या कार्यक्रमात श्रीरामपूर शहरातील सामाजिक जाणीव असलेले निलेश शिंदे यांनी स्वखर्चाने दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लावला. संजय साळवे अनेक वर्षांपासून दिव्यांगांसाठी विशेष उपक्रम राबवत असून, ते दिव्यांगांसाठी देवसमान असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना माजी नगरसेवक रवी अण्णा पाटील यांनी सांगितले की, मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष सहकार्याने भविष्यात नगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विशेष घरकुल योजना राबवली जाईल.
निलेश शिंदे यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुस्ताकभाई तांबोळी, खजिनदार सौ. साधना चुडीवाल, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, राज्य समन्वयक विनोद कांबळे सर, भारत मुक्ती मोर्चाचे सुधाकर बागुल यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुस्ताकभाई तांबोळी यांनी केले, तर वर्षा गायकवाड यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शांतुभाऊ मावरे, दिनेश पवार, सतीश साळवे, फिरोज शेख, सागर म्हस्के यांनी विशेष प्रयत्न केले.
Post a Comment