Latest Post

(शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ) - सध्या कोरोना मुळे देशभरात सर्वत्र संकटकालीन परिस्तिथी निर्माण झालेली असतांना लॉक डाऊन काळात सर्वजण घरात असतांना पत्रकार मात्र इतर कोरोना वायरीयर्स  प्रमाणे स्वतःचा जीव धोक्यात घालून घरात बसलेल्यांना अपडेट बातम्या व  परिस्तिथीचा आढावा देण्यासाठी रात्रदिवस प्रयत्न करत असतांना या लोकशाहीचा चौथास्तंब समजल्या जाणार्या प्रसिद्दी माध्यमांना  मात्र शासकीय अधिकारी फक्त त्यांच्या स्वार्था पुरतेच वापर करीत आहेत  आपला उदोउदो करण्यासाठी पत्रकारांना निमंत्रण दिले जाते पत्रकार परिषद घेतली जाते पण पाणी जिथे मुरते तेथे मात्र पत्रकारांना मुद्दाम दूर ठेवले जाते यामुळे सध्या प्रसिद्दी माध्यमातून ह्या  शासकीय अधिकारी विरोधात तीव्र नाराजगी पसरली आहे प्रसिद्दी माध्यमे शासकीय अधिकारी ज्या खुर्चीवर बसले आहेत जणू आपली स्वताची प्रॉपर्टी समजत आहे कि काय अशी शंका येऊ लागली आहे सध्या कोरोनाच्या आपत्तीकालीन परिस्तिथीत जशे डॉक्टर पोलीस सफाई कामगार जीव धोक्यात घालून देशा साठी काम करीत आहेत तशेच पत्रकार हि देशा साठी काम करीत आहे शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना शासन पगार देते शासन कडून गाड्या  देतात त्या गाड्या मध्ये पेट्रोल डिजेल शासनाकडून दिले जाते परंतु पत्रकाराला कुठेही पगार दिला जात नाही कुठलेही सौरक्षण नसतांना दिवस रात्र पत्रकार हा काम करीत असतो त्यामुळे पत्रकाराचीही ह्या काळात महत्वाची भूमिका आहे अनेकदा पत्रकारांना अडचणी निर्माण केल्याचे जातात केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सुद्धा पत्रकारांना अडवू नये या कोरोना आपत्तीतजनक काळात पत्रकारांचीही भूमिका महत्वाची आहे पत्रकारांमुळे सत्य उजेडात येते पत्रकारांना अडविले तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही जावडेकर यांनी दिला असतांना काल साईनगर शिर्डी रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेश मधील कामगारांना श्रमिक रेल्वे सोडण्यात आली होती जिल्ह्यातून हि पहिली रेल्वे सुटणार असल्याने पत्रकार तेथे जात असतांना रेल्वे पोलीसान्नि मात्र आडमुठे धोरण ठेवले पत्रकारांनी ओडखपात्र दाखवून हि काही पत्रकारांना सोडण्यात आले नाही याची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे अर्ज जनमत मराठी चे उप संपादक बिंदास न्यु चे उप संपादक व दैनिक सैदर्शन चे संपादक यांनी संबंधित विभागांना केले आहे जनमत मराठी साठी जितेश लोकाचंदानी शिर्डी अहमदनगर.

बुलडाणा - 7 मे
मागील आठवड्यात जलंब ठाणे अंतर्गत माटरगांव जवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाने पहाटे एका पोलिस कर्मचाऱ्याला चिरडले होते. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात पोलिस विभागाने वाळू तस्करांवर धडक कार्रवाई सुरु केली असून रात्री बुलडाणा एलसीबीच्या पथकाने 4 टिप्पर तर पकडलेच परंतु या पथकाचा एका रिकामे टिप्पर व स्विफ्ट डिज़ायर कारने पाठलाग करणारे  6 वाळू तस्कर ही पकडले आहे.या धडक कार्रवाइत एलसीबी ने एकूण 5 टिप्पर, 1 स्विफ्ट डिजायर कार व 6 आरोपी पकडले आहे.पाठलाग करणाऱ्या वाळू तसकरांवर अंढेरा व देऊळगांव राजा पोलिस ठाण्यात विविध कलमानवय गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या कार्रवाई नंतर खडकपूर्णा नदितुन वाळू तस्करी करणाऱ्यांचे धाबे दनानले आहे.
      खामगांव तालुक्यातील जलंब पोलिस ठाणे हद्दी जवळून पूर्णा नदी वाहते.रात्रीच्या वेळी येथून मोठ्या प्रमाणात वाळू तस्कर आपल्या वाहणाने रेती घेऊन जातात.मागील 29 अप्रिलच्या रात्री जलंब ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचारी उमेश शिरसाट यांनी एका वाळू घेऊन जाणाऱ्या वाहनाचा पाठलाग केला असता चालकाने त्यांच्या अंगावरुन आपले वाहन नेले त्या मुळे पोलिस शिपाई उमेश शिरसाट जागेवरच ठार झाले होते.वाळू तस्कर किती माजले हे या घटने नंतर आपले लक्षात येईल. जिल्ह्यातील वाळू तसकरांचे मुसक्या आवळने गरजेचे आहे,हे ळक्षात आल्याने संपूर्ण जिल्ह्यात पोलिस विभागाने करवाया सुरु केले आहे.
       जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या आदेशाने व एलसोबीचे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री एलसीबीचा एक पथक देऊळगाव राजा तालुक्यात रवाना झाला. अंढेरा पोलिस स्टेशन हद्दीतील मेरा फाटा येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या 4 टिप्परवर कारवाई करण्यात आली.या कार्रवाईसाठी निघालेल्या पोलिस पथकाच्या वाहनचे रिकामे टिप्पर व स्वीफ्ट डिज़ायर कारने पाठलाग करून सतत लक्ष ठेवणारे 6 इसमाना त्यांच्या ताब्यातील  टिप्पर व स्विफ्ट कारसह ताब्यात घेण्यात आले आहे.4 अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर विरुद्ध कार्रवाई करण्यासाठी मा.तहसीलदार चिखली यांना पत्र देण्यात आले आहे.पो.स्टे.अंढेरा येथे स्विफ्ट कार मधील आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम कसरे, आत्माराम बळीराम सोलंकी,अमोल गजानन माळोदे सर्व रा.चिखली तसेच मोकळे टिप्पर मधील आरोपी अब्रार शकील अत्तार रा.चिखली, चालक विठ्ठल सुनील इंगळे  व कंडक्टर राहुल अवसरमोल दोघे रा.चांधई यांच्या विरुद्ध देऊळगांव राजा पो.स्टे. मध्ये कलम 188,269,270,271 भादवि सह 2,3,4 साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम 1897, सह महाराष्ट्र कोविड 19 उपाययोजना नियम 11 सह कलम 158/177, 3/181 मोटर वाहन कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे.वाळू माफिया विरुद्ध केलेली या धडक मोहिम मध्ये बुलडाणा एलसीबीचे पीएसआई इमरान इनामदार,पीएसआई मुकुंद देशमुख, एएसआई राठोड, एएसआई भुसारी,पोलिस कर्मचारी  चांदूरकर,रघु जाधव,दराडे, चिंचोले,वारुळे,असोलकर,सतीश, चालक काळे,चालक राहुल बोर्डे यांचा सहभाग होता.

संगमनेर (शहर प्रतिनिधी)- दारूचे दुकान उघडल्यानंतर दारू खरेदीसाठी लाईनमध्ये उभे राहणार्‍या अनेक गरीब तळीरामांना मद्यखरेदी चांगलीच महागात पडली आहे. गरीब म्हणून ज्यांना मोफत जेवणाचे डबे दिले जातात तेच गरीब शेकडो रुपये खर्च करून मद्य खरेदी करताना आढळल्याने संतापलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या तळीरामांचे जेवणाचे डबे त्वरीत बंद करण्याचा निर्णय घेतला. तब्बल 100 जण आजपासून मोफत डब्यांना मुकणार आहेत.शहरात करोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. संचारबंदीच्या काळात अनेकांची गैरसोय झाली. शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना अंंमलात आणल्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व इतर स्वयंसेवी संस्थांनी प्रशासनाला साथ देत नागरिकांना मदत कार्य सुरू केले.शहरातील गरजू नागरिकांना दररोज 800 मोफत जेवणाचे डबे पुरविण्याचे काम या स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केले. यामुळे अनेकांची जेवणाची गैरसोय दूर झाली. अनेक दिवस नागरिक या डब्यांचा आनंद घेत आहेत. आपण गोरगरिबांची सेवा करत असल्याचा आनंद विविध स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते घेत असताना, काल त्यांच्या आनंदावर विरजण पडले. आपण चुकीच्या लोकांची सेवा करत असल्याचे जाणवल्याने पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली.जिल्हाधिकार्‍यांनी देशी व विदेशी दारू सुरू करण्याचे आदेश दिल्यानंतर काल सकाळी शहरातील विविध दारूची दुकाने सुरू झाली. दारू खरेदी करण्यासाठी मोठी रांग दिसत होती. काही स्वयंसेवकांनी या रांगेचे व्हिडिओ चित्रीकरण केले. या रांगेत दारू खरेदी करण्यासाठी विविध ठिकाणचे नागरिक दिसत होते. गोरगरीब म्हणून ज्यांना जेवणाचे डबे दिले जायचे असे 100 नागरिकही दिसले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी या नागरिकांचे जेवणाचे डबे बंद करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करत जेवणाचे डबे बंद करण्यात आले. जेवणासाठी पैसे नसणार्‍यांंकडे दारूसाठी पैसे असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

नेवासा - तालुक्यातील खडका फाटा येथील मे. भांगे ऑरगॅनिक केमिकल्स लिमिटेड या कारखान्याने सॅनिटायझर निर्मीतीसाठीचे अल्कोहोल अवैधरित्या मद्य निर्मीतीसाठी विक्री केल्याची घटना घडली असून मद्यासाठी विकलेले हे अल्कोहोल मंगळवार दि.5 रोजी राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे येथील भरारी पथकाने पकडले असून 6 आरोपींना अटक करण्यात आले आहे.पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्र.1चे अधिक्षक यांनी अहमदनगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात अवैधरित्या मद्यार्काची वाहतूक होत असताना दि. 03 जानेवारी 2020 रोजी गुन्हा क्र. 1/2020 नोंद केला होता. सदर तपासाच्या अनुषंगाने न्यायालयाच्या आदेशानुसार संशयितांना आठवड्यातून एकदा हजेरी लावण्याचे आदेशित केलेले होते. त्यानुसार संशयितांची नियमित चौकशी करुन त्यांच्याकडुन अवैध मद्य निर्मीती व विक्रीबाबत माहिती घेण्यात येत होती.सदर संशयिताकडुन मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा या ठिकाणी सॅनिटायझर निर्मीती घटकामध्ये अवैधरित्या मद्यनिर्मीती साठी मद्यार्क छुप्या पध्दतीने देत असलेबाबत माहिती मिळाली. सद्यस्थितीत कोविड-19 या विषाणुचा अनुषंगाने तसेच लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अवैधरित्या मद्यनिर्मीती व विक्री होऊ नये त्याअनुषंगाने व माहितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उक्त ठिकाणी छापा टाकण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक संतोष झगडे, तसेच पराग नवलकर यांनी स्वतः विशेष पथकासमवेत सदर कारवाई केली.नेवासे तालुक्यातील मे. भांगे ऑरगॅनिक केमिकल्स लि. या ठिकाणी सॅनिटायझर निर्मीतीसाठी परवानगी अन्न व औषध प्रशासन यांचेकडून घेतली होती. सॅनिटायझर निर्मीतीच्या नावाखाली अवैधरित्या मद्यार्क हे मद्य निर्मीतीसाठी छुप्या पध्दतीने दिले जात असल्याचे दिसून आले. सदर छाप्यात पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त करण्यात आला.40 हजार 535 लिटर मद्यार्क (अल्कोहोल), तीन वाहने (टँकर- 2, चारचाकी 1) मद्यार्क किंमत न 20 लाख 67 हजार 282 रुपये दोन टँकर किंमत 43 लाख रुपये तसेच चार चाकी किंमत  तीन लाख रुपये व इतर मुद्देमाल 8 हजार 300 रुपये असे एकुण मुद्देमाल किंमत 66 लाख 75 हजार 585 रुपये सह 6 आरोपी अटक करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींगध्ये उस्मान सय्यद शेख, संजय भाऊसाहेब भांगे, ज्ञानेश्वर विष्णु मगर, तानाजी सखाराम दरांडे, शामसुंदर वसंतराव लटपटे, शिवाजी भागुजीराव शिंदे यांचा समावेश आहे.सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्कचे पुणे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुर्वे, याच विभागाचे अधिक्षक संतोष झगडे व पराग नवलकर (अहमदनगर)यांनी स्वत: तसेच राज्य उत्पादन शुल्कचे निरीक्षक अनिल पाटील (अहमदनगर), दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव, दिपक सुपे तसेच जवान सागर धुर्वे, गोरख नील, व तात्या शिंदे यांनी सहभाग घेतला, पुढील तपास राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक सुरज दाबेराव (पुणे) हे करीत आहेत.

आता सकाळी ०५ ते सायंकाळी ०५ वाजेपर्यंत पेट्रोल विक्रीस परवानगी
अहमदनगर, दि. 06 - अहमदनगर जिल्ह्याच्या महसूल सीमा हद्दीमध्ये दररोज पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्री वेळ वाढविण्यात आली आहे. आता सकाळी  ०५ ते सायंकाळी ०५ अशी विक्रीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. डिझेल विक्री पूर्वीप्रमाणेच २४ तास सुरु राहील. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
            जिल्ह्यातील कंटेन्मेंट झोन वगळता सार्वजनिक सोईसुविधांच्या अनुषंगाने पेट्रोल आणि एलपीजी इंधन विक्रीची वेळ वाढविण्यात आली आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंड संहिता   (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतूदीनुसार कारवाईस पात्र राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांना,सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा  दि.06-शिर्डी शहर परिसरातील नगरपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक बारामध्ये मधील कोरोना पॉझिटिव्‍ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तिंना अहमदनगर येथे वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तपासणीनंतर संबधितांना निघोज ता.राहाता येथील श्री साईबाबा संस्थानच्या साई आश्रम फेज-2 धर्मशाळा, हेलीपॅड रोड येथील विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक खबरदारी घेण्यात येत असून नागरिकांनी घाबरुन न जाता प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.
            प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, शिर्डी नगरपंचायतचे मुख्याधिकारी सतिष दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ गोकुळ घोगरे, शिर्डी पोलीस, नगरपंचायतचे कर्मचारी, वैद्यकीय पथकाने या परिसरास तातडीने भेट देऊन आवश्यक उपाययोजना केल्या. बाहेरील व्यक्तींना गावात प्रवेश देऊ नये, जर कोणी बाहेरील व्यक्ती आली तर त्याची माहिती तात्काळ प्रशासनास देण्यात यावी. या भागातील रहिवाशांनी तसेच शिर्डी शहरातील नागरिकांनी घाबरून न जाता  घरीच थांबावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी हाच उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सूचित केले. 
            साथ रोग प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार प्रशासनाने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी विनाकारण गदी करु नये तसेच सोशल मिडीयातून अफवा पसरवू नये. प्रशासनातील सर्व  यंत्रणा नागरिकांच्या सोईसाठी अहोरात्र कार्यरत आहेत. जे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत, ते नागरिकांच्या हितासाठीच आहेत, त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे असे आवाहन प्रांताधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी गोविंद शिंदे यांनी केले आहे.

वैद्यकीय तपासणी करुन प्रशासनाने पुरविल्या विविध सुविधा  शिर्डी प्रतिनिधी- जय शर्मा ,दि.6: कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनमुळे शिर्डी आणि परिसरात अडकून पडलेल्या उत्तर प्रदेश राज्यातील 1251 कामगार व त्यांचे कुटुंबिय यांना आज दुपारी शिर्डी रेल्वेस्थानकावरुन विशेष रेल्वेने टाळयांच्या गजरात उत्तर प्रदेशातील लखीमपूर जिल्हयाकडे रवाना करण्यात आले. गुरुवारी, दिनांक 7 मे रोजी सायंकाळी सात वाजेपर्यत सदरहू रेल्वे लखीमपूर येथे पोहोचेल.
           राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हयात संचारबंदी जारी करण्यात आली असून लॉकडाऊन आदेशीत करण्यात आले आहे. यामुळे राज्याच्या विविध भागात अन्य राज्यातून आलेले कामगार, नागरिक,पर्यटक,विद्यार्थी आणि भाविक विविध ठिकाणी अडकून पडले होते. या सर्वांना विहित प्रक्रिया पार पडून त्यांच्या गावी आणि राज्यात जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे शासनाने
 आदेशित केले होते. संबधित तहसिलदार तथा आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 अन्वये घटना व्यवस्थापक यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले होते. यासंबधीची विहित प्रक्रिया तहसीलदार कुंदन हिरे तसेच तालुका प्रशासनातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडून संबधितांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी सर्व व्यवस्था केली. साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. गत दोन दिवसांपासून ही प्रक्रिया पार पाडण्यात येत होती.
            लॉकडाऊनमुळे शिर्डी येथे अडकून पडलेल्या जवळपास 1484 जणांनी त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी तालुका प्रशासनाकडे विनंती अर्ज सादर केले होते. त्यापैकी सोशल डिस्टन्सींगचे पालन करुन 1251 जणांची रवानगी आज रेल्वेद्वारे करण्यात आली. यामध्ये 752 प्रौढ,314 अर्धे तिकीट प्रवासी आणि 185 चार वर्षाखालील बालकांचा समावेश आहे. बावीस डब्यांच्या रेल्वेमध्ये प्रत्येक डब्यात पन्नास प्रवाश्यांची सोय करण्यात आली होती. या सर्वांची योग्य ती वैद्यकी तपासणी करण्यात आली होती. यासाठी  तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संजय गायकवाड यांच्या
मार्गदर्शनाखाली सहा पथके स्थापन करण्यात आली होती. विशेष रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी साई संस्थानतर्फे जेवणाची, पाण्याचे पाऊच तसेच फूड पॅकेट पार्सलची व्यवस्था करण्यात आली होती. रेल्वेस्टेशनपर्यत त्यांच्या प्रवासाची व्यवस्था विविध शाळांच्या  मदतीने करण्यात आली होती. यासाठी तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांना जबाबदारी देण्यात आली होती. प्रवरा मेडीकल ट्रस्टच्यावतीने प्रवास करणाऱ्यांसाठी दोन हजार मास्कचा पुरवठा करण्यात आला होता. रेल्वेने प्रवासी पाठविण्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी श्रीरामपूरच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक दिपाली काळे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमपनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली  मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
            लॉकडाऊनसारख्या अडचणीच्याप्रसंगी स्थानिक तालुका प्रशासनाने आत्मीयतेने केलेल्या सहकार्यामुळे तसेच उपलब्ध करुन दिलेल्या सोयी सुविधांमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजूरांना त्यांच्या मूळ गावी जाणे शक्य झाले असून, त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मनापासून आभारी आहोत, अशी भावना यावेळी प्रवाश्यांनी व्यक्त केली. जवळच्या नातेवाईंकाकडे जात असल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

            यावेळी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गट विकास अधिकारी समर्थ शेवाळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी.एस.प्रसाद, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget