Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) स्कूल व्हॅन मधून विदेशी दारुची वाहतूक करून विक्री करणाऱ्या एकाला भिंगार कँम्प पोलिसांनी बुधवारी आज दुपारी अटक केली आहे. संजय एकनाथ लोणारे (रा. कापुरवाडी ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडे चार हजार ६८० रुपये किंमतीच्या ३६ विदेशी दारुच्या बाटल्या सापडल्या. पोलिसांनी व्हॅन (क्र. एमएच- 12 एएफ- 4889), दारु असा एक लाख ५४ हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लोणारे विरुद्ध भिंगार कँम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बुधवारी दुपारी शहर उपअधीक्षक संदीप मिटके, भिंगार कँम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील भिंगार पोलीस ठाण्यात असताना, सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील यांना माहिती मिळाली की, नगर ते कापुरवाडी रोडवर नागरदेवळे फाटा येथे नागरदेवळे कमानी जवळ एक इसम पिवळ्या रंगाच्या मारुती स्कूल व्हॅन मध्ये विक्री करत आहे. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक प्रवीण पाटील उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस नाईक आर. ए. सुद्रीक, पोलीस शिपाई सचिन धोंडे यांच्या पथकाने नागरदेवळे फाटा येथील कमानी जवळ जाऊन छापा टाकला. यावेळी स्कूल व्हॅनची तपासणी करण्यात आली. यामध्ये विदेशी दारू मिळून आली. पोलिसांनी लोणारे याला अटक केली असून व्हॅन व दारू जप्त केली आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर अधीक्षक डॉ. सागर पाटील, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार पोलिसांनी केली.

ब्रेकिंग न्यूज शिर्डी प्रतिनिधी जय शर्मा ,,,,,,,,,,,,,,,,
 शिर्डी येथील रहिवासी असलेले डॉक्टर कोरोणाग्रस्त असल्याचे येथील वैद्यकीय अधिकारी घोघरे यांनी बोलतांना सांगितले हे डॉक्टर येवला येथे सेवेत आहेत ते  दोन दिवसांपूर्वी शिर्डी येथे आपल्या घरी आले होते त्या मुळे त्यांच्या कुटुंबातील व डॉक्टरांच्या संपर्कात एकूण दहा लोकांना तपासणी साठी अहमदगर येथे तपासणी साठी नेले असल्याने प्रशासनाने तातडीने पाऊले उचलत त्यांच्या कुटूंबियांना तपासणी साठी येथील  ग्रामीण रुग्णालयात नेले नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहून घराबाहेर पडू नये असे बिंदास न्यूज कडून आवाहन करण्यात येत आहे तेव्हा जनतेने सहकार्य करावे

मालेगाव | प्रतिनिधी शहरात करोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. असे असतानाही मालेगावातील रस्त्यावरील अनावश्यक गर्दी काही कमी होण्याची चिन्हे दिसून येत नाहीयेत. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांची तात्पुरत्या स्वरुपात मालेगावी नियुक्ती करण्यात आली आहे.कायदा-सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. कडासने यांनी यापूर्वी मालेगावी कार्यभार सांभाळला आहे. त्यांचा शहरात जनसंपर्क दांडगा असल्याचे लक्षात घेत ही नियुक्ती करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.मालेगावात मोठ्या प्रमाणात करोनाचा उद्रेक झाल्यानंनंतरदेखील मालेगावातील गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. पोलीस यंत्रणा २४ तास कर्तव्य बजावत आहे. तरीदेखील नागरिक ऐकण्याच्या पलीकडे गेले आहेत.दरम्यान, आज सक्षम अधिकारी म्हणून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सुनील कडासने यांना तात्पुरत्या स्वरुपात नियुक्ती देण्यात आली आहे. एकीकडे रस्त्यावरील गर्दी आटोक्यात आल्याचे कुठेही चिन्ह दिसत नसताना संचारबंदीचे काटेकोर पालन करण्यास सांगणाऱ्या पोलिसांवर धावून जाण्याचे काही ठिकाणी प्रकार घडले आहेत.दुसरीकडे 70 अधिकारी व पोलीस बाधित झाले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग यांच्या सोबत आणखी एक सक्षम अधिकारी याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था विभागाने दिल्याने मालेगावी शांतता अबाधित राखण्याला मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

अहमदनगर, दि.५ : जिल्‍हयातील नागरी व ग्रामीण भागातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पिटल, क्लिनीक, डिझेल पंप, पेट्रोल पंप, एटीएम इ. अत्‍यावश्‍यक सेवा, कार्यालये, आस्‍थापना वगळून इतर सर्व दुकाने दि. १७ मे, २०२० रोजी पर्यंत संध्‍याकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत बंद ठेवण्‍याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. तसेच या कालावधीत उपरोक्‍त अत्‍यावश्‍यक सेवा वगळून इतर कामांसाठी व्‍यक्‍तीच्‍या हालचालीवर निर्बंध असल्याचेही या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. असल्‍याबाबत आदेशीत करीत आहे.ज्‍याअर्थी, राज्‍य शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्‍हीड 19) प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी राज्‍यात साथरोग अधिनियम 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदीनुसार अधिसुचना निर्गमित केलेली आहे. त्‍याअन्‍वये जिल्‍हाधिकारी हे त्‍यांचे कार्यक्षेत्रात कोव्‍हीड 19 वर नियंत्रण आणण्‍यासाठी व त्‍यांचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपाययोजना करणे आवश्‍यक आहे त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी घोषीत करण्‍यात आलेले आहेत. त्यानुसार, श्री. द्विवेदी यांनी हे आदेश जारी केले आहेत.कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्‍याची शक्‍यता लक्षात घेता त्‍यावर तात्‍काळ नियंत्रण करणेकामी प्रतिबंधात्‍मक आदेश पारित करण्‍यात आलेले आहेत. नागरिकांची अनावश्‍यक गर्दी टाळण्‍यासाठी जिल्‍हयातील मे‍डीकल दुकाने, हॉस्‍पीटल, क्लिनीक, डिझेल पंप, एटीएम इ. वगळता सर्व दुकाने संध्‍याकाळी ०७ ते सकाळी ०७ या कालावधीत बंद ठेवणे आवश्‍यक आहे. त्यामुळे हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. अत्‍यावश्‍यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्‍यक्तीच्‍या हालचालीवरही या कालावधीत निर्बंध लागू राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.कोणतीही व्‍यक्‍ती/संस्‍था/संघटना यांनी उक्‍त आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास ते भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्‍या कलम 188 नुसार दंडनिय/कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.   

राहुरी : शहरात मंगळवारी (दि.५ मे) दुपारी पोलिसांनी तळीरामांवर लाठीचार्ज केल्याने एकच धावपळ उडाली. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाचा भंग केला म्हणून राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांनी तीन दुकानांना सील ठोकले. त्यामुळे अर्ध्या तासामध्ये दुकाने बंद करण्याची वेळ दुकान मालकांवर आली. दारूची दुकाने सुरू होणार म्हणून तळीरामांनी दुकानांसमोर गर्दी केली होती. मात्र मंगळवारी सकाळी दारूची दुकाने उघडली नाही. फिरत्या जिपवरून दारूची दुकाने उघडू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले होते. मात्र अचानक दुपारी दारूची दुकाने उघडली. तीनही दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. फिजीकल डिस्टन्सिंगचा सर्वत्र फज्जा उडाला. याची माहिती तहसीलदार एफ.आर.शेख व पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना समजली. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेथील परिस्थिती पाहून तहसीलदार शेख यांनी लाठीचार्ज करण्याचा आदेश दिला. त्यानंतर किशोर वाईन्स व सुनील वाइन्स या दोन ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे तळीरामांची एकच धांदल उडाली. क्षणात गर्दी गायब झाली. तहसीलदारांच्या आदेशानुसार किशोर वाईन्स, मोटलानी वाईन सुनील वाईन यांना सील ठोकण्यात आले. बेकायदेशीर दुकान उघडल्याबद्दल तीनही वाईन्स चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद देशमुख यांनी दिली. राहुरी येथील तीन दुकानांना सील करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केले म्हणून संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे राहुरीचे तहसीलदार एफ.आर.शेख यांनी सांगितले.

शिर्डी( प्रतिनिधी) कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉक डाऊन काळात सर्वत्र मद्य विक्री बंद होती, मात्र लॉकडाऊन२ संपल्यानंतर चार मे पासून तिसरा टप्पा सुरू झाला असून या लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये ,ग्रामीण भागात मद्यविक्रीची दुकाने काही अटी व शर्ती ठेवून सुरु करण्यास शासनाने परवानगी दिली असली तरी 43 दिवसानंतर मद्य विक्री आज मंगळवारी सकाळी सुरू झाल्यानंतर या मद्यविक्री केंद्रांवर दुकाने ,वाईन्सवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, राहत्याला मद्य घेणारे ग्राहक मोठ्या संख्येने जमा झाल्याने राहातेतील वाईन शॉप वाल्यांनी मद्य ग्राहकांना साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये बसवून मग मद्य विक्री करण्यास सुरुवात करणार होते, मद्य घेणारे लोक सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये जणू लग्नाला आले की काय। असे यावेळी वाटत होते, एवढी मोठी गर्दी येथे होती,  याची खबर प्रांताधिकारी, तहसीलदार पोलीस उपाधीक्षक ,यांना समजताच या लॉनच्या ठिकाणी पोलीस पथकाने जाऊन तेथील गर्दी पांगवली तसेच वाईन शॉप वर जाऊन  हे वाईन शॉप त्वरित बंद करण्याचे आदेश महसूल   व पोलिस प्रशासनाने देण्यात  आले.
 राहता तालुका प्रमाणे श्रीरामपूर तालुक्यातही हीच परिस्थिती होती, राहताचे वाईन शॉप उघडणे आधीच बंद झाले, मात्र श्रीरामपूरचे पाच वाईन शॉप मात्र गर्दीमुळे तेही बंद करण्यात आले, महसूलचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी यापुढे मद्य विक्री केंद्रांना ठरवून दिलेल्या अटी  व शर्तीचा  भंग झाला तर वाईन्स उघडण्यास परवानगी द्यायची की नाही हे आज रात्री पर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांची मसलत करून ठरवण्यात येणार असल्याचे  बिनदास न्यूज सी बोलताना सांगितले,
    जिल्ह्यात लॉक डाऊन चा तिसरा टप्पा सुरू असला तरी मध्ये विक्री दुकाने वाईन्स शर्तीवर ग्रामीण भागात करण्यास परवानगी शासनाने दिले आहे, मात्र या अटी व शर्तींचा अनेक ठिकाणी भंग होत आहे ,राहत्यालाही असा प्रकार दिसून आला आहे ,लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असताना व अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोन मध्ये येत असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण भागात काही गावात, शहरात मद्य विक्री दुकाने उघडण्यास शासनाने परवानगी दिली असल्यामुळे आजपासून 43 दिवसाने तालुक्यातील काही मद्यविक्री दुकाने अटी व शर्ती राखून उघडण्याचे परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे राहता येथील वाईन शॉप आज  43 दिवसांनी उघडण्यात आले, 43 दिवस घरात बसून असलेले मद्य ग्राहक यांनी मद्य घेण्यासाठी राहता वाईन शॉप येथे मोठी गर्दी केली, त्यामुळे वाईन्स मालकाने आपल्याच कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील साई सिद्ध संकल्प लॉन्स मध्ये सर्व ग्राहकांना पाठवून तेथे सर्वांना या  साई सिद्ध संकल्प लॉन्स, मंगल कार्यालय मध्ये खुर्च्या टाकून तेथे बसण्याची व्यवस्था केली, चारशे ते पाचशे मद्य ग्राहक याठिकाणी लॉन्स मध्ये होते, यामध्ये ग्राहकांना रिक्षाने दीड किलोमीटर राहता शहरात पाठवले जाणार होते, ग्राहकांकडून दहा रुपये रिक्षा भाडे व पाच रुपये परवाना फी घेतली जाणार होती व परत लॉन्स वर आणून सोडले जाणार  होते, वाईन्स वर गर्दी होऊ नये म्हणून ग्राहकांना यालॉन्स मध्ये खुर्च्या टाकून बसवण्यात आले होते,यामध्ये हे ग्राहक एखाद्या लग्नाला आले की काय। असे जणू या लॉन्स मध्ये वाटत होते, सिद्ध संकल्प लॉन्स मंगल कार्यालय मध्ये एकाच वेळी चारशे ते पाचशे लोकांची गर्दी, झाल्याची , खबर प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे शिर्डीचे  पोलीस विभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे व राहाता, शिर्डी चे पोलीस निरीक्षक ,यांना कळताच त्यांनी त्वरित पोलीस पथकासह सिद्ध संकल्प लॉन्स वर धाव घेतली व तेथे जाऊन सर्व गर्दी पांगवली,
लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू झाला असून जिल्ह्यात संचारबंदी व 144 कलम लागू आहे, एकाच ठिकाणी मोठी गर्दी करता येत नाही, शिवाय लॉन्स ,मंगल कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश आहेत, असे असताना या लॉन्स मध्ये एवढी मोठी गर्दी होणे हेअटी व नियमाचे भंग नाही का।। असा सवाल नागरिक करीत आहेत, लॉन्समधील मद्य ग्राहकांना पोलिसांनी पांगवले, मात्र लॉन्स वर कारवाई काय केली गेली हे आजुन गुलदस्त्यात आहे । तसेच  वाईन शॉप वर जाऊन हे वाईन शॉप उघडण्या पूर्वीच ताबडतोब बंद करण्यात आले, मात्र या वाईन्स वर कारवाई काय। असा सवाल काही समाजसेवक करीत आहेत, शासकीय अधिकाऱ्यांनी या लॉकडाउनच्या काळात अटी व शर्ती न पाळल्यामुळे हे वाईन्स शॉप  त्वरित बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे , मात्र लॉन्स व वाइन्स वर कारवाई व्हावी ,अशी मागणी होत आहे, 43 दिवसांनंतर मद्य विक्री दुकाने उघडल्यामुळे सर्वच ठिकाणी मद्य ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती,
अनेक ठिकाणी अटी व शर्ती यांचा भंग झाल्याचे दिसून येत होते, यावर  शासन काय निर्णय घेणार। असा सवाल नागरिकांमधून होत आहे, राहत्या प्रमाणे श्रीरामपूर येथे अशीच परिस्थिती होती श्रीरामपुर मधील पाच वाईन शॉप वर मोठी गर्दी झाली होती ,वाईन शॉप समोर मद्य ग्राहकांना उभे राहण्यासाठी अंतराअंतरावर निशाणी करण्यात आली होती ,मात्र तरीही येथेही लॉकडाउनच्या नियमाचा फज्जा उडाला होता, त्यामुळे हे वाईन्स शॉप महसूल व पोलिस अधिकाऱ्यांनी तेथील परिस्थिती पाहता त्वरित बंद केले ,हे राहता व श्रीरामपूर तालुक्यातील सर्व वाईन्स व मद्य विक्री केंद्र यापुढे अशीच गर्दी होत असेल तर चालू ठेवायची की नाही।। यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून निर्णय घेण्यात येणार असल्याचे महसूल अधिकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी बिनदास न्यूज शी बोलताना सांगितले.

बेलापूर  ( प्रतिनिधी )- सहकार महर्षी लोकनेते पद्श्री कै बाळासाहेब विखे पाटील यांच्या जंयती निमित्त सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असुन या शिबीराचे उदघाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांच्या शुभहस्ते व जिल्हा परिषद सदस्य शरद नवले उपसभापती बाळासाहेब तोरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले लोकनेते पद्श्री मा बाळासाहेब विखे पा .यांच्या जयंतीचे औचित्य साधुन जनसेवा मंडळ श्रीरामपूर डाँ विखे पाटील हाँस्पिटल विळदघाट पंचायत समिती श्रीरामपूर  यांच्या सहकार्याने डाँक्टर  आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमाचे उद्घाटन बाजार समितीचे माजी सभापती दिपक पटारे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी जि प सदस्य शरद नवले  उपसभापती बंडू तोरणे हाजी ईस्माईल शेख शकील शेख शफीक आतार रविंद्र गायकवाड  दस्तगीर शेख केंद्र प्रमुख उत्तम शेलार मुख्याध्यापक  नंदकुमार परदेशी बाळासाहेब शेलार प्रभाकर ताके सतीश शेलार राजेंद्र कुताळ शांतवण अमोलिक शोएब शेख शुभम नवले विष्णुपंत डावरे अरुण अमोलिक उपस्थित होते तपासणी पथकात डाँक्टर सचिन चौधरी डाँक्टर सोहम मदनकर सिस्टर उषा थोरात बापु बलमे सुदाम भागवत प्रदिप लोखंडे आदिंचा सहभाग होता सोशल डिस्टनचा नियम पाळुन आलेल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget