श्रीरामपूर/प्रतिनिधी
जीवनात ही घडी अशीच राहू दे मैत्रीच्या या फुलांवरी वसंत नाचू दे असाच काहीसा अनुभव श्रीरामपूर एज्युकेशन सोसायटी हायस्कुल च्या 1996 इयत्ता 10 वि च्या बॅच च्या मैत्री मेळाव्यायातू न अनुभवयास मिळाला.शाळेच्या त्या दिवसांच्या आठवणी कटू गोड यांना उजाळा देताना प्रत्येकालाच पुन्हा एकदा शाळेत असल्याचा आनंद मिळाला .मित्र मैत्रिणी नि एकत्र येऊन आपले 22 वर्ष पुन्हा मागे वळून बघितले आणि भविष्याचा वेध घेणारा वर्तमानकाळ एकमेकांशी वाटलं .वेगवेगळ्या क्षेत्रात असताना देखील भविष्यात या मैत्रीच्या रेशीमगाठी टिकवण्यासाठी आणाभाका घेतल्या .आपआपल्या जीवनात घडलेल्या सुखाच्या काही दुःखाच्या क्षणांना वाटून मन मोकळे केले .
एक उनाड दिवस भोजनाचा आस्वाद घेऊन घालवला
या कार्यक्रमाचे नियोजन कल्पना वाघ ,रवींद्र वाघ ,मनोहर लबडे ,नितीन लबडे,समीर शेख यांनी अतिशय सुरेख असे केले.व सर्वानाच मैत्रीचा हा कट्टा नव्याने जगण्याची ही उमेद देऊन गेला.
Post a Comment