Latest Post

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहर व परिसरात नगर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने हातभट्टीची गावठी दारु बनविण्याच्या चार ठिकाणी छापे टाकून त्या ठिकाणाहून पोलिसांनी 4 आरोपीविरुध्द कारवाई करत सुमारे 1,45,000/- रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल विजयकुमार वेठेकर, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदिप दरंदले, ज्ञानेश्वर शिंदे आकाश काळे, शिवाजी ढाकणे, महिला पोलीस

कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल अंबादास पालवे या पथकाने काल सरस्वती कॉलनी, वॉर्ड नं. 7 मधील दोन ठिकाणी त्यानंतर भैरवनाथनगर येथे दोन ठिकाणी अशा चार गावठी हातभट्टी दारु बनविण्याच्या ठिकाणी छापे टाकून हे दारु अड्डे उद्ध्वस्त करुन गावठी हातभट्टी दारु व त्याचे कच्चे रसायन नष्ट केले. या छाप्यात पोलिसांनी 1,45,000/- रुपये किंमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने, 2,300 लि. कच्चे रसायन व 300 लि.तयार दारु स्थानिक गुन्हे शाखेने नष्ट केली आहे. यात चार महिला आरोपींविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 989/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु. प्रो. ऍ़. क. 65 (ई) (फ) अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रु.किमतीचे 500 लि. कच्चे रसायन 10 हजार /- रु.किमतीची 100 लि. तयार दारु नष्ट केली.दुसर्‍या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 990/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई)(फ)अन्वये गुन्हा दाखल करुन पोलिसांनी या ठिकाणाहून 25 हजार रुपये किमतीचे 500 लि. कच्चे रसायन 5 हजार रुपये किची 50 लि. तयार दारु नष्ट केली.तिसर्‍या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 991/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु. प्रो .ऍ़. क. 65 (ई) (फ) एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करत या ठिकाणाहून 40, हजार रुपये किंमतीचे 800 लि. कच्चे रसायन 10 हजार रुपये किंमतीची 100 लि. तयार दारु नष्ट केली आहे.चौथ्या फिर्यादित श्रीरामपूर शहर ठाण्यात 992/2022 नुसार एका महिलेविरुध्द मु.प्रो.ऍ़.क. 65 (ई) (फ)अन्वये गुन्हा दाखल करत पोलिसांनी 25 हजार रुपये किंमतीचे 500 लि. कच्चे रसायन 5,000/- रु.किची 50 लि. तयार दारु नष्ट केली आहे. या प्रकरणात एकुण 4 महिला आरोपीकडून 1,45,000/- रु. कि.ची 2300 कच्चे रसायन 300 लि. गावठी हातभट्टीची तयार दारु नष्ट करण्यात आली आहे.

मुंबई   ( विशेष प्रतिनिधी )वितरण व्यवस्थेतील सर्व त्रुटी लवकरच दुर करण्यात येणार असुन संबधीतांना प्रधानमंत्री मोफत धान्य वाटपाचे कमिशन तातडीने देण्याच्या सुचना देण्यात येतील तसेच नवीन फोर जी मशिन देण्यात येणार असल्यामुळे भविष्यात वाटपास अडचणी येणार नसल्याचा विश्वास  पुरवठा विभागाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी व्यक्त केला                        राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या अडचणी संदर्भात पुरवठा विभागाचे प्रधान सचिव मा. विजय वाघमारे यांच्या समवेत आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनची  बैठक आयोजित  करण्यात आली होती . त्या वेळी आँल महाराष्ट्र फेअर प्राईज शाँप किपर्स फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष  गणपतराव डोळसे पाटील म्हणाले की ऐन सणा सुदीच्या काळात राज्यात मशिन बंद पडल्या त्यामुळे धान्य असुनही दुकानदारांना त्याचे वितरण करणे अवघड झाले अनेक जिल्ह्यात वेळेवर धान्य उपलब्ध करुन दिले जात नाही त्यामुळे अनेक धान्य कोठा लँप्स होत आहे तसेच उशिरा धान्य आल्यामुळे ते मंशिनवर वेळेवर न टाकल्यामुळे वाटप करता येत नाही त्यामुळे गोदामातुन गाडी निघताच त्या दुकानाच्या मशिनवर धान्य साठा टाकला जावा तसेच तीन तीन महीने माल उशिरा मिळत असल्यामुळे कार्डधारकांचा रोष ओढवला जातो मोफत व रेग्युलर धान्य एकाच वेळी देण्यात यावे धान्य कोठा नसल्यामुळे लँप्स झालेल्या धान्य वाटपास मुदत वाढ देण्यात यावी कोरोना काळात मृत्यू पावलेल्या दुकानदारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यात यावी कमीशन वाढीबाबत कँबिनेट मंत्रीमंडळात चर्चा करण्यात यावी आय एस ओ मानांकनाबाबत सक्ती करण्यात येवु नये उशिरा आनंदाचा शिधा मिळालेल्या जिल्ह्यांना वाटपासाठी मुदतवाढ देण्यात यावी दुकानदारांना गँस सिलेंडर वाटपास अनुमती देण्यात यावी  अशा मागण्या फेडरेशनच्या वतीने मांडण्यात आल्या .त्या वेळी प्रधान सचिव विजय वाघमारे यांनी दुकानदारांच्या सर्व अडचणी माननीय पुरवठा मंत्री महोदयांच्या बैठकीत ठेवुन त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करु असे अश्वासन दिले   या बैठकीला पुरवठा  विभागाचे उप. सचिव  नेत्रा मानकामे ,उपसचिव गजानन देशमुख , अवर सचिव कोळेकर  . दिपक आत्राम ,सागर कारंडे  यांच्य समवेत .ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉप किपर फेडरेशनचे राज्य अध्यक्ष गणपतराव डोळसे पाटील ,नाशिक जिल्हाध्यक्ष निवृत्ती कापसे जनरल सेक्रेटरी बाबुराव ममाणे ,विभागीय अध्यक्ष अशोक ऐडके शांताराम पाटील शंकर सुरोसे ,विवेक भेरे ,दिलीप नवले फारुख शेख सातारा जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब तोडकरी  आण्णा शेटे आदि उपस्थित  होते .

श्रीरामपूर-शहरातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचा विडा उचलून,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळ्या कारवाई होत असतांना. एकजण घातपाटाच्या उद्देशाने, गावठी कट्टा व जिवंत बाळगत असल्या संदर्भात. पोलीस निरीक्षक गवळी यांना गोपीनिय माहिती मिळताच, त्यांनी शहर गुन्हे तपास पथकाचे सपोनि जिवन बोरसे यांना कारवाईचे आदेश दिले. रात्री १० वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीच्या आधारे, आपल्या जीवाची पर्वा न करता. सपोनि बोरसे हे काही सहका-यांना सोबत घेऊन. छत्रपती शिवाजी चौकापासून काही अंतरावर, सापळा लावुन बसलेले असतांना. त्यावेळी २ इसम विनानंबर पांढऱ्या रंगाच्या एक्टीवावर, टिळकनगर हुन श्रीरामपूरच्या दिशेने येतांना पाहून. पोलिसांनी मोठ्या शिताफीने, गौरव संजय रहाटे, वय वर्ष २२, राहणार दत्तनगर, व रुपेश किरण जाधव, वय वर्ष १८,राहणार कामगार हॉस्पिटल, वॉर्ड नं. ६, या दोघांना  एक गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह,

१ लाख १ हजारांच्या मुद्देमालासह रंगेहाथ पकडून. आरोपीं विरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून. आरोपींनी गावठी कट्टा कोठून आणि कोणत्या उद्देशाने आणला या बाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत. सदरची कारवाई सपोनि जिवन बोरसे, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस शिपाई गौतम लगड, राहुल नरवडे,रमिझराजा अत्तार,गणेश गावडे,गौरव दुर्गुळे,मच्छिद्र कातखडे, भारत तमनर आदींनी यशस्वीरीत्या पारपडली असून. आरोपींना न्यायालयात हजर केले असता. अधिक तपासा करिता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनाविण्यात आल्याची माहिती, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी दिली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी  )-जगातील सर्व देश हे भारताकडे कुतुहलाने व उत्सुकतेने पहात असुन येणारा काळ हा भारत मातेच्या उत्कर्षाचा भरभराटीचा व वैभव संपन्नतेचा असणार आहे जागतीक पातळीवर आपल्या देशाला विशेष महत्व प्राप्त होणार असल्याचा विश्वास राम मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष महंत गोविंददेवगीरीजी महाराज तथा आचार्य किशोरजी व्यास यांनी व्यक्त केला                                              बेलापुर येथील जुने बालाजी मंदीर येथे आयोजित अन्नकुट उत्सवात भावीकांना उपदेश करताना महंत गोविंद देवगीरीजी महाराज पुढे म्हणाले की या देशात विविध जाती धर्माचे लोक गुण्या गोवींदाने राहतात  या देशात वेगवेगळे उत्सव सण उपासणा केल्या जात असल्यामुळे देशाची शोभा दिवसेंदिवस वाढत आहे  जगातील एकमेव भारत देश असा देश आहे की तेथे विविध भाषा वेगवेगळ्या परंपरा रितीरीवाज चालीरीती असुनही या देशात ऐकोपा आहे सुख समृद्धी आहे याचे कारण आपल्या सर्वांची एकच भावना आहे की आपण सारे भारत मातेची लेकुरे आहोत आपल्या देशाची एक व्यक्ती इंग्लंडचा पंतप्रधान होवु शकते ही अभिमानाची गोष्ट आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त आपली खरेदी गावातच करा ही सुंदर संकल्पना गावकऱ्यांनी राबविली आपल्या गावाचा तालुक्याचा जिल्ह्याचा देशाचा विकास करावयाचा असेल तर आपल्या वस्तु गावातच खरेदी करा देशी वस्तुंचाच वापर करा आपली मुले शहराकडे आकर्षित होत आहे नोकरीच्या मागे पळताना गाव गावातील माणसांना विसरत चालले आहे हे कुठेतरी थांबले पाहीजे त्याकरीता उच्च शिक्षणाची सुविधा गावातच मिळण्यासाठी प्रयत्न करायला हवेत जगातील सर्व मुस्लीम राष्ट्रांची परिषद इंडोनेशियात होत आहे  काळानुरुप मुस्लिम बांधव देखील  बदलण्याच्या विचारात आहेत.असे सागुंन ते पुढे म्हणाले की  आपल्या देशाच्या वतीने नेतृत्व करण्याची, विचार मांडण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली असुन भगवान केशव गोंविंद महाराज व आपल्या ग्रामस्थांच्या कृपेने नक्कीच यश येईल असेही आचार्य महंत गोविंददेवागीरीजी महाराज म्हणाले ओमप्रकाश व्यास व व्यास परिवारातील बालगोपालांनी देवाचा अतिशय सुंदर पध्दतीने शृंगार केला होता या वेळी अन्नकुटचे यजमान सौ स्नेहलशरद नवले व शरद मोहनराव नवले यांचा सप्त्नीक सत्कार करण्यात आला या वेळी  सखाहारी मुळे लिखीत गोमाता कथा अमृत तसेच मोहनराव खानवेलकर लिखीत भगवान श्री हरिहर केशव गोविंद महात्म्य या ग्रंथाचे प्रकाशन तसेच बेलापुर पाणी पुरवठा योजनेस शासनाकडून १२६ कोटी रुपये मंजुर झाल्याबद्दल त्या माहीती पत्रकाचे अनावरण स्वामीजींच्या हस्ते अनावरण करण्यात आले  कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोपाल उपाध्याय यांनी केले तर ट्रस्टचे सचिव पंडीत महेश व्यास यांनी आभार मानले

बेलापुर  (प्रतिनिधी  )-देशाचे रक्षण करताना शहीद झालेल्या जवान व शहीद झालेल्या पोलीस बांधवांना श्रध्दांजली वहाण्याचा तसेच भारतीय जवान व पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी एक पणती जवानांसाठी हा उपक्रम फ्रेंडस् फाँर एव्हर गृप व बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने राबविण्यात आला.फ्रेंड़्स फाँर एव्हर गृप व समस्त ग्रामस्थांच्या वतीने देशाचे रक्षण करताना जे जवान शहीद झाले तसेच आपले कर्तव्य बजावताना जे पोलीस बांधव शहीद झाले त्यांना श्रध्दांजली वहाण्यासाठी तसेच भारतीय जवान व कर्तव्य बजावणारे पोलीस बांधव यांच्या प्रति सद़्भावना व्यक्त करण्यासाठी गेल्या नऊ वर्षापासुन पाडव्याच्या दिवशी सायंकाळी सात वाजता हा उपक्रम राबविण्यात येत आहे छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व भारत मातेचे पुजन करुन या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली बेलापुरच्या मुख्य चौकात असलेल्या ध्वजस्तंभाभोवती हजारो पणत्या माजी सैनिक तसेच पोलीस बांधव व ग्रामस्थ यांच्या हस्ते प्रज्वलीत करण्यात आल्या या वेळी शहीद जवान शहीद पोलीस बांधव आत्महत्या केलेले शेतकरी बांधव या सर्वांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली या वेळी शहीद जवान अमर रहे जय जवान जय किसान वंदे मात़़्रम भारत माता कि जय अशा घोषणा देण्यात आल्या या वेळी माजी जि प सदस्य  शरद नवले सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे बेलापुर सेवा संस्थेचे चेअरमन सुधीर नवले बेलापुर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे सचिव देविदास देसाई,रणजित श्रीगोड,मारुती राशिनकर,विष्णूपंत डावरे दिलीप दायमा,दिपक क्षत्रिय, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, अजीज शेख,भीमराज हुडे,ग्रामपंचायत सदस्य,मुस्ताक शेख तंटामुक्ती अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे मोहसीन सय्यद, शिवाजी वाबळे,लहानु नागले, बेलापुर पोलीस स्टेशनचे हवालदार अतुल लोटके गणेश भिंगारदे  हरिष पानसंबळ  पोलीस पाटील अशोक प्रधान कैलास चायल,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा,रावसाहेब अमोलीक बाबुलाल पठाण,शफीक बागवान सुधीर तेलोरे,महेश कुऱ्हे, गणेश बंगाळ,दत्तात्रय मुसमाडे,रफिक शेख,जयेश अमोलीक,गयाज पठाण,वैभव कुऱ्हे,योगेश दायमा पोपट नवले, समीर जहागीरदार, जब्बार पठाण,सुरेश सूर्यवंशी, अवधूत कुलकर्णी, जयेश अमोलिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी फ्रेंड़्स फाँर एव्हर गृपचे विष्णूकांत लखोटीया, शशिकांत तेलोरे,राजेश सुर्यवंशी वेणूगोपाल सोमाणी,अभिषेक खंडागळे,सुमित सोमाणी विशाल वर्मा,मयुर साळूंके,सुभाष शेलार योगेश जाधव, संदीप जाधव ऋतुराज नाईक, विजय कोठारी प्रभात कुऱ्हे  निशीकांत लखोटीया,रविंद्र कुऱ्हे,साईनाथ शिरसाठ आदिनी विशेष प्रयत्न केले उपसरपंच अभिषेक  खंडागळे यांनी आभार व्यक्त केले.

श्रीरामपूर : शाळा आणि ज्ञानार्जन हे विद्यार्थ्यांच्या बाबतीत एक सर्वश्रूत समीकरणच आहे.शाळेतून घेतलेले धडे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे काम विद्यार्थ्यांनी केल्यास त्यांचे सर्वत्र कौतुक होत असते.गावकर्‍यांसोबत इतरांनीही कौतुक करावे असा दीपोत्सवाचा उपक्रम उंबरगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत साजरा केला.  

असा सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी शाळेत यावे हीच मुळात आनंद देणारी बाब आहे. ज्या शाळेत आपण ज्ञानाचे धडे घेतो,त्याच ज्ञानरूपी शिदोरीच्या सहाय्याने विद्यार्थी भविष्यात मार्गक्रमण करतो, अशा शाळेत रोषणाई केली जावी अशा उद्देशाने विद्यार्थ्यांनी दिवाळी प्रथम शाळेत साजरी केली.


उंबरगाव येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक शकील बागवान यांनी पुढाकार घेत दिवाळी सुट्टीपूर्वी विद्यार्थ्यांना दीपावलीचे महत्त्व पटवून देताना पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करताना फटाके न वाजवण्याचे आवाहन केले होते.त्याचवेळी सहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळेतच दिवाळी साजरी करण्याचा संकल्प मांडला.सर्व विद्यार्थ्यांनी होकार देत प्रत्यक्ष दिवाळी साजरी करण्याचे नियोजन केले. 

दिवलीच्या दिवशी रंगी बेरंगी कपडे परिधान करून नटून थटून आलेला प्रत्येक विद्यार्थी पणतीसह आला. प्रत्येक विद्यार्थ्याने त्याच आनंदाची पणती प्रत्येक


वर्गासमोर दीप लावून तो वर्ग सुशोभित केला.पणत्यानी रोषणाई करून संपूर्ण शालेय परिसर प्रकाशमय करून समृद्ध केला. फटाके न फोडता प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचा खराखुरा आनंद यावेळी विद्यार्थ्यांनी घेतला.सर्व विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता. प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकासह एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

आगळ्यावेगळ्या या दीपोत्सवाच्या कार्यक्रमाचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे,जिल्हा परिषद सदस्य शरद नवले,पंचायत समिती सदस्य अरुण पाटील नाईक,गटशिक्षणाधिकारी साईलता सामलेटी,सरपंच किशोर कांडेकर,माजी सरपंच चिमाजी राऊत,राजेंद्र राऊत,जितेंद्र भोसले,मुख्याध्यापक लताबाई पालवे व सर्व शिक्षकांनी उपक्रमाचे कौतुक केले.

बेलापुर (प्रतिनिधी  )-दिपावलीच्या सणाकरीता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सजवुन ठेवली परंतु अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे बाजारपेठेत मंदीचे सावट स्पष्ट जाणवत होते            दिपावली सणाकरीता व्यापाऱ्यांनी दुकानात भरपुर माल भरुन ठेवला होता या वर्षी दिवाळी चांगली होईल अशी सर्वांनाच अपेक्षा असताना अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी व्यापारी कष्टकरी सर्वांच्या आनंदावर पाणी पडले बेलापुर बाजारपेठेची आसपासच्या गावांमुळे दर वर्षी मोठी आर्थिक उलाढाल होत असते खासकरुन शेती चांगली पिकली तर बाजारपेठ फुलुन जाते परंतु या वर्षी सर्वच पिके जोमात होती परंतु आलेल्या पावसामुळे ती सर्व कोमात गेली पाऊस येण्या आगोदर सर्वच भागात सोयाबीन कापसु मका ही पिके जोरात होती त्या पिकाच्या जोरावर काही शेतकऱ्यांनी कर्ज घेतले होते परंतु अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या वाती झाल्या तर

सोयाबीनला जागेवरच मोड फुटले सोयाबीन, कापुस बाजारात आले असते तर आर्थिक उलाढाल वाढली असती परंतु आता केवळ बालबच्च्याकरीता नाईलाजास्तव सण साजरा करण्याची वेळ सर्वावरच आली आहे अनेकांनी थोडे फार फराळ बाजारातुनच विकत आणुन सण साजरा केला आहे  शेतीतील पिकाचे नुकसान झाल्यामुळे कष्टकरी वर्गांना देखील काम मिळेनासे झाले आहे नुकसानीचे पंचनामे करुन निदान दिवाळीला तरी सण साजरा करण्यापुरती मदत शासनाकडून मिळेल ही अपेक्षा होती पण ती ही फोल ठरली आहे याचा परीणाम सर्व बाजारपेठावर झालेला दिसत असुन व्यापारी ग्राहकाच्या प्रतिक्षेत दुकानात बसुन आहे बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त  ग्राहकांनी आपली खरेदी गावातच करावी या करीता भव्य अशी बक्षिस योजना जाहीर केली व्यापारी वर्गाकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला परंतु हाता-तोंडाशी आलेला शेतकऱ्याचा घास हिरावला गेल्यामुळे व्यापारी बँका पतसंस्था सहकारी संस्था सर्वावरच मोठा परिणाम झाला आहे

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget