Latest Post

बेलापुर  (प्रतिनिधी  )-आपल्या विविध मागण्या बाबत बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर  सुरु केलेले धरणे आंदोलन सरपंच महेंद्र साळवी  उपसरपंच अभिषेक खंडागळे  व ग्रामविकास  अधिकारी राजेश तगरे यांच्या अश्वासनानंतर मागे घेण्यात आले.  महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाच्या नेतृत्वाखाली बेलापुर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु करु कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरु केले होते कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर करावेत प्राँव्हीडंट फंडाची रक्कम त्वरीत अदा करण्यात यावी पगार वाढ देण्यात यावी भविष्य निर्वाह निधीची रक्कम नाशिक येथील खात्यावर भरण्यात यावी आदिसह विविध मागण्यासाठी बाबासाहेब प्रधान राजेंद्र भिंगारदिवे अशोक राऊत नंदकुमार गायकवाड म्हाळू खोसे रविंद्र मेहेत्रे रमेश लगे दत्तात्रय वक्ते योगेश अमोलीक बाबासाहेब लोंढे सचिन नगरकर सचिन साळूंके अमोल साळवे संकेत मोडके अनिल गाढे किरण खरोटे रविंद्र बागडे अविनाश तेलोरे अविनाश शेलार असिफ ठाकुर शाम भिंगारदीवे सागर भिंगारदीवे उज्वला मिटकर अलका भिंगारदीवे सुशिला खरात सरस्वती बागडे निर्मला तेलोरे सागुणा तांबे कलाबाई शेलार निर्मला भिंगारदीवे निर्मला गाढे आदि कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य सर्व  श्रमीक संघाचे काँ जीवन सुरुडे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु केले होते सरपंच महेंद्र साळवी उपसरपंच अभिषेक खंडागळे ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांनी सुरुडे व इतर कर्मचाऱ्यांबरोबर चर्चा केली गेल्या दहा वर्षात ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ झालेली नाही  कोरोनामुळे वसुली नाही तसेच फेर आकारणी करावयाची आहे त्यामुळे फेर आकारणी नंतर पगार वाढीबाबत  निर्णय घेण्यात येईल अश्वासन दिले त्यांच्या अश्वासनावर समाधान झाल्यामुळे आंदोलन स्थगीत करण्यात येत असल्याचे सुरुडे यांनी सांगितले

श्रीरामपूर प्रतिनिधी:-ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन श्रीरामपूर या संस्थेचे संस्थापक कलीम बिनसाद यांच्या अकॅडमीचे पंचवीस विद्यार्थी हे समता इंटरनॅशनल स्कूल उक्कलगाव याठिकाणी नुकत्याच पार पडलेल्या कराटे या कॉम्पिटिशन मध्ये विजय झाले यांचा सनमान प्रमाणपत्र व गुणगौरव करण्यासाठी श्रीरामपूर येथील मिनी स्टेडियम या ठिकाणी घेण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीरामपूर तालुक्याचे तहसीलदार मा.प्रशांत पाटील साहेब,मा. नगराध्यक्षा अनुराधाताई अदीक, शहर पोलीस स्टेशनचे ए पीआय बोरसे साहेब, महाराष्ट्र लघु वृत्तपत्र पत्रकार संघाचे शेख बरकत अली, पत्रकार प्रदीप आहेर, मा.अल्तमश पटेल,

आदित्य अदीक, तिरंगा न्यूज व इलेक्ट्रॉनिक मीडिया जिल्हाध्यक्ष असलम बिनसाद यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्लोबल मार्शल आर्ट असोसिएशन च्या विजयी विद्यार्थ्यांचा या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुणगौरव करून त्यांना प्रशस्तिपत्रक व कलर बेल्ट एक्झाम मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना बेल्ट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी  मा. तहसीलदार प्रशांत पाटील साहेब यांनी मुलांना व पालकांना मोलाचे मार्गदर्शन करत या क्षेत्रामध्ये मुलांचं करिअर घडतात यापासून शरीर व बुद्धी खूप वाढते यामध्ये कोणी पोलीस मध्ये कोणी तहसीलदार तर कोणी शिक्षक अशा मोठमोठ्या पदावर जाऊ शकतात यामुळे पालकांनी इतक्या लहान वयात मुलांना मार्शल आर्ट या खेळासाठी पाठवून खूप चांगले काम केले आहे आणि कलीम बिनसाद यांनी मुलांना मोबाईल पासून दूर करून या ग्राऊंड वर मार्शल आर्ट या खेळाकडे आकर्षित केले त्याबद्दल कलीम बिनसाद यांचे आपण मनापासून धन्यवाद देतो असे म्हणत त्यांच्या या कामाचे कौतुक केले तसेच यावेळी माननीय नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी या लहान मुलांचे फाईट ,योगा हे करत अस्थानी या मुलांना मॅट ची गरज आहे

आणि हे मॅट आपल्या तर्फे देण्याचे कबुल करत त्वरित आपन ऑर्डर करण्यासाठी प्रशिक्षक कलीम बिनसाद यांना सांगितले संस्थेचे कलीम बिनसाद हे खूप मोठे काम करत आहे आणि हे मुलं माझे संरक्षण करतील असे बोलत मुलांना प्रोत्साहन दिले त्याच पद्धतीने ए पीआय बोरसे यांनी मुलांचे मनोबल वाढवत आपण मुला मुलींचा देखील मोठ्या पदावर या ग्राउंड वर खेळणाऱ्या खेळाच्या बेसवर एक चांगले अधिकारी होऊ शकतात एक चांगला अधिकारी होण्यासाठी ग्राऊंड व फिटनेस खूप महत्त्वाचे असते असे ते म्हणाले व सर्वांनी मार्शल आर्ट च्या सर्व प्रशिक्षक यांना शुभेच्छा दिल्या  यावेळी कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एडवोकेट अजित डोके यांनी केले तर आसलम बिनसाद यांनी आभार मानले.

बेलापुर  (प्रतिनिधी  )-मासीक बैठक नियमानुसार न घेता आगोदरच सत्ताधारी गटाच्या  सह्या ईतिवृत्तावर घेवुन विरोधकांना गैरहजर दाखविण्याचा चुकीचा प्रकार बेलापुर ग्रामपंचायतीत सुरु असुन तो थांबविण्यात यावा अशी मागणी विरोधी सदस्य रविंद्र खटोड यांनी केली आहे.ग्रामविकास अधिकारी राजेश तगरे यांना दिलेल्या निवेदनात माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य रविंद्र खटोड यांनी पुढे म्हटले आहे की बेलापुर ग्रामपंचायतीत सत्ताधारी मन मानेल तसा कारभार करत असुन विरोधकांना विश्वासात न घेता चुकीच्या पध्दतीने कामकाज करत आहेत अशा प्रकारे चुकीचे होणारे कामकाज थांबविण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. बेलापुर ग्रामपंचायतीच्या मासीक बैठकीचे आज दिनांक ३०मार्च रोजी सकाळी साडे दहा वाजता आयोजन करण्यात आले होते .मासीक बैठकीसाठी रविंद्र खटोड व भरत साळूंके  सह विरोधी सदस्य ग्रामपंचायत कार्यालयात आले असता  बैठकीची वेळ झालेली असतानाही सत्ताधारी सदस्य हजर नसल्याचे लक्षात येताच खटोड व साळूंके यांनी ईतिवृत्ताची मागणी केली व मासीक बैठकीच्या ईतिवृत्तावर सह्या करण्यासाठी पाहीले असता त्या ईतिवृत्तावर विरोधी सदस्य वगळता सर्वांच्या सह्या असल्याचे लक्षात आहे सदस्य बैठकीला नसतानाही सह्या कशा झाल्या याचे कोडे विरोधकांना उलगडले नाही त्यांनी पत्रकार व इतर कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात बोलविले व सह्या झालेले ईतिवृत्त दाखविले त्या नंतर बाजार समीतीचे संचालक सुधीर नवले रविंद्र खटोड भरत साळूंके यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दुरध्वनी केला त्या नंतर सर्व जण तक्रार करण्यासाठी पंचायत समीतीत गेले तेथे त्यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांना लेखी दिले तसेच सदर बाब ही अतिशय गंभीर असुन त्या बाबत आपण योग्य ती कारवाई न केल्यास गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा ईशाराही खटोड व साळूंके यांनी दिला आहे या बाबत सरपंच महेंद्र साळवी यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की बैठकीचे कामकाज नियमानुसारच झालेले आहे मार्च अखेर असल्यामुळे वसुली व इतर कामकाजामुळे बैठक लवकर आटोपती घ्यावी लागली त्या वेळेपर्यत विरोधक आलेले नव्हते परंतु बैठकीचा कोरम पुर्ण झाल्यामुळे बैठक सुरु करुन आटोपती घेण्यात आली असुन विरोधकांचे कामच आहे आरोप करणे परंतु आमचा कारभार स्वच्छ व पारदर्शी असल्यामुळे विरोधकांना तक्रारीस वावच नसल्यामुळे हा खोटा उपद्व्याप केला जात असल्याचे साळवी यांनी म्हटले आहे .

खंडाळा प्रतिनिधी -शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जवळपास 10-15 एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. काल दि. 28 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथे ही घटना घडली. या आगीचा गावातील चार शेतकर्‍यांना फटका बसला.सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील शेतकरी अरविंद डेंगळे, अप्पासाहेब म्हसे, एस. शर्मा, परसराम डेंगळे यांच्या उसाला आग लागली. या आगीत शेतकर्‍यांचा 10 ते 15 एकर क्षेत्रातील ऊस खाक झाला.या घटनेची माहिती मिळताच गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी

दाखल झाला. मात्र वार्‍यामुळे आगीची तीव्रता आणखी वाढली. त्यातच अग्निशमन बंबास शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता न मिळाल्यामुळे मदत कार्यात अडथळे आले. त्यामुळे आग आणखी वाढत राहिली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. यापुर्वी याच महिन्यात येथे आगीची घटना घडली होती. त्यावेळीही सुमारे 10-15 एकर उसाच्या क्षेत्राची हानी झाली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

श्रीरामपूर प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. 5, रेल्वे स्टेशनसमोर विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस स्वतःजवळ बाळगुन फिरणार्‍या एकास काल पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात आर्मअ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक संजय सानप यांना एक संशयीत इसम हा आपले कब्जात विनापरवाना बेकायदेशिर गावठी कट्टा व जिवंत काडतुस बाळगून रेल्वे स्टेशन समोर वार्ड नं. 5 श्रीरामपूर येथे फिरत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळताच त्यांनी पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी

तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीषक जिवन बोरसे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल रमिजराजा आत्तार यांना कारवाई करण्यासाठी रवाना केले.तपास पथक हे रेल्वे स्टेशन जवळ गेले असता, नमूद बातमीतील वर्णना प्रमाणे एक इसम रेल्वे स्टेशन समोर फिरत असलेला दिसून आला. तपास पथकाला पाहून सदर संशयित इसम पळून लागला. तातडीने या पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करुन त्यास पकडले. सचिन बाळू धुमाळ (वय 30) रा.संभाजी चौक, अशोकनगर, ता. श्रीरामपूर असे या आरोपीचे नाव आहे. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कमरेला 25,500 रुपये किमतीचे एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतुस मिळून आला आहे. त्याप्रकरण पोलीस कॉन्स्टेबल राहुल नहादेव नरवडे यांच्या फिर्यादीवरून गु.र.नं.220/2022 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके हे करत आहेत.

श्रीरामपूर प्रतिनिधी-पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून मोटारसायकल चोरी करणार्‍या अट्टल गुन्हेगारांना काल श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणातील दोघा आरोपींना पोलिसांनी काल न्यायालयात हजर केले असताना दोघांनाही दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.श्रीरामपूर येथील अक्षय गाडेकर यांच्याकडून पोलिसांनी नंबर नसलेली मोटारसायकल पकडली. या मोटारसायकलची कोणतीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांना या गाडीचा संशय आला. त्यांनी अक्षय गाडेकर यास तू गाडी कोणाकडून खरेदी केली याची माहिती घेतली. अक्षय गाडेकर याने मोटारसायकल घेणार्‍याची नावे सांगितली. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या गुन्ह्यातील मोटार सायकल बाबत गोपनिय माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकार्‍यांना तपासाचे आदेश दिले.शहर पोलीस पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर महादेव देवकर रा. नेवासा, नल्ल्या उर्फ आकाश अनिल गायकवाड रा. नेवासा यांना अटक करुन त्यांचेकडून तपास करत होन्डा शाईन कंपनीचे 3

मोटारसायकल, एक हिरो एच.एफ. डिलक्स, एक होन्डा अ‍ॅक्टीवा असे एकूण 5 मोटारसायकल (एकूण किम्मत 3,50,000रुपये). मुद्देमाल जप्त केला आहे. सदर मोटार सायकल पुणे, नाशिक अहमदनगर औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी ज्ञानेश्वर महादेव देवकर यांचेवर वैजापूर, सांगवी, पुणे ग्रामिण, सोनईे, नेवासो, हडपसर, बदलापूर आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक, संदिप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांचेसह पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व पोलीस नाईक पंकज गोसावी, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस नाईक एम. के. शेलार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार यांचे पथकाने केली आहे.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) - शहर आणि तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध व्यवसाय वाढले आहेत, जुगार,सट्टा,मटका,गुटखा,आकडे गावठी दारु,वाळू तस्करी,भांडणे, दादागीरीने अक्षरशः शहरांसह तालुकाभर रहांकाळ मांडला आहे,याविरुद्ध समाजवादी पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी येथील मेनरोडवरील महात्मा गांधी पुतळ्यासमोर दिनांक २२ मार्च २०२२ पासून अमरण उपोषण छेडले होते त्याचा आज तीसरा दिवस होता, मात्र अवैध व्यावसायांवर पोलिसांद्वारे धाडी टाकून होत असलेल्या कारवाईबाबत समाधान व्यक्त करत उप विभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांच्या हस्ते त्यांनी आपले उपोषण अखेर आज (दि.२४/०३/२०२२ रोजी) तीसऱ्या दिवशी सोडले,

यावेळी समाजवादीचे वरिष्ठ नेते फहाद अहमद,प्रदेश महासचिव रऊफ शेख, डॉ.आरिश कमर, ज्येष्ठ कामगार नेते नागेशभाई सांवत,समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख,ऍड.मोहसिन शेख,मतीन शेख,अब्दुल सैय्यद, कलीम वेल्डर,अज़हर शेख, इमरान शेख,सोहेल शेख, समीर पठाण,जिशान शेख,अयाज मिर्ज़ा,आदी मान्यवर उपस्थित होते.

या उपोषणास श्रीसाईबाबा संस्थान विस्वस्त तथा माजी नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, मा.उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख,मा.नगरसेवक हाजी मुखतारभाई शहा,भाजपा चे शहराध्यक्ष मारुती बिंगले, भाजपाचे गणेश राठी ,राष्ट्रवादी शहराध्यक्ष लक्क़ी सेठी,असलम बिनसाथ,श्रीमती रामादेवी धीवर,ऍड.मिलिंद धीवर,पूनम जाधव,रितेश एडके,मूसा पटेल,सलीम शेख,रईस शेख, राजदचे जिल्हाध्यक्ष इमरान शेख, राजेश बोर्डे,अविनाश भोसले, हरिभाऊ शिंदे, सलमान पठाण, अहमद नासीर,श्रीकांत त्रिभुवन,अ.भा.लहूजी सेनेचे  बाळासाहेब बागुल,हनिफभाई पठाण,सलाउद्दीन शेख,इमरान पटेल,गणेश पवार, ज्ञानेश्वर, सुभान पटेल,अजहर शेख, किशोर गाड़े,मनोज बागुल,संतोष मोकळ,सुनील लोखंडे,आदी

विविध राजकीय पक्ष, संघटना, आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा मिळत असल्याने पोलिस यंत्रणा देखील खडबडून जागी झाली, कारवाईसाठी नाशीक पोलिस कमिशनर पथक आणि अहमदनगर गुन्हे अन्वेषण पथक सोबतच उपविभागीय पोलिस अधिकारी संदिप मिटके यांचे स्वतंत्र पथकासह शहर आणि तालुका पोलिस पथकाने ठिकाणी अवैध व्यावसायांवर जागोजागी धाडी टाकून अवैध व्यवसाय उध्वस्त करत लाखोंचा मुद्देमाल ही हस्तगत केला आहे.

यावेळी बोलताना जोएफ जमादार म्हणाले की शहर आणि तालुक्यातील अवैध व्यावसायामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार वाढली आहे, जनसामान्यांचे जीवन जगने मोठे मुश्किल झाले आहे,सर्वत्र गुंडांनी हैदोस मांडला आहे,यात जनसामान्यांचे मोठे नुकसान आणि परवड होत आहे, पोलिसांनी जर वेळीच आपली चोख भुमिका पार पाडलीतर सर्वत्र शांतता नांदेल मात्र असे होत नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांना उपोषण करण्याची वेळ येते ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे,मात्र सध्या अवैध व्यवसायांवर होत असलेल्या कारवाईबाबत आपण समाधानी असुन असेच धाडसत्र यापुढे देखील पोलिसांनी सुरू ठेवत शहर व तालुक्यातील अवैध व्यावसायांचा बिमोड करावा,ही कारवाई केवळ जुज्बी आणि फार्स स्वरुपाची ठरु नये, कर्तव्यदक्ष उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके आणि पक्षश्रेष्टींच्या शब्दाचा मान राखत आपण जरी उपोषण तृर्त स्थगित करत असलो तरी पुन्हा अवैध व्यवसाय आढळून आल्यास यापेक्षाही उग्र स्वरुपाचे धरणे, आंदोलने आणि उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असेही ते म्हणाले, 

यावेळी समाजवादीचे आसिफ तांबोळी,अय्युब पठाण,सौ. सुल्तानाबानो शाह,अब्दुल सैय्यद, मतीन शेख,जकरिया सैय्यद, अरबाज कुरेशी, मुबसशिर पठाण, शोएब कुरेशी ,अमन इनामदार, फैजान काज़ी, साद पठाण, रफीक शेख,गुड्डू जमादार,अनवर तांबोळी,दानिश शाह,कालु आदी उपस्थित होते.


MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget