Latest Post

अहमदनगर (प्रतिनिधी) शहरातील न्यू टिळकरोडवर असलेल्या स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लरवर शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून हुक्का पार्लरमध्ये वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. शहर पोलीसांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास ही कारवाई केली. हुक्का पार्लरचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशीरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003 नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.शहरात महाविद्यालयीन तरूण-तरूणींना आकर्षित करण्यासाठी न्यू टिळकरोडवर विनापरवाना स्मोकी व्हिल्ला हुक्का पार्लर सुरू असल्याची गुप्त माहिती शहर पोलीस उपाअधीक्षक संदीप मिटके यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विकास वाघ, सहायक पोलीस निरीक्षक रणदिवे यांच्या पथकांनी सोमवारी रात्री दहाच्या सुमारास स्मोकी व्हिल्लावर छापा टाकला.यावेळी हुक्काचा चालक-मालक दिनेश खरपुडेला पोलीसांनी ताब्यात घेतले. हुक्का पार्लरमधील साहित्य पोलीसांनी जप्त केले. किती साहित्य जप्त केले याची माहिती मिळू शकली नाही. रात्री उशिरापर्यंत कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

श्रीरामपूर (प्रतिनिधी)-माजलगाव नगरपरिषदेचे तत्कालीन व श्रीरामपूर पालिकेचे मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्यासह तीन जणांवर माजलगाव नगरपरिषदेमध्ये 1 कोटी 44 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माजलगाव शहरातील विविध विकास कामांसाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. त्याकामी आलेल्या निधीचा तत्कालीन मुख्याधिकारी बी.सी.गावित यांनी संगनमत करून तत्कालीन लेखापाल अशोक भीमराज कुलकर्णी, सल्लागार स्थापत्य अभियंता महेश कुलकर्णी यांनी काँक्रिट रोड नाल्यांच्या बावीस शासकीय कामांची बनावट कागदपत्रे तयार करून ती खोटी आहेत, अशी माहिती असताना सुध्दा त्याचा वापर करून शासनाची 1 कोटी, 44 लाख, 29 हजार, 959 रुपयांचा अपहार करून फसवणूक केली.<याप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांत स्थापत्य अभियंता कृष्णा श्रीराम जोगदंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गावित यांच्यासह दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक सुलेमान सय्यद करत आहेत. दरम्यान याबाबत मुख्याधिकारी बी.सी. गावित यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन स्विचऑफ आला, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. देवळालीचे लाच प्रकरण, राहात्याचा कार्यभार..देवळालीचे तत्कालीन मुख्याधिकारी नानाभाऊ महानवार यांना तक्रारदाराकडून दोन लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याचा संदर्भ राहाता शहरातील पालिकेचा स्वच्छतेच्या ठेक्याबाबत होता. त्यावेळी राहात्याच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार गावित यांच्याकडे होता.त्यांच्याकडून संबंधित कंपनीची अडवणूक केली जात होती. या लाचप्रकरणात गावित यांचे नाव आल्याने त्यांना काही दिवस कार्यमुक्त करण्यात आले होते. 

बेलापूर  ( प्रतिनिधी  )- बेलापूर  महाविद्यालयाच्या आवारात अज्ञात ईसमाने मोठ्या प्रमाणात औषधे गोळ्या आणून टाकल्या असुन सकाळी 
महाविद्यालयात आलेल्या प्राध्यापकाच्या हा प्रकार लक्षात आला                              बेलापूर  महाविद्यालयाला रविवारची सुट्टी असल्यामुळे कुणीतरी मुदतबाह्य झालेल्या गोळ्या औषधे विद्यालयाच्या गेटमध्ये आणुन टाकली एकाच प्रकारच्या या गोळ्या असुन महाविद्यालयाच्या आवारातच टाकण्याचा नेमका हेतू काय असावा असा सवाल विचारला जात आहे महाविद्यालयात सी सी टी व्ही कँमेरे बसविलेले आहे त्यामुळे हे कृत्य कुणी केले याचा उलगडा
होणारच आहे परंतु  महाविद्यालय बंद असताना महाविद्यालयाचा मुख्य दरवाजा उघडा कसा होता या दिवशी नेमकी जबाबदारी कोणावर होती याचा शोध घेवुन असे प्रकार पुन्हा होणार नाहु याची दक्षता घेतली पाहीजे या बाबत प्राचार्य  गुंफा कोकाटे यांच्याशी संपर्क साधला असता कुणीतरी खोडसाळपणे हे कृत्य केले असुन सी सी टी व्ही त पाहुन असे कृत्य करणारावर कारवाई  करु असे त्यांनी  सांगितले

बुलडाणा- 15 डिसेंबर
"कुंपणच शेत खाते" याच म्हन प्रमाणे बैंकेत कार्यरत मूल्यांकन अधिकारीने इतरांच्या संगनमताने नकली सोना तारण ठेवून सहकारी बैंकेची फसवणूक केली,ही बाब लक्षात आल्यावर बैंक मैनेजरच्या तक्रारीवरुन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करत पोलीसाने 6 आरोपींना अटक केली आहे.अशा प्रकारे इतर बैंक व पतसंस्थेतही नकली सोने तारण ठेवण्यात तर आले नाही ना,असे प्रश्न उपस्थित होत आहे.
      बुलडाणा येथील जिजामाता  महिला नागरी सहकारी बैंकचे शाखा व्यवस्थापक दिपक अग्रवाल यांनी 13 डिसेंबरला बुलडाणा शहर ठाण्यात तक्रार दिली, त्यात नमूद करण्यात आले की त्यांच्या बैंकेत मूल्यांकन अधिकारी पदी कार्यरत दिपक हरीश वर्मा यांनी इतर काही लोकांशी संगनमत करुण 27 लाख रुपयचे नकली सोने तारण ठेवले व वेळेवर त्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाही.या बाबत शंका आल्याने सोन्याची तपासणी केली असता तो सोने नकली निघाले.अश्या तक्रारीवरुन 12 आरोपींच्या विरोधात भादवी चे कलम 420, 471, 468, 34 अन्वय गुन्हा दाखल करुन पोलीसाने आरोपी मूल्यांकन अधिकारी दिपक हरीश वर्मा,संजय राधे मठारकर,मोहन खरात,मनोहर श्रीराम सावळे,कन्हैयालाल बद्रीनारायण वर्मा व प्रवीण रमाकांत वाडेकर यांना अटक करून आज 15 डिसेंबर रोजी बुलडाणा कोर्टात हजर केले असता या 6 आरोपींची 18 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.तपास अधिकारी पीएसआई अमित जाधव माहिती देत म्हणाले की आरोपींनी नकली सोने अजुन कुठल्या बैंकेत तारण ठेवले आहे का, याची चौकशी करण्यात येईल.एकंदरित हे प्रकरण तुरतास  लहान वाटत असले तरी फार मोठा खुलासा समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


 यवतमाळ - एखाद्या थरारपटाला शोभावा अशा पद्धतीचा तपास यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेने पूर्ण केला. घटनास्थळावर मिळालेल्या ब्लँकेटवरून थेट उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यात दुर्गम गावात राहणाऱ्या एटीएम फोडणाऱ्या टोळीचा माग काढला. त्यांच्याकडून चोरलेली पाच लाखांची रोख, गुन्ह्यात वापरलेली गाडी, गॅस कटर हे साहित्य जप्त केले. चार राज्याच्या पोलिसांची मदत घेऊन ही कारवाई करण्यात आली. करंजी रोड येथील स्टेट बँकेचे एटीएम गॅस कटरने कापून त्यातील सात लाखांची रोख चोरीला गेली होती. ही घटना १७ नोव्हेंबरला सकाळी ८ वाजता उघड झाली. या प्रकरणी पांढरकवडा पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. या गंभीर गुन्ह्याचा तपास पांढरकवडा पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी सुरू केला. घटनास्थळाला सर्वच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी भेट देऊन पाहणी केली. या ठिकाणी मिळालेल्या ब्लँकेटवरून अज्ञात एटीएम चोरट्यांचा माग पोलिसांनी काढला. मो.साकीर मो.जफर (३२), सरफराज उमर खान (३३) दोघेही रा.भोजपूर जि.गाजियाबाद, उत्तर प्रदेश यांना १३ डिसेंबर रोजी अटक केली. त्यांच्याकडून पाच लाख रुपये रोख, सहा लाख रुपये किमतीची कार, पाच हजारांचे मोबाईल, १५ हजारांचे गॅस कटर असा ११ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. उत्तर प्रदेशातून रोख रकमेसह आरोपीला आणणे आजपर्यंत शक्य झाले नाही. यवतमाळ पोलिसांनी ही कामगिरी पूर्ण केली. यात अपर अधीक्षक नुरूल हसन यांनी विशेष पुढाकार घेतला. गाजियाबाद येथील पोलीस अधीक्षक निरज त्यांचे बॅचमेंट असल्याने यवतमाळ पोलिसांना गाजियाबादमध्ये भरपूर सहकार्य मिळाले. सलग तीन दिवस पोलीस उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार, मंगेश भोंगाडे सहकाºयांसह गाजियाबादमध्ये ठाण मांडून होते. शिताफीने आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहायक फौजदार साहेबराव राठोड, सुधीर पिदूरकर, महेश पांडे, सुरेंद्र वाकोडे, विठ्ठल बुरूजवाडे, सुहास मंदनवार, सचिन मकराम, रितेश श्रीवास, पंकज गिरी, दिगांबर पिलावन यांनी सहभाग घेतला. ही कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरूल हसन, पांढरकवडा एसडीपीओ अमोल कोळी, एलसीबी प्रमुख प्रदीप शिरस्कर, पांढरकवडा ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. उमरेडमधून मिळली तपासाला
दिशागाजियाबाद ग्वाल्हेर मार्गे महाराष्ट्रात आलेल्या या चोरट्यांनी उमरेड (जि.नागपूर) येथे दोन एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. नंतर तेथून ब्लँकेट खरेदी केले. हैदराबाद मार्गाने निघाले असता राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वर असलेल्या करंजी येथील एटीएम या चोरट्यांनी गॅस कटरने फोडले. हा गुन्हा करण्यापूर्वी त्यांनी डोक्यात माकड टोपी घातली होती. नंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला. अंगावर ब्लँकेट ओढून एटीएम फोडले व रोख काढून घेतली. जाताना चोरटे सोबत आणलेले ब्लँकेट नेण्याचे विसरले. येथूनच पोलिसांना सुगावा मिळाला. हे ब्लँकेट उमरेडमधील ज्या दुकानातून खरेदी केले होते त्याचा टॅग लागलेला होता. पोलिसांनी त्या टॅगचा शोध घेऊन उमरेडमधील दुकान गाठले. तेथे ब्लँकेट खरेदी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. गुन्ह्यात वापरलेली गाडीही सीसीटीव्हीत आली. मात्र त्या गाडीचा क्रमांक दिसत नव्हता. चोरट्यांनी बिल बनविताना आपला खराच मोबाईल क्रमांक नमूद केला. या आधारावर पोलिसांच्या चार पथकांनी तपास करत या दोघांना अटक केली.
  

नाशिक । प्रतिनिधी टोलनाके गर्दीमुक्त करण्यासाठी आणि वाहनधारकांच्या वेळ व इंधनाची बचत करण्यासाठी फास्टॅग अंमलबजावणीस उद्या शनिवारी मध्यरात्रीपासून सुरुवात होणार आहे. राष्ट्रीय महामार्गांसह सर्वच टोलनाक्यांवर फास्टॅग नसलेल्या वाहनांसाठी एकच लेन राहील. फास्टॅग वाहनांसाठीच इतर सर्व लेन उपलब्ध राहतील.‘वन नेशन वन टॅग’ ही संकल्पना राबवत देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्याअंतर्गत सर्वच वाहानांनी टोलनाक्यावर फास्टॅगद्वारेच ऑनलाईन आपला टोल भरणे अपेक्षित आहे. त्याची अंमलबजावणी 1 डिसेंबरपासून होणार होती. परंतु तयारीअभावी आणि फास्टॅग उपलब्धतेच्या संभ्रमामुळे ती पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आली. आता हा नियम 15 डिसेंबरपासून लागू होणार आहे. यादरम्यान मोफत फास्टॅग नोंदणीही केली जात होती. पण 15 डिसेंबरनंतर मात्र आता सर्वच वाहनधारकांना त्यासाठी आवश्यक असलेले 100 रुपयांचे नोंदणी शुल्क भरावे लागणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.त्यामुळे फास्टॅग लेनमधून बिगर फास्टॅग वाहन गेल्यास फास्टॅग वाहनांचा वेळ वाया जाईल. त्यामुळे संबंधित बिगर फास्टॅगधारक वाहनास दुप्पट टोल लागेल. परंतु जर नियमित टोलधारकांसाठी असलेल्या लेनमधूनचे त्याने प्रवास केला तर मात्र दुप्पट आकारणी होणार नाही. फास्टॅगची सुविधा टोलनाक्यांवर तर आहेच. शहरातील वाहनधारकांना आयडीएफसी, एचडीएफसी, आयसीआयसीआय, एसबीआय, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक तसेच एअरटेल पेमेंट बँक, पेटीएम पेमेंट बँकेच्या विविध शाखांमध्ये तसेच अ‍ॅमेझॉनवरही ती ऑनलाईन उपलब्ध आहे

अमरावती महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकारने एक अतिशय महत्वाचा निर्णय घेतलाय. बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे.आंध्रच्या विधानसभेत या दिशा विधेयकाला मंजुरी देण्यात आलीय. एफआयआर दाखल झाल्यानंतर 7 दिवसांत तपास आणि पुढील 14 दिवसांत खटला संपवण्यात येणार आहे.बलात्कार्‍याला कठोरात कठोर शिक्षा आणि ती सुद्धा अवघ्या 21 दिवसात देण्यासाठी आंध्रप्रदेश सरकारने दिशा विधेयक 2011 आणण्याचा निर्णय घेतलाय.या प्रस्तावित विधेयकात बलात्कार आणि सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची तरतूद आहे. आंध्र विधानसभेच्या चालू अधिवेशनात हे विधेयक पटलावर मांडण्यात आले होते. ते बहुमताने मंजूर झाले आहे.या नव्या कायद्यानुसार बलात्काराचा आरोप सिद्ध होणार्‍या आरोपींना 21 दिवसांत फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो.या प्रकरणांसाठी 13 जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे. या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ आणि महिला आणि मुलींवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.एन्काऊंटर प्रकरणी आयोगाची स्थापना हैदराबाद येथील कथित एन्काऊंटरचा तपास करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने आयोगाची स्थापना केली आहे. सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती वी एस सिरपुरकर हे या आयोगाचे अध्यक्ष आहेत.तर, मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती रेखा बलडोटा आणि माजी सीबीआय प्रमुख वी. एस. कार्तिकेयन हे या आयोगाचे सदस्य असणार आहेत.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget