Latest Post

शेवगांव-अविनाश देशमुख:-शेवगाव पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करत तब्बल १५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे गु.र.नं ४४२/२०२३, आणि गु.र.नं ४३७/२०२३ कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि २६/05/2023 रोजी सकाळी ९:१० वाजता मुंडे चौक बोधेगाव येथे एक टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा एम एच क्रमांक ३२ क्यु ३७७२ डंपर रोडवरून जात असताना त्यास थांबविले असता डंपर चालकास ताब्यात घेऊन त्यांस नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव एकनाथ पांडुरंग मिसाळ वय ३४ वर्षे राहणार बोधेगाव तालुका शेवगाव असे सांगितले सदर डंपर चालकास वाळू वाहतूकीच्या परवाना बाबत माहिती विचारली असता त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही.सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच  दि २४/05/2023 रोजी भगतसिंग चौक शेवगाव या ठिकाणाहून टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा एम एच क्रमांक १७ ए जी ५०५० डंपर चालकास वाळू वाहतूक सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल परवाना संदर्भात माहिती विचारली असता सदर डंपर चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीर वाळू वाहतूक केली असल्याने शेवगाव पोलिस स्टेशन येथे सदर डंपर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे *या दोन्ही कारवाईमध्ये तब्बल १५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कौतुकास्प़द कामगिरी मा.पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला सो ,मा.अप्प़र पोलीस अधिक्षक सो श्री. प्रशांत खैरे साहेब , मा.उपविभागीय  पोलीस अधिकारी श्री.संदिप मिटके सो श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.विलास पुजारी,सपोनि/आशिष शेळके,चापोना/ रविंद्र शेळके,चापोना/बाळासाहेबनागरगोजे   ,पोकॉ/ बप्पासाहेब धाकतोडे,पोकॉ/  राहुल खेडकर यांनी सदरची कामगिरी  केली आहे.

बेलापुर (प्रतिनिधी )-येथील अभिषेक दिलीप दुधाळ याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर तिसऱ्यांदा युपीएससी परिक्षेत घवघवीत यश मिळवीले असुन नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससीच्या निकालात २७८ क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवीला आहे                                  अभिषेक दिलीप दुधाळ याने यापूर्वी वयाच्या २३ व्या वर्षी युपीएससी परिक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवीला होता त्या वेळी त्याला ६३७ रँंक मिळाली होती त्याला इंडीयन रेल्वे ट्रँफीक सर्व्हीस आयआरटीएस गृप ए हे पद मिळाले या ठिकाणी सेवेत हजर होवुन पुन्हा परीक्षा देण्याचा त्याने निर्णय घेतला अन अभ्यास सुरुच ठेवला दररोज सात तास नियमित अभ्यास सुरु ठेवला म्हणतात ना प्रयत्नांती परमेश्वर त्याप्रमाणे त्याने २०२० मध्ये दिलेल्या युपीएससी परिक्षेत देशात ४६९ वा रँंक मिळवीला  इंडीयन पोलीस सर्व्हीस हे पद मिळवुन हैद्राबाद येथे प्रशिक्षण सुरु झाले यावरही समाधान मानेल तो अभिषेक कसला त्याने पुन्हा नियमित अभ्सास सुरुच ठेवला अन पुन्हा  परिक्षा दिली व नुकताच युपीएससी परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यात त्याला २७८ रँक मिळाले आहे सलग तिन वेळा परिक्षा देवुन तिनही वेळेस वरची रँक मिळवीणारे अभिषेक दुधाळ यांचे प्राथमिक शिक्षण बेलापुर तसेच जेटीएस हायस्कूल बेलापुर  येथे झाले  त्यापुढील शिक्षण मुंबई येथील वीर जिजामाता अभियांत्रिकी शिक्षण संस्थेत माहीती व तंत्रज्ञान विभागात पदवी प्राप्त केली आयटी क्षेत्रातील चांगल्या पगाराची नोकरी सोडून प्रशासकीय सेवेत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला याकरीता वडील दिलीप व आई संगीता दुधाळ यांची तसेच गुरुजन वर्ग तसेच मित्रांची मोलाची साथ मिळाली  दिल्ली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात जेएनयू एमए अर्थशास्र विभागासाठी प्रवेश घेतला त्याकरीता खाजगी शिकवणी लावली नंतर स्वंय अध्यापन करण्याचा निर्णय घेतला व कठोर अशी मेहनत घेवुन सलग तिसऱ्यांदा युपीएससी परीक्षेत यश मिळवीले याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) - निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसे राज्यातील वातावरण खराब करायचा प्रयत्न काही प्रतिगामी शक्ती करीत आहेत. अकोला, शेवगाव येथे हे प्रयोग झालेले आहेत. श्रीरामपूर सुद्धा अशा पद्धतीने अशांत करून श्रीरामपूरची शांतता धोक्यात आणून आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा डाव वेळोवेळी आखला जात असतो.यातूनच काल हजरत काजीबाबा उर्सानिमित्ताने निघालेल्या चादरीवर गोंधवणी गावांमध्ये दगडफेक करून वातावरण खराब करायचा प्रयत्न काही समाजकंटक यांनी केला. मात्र कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम,पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी व त्यांच्या टीमने अत्यंत कौशल्याने परिस्थिती हाताळली व शहराच्या शांततेला गालबोट लावण्याचा करण्यात आलेला प्रयत्न हाणून पाडला.एवढेच नव्हे तर ज्या दुकानदारांनी घाबरून दुकाने बंद केली होती ती त्यांना तातडीने उघडायला लावली तसेच काजी बाबांच्या कव्वालीच्या कार्यक्रमात कोणताही खंड न पडू देता सुरळीतपणे रात्री बारा वाजेपर्यंत ती पार पडली. त्यामुळे ज्या ठिकाणी कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी असतात तिथली कायदा व सुव्यवस्था अबाधित राखली जाते याचा प्रत्येक काल श्रीरामपूरकरांना आला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्वाती भोर मॅडम या स्वतः हेल्मेट लावून बंदोबस्तासाठी रस्त्यावर उतरल्या आणि शहराचं वातावरण खराब करणाऱ्या प्रवृत्तीचा बिमोड केला. त्याबद्दल सर्व शहरवासीय त्यांना धन्यवाद देत आहेत.

दंगलीसाठी बऱ्याचदा शुल्लक कारणे देखील पुरेशी असतात. हजरत काजीबाबा म्हणजे श्रीरामपूरचे जिवंत प्रतीक होते. त्यांचा उरूस अतिशय भक्तिभावाने दरवर्षी साजरा केला जातो. पन्नास वर्षाची परंपरा या उरुसाला आहे. काजी बाबा उर्सानिमित्त होणाऱ्या कव्वाल्या या महाराष्ट्रभर गाजत असतात. काजीबाबांचा भक्त परिवार शहरात सर्वत्र असल्यामुळे विविध भागातून ऊर्सा निमित्ताने चादरी दर्ग्यावर येतात. अशीच एक चादर काल गोंधवणी गावातून येत असताना गोंधवणी रोड वरील गुंड प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी वाद घालून त्या ठिकाणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. गोंधवणी रोडची ही गुंड टोळी पोलीस रेकॉर्डवर सुद्धा आहे.त्यांच्या गुंडगिरीने संपूर्ण परिसर, तेथील महिला भगिनी, तरुण मुली वैतागलेल्या आहेत. अशा या गुंड प्रवृत्तींनी काल चादरीचे निमित्त करून शहरात अशांतता निर्माण करण्याचा व दंगल सदृश्य परिस्थिती तयार केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून चादर काढणाऱ्या तरुणांनी सुद्धा माणसं गोळा करायचा प्रयत्न केला होता.हे प्रकरण जर वाढले असते तर श्रीरामपूरची शांतता काल बिघडली असती. परंतु सर्व कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थिती अत्यंत कौशल्याने हाताळल्याने राज्यात होणारी संभाव्य एक दंगल टळली असे म्हणता येईल.

अलीकडच्या काही दिवसांमध्ये श्रीरामपूर शहराची शांतता व सुव्यवस्था बिघडवण्याचे प्रयत्न होत आहेत. परराज्यातील माणसे बोलावून प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. श्रीरामपूरला शांततेची वेगळी परंपरा आहे. सर्व जाती-धर्माचे लोक अत्यंत गुण्यागोविंदाने येथे नांदतात. निवडणूक जवळ आली की काही लोकांच्या अंगात येते. कधी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून तर कधी अन्य कारणावरून लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु शहरातील जनता अत्यंत सुज्ञ असल्यामुळे ती या माथेफिरूंच्या अशा प्रयत्नांना बळी पडत नाही. परंतु दरवेळी अशा पद्धतीने निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काहीतरी कारण शोधून खोटे-नाटे प्रयत्न करून शहराची शांतता व सुव्यवस्था वेठीस धरली जाते.अशा गुंड प्रवृत्तींचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. सध्या श्रीरामपुरात गुंडांना महत्त्व आले आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले गुंड उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना सत्ताधारी राजकीय पक्षाचे काही लोक मदत करीत असल्याची खुली चर्चा शहरामध्ये आहे. नगरपालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा हिंदू - मुस्लिम विरोधी वातावरण निर्माण करून,मते मिळवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन लोकांची माथी भडकवण्याचे काम सध्या सुरू आहे. मात्र खरोखरच श्रीरामपूरकरांना धन्यवाद दिले पाहिजे कि ते अत्यंत समजूतदारपणे या लोकांच्या या प्रयत्नांना बळी पडत नाही. तरी सुद्धा भविष्य काळामध्ये श्रीरामपूरची शांतता अबाधित राखण्यासाठी दोन्ही बाजूला असणाऱ्या गुंड प्रवृत्तीचा बिमोड करून त्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे. शहरांमध्ये काही ठराविक गट असे निर्माण झाले आहेत कि ते राजरोसपणे दोन नंबरचे धंदे उजळ माथ्याने करीत आहेत. वाळू सम्राटांचे आता धाबे दणाणले आहेत. मटका जोरात आहे. हप्ते वसुली जोरात आहे.

पोलीस खात्याचे काही कर्मचारी या गुंडांचे हस्तक म्हणून काम करीत आहेत. त्यामुळे गुंडांचे मनोबल वाढले आहे. सर्वसामान्य जनता मात्र त्यामुळे त्रासलेली आहे. सार्वजनिक उत्सवाच्या नावाखाली जबरदस्तीने वर्गणी गोळा करून अनेक कार्यक्रम मागील दोन महिन्यात शहरात झालेले आहेत. थोडसं जरी कुठे खट्ट वाजलं तरी बाजारपेठेतील व्यापारी भीतीने आपली दुकाने बंद करतात.ही भीती दूर करण्याचे काम पोलीस प्रशासनाने केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सुद्धा याबाबत जागरूक होऊन लक्ष घालणे गरजेचे आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना श्रीरामपूरची सर्व परिस्थिती माहिती आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग शहर व तालुक्यामध्ये आहे. सर्व समाजामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांनी देखील श्रीरामपूरची शांतता व सुव्यवस्था बिघडणार नाही यासाठी प्रशासनाला योग्य त्या सूचना देण्याची गरज आहे. त्यासाठी व्यापक स्वरूपामध्ये श्रीरामपूर शहरांमध्ये शांतता कमिटीची बैठक पालकमंत्र्यांचे उपस्थितीमध्ये होण्याची आवश्यकता आहे.

गुंड प्रवृत्तीचे लोक सर्वत्र असतात. दोन्ही बाजूने अशा गुंड लोकांचा बंदोबस्त होऊन शहरातील नागरिकांना शांततेत जीवन कसे जगता येईल, येणाऱ्या काळातील निवडणुकांना कोणत्याही प्रकारे गालबोट लागणार नाही यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.


श्रीरामपूर-अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून प्रस्तावित श्रीरामपूर जिल्हा करण्याची मागणी अंतिम टप्प्यात असताना त्या मागणीला सुरुंग लावून जिल्ह्याचे मुख्यालय शिर्डी येथे नेण्याचा घाट पालकमंत्र्यांनी घातला असून आगामी काळात अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 70 कोटी रुपयांची तरतूद मंजूर करून घेऊन सदरचे कार्यालयाची इमारत शिर्डीमध्ये बांधण्यासाठी शेती महामंडळाची जागा महसूल खाते अंतर्गत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न देखील झाला आहे. त्यामुळे श्रीरामपूर जिल्हा होण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आहे. याबाबत श्रीरामपूर तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी जागरूक होऊन या प्रश्नी आवाज उठवावा व शेती महामंडळाची जागा श्रीरामपूर परिसरात देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने सदरचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपूरात होण्यासाठी प्रयत्न करावे व त्यासाठी तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारावे अशी मागणी श्रीरामपूर जिल्हा प्रेमी नागरिकांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी विकास आराखड्याची घोषणा करतांना शिर्डीमध्ये अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीसाठी शेती महामंडळाची जागा उपलब्ध करण्यात आली असून त्यासाठी 70 कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे सुतोवाच केले. सदरची बातमी प्रसार माध्यमातून प्रसारित होताच श्रीरामपूर जिल्हा प्रेमींमध्ये एकच खळबळ निर्माण होऊन तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

 1991 साली सोनई येथे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून श्रीरामपूर जिल्हा करण्याची घोषणा केली. तेव्हापासून गेली 32 वर्षे श्रीरामपूर जिल्ह्याचा प्रश्न प्रलंबित आहे. श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अनेक आंदोलने झाली. शासनाच्या विविध खात्यांनी केलेल्या शिफारशीनुसार जिल्ह्यासाठी श्रीरामपूर हेच ठिकाण योग्य आहे यावर शासन पातळीवर एक मत देखील झाले. मात्र मागील काळामध्ये संगमनेरचे बाळासाहेब थोरात महसूल मंत्री असल्याने त्यांनी श्रीरामपूर जिल्हा होऊ दिला नाही तसेच राधाकृष्ण विखे पाटील देखील गेले अनेक वर्षे मंत्री आहेत. मात्र त्यांनी देखील याबाबत फारसे प्रयत्न केले नाहीत.

श्रीरामपूर तालुक्याचे भूमिपुत्र माजी मंत्री कै.गोविंदराव आदिक व माजी आमदार कै.जयंत ससाणे यांनी श्रीरामपूर जिल्ह्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. आदिक साहेबांनी आपल्या मंत्रिपदाच्या काळात त्यासाठी आवश्यक त्या सर्व शिफारसी घेऊन जिल्हा विभाजनाच्या फाईलवर मुख्यमंत्र्यांची सही देखील घेऊन ठेवली आहे. श्रीरामपूर जिल्हा घोषित होत असतांना विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत मेन रोडवर झालेल्या कार्यक्रम प्रसंगी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ऐनवेळी उठून मुख्यमंत्र्यांना विनंती केल्याने तो निर्णय घोषित झाला नाही आणि तेव्हापासून श्रीरामपूर जिल्ह्याचे भिजत घोंगडे पडले आहे.

 सध्या श्रीरामपूर तालुक्याला प्रभावी नेतृत्व नसल्यामुळे श्रीरामपूर जिल्ह्याचा हाता तोंडाशी आलेला घास काढून घेण्याचे कारस्थान रचले जात आहे. त्यासाठी श्रीरामपुरातील सर्वपक्षीय नेते मंडळींनी एकत्र येऊन श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी नियोजित अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची वास्तू श्रीरामपूर तालुक्यात झाली पाहिजे यासाठी जोरदार आंदोलन करण्याची गरज आहे. श्रीरामपूर परिसरामध्ये शेती महामंडळाची जमीन मोठ्या प्रमाणात आहे. महसूल खात्याच्या अंतर्गत ही बाब येत असल्याने महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना साकडे घालून शिर्डी येथे होऊ घातलेले अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय श्रीरामपुरातच झाले पाहिजे यासाठी वेळप्रसंगी बेमुदत श्रीरामपूर बंद ठेवून आंदोलन करावे अशी भावना सर्वसामान्य श्रीरामपूरकरांनी व्यक्त केली आहे. 

विद्यमान आमदार लहूजी कानडे यांनी याबाबत पुढाकार घेऊन श्रीरामपुरात सर्व पक्षीयांना सोबत घेऊन आंदोलन उभारावे तसेच श्रीरामपूर जिल्हा कृती समितीने देखील यामध्ये आता मागे राहू नये. कारण *अभी नही तो कभी नही* या न्यायाने श्रीरामपूर जिल्ह्याचा अंतिम टप्प्यात आलेला प्रश्न सोडविण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात यावे यासाठी सर्व श्रीरामपूरकर सज्ज आहेत अशा भावना तालुक्यातून व्यक्त होत आहे.


खंडाळा प्रतिनिधी -दि.१४ मे २०२३ पासून मारुती मंदिर, खंडाळा येथे ७ दिवसीय श्रीमद भागवत कथेचे दररोज सायं.७ ते ९ या वेळेत आयोजन करण्यात येणार आहे.यांच कार्यक्रमासंदर्भात आज *भागवताचार्य महंत स्वामी अरुणनाथगिरीजी महाराज* (मठाधिपती,श्री क्षेत्र अडबंगनाथ देवस्थान) हस्ते भूमिपूजन व धर्मध्वजाच्या अनावराणाचा कार्यक्रम विधिवत संपन्न झाला.यावेळी मार्गदर्शन करताना महाराज म्हणाले की,जिथे भागवत पारायण होते तिथे प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण साक्षात

विराजमान होतात.जो भागवत ग्रंथाचे श्रवण-पठण करतो तो आपल्या वडिलांचे कुळ,आईचे कुळ आणि पत्नीचे कुळ या तीनही कुळांचा उद्धार होतो.ते पुढे म्हणाले की धर्मध्वजाचे महत्त्व म्हणजे साक्षात हनुमानजी या ध्वजावर गावाच्या रक्षणासाठी विराजमान होतात.श्रीमद भागवत कथेने संपूर्ण गावाचे कल्याण होणार आहे म्हणूनच जास्त जास्त संख्येने या कथेचा लाभ घ्यायचा आहे.श्रीमद् भागवत कथेचं आयोजन केल्याबद्दल नगरकर कुटुंबियांचं महाराजांनी अभिनंदन केले तसेच गावकऱ्यांना या कथेचा प्रचार प्रसार जास्त संख्येने करण्याचे आवाहन केले.

🚩🚩 श्रीमदभागवतकथा 🚩🚩

रविवार 🔶दि.१४ ते २१ मे २०२३ 

दररोज संध्याकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत 🔶 

मारुती मंदिर,खंडाळा,श्रीरामपूर 

 🚩🚩🚩

बेलापुर  (प्रतिनिधी )-विश्व प्रेस स्वतंत्रता दिनाचे औचित्य साधुन पिछडा वर्ग आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे नवनाथ कुताळ यांना जाहीर झाला आहे                जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन पिछडा वर्ग आयोग नवी दिल्ली यांच्या वतीने प्रिंट मिडीया व ईलेक्ट्रिक माध्यमातून काम करणाऱ्या पत्रकारांना कलम के सिपाही या पुरस्कार दिले जातात.जागतिक वृत्तपत्र स्वतंत्रता दिनानिमित्त पिछडा वर्ग आयोगाचे चेअरमन जगदीश यादव सचिव रणजित सिंह डाँक्टर भरत झा ,डाँक्टर धर्मपाल भारद्वाज यांनी देशभरातून पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांची कलम के सिपाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आले त्यात बेलापूरचे पत्रकार नवनाथ कुताळ यांच्यासह देशभरातुन पंकज अग्रवाल संत्येंद्र त्रिपाठी ब्रिजेश शर्मा के डी पाठक ,राकेश कुमार सिंह ,नविन गौतम ,आरती , मनोरंजन कुमार ,ज्ञान प्रकाश,शैलेंद्र पांडे, सुशील गर्ग ,संदीप गुलाटी ,दिपीका जयस्वाल ,राजेश जाँन हरजिंदरसिह महेश देशपांडे ,मिलींद देखणे ,प्रदीप पेंढारे विनायाक लांडे ,ईम्रान शेख ,अनुप चावला आदिंचा समावेश आहे

बेलापुर - (प्रतिनिधी  )-तालुक्यातील बेलापूर येथील वीज उपकेंद्रात असणाऱ्या रोहित्राची क्षमता कमी पडत असल्याने ओव्हरलोड होऊन वारंवार वीज पुरवठा खंडित होण्यामुळे ग्राहक वैतागून गेले आहेत.मात्र आता एका रोहित्राची पाच एमव्हीए एवढी क्षमता वाढवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याची माहिती उद्योजक जितेंद्र तोरणे यांनी दिली आहे.

      या बाबता माहीती देताना उद्योजक तोरणेयांनी सांगितले की बेलापूर येथे ३३ केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र असून येथे ५ एमव्हीए क्षमतेचे तीन व ३.१५ एमव्हीए क्षमतेचे एक असे एकूण १८.१५ एमव्हीए क्षमतेचे एकूण चार रोहित्र आहेत.या वीज उपकेंद्रातून बेलापूर,ऐनतपूर, बेलापूर खुर्द,नरसाळी,उक्कलगाव, वळदगाव,उंबरगाव,पढेगाव,मालुंजा,लाडगाव,कान्हेगाव आदी गावातील सुमारे दहा हजार पेक्षा जास्त ग्राहकांना वीज पुरवठा होतो.मात्र मागणी जास्त होत असल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होणे,बिघाड होणे आदी प्रकार होतात. या प्रकारांमुळे ग्राहक वैतागले असून यातून सुटका करण्याची मागणी वारंवार ग्राहक करीत होते.याबाबत खासदार सदाशिव लोखंडे यांनी २३ फेब्रुवारी २०२३ रोजी उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले होते.त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २९ मार्च रोजी महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक यांना कार्यवाहीबाबत अवगत केले.त्यावर त्यांनी नाशिक विभागाचे मुख्य अभियंता पुढील कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून त्याचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.हा प्रस्ताव सादर होऊन अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर बेलापूर वीज उपकेंद्रातील रोहित्राची क्षमता वाढून विजेच्या खेळखंडोबाच्या जाचातून ग्राहकांची सुटका होणार आहे.

       दरम्यान याबाबत पाठपुरावा करून कार्यवाही केल्याबाबत जितेंद्र तोरणे व रणजित बनकर यांनी खासदार लोखंडे यांचे आभार मानले आहेत.तोरणे यांनी श्रीरामपूर येथे होणाऱ्या २२० केव्ही वीज केंद्रासाठीही विशेष पाठपुरावा केला आहे.त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली होती.अनेक वेळा निवेदन देऊनही पाठपुरावा केला होता.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget