Latest Post

बेलापूरः(प्रतिनिधी )- जलसंपदा तथा पालकमंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली बेलापूर बु ग्रामपंचायतीने  सातत्याने विविध उपक्रम राबविले असुन या उपक्रमामुळे गावातील विकासाला चालना मिळाली असल्याचे प्रतिपादन मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी केले.                                बेलापूर बुll ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महिला मेळाव्यास संबोधित करताना नवले बोलत होते.या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.मिनाताई साळवी या होत्या.तर मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे मा. उपसभापती अभिषेक खंडागळे,उपसरपंच चंद्रकांत नवले,ग्रामपंचायत सदस्य मुश्ताक शेख,तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,रंजना बोरुडे,प्रतिभा नवले, मानवी खंडागळे,पंचायत समितीच्या प्रकल्प अधिकारी  शोभा शिंदे,बँक आॕफ महाराष्ट्र चे शाखा व्यवस्थापक राजेश परदेशी, डॉ. अश्विनी लिपटे, शशिकांत दुशिंग आदि उपस्थित होते.                         आपल्या भाषणात नवले पुढे म्हणाले की गावात महिलांची संख्या पन्नास टक्के असुन या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाम.राधाकृष्ण विखे पा, माजी खा.डाॕ.सुजय विखे पा.,जि.परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.शालिनीताई विखे पा.यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले  आहेत. गावकरी मंडळाच्या ताब्यात सत्ता आल्यापासून गावात विविध विकास कामे वेगाने होत असून बेलापूर ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच स्वाती अमोलिक,मिनाताई  साळवी,माजी उपसरपंच तबसुम बागवान,प्रियंका कु-हे,सदस्य उज्वला कुताळ,सुशिलाबाई पवार,शिलाताई पोळ,छायाताई निंबाळकर आदिंचा यात  मोठा सहभाग आहे.गावकरी मंडळाने  समाजांतील सर्व घटकांना समान न्याय देण्याचे धोरण अवलंबिले असुन लवकरच १००० घरकुलांचे बांधकाम सुरू होणार आहे.महिलांकरीता शासनाच्या अनेक  योजनां असुन योजनांची माहिती न झाल्यामुळे अनेक महिला लाभापासून वंचित राहतात.महिलांचे आरोग्य चांगले राहिले तर कुटुंबाचेही आरोग्य चांगले राहू शकते.त्यामुळे महीलांनी आरोग्याबाबात सजग व्हावे यासाठी आरोग्य प्रबोधन व तपासणी स्वच्छता महिलांना मिळणारे लाभ गावाच्या विकासात महीलांचे योगदान या सर्व बाबींची माहिती व्हावी या हेतुने मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे नवले यांनी सांगीतले .                                          प्रास्तविक भाषणात बाजार समितीचे माजी उपसभापती म्हणाले की,आजवर बेलापूर ग्रामपंचातीच्या माध्यमातून गावाच्या विकासासाठी नामदार.राधाकृष्ण विखे पा.यांचे  भक्कम सहाय्य व पाठबळ मिळाले आहे.नाम.विखे यांच्या सहकार्याने १२६ कोटीची पाणी पुरवठा योजना तसेच या योजनेच्या साठवण तलावासाठी आठ एकर जमिन ग्रामपंचायतीला मोफत मिळाली.या योजनेचे काम प्रगतीपथावर असून येत्या सहा महिन्यात योजना पूर्ण होणार असुन तिनं म्हशीने पुरेल इतका पाणीसाठा त त्यात असणार आहे.गावातील गरजूंसाठी तब्बल ११०० घरकुले मंजूर झाली आहेत.  या घरकुलासह,सेंद्रिय खत प्रकल्प,क्रिडा संकुल तसेच सर्वधर्मियांच्या स्मशानभुमिसाठी ३४ एकर जागा नाम.विखे पा. यांच्या प्रयत्नातून मिळाली आहे.ग्रामपंचायतीने भुयारी गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर केले आहे.तसेच ओला व सुका कचरा स्वतंञपणे संकलित करण्याचे कामही सुरु केले आहे.भविष्यात कच-यावर प्रक्रिया करुन खतप्रकल्प उभारणी केली जाणार आहे.सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे कामही प्रगतीपथावर आहे.पाणी पुरवठा योजनेच्या पाईपलाईनसाठी रस्ते खोदाई झाल्याने रस्त्यांची कामे करता आली नाहीत.माञ पावसाळ्यानंतर लगेचच रस्त्यांची कामे केली जातील. त्यासाठी निधी उपलब्धतेसाठी नाम.विखे पा.यांचे माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. लवकरच पाणीपुरवठा योजना कामाचा पाहणी दौरा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती खंडागळे यांनी दिली.                                                यावेळी सरपंच मिनाताई साळवी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला तर सौ.आशाताई गायकवाड ,ग्रामपंचायत अधिकारी निलेश लहारे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी प.समितीच्या प्रकल्प आधिकारी शोभा शिंदे यांनी बचतगटा संदर्भातील योजना,त्या माध्यमातून करता येणारे व्यवसाय याची माहिती दिली. महाराष्ट्र बँकेचे बेलापूर शाखेचे व्यवस्थापक  राजेश परदेशी यांनी महिलांसाठी बँकेमार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देवून त्याबाबात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभ प्रकल्पचे शशिकांत दुशिंग यांनी घनकचरा व ओलाकचरा संकलन व प्रक्रियाबाबत सविस्तर माहिती दिली.प्राथमिक आरोग्य केन्द्राच्या आरोग्य अधिकारी डाॕ.अश्विनी लिप्टे यांनी महिलांच्या आरोग्याबाबत प्रबोधन केले.पञकार देविदास देसाई यांनी अंधश्रध्देबाबत प्रबोधन केले.मेळाव्याचे दरम्यान महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली.अध्यक्षीय सूचना सौ. मनिषा दळे यांनी मांडली त्यास सौ. संध्या तेलोरे यांनी अनुमोदन दिले.कार्यक्रमाचे सूञसंचलन सौ.योगिताताई अमोलिक यांनी केले तर सौ. वैशालीताई शेळके यांनी आभार मानले.मेळाव्यास उपसरपंच चंद्रकांत नवले सदस्य मुस्ताक शेख तबसूम बागवान प्रियंका खुरे उज्वला कुताळ जया भराटे आशा गायकवाड ज्योती जगताप मंगल जावरे सरिता मोकाशी वैशाली शेळके मनीषा दळे संगीता देसाई प्रतिभा देसाई संगीता शिंदे तेलोरे नीलिमा कुमावत सुजाता गुंजाळ वैशाली शिरसाठ सुवर्णा खंडागळे आदिसह मोठ्या संख्येने परिसरातील बचत गटाच्या महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कोपरगाव (गौरव डेंगळे): श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजित ‘शारदा एक्सप्रेस खो खो संमिश्र लीग २०२५’ ही राज्यस्तरीय स्पर्धा शनिवार, २६ जुलै रोजी मोठ्या उत्साहात आणि पावसाच्या सरींसह संपन्न झाली. कोपरगाव, संगमनेर, येवला, अहिल्यानगर येथून आलेल्या एकूण १३ संघांनी सहभाग घेतलेला असून १८ सामन्यांमध्ये दमदार खेळाचा थरार अनुभवायला मिळाला.

स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे,युवराज नगरकर,संकेत पारखे, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे, नथलीन फर्नांडिस, कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर,रामदास खरात, अजित पवार,रवी नेद्रे, भरत थोरात आणि दिगंबर गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

चार गटांमध्ये विभागलेली ही स्पर्धा गटसाखळी,उपांत्य आणि अंतिम फेरी अशा तीन टप्प्यांमध्ये झाली. अ गटातून नूतन विद्यालय संगमनेर, ब गटातून आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल संगमनेर, क गटातून दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगर आणि ड गटातून आत्मा मालिक कोकणठाण यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या उपांत्य सामन्यात दिग्विजय क्रीडा मंडळने नूतन विद्यालयाचा पराभव केला, तर दुसऱ्या लढतीत आत्मा मालिक संघाने आदर्श स्कूलवर मात केली.

अंतिम सामन्यात आत्मा मालिक कोकणठाण संघाने जबरदस्त खेळ करत दिग्विजय क्रीडा मंडळ अहिल्यानगरचा पराभव केला आणि शर्यतीचे विजेतेपद पटकावले. यावेळी खेळाडूंनी पावसाचे आव्हान अंगिकारत मैदानावर चिवट झुंज दिली आणि उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून राधिका भोसले आणि जयदत्त गाडेकर यांना गौरविण्यात आले. अंतिम सामन्याचा मानकरी तनिष मानकर ठरला. स्पर्धेत विविध सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित हसे, साईराज पाटील, साहिल नेहे, तेजल रोकडे, साई सरोदे, साई भराडे, अनामिका आहेर, कार्तिक कराळे, रिंकू वळवी, मनीषा वळवी, अर्णव थोरात, अमित वासवे आणि तनवी देवकर यांचा समावेश होता.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामध्ये पंच म्हणून अण्णासाहेब गोपाल, बाळासाहेब शेळके, गणेश वाघ, गणेश मोरे, रितेश माळवदे, ओम जगताप, यश जाधव, साई जाधव, प्रसाद मावळ यांचे मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यांच्यात नेतृत्वगुण, संघभावना, स्पर्धात्मकता आणि आत्मविश्वास यांचे उत्तम संकलन घडल्याचे दृश्य मैदानात दिसून आले.पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. विजेता आत्मा मालिक कोकणठाण संघाला ₹२१०० रोख रक्कम व चषक देण्यात आला, तर उपविजेता दिग्विजय मंडळ अहिल्यानगर संघाला कोपरगाव क्रीडा समितीचे अध्यक्ष श्री. धनंजय देवकर यांच्या हस्ते ₹१००० रोख रक्कम व गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यासोबतच सर्वोत्तम खेळाडू, अंतिम सामन्याचा मानकरी व इतर उल्लेखनीय खेळाडूंनाही स्मृतिचिन्हे देण्यात आली.

‘शारदा एक्सप्रेस खो खो लीग’ ही स्पर्धा केवळ एक खेळ नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक प्रेरणादायी मंच ठरली आहे.



*कोट*


"कालपर्यंत संपूर्ण जिल्ह्याला पावसाने वेढलं होतं... प्रश्न होता, 'स्पर्धा होणार तरी कशा?' पण मनामध्ये एक आशा होती, की देव जिथं खेळाचं मंदिर असतं, तिथं पावसालाही थांबावं लागतं. आज सकाळी मैदानावर आलो, ओलसर माती, पाण्याच्या साऱ्या, पण मनात एकच विनंती – ‘देवा, चार तास विश्रांती दे… खेळू दे आमचं स्वप्न.’ आणि खरंच... पावसाने थोडं बाजूला सरून मैदान खुलं केलं आणि शारदा खो खो लीगचा थरार साऱ्या सीमारेषा तोडून मैदानावर अवतरला!"


गौरव अरविंद डेंगळे (क्रीडा मार्गदर्शक)

बेलापूर (प्रतिनिधी)-एका दिव्यांगाला प्रवाहात आणण्याची टाकलेली जबाबदारी एका कर्मचाऱ्याला चांगलीच महागात पडली .50 हजार रुपये रोख भूर्दंड भरुन इज्जतीचा पंचनामा करण्याची वेळ त्या कर्मचाऱ्यांवर आली पण दिवसांचा गोंधळ रात्री च मिटला अन् त्याने सुटकेचा निश्वास टाकला.                      त्याचे झाले असे की परिसरातील एका परिवारात एक मुलगा दिव्यांग होता. त्याची माहिती पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मिळाली. त्यांनी एका कर्मचाऱ्याला आदेश दिला की त्या दिव्यांग मुलाच्या घरी जाऊन त्याला प्रवाहात आणा. वरिष्ठाच्या आदेशानुसार तो कर्मचारी त्या दिव्यांग मुलाच्या घरी गेला त्याने दिव्यांग व्यक्तीला मिळणारे लाभ, शासकीय योजनांची माहिती दिव्यांग व्यक्तीच्या आईला दिली . त्याचबरोबर त्या मुलाचे अहिल्यानगर येथे जाऊन दिव्यांगाचे प्रमाणपत्र काढून आणा ते कसे करायचे याविषयी देखील सविस्तर मार्गदर्शन केले. काही अडचण आल्यास माझ्या फोन नंबर वर संपर्क साधा असे सांगून त्या कर्मचार्‍याने आपला फोन नंबर त्या महिलेला दिला .त्यानंतर दिवसभर त्या महिलेने वेगवेगळ्या कारणाने संबंधित कर्मचाऱ्याला फोन केले. तो कर्मचारी प्रामाणिकपणे दिव्यांगाची माहिती व येणाऱ्या अडचणी विषयी सांगत होता. हे सर्व झाल्यानंतर सायंकाळी ती महिला विचारपूस करत राहुरी येथील कर्मचाऱ्यांच्या घरी गेली व तेथे आरडा ओरडा करून हा मला दिवसभर घेऊन फिरला याने नको ते केले असे सांगून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. झालेला प्रकार पाहून तो कर्मचारीही गडबडून गेला. आजूबाजूचे नागरिक जमा होऊ लागले .तसे ती महिला आणखीनच जोर जोरात ओरडू लागले त्यामुळे त्या कर्मचाऱ्याने आपल्या मित्रांचा सल्ला घेऊन त्या महिलेसह बेलापूर गाठले. बेलापूरला आल्यानंतर ते सरळ पोलीस स्टेशनला गेले तेथे आपल्याला न्याय मिळेल अशी अपेक्षा त्या कर्मचाऱ्याला होती.परंतु तिथेही संबंधित महिलेने एकच रट लावून धरली. त्यामुळे कर्मचारी आणखीनच गडबडून गेला त्याने गावातील काही व्यक्तींना बोलावले. परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. ती महिला एका विषयावर ठाम राहिले. रात्री अकरा वाजता सुरू झालेले नाट्य दीड दोन वाजेपर्यंत सुरू होते. अखेर शेवटी त्या महिलेने आपला प्रस्ताव ठेवला. मनात नसतानाही सर्वांच्या आग्रहा खातर त्या कर्मचाऱ्याला पन्नास हजार रुपयांचा भूर्दंड बसला.वास्तविक तो कर्मचारी दिवसभर पंचायत समितीत आपल्या सहकाऱ्यां बरोबर काम करत होता.पण एका महीलेपुढे त्याला हतबल व्हावे लागले. यापूर्वीही अशाच घटना घडलेल्या असून हनी ट्रॅप सारखे प्रकार आता ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत.या याबाबत काही कर्मचारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना समक्ष भेटून निवेदन देणार असल्याचे समजले

श्रीरामपूरःपुणतांबा येथील रहिवासी असलेले धीरज व सूरज संपतराव बोर्डे या बंधुची अनुक्रमे  जलसंपदा व नगरपालिका विभागात अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.                                                     महाराष्ट्र शासनाच्या 'जलसंपदा विभाग' तर्फे घेण्यात आलेल्या परीक्षेत  धीरज बोर्डे याची सहाय्यक अभियंता (ज्यु. इंजिनियर ) पदी निवड झाली आहे . तर सूरज बोर्डे यांची सन २००० मध्ये नगरपालिका विभागात लेखाधिकारी म्हणून निवड झाली असून ते बुलढाणा नगरपालिकेत रुजू झाले आहेत. धीरज व सूरज हे दोघे अशोक सहकारी कारखान्याचे माजी कर्मचारी संपतराव बोर्डे यांचे चिरंजीव आहेत.विशेष म्हणजे सुरज व धीरज हे जुळेबंधू असून दोघांचीही शासकीय अधिकारी म्हणून निवड होणे  दुर्मिळ ठरते.धीरज व सुरज बोर्डे यांच्या या नियुक्तीबद्दल भास्कर खंडागळे ,नानासाहेब जोंधळे,अॕड.एन.जी.खंडागळे ,बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

बेलापूर( प्रतिनिधी )-आंबी येथून पुण्याला जाण्याकरता पहाटे निघालेल्या मायलेकाच्या मोटरसायकलला बिबट्याची धडक बसल्यामुळे दोघेही  जखमी झाले असुन त्यांचेवर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात दाखल उपचार सुरू आहेत केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघेही वाचले.                याबाबत समजलेली हकीगत अशी की आंबी येथील अलका भगवान वायदंडे वय वर्ष 45 व त्यांचा मुलगा विशाल भगवान वायदंडे वय 28 हे पुणे येथे जाण्याकरिता सकाळी साडेपाच वाजता आंबी येथून निघाले श्री हरिहर केशव गोविंद बन या ठिकाणी रस्त्याच्या वळणावर गाडी असतानाच अचानक बिबट्याने गाडीला धडक दिली. या धडकी मुळे बिबट्या देखील एका बाजूला पडला तर विशाल वायदंडे व त्याच्या आई अलका वायदंडे या एका बाजूला पडल्या बिबट्या लगेच शेजारील झुडपात निघून गेला. गाडीवरून पडल्यामुळे विशाल व अलका यांना मार लागल्यामुळे ते साखर कामगार रुग्णालयात दाखल झाले तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत बिबट्याची धडक बसून देखील दोघे सुखरूप आहेत याबद्दल दोघाही मायलेकांनी देवाचे आभार मानले.

कोपरगाव ( गौरव डेंगळे):सोमैया विद्याविहार संचलित श्री शारदा इंग्लिश मिडीयम स्कूल,कोपरगाव यांच्या वतीने आयोजित शारदा Xpress खो-खो संमिश्र लीग २०२५ स्पर्धेला शनिवार, दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सुरुवात होणार आहे. कोपरगाव, संगमनेर, येवला आणि अहिल्यानगर येथून आलेल्या १३ संघांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण १८ सामने रंगणार आहेत.

शारदा स्पार्टनचे कर्णधार फरहान शेख आणि उपकर्णधार तन्वी देवकर, शारदा Xpress संघाचे जय शिंदे आणि श्रेया वाघ, शारदा महारथीचे सरस ठोळे आणि अनुष्का देवकर, शारदा शूरवीरचे अमित बोरनारे आणि श्रद्धा ठेके, शारदा बाजीराव संघाचे श्रेयस अनाड आणि श्रद्धा कालेकर अशी शारदा परिवारातील पाच संघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

शहराबाहेरील सहभागी संघांमध्ये आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल संगमनेरचे तेजस रोकडे आणि किरण पथवे, राधिका इंग्लिश मीडियम स्कूल येवल्याचे ओम भंडारी आणि स्वरा पानमळे, नूतन माध्यमिक विद्यालय राजापूर संगमनेरचे राजवीर पवार आणि कावेरी मोरे, दिग्विजय क्रीडा सामाजिक व सांस्कृतिक मंडळ अहिल्यानगरचे जयदत्त गाडेकर आणि श्रावणी थोरात, आत्मा मालिक कोकणठाणचे निलेश तडवी आणि मनीषा वाळवी, सोमैया विद्यामंदिर लक्ष्मीवाडीचे अभिजीत पवार आणि प्रीती अहिरे, संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल कोपरगावचे सार्थक कुलकर्णी आणि अन्वी परजणे तसेच सोमैया विद्यामंदिर साखरवाडीचे ओम शिंदे आणि अनुष्का भाकरे यांचा सहभाग आहे.स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य के. एल. वाकचौरे, युवा उद्योजक मनोज नगरकर, संकेत पारखे, उपप्राचार्य शुभांगी अमृतकर, पर्यवेक्षिका प्रज्ञा पहाडे, पल्लवी ससाणे व नथलीन फर्नांडिस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.कोपरगाव क्रीडा समिती अध्यक्ष धनंजय देवकर, सचिव अनुप गिरमे, पंच समिती प्रमुख अण्णासाहेब रतन गोपाल,अजित कदम, गणेश वाघ,बाळासाहेब शेळके, अनिल तेलगट,भीमाशंकर औताडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.स्पर्धेच्या तांत्रिक बाबतीत दिग्विजय भोरे,जयदीप दरंगे व जिशान इनामदार कार्यरत राहणार आहेत.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना मैदानी खेळात सहभागाची संधी मिळणार असून नेतृत्व, संघभावना आणि स्पर्धेची चुणूक यांचे उत्तम दर्शन घडणार आहे.

बेलापूरात काही महिन्यांपूर्वी बेलापूरच्या कोल्हार चौकात एटीएम फोडून धुमाकूळ घालणारे आरोपी पुन्हा बेलापुरात सक्रिय झाल्याचे पाहून स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सतर्क पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता, जीव मुठीत धरून या संशयितांचा थरारक पाठलाग केला.

​मिळालेल्या माहितीनुसार, सुज्ञ नागरिक यांनी नंदकिशोर लोखंडे यांना बाजारात एक संशयित निळ्या रंगाची मारुती ८०० गाडी उभी असल्याची माहिती दिली. तात्काळ नंदकिशोर लोखंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीचा दरवाजा वाजवला. मात्र, पोलिसांना पाहताच संशयितांनी गाडी भरधाव वेगाने पळवून नेली. पेठेतून झेंडा चौक मार्गे पडेगावच्या दिशेने आरोपी फरार झाले.


​या घटनेची माहिती मिळताच, नंदकिशोर लोखंडे यांनी भारत तमनर यांना फोन करून संशयितांचा पाठलाग करण्यास सांगितले. तात्काळ भारत तमनर आणि पंकज सानप यांनी सरकारी गाडीतून, तर जाधव साहेब आणि कोळपे दादा यांनी त्यांच्या खाजगी गाडीतून संशयितांचा पाठलाग सुरू केला. नंदकिशोर लोखंडे आणि होमगार्ड महेश थोरात हे देखील त्यांच्या गाडीतून पाठलागात सहभागी झाले.

​पोलिसांच्या या थरारक पाठलागादरम्यान, भरधाव वेगाने पळणाऱ्या निळ्या रंगाच्या मारुती ८०० गाडीचा लाडगाव रेल्वे चौकीजवळ ताबा सुटला आणि ती पलटी झाली. या अपघातात गाडीतील तीनही संशयित जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तात्काळ साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पलटी झालेली गाडी बेलापूर आऊटपोस्ट येथे आणण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

​पोलिसांनी दाखवलेल्या या धाडसामुळे बेलापूरकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget