः(प्रतिनिधी  )-सत्तेतून पैसा व पैशातून राजकारण हि विरोधकांची निती आहे. संस्थांच्या बेकायदेशीर कामातून विरोधकांनी मोठी माया कमविली असून त्याचा वापर राजकारणासाठी सत्तेसाठी  केला जात असुन ही वृत्ती निवडणूकीत ठेचुन काढा व गांवकरी मंडळाला विजयी करा . असे अवाहन  संस्थेचे माजी चेअरमन सुधाकर खंडागळे व भास्कर बंगाळ यांनी केले आहे .    प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात खंडागळे व बंगाळ यांनी पुढे म्हटले आहे की  ,जेथे जावू तेथे खाऊ हे विरोधकांचे  धोरण आहे.आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना कामे देवून टक्केवारी करायची  व आपला स्वार्थ साधायचा हे यांचे उद्योग आहेत.सोसायटीच्या पेट्रोल पंपाचा घोटाळा सभासदांना ठाऊक आहे.याबाबत श्री.शरद नवले यांनी तक्रार केली होती.त्याची चौकशीही झाली.चौकशीत पेट्रोल व डीझेल घटीबाबतचे आरोपात तथ्य असल्याचे आढळले.सहाय्यक निबंधक सहकारी संस्था ,श्रीरामपूर यांनी २६/१०/२०१८ रोजी याबाबत कारणे दाखवा नोटीसही बजावली.त्यात पेट्रोल व डीझेल घटीमुळे एकुण ५लाख १ हजार ३७८इतके आर्थिक नुकसान झाले.तसेच संस्थेच्या स्वस्त धान्य दुकान नं २०/१ व नं ९४/२ मध्ये हमालीसाठी एकुण रु.८४,९८९आणि वाहतुक खर्चापोटी एकुण ५३,८१०खर्च बेकायदेशीर दाखविला.सबब महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८(अ) नुसार कारवाई कां करु नये असे स्पष्ट नमूद केले होते.पुढे हे प्रकरण राजकीय दबाव आणि तडजोडी करुन मिटविले.तथापि या प्रकरणी श्री.शरदराव नवले यांनी सहकार आयुक्त नाशिक यांच्याकडे अपील केलेले आहे कोरोनामुळे खटला चालला नाही नाहीतर केव्हाच कारवाई झाली असती  सदर प्रकरण मिटलेले नाही चूकीच्या कामाची वसुली केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही .सत्ताधा-यांनी आपण साव  असल्याचा आव आणू नये.प्रत्येक ठिकाणी  नाममाञ सरपंच , चेअरमन निवडायचे.त्यांना नाममात्र ठेवायचे अन काम मात्र आपण उरकायचे नावापुरते व सह्यापुरते त्यांना ठेवायचे आणि कारभार माञ रिमोट कंट्रोलने चालवून वेगवेगळे उद्योग करायचे आणि परस्पर मलिदा लाटायचा हि यांची कार्यपध्दती आहे.याच कमाईच्या जोरावर निवडणुकीत पैसे उधळायचे अन मतदारांना विकत घेण्याचा प्रयत्न करायचा पण  तुमच्या काळ्या पिशवीला अन बाकीच्याही प्रलोभनाला मतदार भुलणार नाही हे ग्रामपंचायत निवडणूकीत दाखवून दिले आहे आता सोसायटीतही तेच होणार आहे काही लोक स्वंयः घोषीत नेते होतात जे नेते आहेत तेच निवडणूक लढवितात ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविली जाते ते नेते असतात उमेदवार नसतात हे ही यांना माहीत नाही अशा मतलबी नेत्याचा डाव मतदार उधळून लावतील असा विश्वास गावकरी मंडळाचे  श्री.खंडागळे व श्री बंगाळ यांनी व्यक्त केला आहे.

नवीन नाशिक प्रतिनिधी-अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गुन्ह्यातील हस्तगत केलेला आठ लाख रुपये किंमतीचा सोने चांदीचे दागिने दुचाकी, मोबाईल फोन असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने उपायुक्त सोहेल शेख ,अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी भगीरथ देशमुख , यांच्या हस्ते मूळ तक्रारदारांना परत करण्यात आला.यावेळी राजेंद्र बोरसे ५ लाख रुपये किंमतीचे सोने चांदीचे दागिने,ज्योती चव्हाण ९२ हजार रुपये किंमतीची सोन्याची लगड, मंजीरी मांडोळे ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत,बाळू खाडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,परशुराम राजभोर ८ हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन,राजु चौधरी २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,रोहीत अहिरे यांची ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी,कैलास काळे ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी,समीर मांडवडे २० हजार रुपये किंमतीची दुचाकी,ताई पगारे ५ हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन असा एकुण ८ लाख १५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल तक्रारदारांना न्यायालयाच्या आदेशाने परत करण्यात आला.सदरच्या कामगिरीमध्ये अंबड पोलीस ठाणेचे मुद्देमाल कारकुन पो हवा, छबु सानप, पो. ना. समाधान चव्हाण यांनी केली. यावेळी तक्रारदारांनी समाधान व्यक्त करत पोलिसांचे आभार मानले.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget