
पटणा (बिहार)/ गौरव डेंगळे/१५ मे २०२५:बिहारमध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया यूथ गेम्स २०२५ मध्ये महाराष्ट्राने दमदार कामगिरी करत एकूण १५८ पदकांची कमाई केली आणि देशभरात आपला पहिला क्रमांक पक्का केला. या स्पर्धेत राज्याने ५८ सुवर्ण,४७ रौप्य आणि ५३ कांस्य पदकांची भरघोस कमाई केली आहे.#महाराष्ट्राच्या_खेळाडूंची_बहारदार_कामगिरी!या स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या खेळाडूंनी विविध क्रीडाप्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करत राज्याचं नाव उंचावलं. अॅथलेटिक्स, कुस्ती, जलतरण, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, खो-खो, कबड्डी आणि जिम्नॅस्टिकसारख्या खेळांमध्ये महाराष्ट्राने वर्चस्व प्रस्थापित केलं.#हरियाणा_व_राजस्थान_मागे_राहिले!महाराष्ट्राच्या पाठोपाठ हरियाणाने दुसरं स्थान पटकावत ११७ पदकं जिंकली. त्यानंतर राजस्थानने ६० पदकांसह तिसरे स्थान मिळवले.दिल्ली,कर्नाटक आणि तामिळनाडू यांसारख्या राज्यांनाही महाराष्ट्राच्या तुलनेत कमी पदकं मिळाले.#प्रशासनाची_भूमिका_आणि_पुढील_योजना!राज्य सरकारने खेळांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, प्रशिक्षकांची नियुक्ती, आर्थिक सहाय्य आणि आधुनिक प्रशिक्षण केंद्रांची उभारणी यांमध्ये भरीव योगदान दिले आहे. याशिवाय शालेय व महाविद्यालयीन स्तरावरून खेळाडूंना निवडून पुढे घेऊन जाण्याची मजबूत यंत्रणा यशस्वी ठरली आहे.
#क्रीडामंत्री_यांचे_वक्तव्य:
ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.आमच्या खेळाडूंनी संपूर्ण देशात सर्वोत्तम कामगिरी केली.आम्ही पुढेही त्यांना हवे ते सहकार्य देत राहू.
#महाराष्ट्रासाठी_पुढील_पाऊल – #आंतरराष्ट्रीय_यशया कामगिरीमुळे अनेक खेळाडू आता राष्ट्रीय स्तरावरून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचं प्रशिक्षण, फिजिओथेरपी, पोषण आहार, आणि मानसिक तयारी यासाठी विशेष कार्यक्रम राबवले जातील.
Post a Comment