खताच्या किमती वाढल्यामुळे अन्नदाता चिंतेत ? किमती कमी करण्याची मागणी.

 


बेलापुर  (प्रतिनिधी  )-निसार्गाच्या ऋतुमानात अचानक होणाऱ्या बदलामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असतानाच शासनाने खताच्या किमतीत भरमसाठ वाढ करुन शेतकऱ्यांना जोरदार धक्का दिला असुन खताच्या किमती कमी करण्याची मागणी केली जात आहे            वातावरणात वेळोवेळी बदल होत असतानाही आपला जिव मुठीत धरुन शेतकऱ्यांनी कांदा गहु हरबरा ज्वारी पिके घेतली अनेकांनी फळबागा धरलेल्या आहेत वातावरणात झालेल्या बदलामुळे फवारणी करुन वैतागलेल्या शेतकऱ्यांना आणखी एक जोरदार झटका दिला असुन रासायनिक खताच्या किमतीत ५० रुपयापासुन १९५ रुपयापर्यत वाढ केलेली आहे आगोदरच वाढता उत्पादन खर्च व कमी उत्पन्न यामुळे शेतकऱ्यांची दयनिय अवस्था झालेली असतानाच खताच्या किमतीत वाढ झाल्यामुळे शेती करावी तर कशी करावी असा प्रश्न शेताकऱ्यांना पडला आहे रब्बी हंगामातील खताची मागणी वाढलेली असतानाच शासनाने खताच्या किमतीत वाढ केल्यामुळे शेतकऱ्यांचे बजेट कोसळले आहे.२४;२४;० ची गोणी १५४०रुपयांना मिळत होती आज तीची किंमत १७०० रुपये झाली आहे .१०;२६;२६ ची गोणी पुर्वी १४५० रुपयांना मिळत होती आता तीच गोणी १६४० रुपयांना मिळणार आहे .१२;३२;१६ ही खताची गोणी १४७०रुपयांना मिळत होती आता तीची किंमत १६४० रुपये झाली आहे पोटँशची किमंत पुर्वी १०१५ रुपये होती आता तीच किमत १८७५ रुपये झाली आहे .१६;२०;०;१३ या खताच्या गोणीतही ५० रुपयांनी वाढली आहे .त्यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे शासनाने खताच्या किमती तातडीने कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे .

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget