Latest Post

मा.श्री.संजय राठोड, मंत्री, वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, महाराष्ट्र राज्‍य यांनी सहपरिवार श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर उपस्थित होते.

संविधान बचाव समिती,श्रीरामपूर यांचे वतीने आज मोर्चा दि.६/1/2020 रोजी सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून काढण्यात येणाऱ्या सर्व धर्मीय,सर्व पक्षीय  प्रचंड मोर्चा मध्ये नागरीकांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन आ.कानडे यांनी केले आहे,भारत देशात संविधानाची पायमल्ली करण्याचे प्रकार सुरू असून
सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेऊन केवळ समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग सध्याचे केंद्रातले सरकार करत आहे,त्याचाच एक भाग म्हणजे एन आर सी,सी ए ए व एन पी आर सारख्या संविधान विरोधी तरतुदी.
या सारख्या समाजविरोधी कायद्यांना पायबंद घालण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने शांतता मय मार्गाने विरोध दर्शविणे काळाची गरज बनली आहे.
तेव्हा आजच्या होणाऱ्या मोर्चा मध्ये सर्व नागरीकांनी सामील होऊन शांततामय मार्गाने सदर मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन आ.कानडे यांनी केले आहे.

शिर्डी प्रतिणिधी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन तसेच वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी शिर्डीत श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी आलेल्‍या साईभक्‍तांना आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे मोफत वाटप करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्‍हणाले, पर्यावरणाच्‍या संरक्षणाच्‍या दृष्‍टीने शासनाच्‍या ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात सहभाग घेऊन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने वृक्षलागवड उपक्रमाची जनजागृती करण्‍यासाठी तसेच शिर्डीत आलेल्‍या साईभक्‍तांना सावली मिळावी व वातावरणात प्रसन्‍नता राहावी याकरिता संस्‍थान परिसरामध्‍ये १००० वृक्षांची लागवड करणेत आलेली आहे. या वृक्षलागवडीमुळे प्रदुषण कमी होऊन पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. दिनांक २६ जुलै २०१९ रोजी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १००० निंबवृक्षाची रोपे वाटप करणेत आलेली आहेत. त्‍याचप्रमाणे मंगळवार दिनांक १७ सप्‍टेंबर २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप येथे विश्‍वस्‍त बिपीनदादा कोल्‍हे यांच्‍याहस्‍ते साईभक्‍तांना मोफत १५०० निंबवृक्षांची रोपे वाटप करण्‍यात आलेली आहेत.
या उपक्रमाचा एक भाग म्‍हणूनच श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०१९ पासून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी येणा-या साईभक्‍तांना समाधी मंदीर परिसरात (लेंडीबाग गेट क्रं. ५ जवळ) प्रसाद रुपाने नियमित मोफत रोपे वाटप करणेत येत आहेत जेणेकरुन साईभक्‍त आपल्‍या घरी या रोपांची लागवड करतील. याची माहिती साईभक्‍तांना होणेकरीता मंदीर परिसरात वेगवेगळया भाषेत फलक ही लावण्‍यात आलेले आहेत. या उपक्रमाचा प्रचार व प्रसार होण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध राज्‍यांतुन येणा-या साईसेवकांना वृक्ष वाटपाच्‍या सेवेचा लाभ दिला जात आहे. सदर मोफत वृक्ष वाटप उपक्रमामध्‍ये अशोका, शिसम, वड, आवळा, चिंच, जांभूळ, निंब अशा विविध प्रकारच्‍या रोपांचा समावेश करण्‍यात आलेला आहे.
          या मोफत वृक्ष वाटप उपक्रमामधुन आजतागायत सुमारे ११ हजार विविध वृक्षांची रोपे साईभक्‍तांना मोफत वाटप करण्‍यात आलेले असून यापुढेही मोफत वृक्ष वाटप उपक्रम सातत्‍याने राबविला जाणार असल्‍याचेही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.

मुंबई : देशभक्ती कोणत्या एका जातीची किंवा एका पक्षाची नाही. आम्ही सर्व देशभक्त आहोत, आमची देशभक्ती तुमच्यापेक्षा अधिक आहे, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला. सीएए, एनआरसी, एनपीआरविरोधात जमात ए इस्लामीच्या वतीने चर्चासत्र मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, पीयूसीएलचे अध्यक्ष मिहीर देसाई, एपीसीआरचे अध्यक्ष युसूफ मुछला आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी राऊत म्हणाले की, देशात भीती पसरवली जात आहे, परंतु कोणालाही घाबरून जाण्याची गरज नाही. घाबरविणारे येतात आणि जातात. हा देशाचा इतिहास आहे. महाराष्ट्राने भीती संपविण्याचे काम केले आहे, देशाला दिशा देण्याचे काम केले आहे. ते पुढे म्हणाले की, देशातील विद्यार्थ्यांवर बंदूक रोखली जात आहे, हल्ले होत आहेत, असे असताना पंतप्रधान विद्यार्थ्यांनी केवळ शिकण्याचे काम करावे, असे सांगत आहेत. परंतु विद्यार्थ्यांवर हल्ला म्हणजे देशावर हल्ला असून याचा अर्थ लोकशाही धोक्यात आहे. तसेच स्वातंत्र्य लढ्यात विद्यार्थ्यांचे महत्त्वाचे योगदान होते, त्याच्यामुळे परिवर्तन घडले, असेही ते म्हणाले. आपल्याला सर्वांना मिळून देश वाचवायचा आहे, सर्वांनी याविरोधात एकत्र उभे राहिले पाहिजे, असे सांगितले.या वेळी कोळसे पाटील म्हणाले की, कोणताही कायदा आणताना सहजतेने त्याची अंमलबजावणी होईल असा कायदा असायला हवा. ज्या कायद्याची अंमलबजावणी शक्य नाही ते आपल्यावर लादले जात आहेत. हे २०२४ निवडणुकीसाठी सरकारचे षड्यंत्र आहे. हिंदू आणि मुस्लीम या दोघांचेही रक्त एकच असून सर्वांनी याविरोधात रस्त्यावर उतरा, असे आवाहन त्यांनी केले. तर सीएए, एनआरसी, एनपीआर हे कायदे गरिबांच्या विरोधात आहेत. धर्मावर आधारित नागरिकत्व देऊन सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे, असे मिहीर देसाई म्हणाले.>तीस टक्के हिंदूंना फटकासीएए, एनआरसी, एनपीआरमुळे केवळ मुस्लिमांना नाही, तर सर्वांना फटका बसणार आहे. कित्येक लोकांकडे जुने पुरावे नाहीत. देशातील ३० टक्के हिंदूंचे यामुळे नुकसान होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.

नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (सीएए) देशात निदर्शने सुरूच असून, केंद्र व राज्य सरकारांमधील संघर्षही वाढत चालला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी भाजपचे शीर्ष नेतृत्व प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. निदर्शकांना एकटे पाडण्यासाठी विविध पर्यायांवर विचार केला जात आहे.निदर्शने निष्प्रभ करण्यासाठी पक्ष नेतृत्वाने देशव्यापी मोहीम हाती घेतली आहे. त्याच वेळी सीएए विरोधी प्रचाराचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकार जागतिक पातळीवर मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून काम करीत आहे.सीएए विरोधी आंदोलकांनी आपला पवित्रा बदलल्यामुळे सरकारच्या चिंतेत भर पडली आहे. सुरुवातीला हिंसक असलेले आंदोलन आता शांततापूर्ण मार्गाने सुरू आहे. अल्पसंख्याक समुदायातील लोक हातात तिरंगा झेंडे घेऊन ‘जन गन मन’ म्हणत आहेत. बिगर-भाजप पक्षांची सरकारे असलेल्या सुमारे ११ राज्यांत विशाल निदर्शने होत आहेत. ईशान्य भारतातही हीच स्थिती आहे.भाजप अध्यक्ष अमित शहा हे सीएए समर्थनार्थ आक्रमक वक्तव्ये करीत असले तरी गृह मंत्रालयाने अद्याप या कायद्याचे नियम जारी केलेले नाहीत. कदाचित सरकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत असावे. मुद्या चिघळावा अशी मंत्रालयाची इच्छा नाही. त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. आसामात भाजपची अधिक कोंडी झाली आहे. कारण तेथे आसामी संस्कृती आणि ओळख यांचे संरक्षण करण्याचे आश्वासन भाजपने दिलेले आहे.दरम्यान, गृह मंत्रालयाने राज्य सरकारांना गंभीर इशारा दिला आहे. सीएए आणि एप्रिलपासून सुरू होणाऱ्या एनपीआरची अंमलबजावणी न केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर खटले भरले जातील, तसेच घटनात्मक तरतुदींचा वापर करून राज्य सरकारे बरखास्त केली जातील, असे राज्यांना अनौपचारिकरीत्या कळविण्यात आले आहे.केरळ, प. बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, पंजाब आणि महाराष्ट्र या राज्यांनी सीएएची अंमलबजावणी न करण्याचे घोषित केले आहे.चिंताजनकदोन दिवसांपूर्वी भाजप नेतृत्वाने यावर बैठक घेतली. सीएएची अंमलबजावणी न करण्याच्या केरळ विधानसभेच्या ठरावावर बैठकीत चर्चा झाली. हा ठराव घटनाविरोधी आणि राज्य सरकारच्या अधिकाराबाहेरील असल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले असले तरी हा पायंडा चिंताजनक आहे. असा ठराव संमत करण्यासाठी आसाम सरकारवर दबाव वाढत आहे.

सिन्नर | प्रतिनिधी-सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक क्रिकेटचे सामने खेळात असताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप वसंत सानप असे मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळे पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत होते.गेल्या वर्षभरापासून सफाळे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. रायझिंग डे सप्ताहानिमित्त पालघर तालुक्यतील सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सफाळे येथील मकुणसार भागात आज क्रिकेटचे सामने घेण्यात आले.त्यावेळी मैदानात खेळत असताना सपोनि सानप यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मृत्यू झाला. त्यांच्यावर चिंचोली येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.


श्रीरामपूर (प्रतिनिधी ): कामधेनु पतसंस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणारे व्यक्तीना देण्यात येणारा या वर्षीचा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे श्रीरामपूर अध्यक्ष तथा,श्रीरामपूर तालुक्यातील नाऊर येथील पत्रकार संदिप वसंतराव जगताप यांना ६ जाने. रोजी ( कामधेनु सभागृह ) भातकुडगाव फाटा ता. शेवगांव येथे प्रदान करण्यात येणार आहे.
    शेवगाव तालुक्यातील बक्तरपुर येथील कामधेनु दुग्ध व्यावसायीक ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्था बक्तरपुर यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणाऱ्या व्यक्तीना दरवर्षी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते व पत्रकार क्षेत्रातील एका जेष्ठ व्यक्तीला पत्रकारीता जीवनगौरव  देऊन गौरवण्यात येते. या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असुन त्यांचे वितरण ६ जानेवारी रोजी संस्थेच्या भातकुडगाव फाटा सभागृहात ह.भ.प. महत देविदास महाराज म्हस्के, माजी आमदार चंदशेखर घुले, उपपोलिस अधिक्षक मंदार जवळे, पोलीस निरिक्षक रामराव ढिकले, शेवगावचे तहसिलदार विनोद भामरे,लोकमंथन चे संपादक अशोक सोनवणे,जेष्ठ विचारवंत कॉ.बाबा अरगडे,जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे यांच्या प्रमुख उपस्थितीत भातकुडगाव फाटा येथील सभागृहात पार पडणार आहे. अशी माहिती संस्थेचे चेअरमन बाळासाहेब काळे यांनी दिली.
              संस्थेच्या माध्यमातुन गेल्या आनेक वर्षापासुन पत्रकार दिनी विविध क्षेत्रातील व्यक्ती सह पत्रकाराचा गौरव सोहळा आयोजीत केला जातो. यापुर्वी जेष्ठ पत्रकार आर. आर.माने याना जीवनगौरव देऊन गौरवण्यात आले आहे. संस्थेच्या माध्यमातुन नेहमीच सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन पत्रकार दिनी माजी अप्पर पोलिस अधिक्षक अॅण्टी करप्शन ब्युरो ज्ञानदेव गवारे ( शहर टाकळी ) यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार २०२०, गुन्हे अन्वेषण जिल्हा प्रमुख दिलीप पवार ( अहमदनगर ) यांना सामाजिक कार्य गौरव पुरस्कार, गुन्हे अन्वेषण विभागाचे रविंद कडिले( शेवगाव ), उत्कृष्ट पत्रकरिता पुरस्कार तुलसीदास मुखेकर (करंजी पाथर्डी ) उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - संदिप जगताप ( श्रीरामपुर ), दुग्ध व्यावसायिकांना उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कार राजेंद्र उगार (पाथर्डी ), उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार
संदिप गाडेकर ( नेवासा ), यांना जाहीर करण्यात आले आहे. याचे वितरण पत्रकार दिनी होणार आहे
या निवडीचे सर्वच स्तरातुन अभिनंदन होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget