नगरपरिषदेकडून अशुध्द पाणी पुरवठा ; जे.जे. फौंडेशन उपोषण करणार - जमादार.

श्रीरामपूर गेल्या अनेक दिवसापासून श्रीरामपूर नगरपरिषदेकडून गुमट वास असलेला बेचव रंगहिन पाण्याच्या सर्रास पुरवठा होत असल्याबाबत जे . जे . फौडेशनच्या वतीने नगरपरिषद मुख्याधिकारी यांना काही दिवसापूर्वी निवेदन देवून नगरपरिषदेकडून दुषित पाण्याचा पुरवठा त्वरीत थांबवून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे लेखी निवेदन देण्यात आले . नगरपरिषदेकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने दि . ७/१२/२०२० रोजी पासून जे . जे . फौडेशनच्या वतीने बेमुदत अमरण उपोषणासह वेगवेगळ्या स्वरुपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा प्रदेशाध्यक्ष जोएफ युनुस जमादार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविलेल्या निवेदनात दिला आहे . शहरातील नागरिकांना स्वच्छ , निर्मळ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे . कुमट वास असलेले पाणी , गढूळ झालेले बेचव व रंग बदलेल्या पाण्याचा पुरवठा होत असल्याने अनेक नागरिकांना ताप , घसा दुखणे , सर्दी - पडसे या सारखे आजार निर्माण झालेले आहेत . लहान बालकांना ही श्वासनाचे आजार ही होत आहे . पाण्याच्या चवीमध्ये फेर बदल झाल्याने मानवनिर्मिती आपत्तीने सर्व सामान्याचे आजार बळावत आहे . सत्ताधारी - विरोधक एकमेकांविरुद्ध आरोप - प्रत्योरोप करण्यात धन्यता मानत असून नागरिकांच्या आरोग्याकडे कोणाचेही लक्ष राहिलेले नाही . नगरपरिषदेमधील सुंदोपसुंदी वाक्प्रचारामुळे नागरिकांची चांगलीच करमणूक होत असून शहराची उचांवलेली प्रतिष्ठा धुळीस मिळत चालेली आहे . एकेकाळी नावारुपास आलेली नगरपरिषद आता ग्रामपंचायतीसारखी झाली आहे . अशी तक्रार ही श्री.जमादार यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमूद केली आहे . 

Tags

Post a Comment

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget